साधुसंगतीचा लाभ
गेल्या पंधरवड्यात पुणे येथे एक भव्य आणि दिव्य अशा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील विविध नगरातून तथा विदेशातून अनेक भक्त या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रतिवर्षी एवढ्या मोठ्या सत्संगाचे आयोजन करण्यामागे हेतू काय आहे? असा प्रश्न नवोदित भक्त नेहमीच विचारतात. अर्थात या सत्संगाचा हेतू हाच असतो की शुद्ध भक्तांची दिव्य कृपा प्राप्त करणे. कारण शुद्ध भक्तांच्या दिव्य संगतीने, त्यांच्या दिव्य वाणीने, त्यांच्या चरणकमळांची धूळ मस्तकी धारण केल्याने सामान्य मनुष्य आपल्या भक्तिपूर्ण सेवेची पूर्णावस्था तात्काळ प्राप्त करू शकतो.
लोक भक्तिपूर्ण जीवनातील सर्वोच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारची तपस्या करतात. कोणी वेदांचे अनुसरण करतात. कोणी विविध उपासनांचा अंगिकार करतात. कोणी घरादाराचा त्याग करून संन्यासाश्रमाचा अंगिकार करतात. तर पुष्कळजण गृहस्थाश्रमातील कर्तव्यांचे पालन करतात, काहीजण वेदमंत्रांचे पठण, होमहवन करतात. तर काहीजण कडक सूर्यप्रकाशात किंवा थंड पाण्यात किंवा भडकत्या अग्नीसमोर साधना करतात आणि समजतात की त्यांना भक्तिपूर्ण जीवनाची सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली आहे. परंतु शुद्ध भक्तिचे परिपक्क फळ असे श्रीमद्भागवत महापुराण सांगते की शुद्ध भक्तांची चरणधूळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणीही भक्तिपूर्ण सेवेची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाही.
भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात - कोणीही आपल्या वैयक्तिक प्रयत्नाने किंवा दुसऱ्यांच्या सांगण्याने आपले जीवन सुधारू शकत नाही. परंतु जर का त्याने शुद्ध भक्तांच्या चरणधूळीचे स्नान केले तर तो तात्काळ आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शुद्ध भक्तांच्या मालकीचे धन आहे. यास्तव शुद्ध भक्तांच्या कृपेशिवाय परस्पर श्रीकृष्णांना प्राप्त करणे शक्य नाही. स्वतः श्रीकृष्ण सांगतात की साधू माझ्या हृदयात निवास करतात आणि मी त्यांच्या हृदयात निवास करतो. ते माझ्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाहीत आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाही. जो कोणी माझा भक्त म्हणवतो तो माझा भक्त नव्हे, तर जो माझ्या भक्तांचा भक्त आहे तो माझा खरा भक्त आहे.
म्हणून कोणीही असल्या तसल्या कोणत्याही मार्गाने भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकत नाही. श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा सरळ मार्ग म्हणजे त्यांच्या शुद्ध भक्तांची संगती करणे आणि त्यांच्याकडून कोणतीही भौतिक गोष्ट न मागणे आणि सत्संगाची तीव्रतेने मागणी करणे. यास्तव श्रीचैतन्य महाप्रभू सांगतात - साधु संग साधु संग सर्व शास्त्र कय । लव मात्र साधु सांगे सर्व सिद्धि हय ।।
गेल्या पंधरवड्यात पुणे येथे एक भव्य आणि दिव्य अशा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील विविध नगरातून तथा विदेशातून अनेक भक्त या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रतिवर्षी एवढ्या मोठ्या सत्संगाचे आयोजन करण्यामागे हेतू काय आहे? असा प्रश्न नवोदित भक्त नेहमीच विचारतात. अर्थात या सत्संगाचा हेतू हाच असतो की शुद्ध भक्तांची दिव्य कृपा प्राप्त करणे. कारण शुद्ध भक्तांच्या दिव्य संगतीने, त्यांच्या दिव्य वाणीने, त्यांच्या चरणकमळांची धूळ मस्तकी धारण केल्याने सामान्य मनुष्य आपल्या भक्तिपूर्ण सेवेची पूर्णावस्था तात्काळ प्राप्त करू शकतो.
लोक भक्तिपूर्ण जीवनातील सर्वोच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारची तपस्या करतात. कोणी वेदांचे अनुसरण करतात. कोणी विविध उपासनांचा अंगिकार करतात. कोणी घरादाराचा त्याग करून संन्यासाश्रमाचा अंगिकार करतात. तर पुष्कळजण गृहस्थाश्रमातील कर्तव्यांचे पालन करतात, काहीजण वेदमंत्रांचे पठण, होमहवन करतात. तर काहीजण कडक सूर्यप्रकाशात किंवा थंड पाण्यात किंवा भडकत्या अग्नीसमोर साधना करतात आणि समजतात की त्यांना भक्तिपूर्ण जीवनाची सर्वोच्च अवस्था प्राप्त झाली आहे. परंतु शुद्ध भक्तिचे परिपक्क फळ असे श्रीमद्भागवत महापुराण सांगते की शुद्ध भक्तांची चरणधूळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणीही भक्तिपूर्ण सेवेची पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाही.
भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात - कोणीही आपल्या वैयक्तिक प्रयत्नाने किंवा दुसऱ्यांच्या सांगण्याने आपले जीवन सुधारू शकत नाही. परंतु जर का त्याने शुद्ध भक्तांच्या चरणधूळीचे स्नान केले तर तो तात्काळ आपल्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त करू शकतो. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या शुद्ध भक्तांच्या मालकीचे धन आहे. यास्तव शुद्ध भक्तांच्या कृपेशिवाय परस्पर श्रीकृष्णांना प्राप्त करणे शक्य नाही. स्वतः श्रीकृष्ण सांगतात की साधू माझ्या हृदयात निवास करतात आणि मी त्यांच्या हृदयात निवास करतो. ते माझ्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाहीत आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाही. जो कोणी माझा भक्त म्हणवतो तो माझा भक्त नव्हे, तर जो माझ्या भक्तांचा भक्त आहे तो माझा खरा भक्त आहे.
म्हणून कोणीही असल्या तसल्या कोणत्याही मार्गाने भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकत नाही. श्रीकृष्णांना प्रसन्न करण्याचा सरळ मार्ग म्हणजे त्यांच्या शुद्ध भक्तांची संगती करणे आणि त्यांच्याकडून कोणतीही भौतिक गोष्ट न मागणे आणि सत्संगाची तीव्रतेने मागणी करणे. यास्तव श्रीचैतन्य महाप्रभू सांगतात - साधु संग साधु संग सर्व शास्त्र कय । लव मात्र साधु सांगे सर्व सिद्धि हय ।।
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा