लाखो बुवा बापू आहेत मग भारत गरीब का आहे?
आपल्या भारतात नेहमीच विचारला जाणारा प्रश्न ! प्राचीन काळापासून आपल्या देशात वैदिक संस्कृती नांदत आहे. यातील एक अविभाज्य घटक आहे 'साधू-संत'! अन्य युगांमध्ये साधू-संत अर्थात ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेत समर्पित केले आहे आणि जे लोक भगवंतांपासून विमुख होऊन या भौतिक जगात दुःख भोगत आहेत अशांचा उद्धार करण्यासाठी झटत आहेत. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी अशा साधूंचे वर्णन अशाप्रकारे केले आहे - ' जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा।' स्वतः तुकाराम महाराज आपल्या वचनांनुसार वागत असत. का? कारण त्यांना भगवद्भक्ती कळलेली होती. त्यांना स्वतःला धनसंपत्तीची आवश्यकता भासत नसे. परंतु कोणी गोरगरीब त्यांच्यापाशी आला तर ते त्याला निश्चित साहाय्य करीत. महाराज त्याला केवळ आर्थिक साहाय्य करून त्याला त्याची इंद्रियतृप्ती वाढविण्यासाठी साहाय्य करीत नसत, तर त्याला या क्षणभंगूर दुःखमय जगाची जाणीव सुद्धा करून देत आणि त्याला श्री विठ्ठलांच्या चरणकमळांजवळ आणून त्याचा उद्धार करीत.
परंतु आता असे साधू भेटणे दुरापस्त झाले आहेत. कारण हे कलियुग आहे. कलह आणि दंभ यांनी भरलेल्या या युगात सत्य कथन करणाऱ्या साधूंची वानवा आहे. एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे -
सीदन्ति सन्तो विलसंत्यसन्त: पुत्रा म्रियन्ते जनकश्चिरायु:।
परेषू मैत्री स्वजनेषु वैरं पश्यन्तु लोका: कलिकौतुकानि।।
'संत सज्जनांना यातना भोगाव्या लागतात , तर दुष्ट दुर्जन वैभवात लोळतात! पुत्र मृत्यू पावत आहेत, तर पिता चिरायू होत आहे! परक्यांशी मैत्री आणि स्वजनांशी वैर केले जात आहे! लोकहो, हा कलियुगाचा चमत्कार पहा.'
जे वास्तविक संत आहेत ते तुकाराम महाराजांप्रमाणे खरीखुरी शिकवण देतात - 'गीता-भागवत करिती श्रावण। अखंड चिंतन विठोबाचे । ' आणि जे बुवा, बापू, बाबा, अम्मा इत्यादी लोक याच्या विपरीत शिकवण देऊन लोकांना भ्रमित करतात ते सर्वजण लुच्चे आणि धूर्त आहेत. अशांच्या नादाला लागून लोक आपले जीवन व्यर्थ घालवत आहेत. जसे देवाधर्माच्या नावाने फसवणूक करणारे बाबा-बुवा आहेत तसेच देव अस्तित्वात नाही, देव माणसाने निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे, बामणाने आपले पोट भरण्यासाठी हे सर्व थोथांड निर्माण केले आहे, मी देव मनात नाही, मानव सेवा हीच माधव सेवा आहे इत्यादी बडबड करणारेही बाबा लोकही तेवढेच लबाड आहेत. असे लोक कधी देशसेवा तर कधी समाजसेवा, रुग्णाची सेवा तर कधी गरिबांची सेवा इत्यादी गोंडस नावाखाली लोकांची फसवणूक करतात. समाजसेवी संस्था काढून अंधश्रद्ध निर्मूलनाच्या नावाखाली परदेशातून प्रचंड पैसे मिळवून थोडीफार समाजसेवा करतात आणि बाकीचा पैसा आपल्यासाठी वा आपल्या कुटुंबियांसाठी वापरतात.
