मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

                    ना खेद  ना खंत 


देशविघातक शक्तिंद्वारे मिळणाऱ्या पैशातून पोसलेले कुविचारवंत जेव्हा प्रताडीत केले जातात किंवा मारले जातात तेव्हा खऱ्या देशभक्तांना मुळीच वाईट वाटत नाही. खरा देशभक्त स्वतःची आणि इतरांची फसवणुक करण्यासाठी, 'अरे रे! असे होऊ नये किंवा जे झाले ते चांगले झाले नाही!' विचारांची लढाई विचारानेच करावी. आम्ही खेद प्रकट करतो," इत्यादी बडबड करत नाही. 

या भारतभूमीवर ज्यांचे नितांत खरे प्रेम आहे अशांचा वेदशास्त्रांवरही पूर्ण विश्वास असतो. त्यांची बुद्धी परदेशी खोट्या विचारांनी भ्रष्ट झालेली नसते. त्यामुळे खरा देशप्रेमी वेदशास्त्रांच्या दिव्य शिकवणुकीनुसार विचार करतो की, 'जे पेराल तेज उगवेल!' आपण जसे कर्म करू तसेच फळ आपल्याला भोगावे लागते. यातून कोणीही सुटलेला नाही. 
बंगाल वा केरळात अनेक निष्पाप हिंदुंच्या हत्या, काश्मिरात हिंदू पंडित विस्थापीत झाले, नक्षलवाद्यांनी अनेक सैनिकांचे हत्याकांड केले त्यावेळी लंकेश सारख्या अनेक पुरोगामी, वामपंथी नतद्रष्टांनी वेळोवेळी आनंद प्रकट केला. अशा आसुरी आनंदभोगी कुविचारवंतांची जेव्हा हत्या होते तेव्हा खरा देशभक्त कधीच हळहळत नाही. 

सतत धर्मद्रोही कुविचार प्रकट करून स्वतःला पुरोगामी, साम्यवादी, समतावादी म्हणवून घेणारे लाल, पिवळे, हिरवे व  निळे कोल्हे सतत समाजात उपद्रव निर्माण करीत असतात. हिंदुंचे दुर्दैव किती भयानक आहे पहा; यांच्या दळभद्री विचारांना वारेमाप प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे, टी.व्ही वा अन्य माध्यमेसुध्दा नीच प्रवृत्तीची असूनही हिंदुच त्यांचा उत्कर्ष घडवीत असतात. प्रामाणिक आणि सुज्ञ धर्माभिमानी देशभक्तांनी अशांचा वेळीच धिक्कार करण्यास तत्पर असावे किंवा त्यांना तिरस्कृत करावे. नाहीतर आपली संस्कृती पार नष्ट होईल. 

हे प्रतिगामी कुविचारवंत आपले विष समाजात पसरविण्यासाठी अनेकदा समाजसेवेचा अंगरखा घालून, शोषितांचे वा पददलितांचे कौवारी म्हणून समाजात मिसळतात. या लोकांना हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्यासाठी विदेशी मिशनरी संस्था वा धर्मनिरपेक्ष राजकारण्यांकडून  भरपूर पैसा मिळत असतो. कधी हे दुष्ट एकमेकात पैशासाठी भांडतात आणि एकमेकांची हत्या करतात. तर कधी राजकारणी आपल्या विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी, हिंदुंची एकता भंग करण्यासाठी अशा कुविचारकांना आधी पोसतात आणि मग त्यांची हत्या घडवून राष्ट्रप्रेमी  हिंदू युवकांना अडकवून आपला स्वार्थ साधतात. 

वस्तुतः हे कुविचारवंत (जंत) भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट असतात, नराधम असतात, त्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालेले असते आणि असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण केलेली असते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. ते म्हणतात की, हे जगत असत्य आणि निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही असे त्यांचे म्हणणे असते. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी, आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत, मोहित झालेले आसुरी लोक, अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशाप्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शेकडो, सहस्रो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरीता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. 

