१- हैद्राबादचा निजाम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इस्लाम कबूल करण्यासाठी तीन कोटी रुपये देत होता, परंतु डॉ. बाबासाहेबांनी ते का घेतले नाहीत?
२- डॉ. बाबासाहेबांनी फाळणीच्या वेळी स्पष्ट सांगितले होते की पाकिस्तानातील हिंदूंना येथे सुरक्षित आणावे आणि येथील सर्व मुसलमानांना पाकिस्तानात सुरक्षित पाठवावे. पण असे का केले नाही?
३- फाळणी नंतर हजारो दलितांना कराचीत डांबून ठेवले, त्यांना इस्लाम कबूल करण्यास भाग पडले. ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. त्यांना मरे पर्यंत वेठबिगर म्हणून राबवून घेतले. त्यांचे हालहाल करण्यात आले तरीही त्याविषयी कोणीच का बोलत नाही वा लिहिताही नाही?
४- डॉ. बाबासाहेबांनी वडाळ्याला सिद्धार्थ कॉलेज चालू केले त्यावेळी त्यांनी ब्राह्माण प्राध्यापक का ठेवले? इतरांना का संधी दिली नाही?
५- त्या काळी संसदेत स्वतंत्र भारताचा ध्वज कोणता असावा या वर चर्चा चालू होती. ८० टक्के खासदारांचे मत होते की प्राचीन काळापासून भारताचा ध्वज भगवा होता आणि आताही तोच असावा, पण नेहरूंचा त्यास विरोध होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी त्या काळच्या बलवान हिंदू संघटनेला सांगितले होते की, तुम्ही दोन हजार भगवे झेंडे घेऊन संसदेवर मोर्चा काढा आणि भगवा झेंडाच राष्ट्रध्वज झालाच पाहिजे या घोषणांनी संसद भवन दणाणून सोडा. मी संसदेत त्याची भक्कम मागणी करेन. मग त्यावेळी बलवान हिंदू संघटनेने तसे का केले नाही?
६- डॉ. बाबासाहेबांचे नातू गणपतीचे पूजन का करतात?
७- डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्या नंतर अमरावती आणि अकोला येथील जे महार बांधव बौद्ध धर्म स्वीकारण्यास तयार नव्हते तेव्हा त्यांची घरेदारे का जाळण्यात आली?
८- मराठा माणूस स्वतःला मोठ्या अभिमानाने 'मराठा' म्हणवून घेतो. परंतु पुरोगामी, सत्यशोधक, समाजवादी, काँग्रेसी, ब्रिगेडी लेखक आपल्या पुस्तकातून मराठ्यांना बहुजन म्हणून का संबोधतात? मराठ्यांचे सत्व, अभिमान, पराक्रम, देशप्रेम इत्यादी संपवण्याची चाल तर नाही ना?
९- पुरोगामी, सत्यशोधक, समाजवादी, काँग्रेसी, ब्रिगेडी लेखक रामायण, महाभारत इत्यादी बनावट आहे असे बडबडतात, मग ते हीच पुस्तके का वाचतात?
१०- विठ्ठल दगडाचा आहे तर मग खासदार आठवले त्याची आषाढी एकादशीला पूजा का करतात?
११- सर्व काही बामणांनी केले तर मग तेच महान होते असे आड मार्गाने सांगून हे बदमाश लेखक महान राजे, महाराजे वा सम्राटांना कमी का लेखतात?
१२- हे बदमाश लेखक सार्वजनिक स्थानी छत्रपती शिवरायांना महान म्हणतात आणि त्यांनी केलेल्या देवपूजेला, दानधर्माला, संतांच्या दिव्य शिकवणुकीची निंदा का करतात?
१३- देश रक्षणासाठी सीमेवर जाण्यासाठी आरक्षण का मागितले जात नाही?
१४- क्रिकेट सारख्या खेळात पवार साहेब आरक्षण का मागत नाहीत?
१5- आषाढी-कार्तिकीला लाखो वारकरी विठ्ठल भेटीच्या दर्शनाच्या दिव्य ओढीने पंढरपुरास पायी जातात. सरकार, पोलीस इत्यादींना त्यातून अतिरिक्त पैसा मिळतो. परंतु शासकीय पातळीवर विठ्ठल भक्तांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्याकडे सरकारचे लक्ष्य न वेधता पुरोगामी, सत्यशोधक, समाजवादी, काँग्रेसी, ब्रिगेडी लेखक वा पत्रकार, टी.व्ही. वाले तेथे साठलेल्या विष्ठे विषयीच का बोलतात?
असे माझे अनेक प्रश्न आहेत. परंतु आपल्या डोक्यास ताण पडू नये म्हणून तूर्तास इतकेच पुरे आहेत. मग वाट कोणाची बघता ? डोकं असेल तर मग खाजवा आणि द्या समर्पक उत्तरे. ही शब्दांची लढाई आहे शब्दांनीच लढूया.
आपला शुभचिंतक
विनय शंकर गोडसे