६. ब्राह्मणांविरुद्ध षड्यंत्र
सध्याचे युग हे कलह आणि दंभ यांनी भरलेले आहे. या युगात चांगल्या गोष्टींना उठाव मिळणे कठीण असते. वाईट गोष्टींना सदैव प्राधान्य मिळते. या युगात पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधून तिला आडात ढकलले जाते आणि वेश्येच्या गळ्यात मणिहार घालून तिला पद्मश्री प्रदान केले जाते.
इंग्रज जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी इथला इतिहास आणि भूगोल चांगल्याप्रकारे जाणून घेतला होता. त्यांनी विविध प्रकारच्या कूटनीतीचा वापर करून संपूर्ण भारत पादाक्रांत केला. अठरा पगड जाती आणि विविध भाषा यांनी व्यापलेल्या या विशाल देशात समस्त हिंदूना एकत्र बांधून ठेवणारी वैदिक संस्कृती किती अद्भूत आहे याची इंग्रजांना चांगलीच जाणीव झाली. त्यांनी पाहिलं की, विविध भाषा बोलणाऱ्या लोकांवर संस्कार आणि शिक्षणाचा प्रचंड प्रभाव आहे तो रामायण, महाभारत आणि भागवत पुराणादी संस्कृत वाड्मयांचा! येथील सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातही या वैदिक शास्त्रांचा नेहमीच मुक्त वापर केला जात असे.
ब्राह्मण वर्ग राजे-महाराजांना उत्तम समादेश देतात आणि राजे प्रजेचे पालन पुत्रवत करतात. वैश्य राजांना नियमित कर देतात आणि शुद्र योग्यप्रकारे श्रम करून समाजाची सर्व प्रकारे उन्नती करतात.
त्या काळी भारतातील गुरुकुल पद्धती इतकी विकसित होती की पाठशाळांतून शुद्र विद्यार्थी आणि शुद्र शिक्षक यांची संख्या सर्वाधिक होती, परंतु त्याच काळात इंग्लंडमध्ये शाळाच अस्तित्वात नव्हत्या. लहान मुलांनाही कारखान्यातून काम करावे लागत असे.
अशा काळात इंग्रजांचे राज्य भारतावर वरवंटा फिरवू लागले. इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वतंत्र करण्यासाठी १८५७ मध्ये पहिले स्वातंत्र्य युद्ध पेटले. या क्रांतीयुद्धाचे नेतृत्व ब्राह्मणांनी केले होते. त्यांनीच समस्त भारतवासीयांना पटवून दिले की, गोरे परकीय असून त्यांना आपल्या देशातून हाकलून दिले पाहिजे. ब्राह्मणांनी चालविलेल्या समाज प्रबोधनामुळे इंग्रजांनी खोटा इतिहास प्रचारात आणला तो हा की, ब्राह्मण सांगतात ती संस्कृत शास्त्रेसुद्धा परकीय आहेत. ते आर्य असून त्यांनी भारतावर आक्रमण करून मूलनिवासी द्रविडांना दास बनविले आहे. त्यांच्या या खोट्या इतिहासाचा प्रभाव फुले ते टिळकांपर्यंत अनेकांवर पडला.
एकदा उत्तर भारतात त्रिवेणी संगमावर कुंभमेळा भरला होता. लक्षावधी हिंदू पवित्र स्नान करण्यासाठी गंगा तटावर एकत्र आले होते. त्यांची ती विशाल गर्दी पाहून इंग्रजांना मोठे आश्चर्य वाटले. ब्रिटिश सरकारकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना इतक्या मोठ्या संख्येने लोक स्नान करण्यासाठी कसे काय एकत्र आले? गोरे इंग्रज मोठे चौकस वृत्तीचे, ते लोकांमध्ये फिरून चौकशी करू लागले. नागाप्रदेशापासून ते गुजरात पर्यंत, खैबर-काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतातून विविध रंगा-रूपाचे, विविध भाषा बोलणारे, विविध मतप्रवाहाचे लोक स्नान करण्यासाठी आले होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी विविध लोकांकडे चौकशी केली की, तुम्ही येथे कशासाठी आलात. त्या वेळी सर्वांकडून एकच उत्तर मिळे की, आम्ही या विशिष्ट दिवशी, विशिष्ट मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी आलो आहोत. या मुहूर्तावर अमृतस्नान केल्याने समस्त पापे नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. इंग्रज परत चौकशी करीत की, तुम्हा अडाणी खेडूतांना कसे कळते की याच मुहूर्तावर स्नान केले पाहिजे. त्यावर उत्तर मिळे की पंचांगावरून मुहूर्त सांगितला जातो. इंग्रज परत जिज्ञासा करीत की, पंचांग कोण लिहितो आणि सांगतो? सर्वांकडून उत्तर मिळत असे की, आमच्या गावाचा ब्राह्मण, जो ग्रामोपाध्ये वा पुरोहित असतो तो पंचांग जाणतो आणि तोच मुहूर्त सांगतो. त्यानुसार आम्ही प्रवास प्रारंभ करून योग्य मुहूर्त येथे पोहोचतो.
