धनसंचयाच्या योजना
सध्या आपला देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विदेशी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे . ऐकाकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे. हा देश सुजलाम सुफलाम म्हणून संबोधला जात असे.
आपल्याला इतिहासातून कळते की फार पूर्वी शक, हूण, कुशाण, मोंगल यांनी या देशाची लूटमार केली. त्यानंतर इंग्रजांनी आणि त्यानंतर स्वकियांनी या देशाला लुटले. प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की मला माझ्या बुद्धिचातुर्याने जेवढे काही खाता येईल तेवढे खाणे आणि हे माझे आहे आणि मीच त्याचा एकमेव भोक्ता आहे. हे सर्व माझ्या सुखासाठीच आहे. परंतु माणूस हे सर्व जाणून घेण्यास तयार नाही की वस्तुतः या जगातील प्रत्येक चेतन किंवा जड पदार्थांचे मूळ मालक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच एकमेव भोक्ता आहेत. तेच नियंत्रक आहेत आणि त्यांनी आमच्या आवश्यकतेसाठी जेवढे आम्हाला दिले आहे तेवढ्याच गोष्टींचा आम्ही स्वीकार करावा. असे ज्यावेळी आम्ही करू, त्याच वेळी आम्हाला वास्तविक शांती मिळेल, सुख मिळेल.
परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोक इतके पतित आणि मूढ झाले आहेत की त्यांना वाटते की मी जर अधिक पैसा मिळविला तर सुख लवकर मिळेल. भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात, "धन इतके प्रिय असते की लोक त्याला मधापेक्षा मधुर समजतात. तर मग असा कोण असेल की जो धन संग्रह करण्याच्या भुकेचा परित्याग करू शकेल आणि ते सुद्धा गृहस्थजीवनात ? चोर, व्यावसायिक नोकर तथा व्यापारी आपल्या प्रिय प्राणांची बाजी लावून धन प्राप्त करू इच्छितात." - भागवत ७.६.१०
पैशाच्या मागे लागलेल्या लोकांविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात " इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उतरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन, अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. " भगवद्गीता १६. ११. १२. १३. १४. १५
तर अशा अनेक आर्थिक योजनांद्वारे आपण सुखी होऊ असे राजकारणी, अर्थतज्ज्ञ, विचारवंताना वाटते. परंतु हे सर्व प्राप्त करूनही लोक सुखी - समाधानी होत नाहीत. असे का? कारण एकच की कोणीही हे जाणून घेण्यास तयार नाही की वास्तविक मालक श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
सध्या आपला देश फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विदेशी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे . ऐकाकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असे. हा देश सुजलाम सुफलाम म्हणून संबोधला जात असे.
आपल्याला इतिहासातून कळते की फार पूर्वी शक, हूण, कुशाण, मोंगल यांनी या देशाची लूटमार केली. त्यानंतर इंग्रजांनी आणि त्यानंतर स्वकियांनी या देशाला लुटले. प्रत्येक व्यक्ती असा विचार करते की मला माझ्या बुद्धिचातुर्याने जेवढे काही खाता येईल तेवढे खाणे आणि हे माझे आहे आणि मीच त्याचा एकमेव भोक्ता आहे. हे सर्व माझ्या सुखासाठीच आहे. परंतु माणूस हे सर्व जाणून घेण्यास तयार नाही की वस्तुतः या जगातील प्रत्येक चेतन किंवा जड पदार्थांचे मूळ मालक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तेच एकमेव भोक्ता आहेत. तेच नियंत्रक आहेत आणि त्यांनी आमच्या आवश्यकतेसाठी जेवढे आम्हाला दिले आहे तेवढ्याच गोष्टींचा आम्ही स्वीकार करावा. असे ज्यावेळी आम्ही करू, त्याच वेळी आम्हाला वास्तविक शांती मिळेल, सुख मिळेल.
परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे सर्वसामान्य लोक इतके पतित आणि मूढ झाले आहेत की त्यांना वाटते की मी जर अधिक पैसा मिळविला तर सुख लवकर मिळेल. भक्तराज प्रह्लाद महाराज सांगतात, "धन इतके प्रिय असते की लोक त्याला मधापेक्षा मधुर समजतात. तर मग असा कोण असेल की जो धन संग्रह करण्याच्या भुकेचा परित्याग करू शकेल आणि ते सुद्धा गृहस्थजीवनात ? चोर, व्यावसायिक नोकर तथा व्यापारी आपल्या प्रिय प्राणांची बाजी लावून धन प्राप्त करू इच्छितात." - भागवत ७.६.१०
पैशाच्या मागे लागलेल्या लोकांविषयी भगवान श्रीकृष्ण सांगतात " इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उतरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन, अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. " भगवद्गीता १६. ११. १२. १३. १४. १५
तर अशा अनेक आर्थिक योजनांद्वारे आपण सुखी होऊ असे राजकारणी, अर्थतज्ज्ञ, विचारवंताना वाटते. परंतु हे सर्व प्राप्त करूनही लोक सुखी - समाधानी होत नाहीत. असे का? कारण एकच की कोणीही हे जाणून घेण्यास तयार नाही की वास्तविक मालक श्रीकृष्ण आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे.
संपर्क : 92421 76587