कलीची निवास स्थाने
पाच सहस्र वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीचा त्याग केला आणि ते आपल्या निजधामाला गेले. त्यानंतर पांडवांनीसुद्धा प्रयाण केले. तत्पूर्वी महाराज युधीष्ठीरांनी आपला नातू अभिमन्यू पुत्र परीक्षित यास राजसिंहासनावर बसविले. त्या वेळी भगवंतांचे महान भक्त परीक्षित महाराज थोर द्विजवर्यांच्या मार्गदर्शनाखाली जगावर राज्य करू लागले.
जेव्हा परीक्षित महाराज कुरु साम्राजाच्या राजधानीत राहत होते, तेव्हा त्यांनी आपल्या राज्याच्या सीमेत कलियुगाच्या लक्षणांचा प्रवेश होत असल्याचे पाहिले. त्यांना ही गोष्ट आवडली नाही, परंतु यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध लढण्याची संधी मिळाली. त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि बाण मारण्यासाठी ते सिद्ध झाले. त्यांनी दाही दिशा जिंकून तेथील राजांकडून खंडणी वसुल केली.
त्या काळी साक्षात धर्म बैलाचे रूप घेऊन इतस्त्तः हिंडत असताना त्याला पृथ्वी एका गायीच्या रूपात दिसली. अपत्यहीन माता जशी असावी तशा मातेप्रमाणे ती खिन्न दिसत होती. तिच्या नेत्रांतून अश्रू ओघळत होते आणि तिच्या शरीराला अवकळा प्राप्त झाली होती. ते पाहून धर्माने तिला विचारले, "हे देवी, तू प्रकृतीने स्वस्थ आणि प्रसन्न नाहीस काय? तू दुःखाने काळवंडलेली दिसतेस. तुझे मुख काळजीग्रस्त दिसते आहे. तुला काही आजार झाला आहे का की दूरच्या स्नेह्यांमुळे तू चिंताग्रस्त आहेस? मी माझे तीन पाय गमावून एकाच पायावर उभा आहे. या माझ्या दु:खावस्थेमुळे तू शोकाकुल आहेस काय? का तुला अशी भयानक काळजी वाटते आहे की अन्यायी मांसभक्षक लोक आता तुझे शोषण करतील?
"चारित्र्यहीन माणसांनी स्त्रिया आणि मुलांना निराधार करून दुःखी बनवून त्यागल्यामुळे तुला त्यांची दया वाटून दुःख होते काय? धर्मतत्त्वांच्या विरुद्ध आचरण करणाऱ्या ब्राह्मणांकडून सरस्वती देवीची जी विटंबना केली जात आहे, त्यामुळे तू दुःखी आहेस? किंवा ब्राह्मणी संस्कृतीविषयी ज्यांना अनास्था आहे अशा शासकीय लोकांचा ब्राह्मणांनी आश्रय घेतला आहे ते बघून तू उदास झाली आहेस?"
"तथाकथित अपात्र शासकीय लोकांनी कलियुगाच्या प्रभावामुळे मोहग्रस्त होऊन त्यांनी सर्व शासनव्यवस्था भ्रष्ट करून सोडली आहे त्यामुळे तुला दुःख होत आहे का? किंवा मानव समाज झोप, खाणे-पिणे, समागम यांचे नियम तोडत असल्यामुळे तू दुःखी आहेस का? हे मातोश्री तुझ्यावरील वाढलेला अनावश्यक भार कमी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतरित झाले. त्यांची येथील सर्व कार्ये दिव्य स्वरूपाची आणि मुक्ती प्रदान करणारी आहेत. तू त्यांच्या जाण्याने चिंतित झाली आहेस का?
"हे वसुंधरे, तू सर्व ऐश्वर्यांची खाण आहेस. परंतु खंगून तू इतकी दुबळी झाली आहेस, त्या तुझ्या दुःखाचे मूळ कारण मला सांग. मला असे वाटते की, अत्यंत शक्तिशाली लोकांचेही दमन करणाऱ्या काळाच्या अमोघ प्रभावाने तुझे सर्व सौभाग्य हरण करून घेतले असावे. खरे पाहता तुझ्या भाग्याची देवदेवतांनीही आराधना करावी."