मागील ७० वर्षांपासून या धर्मद्रोह्यांनी हिंदुंना सतत फसवले आहे. या असुरांना  शोधणे अनेक  वेळा अतिशय कठीण असते. पाच सहस्र  वर्षांपूर्वी जेव्हा अशाच प्रकारच्या असुरांचे प्राबल्य पृथ्वीवर वाढले तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे दमन करण्यासाठी गोकुळात प्रकट झाले. ते केवळ काही दिवसांचे तान्हुले बालक असताना त्यांना मारण्यासाठी पुतना नामक राक्षसी आपल्या स्तनांना विष लावून येते. आपल्या विषयी कोणालाही संशय वाटू नये म्हणून ती स्वतःला सुंदर रूपात परिवर्तीत करते. सुंदर वस्त्रालंकार धारण करून हातात कमळ पुष्प धरून, मुखावर मंद आणि आकर्षक स्मीत हास्य प्रकट करीत ती जेव्हा नंद महाराजांच्या प्रसादात प्रवेश करू लागते तेव्हा तिचे ते मनोहर स्वर्गीय रूप पाहून तेथील व्रजगोपी, गोप, यशोदा माता आणि नंद महाराज इत्यादींना तिचा मुळीच संशय येत नाही. त्या सर्वांनाच वाटते की, ही स्वर्गीय देवता असून ती आमच्या कान्हाचे दर्शन घेण्यासाठी, त्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी आली आहे. त्यामुळे ते सर्वजण पूतनाला सहजपणे अंतःपूरात  प्रवेश करू देतात. 

पूतनेप्रमाणेच या मिशनरी प्रणीत स्त्रियांचे असते. या वामपंथी स्त्रिया अगदी असेच सोंग वटवत असतात. या मोठ्या चतुराईने विविध रूपे घेतात. कधी गोरगरीबांचे  तारण हार, कधी शोषितांच्या कैवारी, स्त्री मुक्ती प्रदाता, निर्भिड पत्रकार, विश्वविद्यालयातील प्राध्यापिका इत्यादी गोंडस रूपात समाजात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण करून समाजाला विषपान करवितात. सध्याचा हिंदू समाज मोठ्या प्रमाणावर धर्मज्ञानहीन, भगवद्भक्तीहीन आणि चंगळवादी झालेला आहे, त्यामुळे तो तत्काळ  विषपान करतो. त्यामुळे तो अशा चेटकिणींना वेळीच ओळखू शकत नाही. आमच्या अवती-भवती अशा अनेक पूतना वेशांतर करून वावरत  असतात. त्यांना ओळखणे कठीण नसते. केवळ थोड्याशा बुद्धीची आवश्यकता असते. या पूतनांची वैशिष्ट्ये म्हणजे यांची वेशभूषा! या स्त्रिया आपल्या अंगावर कोणतेही हिंदू संस्कृतीचे मांगलीक चिन्ह वापरत नाहीत. उदाहरणार्थ - कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, साडी इत्यादी. यांना केस भादरणे, पुरुषी कपडे घालणे आवडते. यांचे धर्मांतर झालेले असते आणि हिंदुंना फसविण्यासाठी स्वतःचे नाव हिंदुंप्रमाणे ठेवतात. यांचा विवाह झालेला नसतो किंवा यांनी तीन-चार पती नव्हे तर बेडपार्टनर वा भडवे बदलेले असतात. सिगरेट फुकणे, ड्रिंक्स (दारू) ढोसणे, मांसाहार करणे आणि सतत आक्रस्ताळे लेख लिहिणे, वक्तव्ये करणे यातच यांचे नैपुण्य असते. विदेशी संस्था, ट्रस्ट वा एन जी ओ  अशा कुलटांना तथाकथित पुरस्कार देऊन भलावण करतात. यांच्या कुप्रचारामुळे बावळट हिंदुचा आपल्याच प्रखर राष्ट्रवादी हिंदू बाधवांवरील विश्वास कमी होतो. तरी हिंदुंनी बहुरूपी पूतनांपासून सावध असावे. 

असभ्याः सभ्यसंकाशाः सभ्याश्चासभ्यदर्शनाः ।
दृश्यन्ते विविधा भावासू तेषु युक्तं परीक्षणम् ।।
पुष्कळ रानटी आणि क्रूर माणसे सुसंस्कृत दिसतात आणि सुसंस्कृत माणसे रानटी दिसतात. अनेक प्रकारच्या वस्तू दिसतात तशा नसतात म्हणून कोणाचीही नीट परीक्षा करणे हेच योग्य असते.
- महाभारत, शांतीपर्व १११.६५