कधीकधी देव न मानणारे धूर्त बाबा आदिवासींची सेवा करतात त्यासाठी प्रचंड त्यागही करतात. मग विदेशी लोक त्याचा सत्कार करतात, त्यामुळे हुरळून जाऊन हे देव न मानणारे आपला मोह आवरू शकत नाहीत आणि भगवंतांच्या लीलांशी स्वतःची तुलना करून स्वतःचे मोठेपण अधोरेखित करतात. श्रीरामांची लीला न कळल्यामुळे ते बडबडतात,"वनवासात निवास करताना सीतेला सुवर्ण मृगाचा मोह झाला पण माझ्या पत्नीला माझ्या समवेत वनात राहताना कसलाही मोह झाला नाही." या वाक्यावर मूर्ख लोक टाळ्यांचा कडकडाटही करतात. आता आशा धूर्त लोकांना आमचे विचारणे असे आहे," अरे लबाडांनो, जर भगवंत अस्तित्वात नाहीत, तुम्ही देव मानतच नाहीत तर मग आमचे आराध्य भगवान श्री श्री सीता राम यांचे उदाहरण का घेता? ज्या ज्ञानोबा-तुकोबांनी ज्यांच्या पवित्र नामाचा सतत गजर करून लक्षावधी पामरांचा उद्धार केला आहे आणि आजही करीत आहेत, त्यांच्या आराध्य भगवंतांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आपल्याला जर श्री रामांवर विश्वास नाही, आपल्या बोडक्यात रामलीला शिरत नाही वा कळतही नाही तर त्यांचे नाव घेऊन स्वतःचा डंका का वाजवता? बरे सीतेला सोनेरी हरिणाचा मोह झाला आणि तुमच्या बायकोला झाला नाही ही आत्मप्रौढी कशाला हवी? भगवदलीला न जाणताच स्वतःचे गुणगान गाण्यापेक्षा जरा हेही जाणून घ्या की तुम्हालाही मोह झाला आहे की नाही? अरे, मोह झाल्याविनाच तुम्हाला मुलेबाळे झाली का? शारीरिक आकर्षणाच्या मोहानेच मुलेबाळे होतात हे आपणास बहुदा माहित नसावे!" असो!
कधीकधी सवंग लोकप्रियता वा सरकारी मानसन्मान मिळावा यासाठी काही थोर संत साहित्याचे अभ्यासकही अशा नास्तिकांना धर्मसुधारक म्हणून त्यांची नसलेली थोरवी गातात. तर हे विशेष प्रकारचे ढोंगी बुवा समाजात मोठ्याप्रमाणावर वाढत आहेत. त्यांच्यापासूनही सावध राहायला हवे.
खरा साधू आणि खोटा साधू ओळखण्यासाठी सुद्धा दिव्य वेद ज्ञानाची आवश्यकता असते. छत्रपती शिवरायांच्या आचरणातून आपण हे शिकू शकतो. शिवरायांनी योग्य साधुसंतांची उत्तमप्रकारे काळजी घेतली होती आणि ढोंगी लोकांना दंडीतही केले होते.
आमची फसवणूक करणारे बाबा बुवा आम्हालाच का भेटतात? कारण आमची वृत्तीही तशीच आहे. लबाडाला लुबाडच गाठ पडणार! जर आपल्या अंतःकरणात खरोखर प्रामाणिकपणे भगवंतांना जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला खरा साधूच भेटणार.
आज भारतात आणि विश्वभरात धंदेवाईक, ढोंगी गुरु, बापू वा बुवांचे प्रस्थ वाढले आहे. तुमची दुःखे मी हरण करिन तुम्ही माझ्याच नावाचा जप करा कारण कलियुगात मीच अवतार आहे अशी भलावण करणारे लुच्चे गुरु अनेक झालेले आहेत. पैशाचा पाऊस पडणारे, हवेतून काहीतरी काढून देणारे सुद्धा आहेत. अशांचे अचूक वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले आहे -
ऐसे संत झाले कळी। तोंडी तंबाखूची नळी।।
स्नानसंध्या बुडाली| पुढे भांग वाढविली ।।
भांग भुर्का हे साधन । पची पडे मद्यपान ।।
तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ।।
या कलियुगात असे तथाकथित संत असून त्यांच्या तोंडी तंबाकूची नळी (सिगारेट, बिडी, हुक्का, चिलीम इत्यादी ) असते. त्यांनी स्नान संध्या इत्यादी आचार बुडवून भांग ओढण्याची प्राप्ती केलेली आहे. भांग, दारू, वाईन, चहा, कॉफ़ी इत्यादी मद्यपान सभ्यतेचे लक्षण झाले आहे. हेच त्यांच्या पचनी पडले आहे. हे सर्वजण ढोंगी असल्यामुळे त्यांचे ठायी पांडुरंग कसा असेल?
कोणताही प्रामाणिक आणि प्रमाणित सदगुरु, साधू, संत, बापू वा बुवा वेदांचे सार अर्थात गीता-भागवत सोडून अन्य कोणताही उपदेश करीत नाही.
श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात -
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।
वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन । एक नारायण सार जप ।।
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ।।
हरिपाठे गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ।।
ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र । याने कुळगोत्र वर्जियलें ।।
वेद ज्ञानाचे सत्य अचूकतेने पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका खऱ्या साधूला पार पाडावी लागते. अशा संतांच्या मार्गाचे अनुसरण आम्ही केले तर आम्ही सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो.