त्या बैल रूपातील धर्माने असे विचारल्यावर गायरूपी पृथ्वीने उत्तर दिले, "हे धर्मा आपण जे विचारलात त्या प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. एके समयी आपल्यालाही चार पाय होते आणि भगवत्कृपेने आपण संपूर्ण विश्वात सुखवृद्धी करीत होता. सत्य, स्वच्छता, दया, क्रोधावर नियंत्रण, आत्मतृष्टी, सरळपणा, मनःस्थैर्य, इंद्रियनिग्रह, निष्ठेने कर्तव्याचरण, समता, सहिष्णुता, समदर्शिता, आज्ञापालन, ज्ञान, इंद्रिय भोगाविषयी अनासक्ती, नेतृत्व, शौर्य, प्रभाव, कोणतीही गोष्ट करण्याचे सामर्थ्य , कर्तव्यपालन, पूर्ण स्वातंत्र्य, कुशलता, सौंदर्यपूर्णता, धैर्य, कनवाळूपणा, चातुर्य, विनय, उदारता, दृढनिश्चय, ज्ञानपूर्णता, योग्य दक्षता, सर्व विषयांवर स्वामित्व, प्रसन्नता, स्थैर्य, निष्ठा, कीर्ती, पूज्यता, निरहंकारीपणा, भगवान परमेश्वर म्हणून अस्तित्व, शाश्वतता आणि असे कित्येक अन्य गुण भगवंतांच्या ठायी नित्य वसत असतात आणि ते कधीही त्यांच्यापासून वेगळे होत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे सर्व सौंदर्य आणि मांगल्य यांचे आश्रयस्थान असून त्यांनी आता पृथ्वीवरील आपल्या सर्व दिव्य लीला आवरत्या घेतल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आता कलियुगाने सर्वत्र प्रभाव टाकला आहे आणि त्यामुळे माझी ही अशी क्षीण अवस्था झाली आहे."
"मी, माझा आणि देवश्रेष्ठ अशा आपणासंबंधीही विचार करते. तसेच एकूण सर्व देव, पितर, ऋषिमुनी आणि भगवद्भक्त तसेच वर्णाश्रमधर्मांचे पालन करणारे अशा सर्वांसंबंधी मी विचार करीत आहे."
"जिचा कृपाकटाक्ष लाभावा म्हणून ब्रह्मादी देवसुद्धा भगवंतांना शरण जाऊन कित्येक दिवस तपाचरण करतात, ती लक्ष्मी स्वतः आपले कमळ वनातील निवासस्थान सोडून ज्यांच्या चरणकमळांच्या सेवेत निरंतर मग्न होऊन राहते, त्या भगवंतांच्या ध्वज, वज्र, अंकुश, कमल इत्यादी चिन्हांनी शोभणाऱ्या चरणांनी अलंकृत होऊन, त्यामुळे तीनही लोकांहून आपले भाग्य मोठे असल्याचा गर्व करणारी मी...... पण दुर्दैव माझे, की मी माझ्या सौभाग्याचा विचार करीत असता भगवान मला सोडून गेले."
"हे धर्ममूर्ते! या नास्तिक राजांनी जमविलेल्या सैनिकी दळभाराने मला प्रचंड ओझे झाले होते. पण भगवंतांच्या कृपेने माझी त्यातून सुटका झाली."
जेव्हा पृथ्वी आणि धर्म हे अशा संवादात गुंतलेले होते, तेव्हा राजर्षी परीक्षित पूर्वेकडे वाहात जाणाऱ्या सरस्वती नदीच्या काठावर येऊन पोहोचले. त्या स्थानी पोहचल्यानंतर राजाला असे दिलसे की कोणी एक कनिष्ठ जातीचा शूद्र राजवेश करून गायीला, बैलाला काठीने झोडपत आहे, जणू काय त्या पशूंना कोणी धनीच नव्हता. श्वेतकमळासमान पांढराशुभ्र असलेला तो बैल शूद्राच्या मारहाणीमुळे अतिशय भयभीत होऊन, एकाच पायावर उभा राहून, थरथर कापत होता. भीतीमुळे त्याला नैसर्गिक विधी आवतरता येत नव्हता.