इंग्रजांजी चक्रे फिरू लागली. इंग्रजांना मोठा अहंकार होता की, आमचे दळणवळण श्रेष्ठ आहे. आम्ही तार, पोस्ट, दूरध्वनी आणि रेल्वे आणली. त्यामुळे आमचा भारतभर संचार वेगाने होतो; परंतु आमच्यापेक्षा ब्राह्मणांचे वैदिक गणित, खगोलशास्त्र वा पंचांग अतिश्रेष्ठ आहे. हे मूठभर ब्राह्मण एका पंचांगातील मुहूर्तावर लक्षावधी लोकांना स्नानासाठी एकत्र आणू शकतात तर मग हे ब्राह्मण ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र का आणू शकणार नाहीत? निश्चितच आणतील!
इंग्रज अधिकारी कुंभमेळ्यात हप्ते गोळा करत नव्हते. त्यांनी तातडीने आपली गुप्तवार्ता वरिष्ठांना कळविली आणि त्यांचे नवीन धोरण आखले गेले. ते हे की, भारतीयांना अर्थात हिंदूंना शिक्षण देणे. त्यांच्या मनावर पक्के बिंबवणे की, तुमचे वैदिक ज्ञान बुरसटलेले असून इंग्रजी ज्ञान प्रगत आहे. पैशासाठी काही ब्राह्मण इंग्रजांना फशी पडले. कलकत्यातील राधाकुंड चटर्जीने तर भरपूर पैसे घेऊन इंग्रजांना ग्रंथच लिहून दिला की, वैदिक काळात ब्राह्मण गोमांस खात होते. इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, भारतीय संस्कृतीचा विदेशातही प्रचार करणाऱ्या विवेकानंदांनी सुद्धा लिहून ठेवले आहे की, प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात, परंतु नंतर त्यांना गायीचे महत्त्व कळू लागल्यामुळे त्यांनी गोपालन प्रारंभ केले. परंतु हा त्यांचा निव्वळ तर्क आहे. सत्य इतिहास नाही की शास्त्रसिद्धान्तही नाही.
मॅक्समूलरच्या खोट्या सिद्धान्ताचा प्रचार केला गेला की, उत्तर भारतीय परकीय असून त्यांनी संस्कृत भाषा लादली आहे. याचा विषारी प्रभाव असा आहे की आजही दक्षिण भारतीय विशेष करून तामिळी लोक तामिळ भाषेला संस्कृतपेक्षा प्राचीन मानतात. इंग्रजांच्या खोट्या इतिहासाचा प्रभाव इतका होता की, लोकमान्य टिळकांनीही एक ग्रंथ लिहून तर्क प्रस्तुत केला की, आर्य उत्तर ध्रुवावरून भारतात आले. पुढे तर इंग्रजी ग्रंथ वाचून आपले प्रभावशाली पुरोगामी तर्क प्रस्तुत करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा वेद-वाड्मयाच्या पोथ्या कालबाह्य असून त्या बहिष्कृत कराव्यात असे अनेकवेळा सांगितले आणि लिहूनही ठेवले. त्यापुढे आणखी प्रगती करीत प्रबोधनकार ठाकरे यांनी संपूर्ण वेदांचे परिपक्व फळ असलेल्या अमल पुराण 'भागवत' ग्रंथास छिनाल म्हणून संबोधले. इंग्रजी शाळा शिकलेल्या ज्योतिबा फुल्यांनी तर देवी-देवतांची भयानक निंदानालस्ती केलेली आहे.