(अपूर्ण)
© विनय शंकर गोडसे
संपर्क - ९२४२१७६५८७
आपल्या भारतात नेहमीच विचारला जाणारा प्रश्न ! प्राचीन काळापासून आपल्या देशात वैदिक संस्कृती नांदत आहे. यातील एक अविभाज्य घटक आहे 'साधू-संत'! अन्य युगांमध्ये साधू-संत अर्थात ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेत समर्पित केले आहे आणि जे लोक भगवंतांपासून विमुख होऊन या भौतिक जगात दुःख भोगत आहेत अशांचा उद्धार करण्यासाठी झटत आहेत. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी अशा साधूंचे वर्णन अशाप्रकारे केले आहे - ' जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा।' स्वतः तुकाराम महाराज आपल्या वचनांनुसार वागत असत. का? कारण त्यांना भगवद्भक्ती कळलेली होती. त्यांना स्वतःला धनसंपत्तीची आवश्यकता भासत नसे. परंतु कोणी गोरगरीब त्यांच्यापाशी आला तर ते त्याला निश्चित साहाय्य करीत. महाराज त्याला केवळ आर्थिक साहाय्य करून त्याला त्याची इंद्रियतृप्ती वाढविण्यासाठी साहाय्य करीत नसत, तर त्याला या क्षणभंगूर दुःखमय जगाची जाणीव सुद्धा करून देत आणि त्याला श्री विठ्ठलांच्या चरणकमळांजवळ आणून त्याचा उद्धार करीत.
परंतु आता असे साधू भेटणे दुरापस्त झाले आहेत. कारण हे कलियुग आहे. कलह आणि दंभ यांनी भरलेल्या या युगात सत्य कथन करणाऱ्या साधूंची वानवा आहे. एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे -
सीदन्ति सन्तो विलसंत्यसन्त: पुत्रा म्रियन्ते जनकश्चिरायु:।
परेषू मैत्री स्वजनेषु वैरं पश्यन्तु लोका: कलिकौतुकानि।।
'संत सज्जनांना यातना भोगाव्या लागतात , तर दुष्ट दुर्जन वैभवात लोळतात! पुत्र मृत्यू पावत आहेत, तर पिता चिरायू होत आहे! परक्यांशी मैत्री आणि स्वजनांशी वैर केले जात आहे! लोकहो, हा कलियुगाचा चमत्कार पहा.'
जे वास्तविक संत आहेत ते तुकाराम महाराजांप्रमाणे खरीखुरी शिकवण देतात - 'गीता-भागवत करिती श्रावण। अखंड चिंतन विठोबाचे । ' आणि जे बुवा, बापू, बाबा, अम्मा इत्यादी लोक याच्या विपरीत शिकवण देऊन लोकांना भ्रमित करतात ते सर्वजण लुच्चे आणि धूर्त आहेत. अशांच्या नादाला लागून लोक आपले जीवन व्यर्थ घालवत आहेत. जसे देवाधर्माच्या नावाने फसवणूक करणारे बाबा-बुवा आहेत तसेच देव अस्तित्वात नाही, देव माणसाने निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे, बामणाने आपले पोट भरण्यासाठी हे सर्व थोथांड निर्माण केले आहे, मी देव मनात नाही, मानव सेवा हीच माधव सेवा आहे इत्यादी बडबड करणारेही बाबा लोकही तेवढेच लबाड आहेत. असे लोक कधी देशसेवा तर कधी समाजसेवा, रुग्णाची सेवा तर कधी गरिबांची सेवा इत्यादी गोंडस नावाखाली लोकांची फसवणूक करतात. समाजसेवी संस्था काढून अंधश्रद्ध निर्मूलनाच्या नावाखाली परदेशातून प्रचंड पैसे मिळवून थोडीफार समाजसेवा करतात आणि बाकीचा पैसा आपल्यासाठी वा आपल्या कुटुंबियांसाठी वापरतात.