धर्मतत्त्वे देऊ शकणारी उपकारकर्ती गाय आता अगदी दीन आणि अपत्यहीन झाली होती. शूद्र तिच्या पायांवरही आघात करीत होता. तिच्या नेत्रांतून अश्रू येत होते, ती अगदी खिन्न आणि क्षीण झाली होती. वनातील थोडेसे गवत खावयास मिळावे यासाठी ती आतुर होती.
धनुष्यबाणाने सुसज्जित तसेच रथारूढ असलेले परीक्षित महाराज आपल्या मेघासमान गरजणाऱ्या गंभीर वाणीने त्या शूद्राला म्हणाले, "अरे, तू कोण आहेस? तू तर अतिशय बलवान दिसतोस आणि तरीही तू जुलुमाने या जगातील दुर्बलांना ठार करू पाहतोस! त्यांना माझे संरक्षण आहे. पोषाखावरून तू एखाद्या राजासारखा दिसतोस, पण तुझी कृती एखाद्या शुद्रासारखी आहे. अरे दुष्टा, भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्यधारी अर्जन हे दोघे आता अदृश्य झाले म्हणून तू गरीब बिचाऱ्या गायीला मारण्याचे साहस दाखवितोस? अशा निर्जन जागी निरपराध प्राण्याला मारण्याचा प्रयत्न केलेला तू अपराधी आहेस आणि तू मृत्युदंडास पात्र आहेस."
असे बोलून सहस्रावधी शत्रूंशी एकट्याने लढणाऱ्या महाराज परिक्षितांनी धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी समस्त अधर्म युक्त कलीला मारण्यासाठी आपले तेजस्वी खड्ग उपसले. जेव्हा कलीला कळून चुकले की, राजा आपल्याला ठार मारण्यास उत्सुक आहे, तेव्हा एकदम त्याने आपला राजवेष टाकून दिला आणि भयभीत होऊन तथा नतमस्तक होऊन राजाच्या चरणाशी लोळण घेतली. जे शरणागत रक्षक तसेच इतिहासात प्रशंसनीय आहेत अशा परीक्षित महाराजांनी त्या शरण आलेल्या पतित कलीला ठार मारले नाही. तर उलट दिनांसाठी दयाळू असलेले महाराज करुणापूर्वक स्मित करून म्हणाले, "अर्जुनाच्या यशाचा वारसा आम्हाला प्राप्त आहे, त्यामुळे हात जोडून शरण आल्यावर तुला प्राणाचे भय बाळगण्याचे कारण नाही. पण तू अधर्माचा मित्र असल्याने माझ्या राज्यात तुला राहता येणार नाही. जर मूर्तिमंत अधर्म अशा कलीला नरदेव अथवा शासक म्हणून कार्य करू दिले तर लोभ, असत्य, लूटमार, असभ्यता, विश्वासघात, दुर्भाग्य, कपट, कलह आणि दंभ अशा अधार्मीक तत्त्वांचा सुळसुळाट होईल. म्हणून हे अधर्माच्या मित्रा, जेथे विशेष विद्वान भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सत्याला आणि धर्माला अनुसरून यज्ञ करीत असतात तेथे राहण्यास तू योग्य नाहीस."
अशा प्रकारे परीक्षित महाराजांकडून आज्ञा मिळालेला कली भयाने थरथर कापत म्हणाला, "हे सम्राट, आपल्या आज्ञेने मी कोठेही राहण्याचा विचार केला तरी सर्व ठिकाणी आपणाला हाती धनुष्यबाण घेऊन सिद्ध असल्याचे पाहात आहे. धर्मरक्षकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या महाराजा, म्हणून कृपया माझ्यासाठी कोणते तरी एक स्थान निश्चित करावे. तेथे मी सदैव आपल्या शासनाच्या संरक्षणाखाली निश्चितपणे स्थिर पाहू शकेन."