या सर्व प्रगत हिंदुमुळे इंग्रजांचे चांगलेच फावले आणि पुढे फाळणी झाल्यानंतर स्वतंत्र हिंदुस्थानचे पंतप्रधान नेहरूंनी तर कमालच केली. संस्कृतचे जाणकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला होता की, संपूर्ण भारताला एक सूत्र ठेवण्यासाठी संस्कृत हीच राष्ट्रभाषा असावी. परंतु संस्कृतचा गंधही नसलेल्या ब्रिटिशनिष्ठ नेहरूनी संस्कृत भाषेला मृत ठरवून बहिष्कृत केले.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
इंग्रजांजी चक्रे फिरू लागली. इंग्रजांना मोठा अहंकार होता की, आमचे दळणवळण श्रेष्ठ आहे. आम्ही तार, पोस्ट, दूरध्वनी आणि रेल्वे आणली. त्यामुळे आमचा भारतभर संचार वेगाने होतो; परंतु आमच्यापेक्षा ब्राह्मणांचे वैदिक गणित, खगोलशास्त्र वा पंचांग अतिश्रेष्ठ आहे. हे मूठभर ब्राह्मण एका पंचांगातील मुहूर्तावर लक्षावधी लोकांना स्नानासाठी एकत्र आणू शकतात तर मग हे ब्राह्मण ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र का आणू शकणार नाहीत? निश्चितच आणतील!
इंग्रज अधिकारी कुंभमेळ्यात हप्ते गोळा करत नव्हते. त्यांनी तातडीने आपली गुप्तवार्ता वरिष्ठांना कळविली आणि त्यांचे नवीन धोरण आखले गेले. ते हे की, भारतीयांना अर्थात हिंदूंना शिक्षण देणे. त्यांच्या मनावर पक्के बिंबवणे की, तुमचे वैदिक ज्ञान बुरसटलेले असून इंग्रजी ज्ञान प्रगत आहे. पैशासाठी काही ब्राह्मण इंग्रजांना फशी पडले. कलकत्यातील राधाकुंड चटर्जीने तर भरपूर पैसे घेऊन इंग्रजांना ग्रंथच लिहून दिला की, वैदिक काळात ब्राह्मण गोमांस खात होते. इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, भारतीय संस्कृतीचा विदेशातही प्रचार करणाऱ्या विवेकानंदांनी सुद्धा लिहून ठेवले आहे की, प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात, परंतु नंतर त्यांना गायीचे महत्त्व कळू लागल्यामुळे त्यांनी गोपालन प्रारंभ केले. परंतु हा त्यांचा निव्वळ तर्क आहे. सत्य इतिहास नाही की शास्त्रसिद्धान्तही नाही.
मॅक्समूलरच्या खोट्या सिद्धान्ताचा प्रचार केला गेला की, उत्तर भारतीय परकीय असून त्यांनी संस्कृत भाषा लादली आहे. याचा विषारी प्रभाव असा आहे की आजही दक्षिण भारतीय विशेष करून तामिळी लोक तामिळ भाषेला संस्कृतपेक्षा प्राचीन मानतात. इंग्रजांच्या खोट्या इतिहासाचा प्रभाव इतका होता की, लोकमान्य टिळकांनीही एक ग्रंथ लिहून तर्क प्रस्तुत केला की, आर्य उत्तर ध्रुवावरून भारतात आले. पुढे तर इंग्रजी ग्रंथ वाचून आपले प्रभावशाली पुरोगामी तर्क प्रस्तुत करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा वेद-वाड्मयाच्या पोथ्या कालबाह्य असून त्या बहिष्कृत कराव्यात असे अनेकवेळा सांगितले आणि लिहूनही ठेवले. त्यापुढे आणखी प्रगती करीत प्रबोधनकार ठाकरे यांनी संपूर्ण वेदांचे परिपक्व फळ असलेल्या अमल पुराण 'भागवत' ग्रंथास छिनाल म्हणून संबोधले. इंग्रजी शाळा शिकलेल्या ज्योतिबा फुल्यांनी तर देवी-देवतांची भयानक निंदानालस्ती केलेली आहे.
या सर्व प्रगत हिंदुमुळे इंग्रजांचे चांगलेच फावले आणि पुढे फाळणी झाल्यानंतर स्वतंत्र हिंदुस्थानचे पंतप्रधान नेहरूंनी तर कमालच केली. संस्कृतचे जाणकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला होता की, संपूर्ण भारताला एक सूत्र ठेवण्यासाठी संस्कृत हीच राष्ट्रभाषा असावी. परंतु संस्कृतचा गंधही नसलेल्या ब्रिटिशनिष्ठ नेहरूनी संस्कृत भाषेला मृत ठरवून बहिष्कृत केले.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७