कधीकधी देव न मानणारे धूर्त बाबा आदिवासींची सेवा करतात त्यासाठी प्रचंड त्यागही करतात. मग विदेशी लोक त्याचा सत्कार करतात, त्यामुळे हुरळून जाऊन हे देव न मानणारे आपला मोह आवरू शकत नाहीत आणि भगवंतांच्या लीलांशी स्वतःची तुलना करून स्वतःचे मोठेपण अधोरेखित करतात. श्रीरामांची लीला न कळल्यामुळे ते बडबडतात,"वनवासात निवास करताना सीतेला सुवर्ण मृगाचा मोह झाला पण माझ्या पत्नीला माझ्या समवेत वनात राहताना कसलाही मोह झाला नाही." या वाक्यावर मूर्ख लोक टाळ्यांचा कडकडाटही करतात. आता आशा धूर्त लोकांना आमचे विचारणे असे आहे," अरे लबाडांनो, जर भगवंत अस्तित्वात नाहीत, तुम्ही देव मानतच नाहीत तर मग आमचे आराध्य भगवान श्री श्री सीता राम यांचे उदाहरण का घेता? ज्या ज्ञानोबा-तुकोबांनी ज्यांच्या पवित्र नामाचा सतत गजर करून लक्षावधी पामरांचा उद्धार केला आहे आणि आजही करीत आहेत, त्यांच्या आराध्य भगवंतांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आपल्याला जर श्री रामांवर विश्वास नाही, आपल्या बोडक्यात रामलीला शिरत नाही वा कळतही नाही तर त्यांचे नाव घेऊन स्वतःचा डंका का वाजवता? बरे सीतेला सोनेरी हरिणाचा मोह झाला आणि तुमच्या बायकोला झाला नाही ही आत्मप्रौढी कशाला हवी? भगवदलीला न जाणताच स्वतःचे गुणगान गाण्यापेक्षा जरा हेही जाणून घ्या की तुम्हालाही मोह झाला आहे की नाही? अरे, मोह झाल्याविनाच तुम्हाला मुलेबाळे झाली का? शारीरिक आकर्षणाच्या मोहानेच मुलेबाळे होतात हे आपणास बहुदा माहित नसावे!" असो!
कधीकधी सवंग लोकप्रियता वा सरकारी मानसन्मान मिळावा यासाठी काही थोर संत साहित्याचे अभ्यासकही अशा नास्तिकांना धर्मसुधारक म्हणून त्यांची नसलेली थोरवी गातात. तर हे विशेष प्रकारचे ढोंगी बुवा समाजात मोठ्याप्रमाणावर वाढत आहेत. त्यांच्यापासूनही सावध राहायला हवे.
खरा साधू आणि खोटा साधू ओळखण्यासाठी सुद्धा दिव्य वेद ज्ञानाची आवश्यकता असते. छत्रपती शिवरायांच्या आचरणातून आपण हे शिकू शकतो. शिवरायांनी योग्य साधुसंतांची उत्तमप्रकारे काळजी घेतली होती आणि ढोंगी लोकांना दंडीतही केले होते.
आमची फसवणूक करणारे बाबा बुवा आम्हालाच का भेटतात? कारण आमची वृत्तीही तशीच आहे. लबाडाला लुबाडच गाठ पडणार! जर आपल्या अंतःकरणात खरोखर प्रामाणिकपणे भगवंतांना जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला खरा साधूच भेटणार.
आज भारतात आणि विश्वभरात धंदेवाईक, ढोंगी गुरु, बापू वा बुवांचे प्रस्थ वाढले आहे. तुमची दुःखे मी हरण करिन तुम्ही माझ्याच नावाचा जप करा कारण कलियुगात मीच अवतार आहे अशी भलावण करणारे लुच्चे गुरु अनेक झालेले आहेत. पैशाचा पाऊस पडणारे, हवेतून काहीतरी काढून देणारे सुद्धा आहेत. अशांचे अचूक वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले आहे -
ऐसे संत झाले कळी। तोंडी तंबाखूची नळी।।
स्नानसंध्या बुडाली| पुढे भांग वाढविली ।।
भांग भुर्का हे साधन । पची पडे मद्यपान ।।
तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ।।
या कलियुगात असे तथाकथित संत असून त्यांच्या तोंडी तंबाकूची नळी (सिगारेट, बिडी, हुक्का, चिलीम इत्यादी ) असते. त्यांनी स्नान संध्या इत्यादी आचार बुडवून भांग ओढण्याची प्राप्ती केलेली आहे. भांग, दारू, वाईन, चहा, कॉफ़ी इत्यादी मद्यपान सभ्यतेचे लक्षण झाले आहे. हेच त्यांच्या पचनी पडले आहे. हे सर्वजण ढोंगी असल्यामुळे त्यांचे ठायी पांडुरंग कसा असेल?
कोणताही प्रामाणिक आणि प्रमाणित सदगुरु, साधू, संत, बापू वा बुवा वेदांचे सार अर्थात गीता-भागवत सोडून अन्य कोणताही उपदेश करीत नाही.
श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात -
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।
वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन । एक नारायण सार जप ।।
जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ।।
हरिपाठे गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ।।
ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र । याने कुळगोत्र वर्जियलें ।।
वेद ज्ञानाचे सत्य अचूकतेने पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका खऱ्या साधूला पार पाडावी लागते. अशा संतांच्या मार्गाचे अनुसरण आम्ही केले तर आम्ही सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो.
(अपूर्ण)
© विनय शंकर गोडसे
संपर्क - ९२४२१७६५८७