कलीन अशी प्रार्थना केल्यानंतर महाराज परीक्षितानी त्याला द्युतं पानं स्त्रियः सूना यत्राधर्मश्वतुविर्धः -- जे थे जुगार, मद्यपान, वेश्यावृत्ती आणि पशुहत्या चालत असेल अशा ठिकाणी राहण्यास अनुमती दिली. परंतु महाराज परिक्षितांच्या राज्यात ही चारही ठिकाणे नव्हतीच. त्यामुळे कलीने आणखी काही द्यावे अशी याचना केली, तेव्हा महाराजांनी त्याला सोने-सुवर्ण जेथे असेल तेथे राहण्यास अनुमती दिली. कारण जेथे जेथे सुवर्ण असते, तेथे तेथे असत्य, नशा, कामुकता, हेवा आणि वैर हे असते.
या प्रकारे अधर्माला उत्तेजन देणारा कली उत्तरापुत्र परिक्षितांनी दिलेल्या या सर्व पाच ठिकाणी त्यांच्याकडून आज्ञा मिळविल्यानंतर निश्चितपणे निवास करू लागला. म्हणून, ज्याला कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा असेल, त्याने विशेषतः राजा, धर्मशील मनुष्य, सार्वजनिक नेता, ब्राह्मण आणि संन्यासी यांनी वरील चार अधार्मिक गोष्टीच्या संपर्कातसुद्धा कधी येऊ नये.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गाथेत स्पष्टपणे लिहितात - १) मांसाहार न करणे -
आणिकांच्या कापिती माना ।
निष्ठुपणा पार नाही ।
करिती बेटे उसणवारी ।
यमपुरी भोगावया ।।
आपल्या लाभासाठी दुसऱ्यांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरपणाला अंत नाही. त्यांचे हे कृत्य यमपुरीचे दुःख भोगण्याची उसनवारी आहे.
कांद्यासाठी झाले ज्ञान, तेणे जग नाडिले, कामक्रोध बुचबुची
पुराणीक म्हणविती। जाणोनि कांदे ते भक्षिती ।
अगस्तीचे मूत्र मळ । लावुनि म्हणती कृष्णावळ ।
स्वतःला भागवतादी ग्रंथांचे पुराणिक म्हणून घेतात आणि पुराणात सांगितलेल्या आचारसंहितेचे विचार न करता निषिद्ध कर्मे करतात. कांदे खातात. अगस्तीचे मलमूत्र असलेल्या समुद्राचे मीठ त्या कांद्याला लावून त्यास 'कृष्णावळ' (कोशिंबीर) असे नाव देतात. तुकाराम महाराज म्हणतात. मी कठोर शब्दांचा तडाखा देऊन, अधम पुराणिकांचे हात तोडीत आहे.
२) जुगार न खेळणे --
अरे हे देह व्यर्थ जावे। ऐसे जरी तुज व्हावे ।
द्यूत कर्म मनोभावे । सारीपाट खेळावा ।।
मग कैंचे हरीचे नाम । निजे लिया जागा राम ।
जन्मोजन्मीचा अधम। दुःख थोर साधिले ।।
हा नर जन्म वाया जावा असे वाटत असेल तर मनःपूर्वक सारीपाट खेळत जा. खेळाचा नाद लागल्यावर हरीचे नाम तोंडात येणार नाही. अविद्येच्या निद्रेत असणाऱ्याला राम कसा जागा करणार?
३) नशा न करणे निषेध -
पाने जो खाईल बैसोनी कथेशी।
घडेल तयासी गोहत्या ते ।
तमाखू ओढून काढील जो धूर ।
बुडेल ते घर तेणे पापे ।।
हरीकथेत बसून जो पान खाईल त्याला गोहत्या पाप लागते. तंबाखू ओढून जो धूर काढतो, त्याला पाप लागेल आणि त्याचे घर बुडेल.
४) अवैध स्त्री संग न करणे --
साधने तरी हीच दोन्ही। जरी कोणी साधील ।
परद्रव्य परनारी। यांचा धरी विटाळ ।।
परद्रव्य, पारनारीपासून जो लांब राहील तीच दोन साधने आहेत.
यास्तव कलियुगात ज्या कोण्या सुज्ञ माणसास आपले जीवन सार्थक करावयाचे आहे त्याने अभक्षण करू नये, कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये, कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करू नये आणि परस्त्री संग करू नये आणि सदैव -
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।
या महामंत्राचा जप आणि कीर्तन करावे.
पाच सहस्र वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी या पृथ्वीचा त्याग केला आणि ते आपल्या निजधामाला गेले. त्यानंतर पांडवांनीसुद्धा प्रयाण केले. तत्पूर्वी महाराज युधीष्ठीरांनी आपला नातू अभिमन्यू पुत्र परीक्षित यास राजसिंहासनावर बसविले. त्या वेळी भगवंतांचे महान भक्त परीक्षित महाराज थोर द्विजवर्यांच्या मार्गदर्शनाखाली जगावर राज्य करू लागले.
जेव्हा परीक्षित महाराज कुरु साम्राजाच्या राजधानीत राहत होते, तेव्हा त्यांनी आपल्या राज्याच्या सीमेत कलियुगाच्या लक्षणांचा प्रवेश होत असल्याचे पाहिले. त्यांना ही गोष्ट आवडली नाही, परंतु यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध लढण्याची संधी मिळाली. त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि बाण मारण्यासाठी ते सिद्ध झाले. त्यांनी दाही दिशा जिंकून तेथील राजांकडून खंडणी वसुल केली.
त्या काळी साक्षात धर्म बैलाचे रूप घेऊन इतस्त्तः हिंडत असताना त्याला पृथ्वी एका गायीच्या रूपात दिसली. अपत्यहीन माता जशी असावी तशा मातेप्रमाणे ती खिन्न दिसत होती. तिच्या नेत्रांतून अश्रू ओघळत होते आणि तिच्या शरीराला अवकळा प्राप्त झाली होती. ते पाहून धर्माने तिला विचारले, "हे देवी, तू प्रकृतीने स्वस्थ आणि प्रसन्न नाहीस काय? तू दुःखाने काळवंडलेली दिसतेस. तुझे मुख काळजीग्रस्त दिसते आहे. तुला काही आजार झाला आहे का की दूरच्या स्नेह्यांमुळे तू चिंताग्रस्त आहेस? मी माझे तीन पाय गमावून एकाच पायावर उभा आहे. या माझ्या दु:खावस्थेमुळे तू शोकाकुल आहेस काय? का तुला अशी भयानक काळजी वाटते आहे की अन्यायी मांसभक्षक लोक आता तुझे शोषण करतील?
"चारित्र्यहीन माणसांनी स्त्रिया आणि मुलांना निराधार करून दुःखी बनवून त्यागल्यामुळे तुला त्यांची दया वाटून दुःख होते काय? धर्मतत्त्वांच्या विरुद्ध आचरण करणाऱ्या ब्राह्मणांकडून सरस्वती देवीची जी विटंबना केली जात आहे, त्यामुळे तू दुःखी आहेस? किंवा ब्राह्मणी संस्कृतीविषयी ज्यांना अनास्था आहे अशा शासकीय लोकांचा ब्राह्मणांनी आश्रय घेतला आहे ते बघून तू उदास झाली आहेस?"
"तथाकथित अपात्र शासकीय लोकांनी कलियुगाच्या प्रभावामुळे मोहग्रस्त होऊन त्यांनी सर्व शासनव्यवस्था भ्रष्ट करून सोडली आहे त्यामुळे तुला दुःख होत आहे का? किंवा मानव समाज झोप, खाणे-पिणे, समागम यांचे नियम तोडत असल्यामुळे तू दुःखी आहेस का? हे मातोश्री तुझ्यावरील वाढलेला अनावश्यक भार कमी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतरित झाले. त्यांची येथील सर्व कार्ये दिव्य स्वरूपाची आणि मुक्ती प्रदान करणारी आहेत. तू त्यांच्या जाण्याने चिंतित झाली आहेस का?
"हे वसुंधरे, तू सर्व ऐश्वर्यांची खाण आहेस. परंतु खंगून तू इतकी दुबळी झाली आहेस, त्या तुझ्या दुःखाचे मूळ कारण मला सांग. मला असे वाटते की, अत्यंत शक्तिशाली लोकांचेही दमन करणाऱ्या काळाच्या अमोघ प्रभावाने तुझे सर्व सौभाग्य हरण करून घेतले असावे. खरे पाहता तुझ्या भाग्याची देवदेवतांनीही आराधना करावी."
त्या बैल रूपातील धर्माने असे विचारल्यावर गायरूपी पृथ्वीने उत्तर दिले, "हे धर्मा आपण जे विचारलात त्या प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. एके समयी आपल्यालाही चार पाय होते आणि भगवत्कृपेने आपण संपूर्ण विश्वात सुखवृद्धी करीत होता. सत्य, स्वच्छता, दया, क्रोधावर नियंत्रण, आत्मतृष्टी, सरळपणा, मनःस्थैर्य, इंद्रियनिग्रह, निष्ठेने कर्तव्याचरण, समता, सहिष्णुता, समदर्शिता, आज्ञापालन, ज्ञान, इंद्रिय भोगाविषयी अनासक्ती, नेतृत्व, शौर्य, प्रभाव, कोणतीही गोष्ट करण्याचे सामर्थ्य , कर्तव्यपालन, पूर्ण स्वातंत्र्य, कुशलता, सौंदर्यपूर्णता, धैर्य, कनवाळूपणा, चातुर्य, विनय, उदारता, दृढनिश्चय, ज्ञानपूर्णता, योग्य दक्षता, सर्व विषयांवर स्वामित्व, प्रसन्नता, स्थैर्य, निष्ठा, कीर्ती, पूज्यता, निरहंकारीपणा, भगवान परमेश्वर म्हणून अस्तित्व, शाश्वतता आणि असे कित्येक अन्य गुण भगवंतांच्या ठायी नित्य वसत असतात आणि ते कधीही त्यांच्यापासून वेगळे होत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे सर्व सौंदर्य आणि मांगल्य यांचे आश्रयस्थान असून त्यांनी आता पृथ्वीवरील आपल्या सर्व दिव्य लीला आवरत्या घेतल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आता कलियुगाने सर्वत्र प्रभाव टाकला आहे आणि त्यामुळे माझी ही अशी क्षीण अवस्था झाली आहे."
"मी, माझा आणि देवश्रेष्ठ अशा आपणासंबंधीही विचार करते. तसेच एकूण सर्व देव, पितर, ऋषिमुनी आणि भगवद्भक्त तसेच वर्णाश्रमधर्मांचे पालन करणारे अशा सर्वांसंबंधी मी विचार करीत आहे."
"जिचा कृपाकटाक्ष लाभावा म्हणून ब्रह्मादी देवसुद्धा भगवंतांना शरण जाऊन कित्येक दिवस तपाचरण करतात, ती लक्ष्मी स्वतः आपले कमळ वनातील निवासस्थान सोडून ज्यांच्या चरणकमळांच्या सेवेत निरंतर मग्न होऊन राहते, त्या भगवंतांच्या ध्वज, वज्र, अंकुश, कमल इत्यादी चिन्हांनी शोभणाऱ्या चरणांनी अलंकृत होऊन, त्यामुळे तीनही लोकांहून आपले भाग्य मोठे असल्याचा गर्व करणारी मी...... पण दुर्दैव माझे, की मी माझ्या सौभाग्याचा विचार करीत असता भगवान मला सोडून गेले."
"हे धर्ममूर्ते! या नास्तिक राजांनी जमविलेल्या सैनिकी दळभाराने मला प्रचंड ओझे झाले होते. पण भगवंतांच्या कृपेने माझी त्यातून सुटका झाली."
जेव्हा पृथ्वी आणि धर्म हे अशा संवादात गुंतलेले होते, तेव्हा राजर्षी परीक्षित पूर्वेकडे वाहात जाणाऱ्या सरस्वती नदीच्या काठावर येऊन पोहोचले. त्या स्थानी पोहचल्यानंतर राजाला असे दिलसे की कोणी एक कनिष्ठ जातीचा शूद्र राजवेश करून गायीला, बैलाला काठीने झोडपत आहे, जणू काय त्या पशूंना कोणी धनीच नव्हता. श्वेतकमळासमान पांढराशुभ्र असलेला तो बैल शूद्राच्या मारहाणीमुळे अतिशय भयभीत होऊन, एकाच पायावर उभा राहून, थरथर कापत होता. भीतीमुळे त्याला नैसर्गिक विधी आवतरता येत नव्हता.
धर्मतत्त्वे देऊ शकणारी उपकारकर्ती गाय आता अगदी दीन आणि अपत्यहीन झाली होती. शूद्र तिच्या पायांवरही आघात करीत होता. तिच्या नेत्रांतून अश्रू येत होते, ती अगदी खिन्न आणि क्षीण झाली होती. वनातील थोडेसे गवत खावयास मिळावे यासाठी ती आतुर होती.
धनुष्यबाणाने सुसज्जित तसेच रथारूढ असलेले परीक्षित महाराज आपल्या मेघासमान गरजणाऱ्या गंभीर वाणीने त्या शूद्राला म्हणाले, "अरे, तू कोण आहेस? तू तर अतिशय बलवान दिसतोस आणि तरीही तू जुलुमाने या जगातील दुर्बलांना ठार करू पाहतोस! त्यांना माझे संरक्षण आहे. पोषाखावरून तू एखाद्या राजासारखा दिसतोस, पण तुझी कृती एखाद्या शुद्रासारखी आहे. अरे दुष्टा, भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्यधारी अर्जन हे दोघे आता अदृश्य झाले म्हणून तू गरीब बिचाऱ्या गायीला मारण्याचे साहस दाखवितोस? अशा निर्जन जागी निरपराध प्राण्याला मारण्याचा प्रयत्न केलेला तू अपराधी आहेस आणि तू मृत्युदंडास पात्र आहेस."
असे बोलून सहस्रावधी शत्रूंशी एकट्याने लढणाऱ्या महाराज परिक्षितांनी धर्म आणि पृथ्वीचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी समस्त अधर्म युक्त कलीला मारण्यासाठी आपले तेजस्वी खड्ग उपसले. जेव्हा कलीला कळून चुकले की, राजा आपल्याला ठार मारण्यास उत्सुक आहे, तेव्हा एकदम त्याने आपला राजवेष टाकून दिला आणि भयभीत होऊन तथा नतमस्तक होऊन राजाच्या चरणाशी लोळण घेतली. जे शरणागत रक्षक तसेच इतिहासात प्रशंसनीय आहेत अशा परीक्षित महाराजांनी त्या शरण आलेल्या पतित कलीला ठार मारले नाही. तर उलट दिनांसाठी दयाळू असलेले महाराज करुणापूर्वक स्मित करून म्हणाले, "अर्जुनाच्या यशाचा वारसा आम्हाला प्राप्त आहे, त्यामुळे हात जोडून शरण आल्यावर तुला प्राणाचे भय बाळगण्याचे कारण नाही. पण तू अधर्माचा मित्र असल्याने माझ्या राज्यात तुला राहता येणार नाही. जर मूर्तिमंत अधर्म अशा कलीला नरदेव अथवा शासक म्हणून कार्य करू दिले तर लोभ, असत्य, लूटमार, असभ्यता, विश्वासघात, दुर्भाग्य, कपट, कलह आणि दंभ अशा अधार्मीक तत्त्वांचा सुळसुळाट होईल. म्हणून हे अधर्माच्या मित्रा, जेथे विशेष विद्वान भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी सत्याला आणि धर्माला अनुसरून यज्ञ करीत असतात तेथे राहण्यास तू योग्य नाहीस."
अशा प्रकारे परीक्षित महाराजांकडून आज्ञा मिळालेला कली भयाने थरथर कापत म्हणाला, "हे सम्राट, आपल्या आज्ञेने मी कोठेही राहण्याचा विचार केला तरी सर्व ठिकाणी आपणाला हाती धनुष्यबाण घेऊन सिद्ध असल्याचे पाहात आहे. धर्मरक्षकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या महाराजा, म्हणून कृपया माझ्यासाठी कोणते तरी एक स्थान निश्चित करावे. तेथे मी सदैव आपल्या शासनाच्या संरक्षणाखाली निश्चितपणे स्थिर पाहू शकेन."
कलीन अशी प्रार्थना केल्यानंतर महाराज परीक्षितानी त्याला द्युतं पानं स्त्रियः सूना यत्राधर्मश्वतुविर्धः -- जे थे जुगार, मद्यपान, वेश्यावृत्ती आणि पशुहत्या चालत असेल अशा ठिकाणी राहण्यास अनुमती दिली. परंतु महाराज परिक्षितांच्या राज्यात ही चारही ठिकाणे नव्हतीच. त्यामुळे कलीने आणखी काही द्यावे अशी याचना केली, तेव्हा महाराजांनी त्याला सोने-सुवर्ण जेथे असेल तेथे राहण्यास अनुमती दिली. कारण जेथे जेथे सुवर्ण असते, तेथे तेथे असत्य, नशा, कामुकता, हेवा आणि वैर हे असते.
या प्रकारे अधर्माला उत्तेजन देणारा कली उत्तरापुत्र परिक्षितांनी दिलेल्या या सर्व पाच ठिकाणी त्यांच्याकडून आज्ञा मिळविल्यानंतर निश्चितपणे निवास करू लागला. म्हणून, ज्याला कोणाला आपल्या कल्याणाची इच्छा असेल, त्याने विशेषतः राजा, धर्मशील मनुष्य, सार्वजनिक नेता, ब्राह्मण आणि संन्यासी यांनी वरील चार अधार्मिक गोष्टीच्या संपर्कातसुद्धा कधी येऊ नये.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या गाथेत स्पष्टपणे लिहितात - १) मांसाहार न करणे -
आणिकांच्या कापिती माना ।
निष्ठुपणा पार नाही ।
करिती बेटे उसणवारी ।
यमपुरी भोगावया ।।
आपल्या लाभासाठी दुसऱ्यांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरपणाला अंत नाही. त्यांचे हे कृत्य यमपुरीचे दुःख भोगण्याची उसनवारी आहे.
कांद्यासाठी झाले ज्ञान, तेणे जग नाडिले, कामक्रोध बुचबुची
पुराणीक म्हणविती। जाणोनि कांदे ते भक्षिती ।
अगस्तीचे मूत्र मळ । लावुनि म्हणती कृष्णावळ ।
स्वतःला भागवतादी ग्रंथांचे पुराणिक म्हणून घेतात आणि पुराणात सांगितलेल्या आचारसंहितेचे विचार न करता निषिद्ध कर्मे करतात. कांदे खातात. अगस्तीचे मलमूत्र असलेल्या समुद्राचे मीठ त्या कांद्याला लावून त्यास 'कृष्णावळ' (कोशिंबीर) असे नाव देतात. तुकाराम महाराज म्हणतात. मी कठोर शब्दांचा तडाखा देऊन, अधम पुराणिकांचे हात तोडीत आहे.
२) जुगार न खेळणे --
अरे हे देह व्यर्थ जावे। ऐसे जरी तुज व्हावे ।
द्यूत कर्म मनोभावे । सारीपाट खेळावा ।।
मग कैंचे हरीचे नाम । निजे लिया जागा राम ।
जन्मोजन्मीचा अधम। दुःख थोर साधिले ।।
हा नर जन्म वाया जावा असे वाटत असेल तर मनःपूर्वक सारीपाट खेळत जा. खेळाचा नाद लागल्यावर हरीचे नाम तोंडात येणार नाही. अविद्येच्या निद्रेत असणाऱ्याला राम कसा जागा करणार?
३) नशा न करणे निषेध -
पाने जो खाईल बैसोनी कथेशी।
घडेल तयासी गोहत्या ते ।
तमाखू ओढून काढील जो धूर ।
बुडेल ते घर तेणे पापे ।।
हरीकथेत बसून जो पान खाईल त्याला गोहत्या पाप लागते. तंबाखू ओढून जो धूर काढतो, त्याला पाप लागेल आणि त्याचे घर बुडेल.
४) अवैध स्त्री संग न करणे --
साधने तरी हीच दोन्ही। जरी कोणी साधील ।
परद्रव्य परनारी। यांचा धरी विटाळ ।।
परद्रव्य, पारनारीपासून जो लांब राहील तीच दोन साधने आहेत.
यास्तव कलियुगात ज्या कोण्या सुज्ञ माणसास आपले जीवन सार्थक करावयाचे आहे त्याने अभक्षण करू नये, कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये, कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करू नये आणि परस्त्री संग करू नये आणि सदैव -
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।
या महामंत्राचा जप आणि कीर्तन करावे.