सोमवार, २७ मार्च, २०१७

 राजे पुन्हा जन्माला यावे !

     आमच्या बेळगावात असो वा कोल्हापूर-सोलापूरात , कधी कधी काही रिक्षांवर वर भगव्या रंगात लिहिलेले आढळते, 'राजे, पुन्हा जन्माला यावे.'  हे वाक्य वाचताच अंगावर रोमांच उभे राहतात. रक्त सळसळते. उर भरून येतो. शिवरायांच्या पावन स्मृतींचा गंगा महासागर हृदयात उचम्बळून येतो. हे असे का होते? सर्व सामान्य मराठी माणसाला छत्रपती शिवराय हेच आपले तारणहार असल्याचे का वाटते? कारण एकच आहे आणि ते म्हणजे मराठी माणूस आजही अन्यायग्रस्त आहे. त्याला तोंड दाबून लाथा-बुक्यांचा मार खावा लागतो आहे. कधी धनदांडग्यांकडून, तर कधी परप्रांतीय अमराठी लोकांकडून, तर कधी धर्मांधांकडून!छत्रपती शिवराय जन्माला येण्यापूर्वी संपूर्ण भारत इस्लामी अत्याचारांनी ग्रस्त होता. महाराष्ट्रात सुलतानी कारभाराचा वरवंटा फिरत होता. येथे इस्लामी  सत्ता होती आणि ती विशिष्ट धर्माची होती. बादशहा वा सुलतान आणि त्यांचे प्रशासक इस्लामचे बंदे होते. इस्लामचेच कायदे-कानून सर्वोच्च होते. त्यामुळे सर्व कारभार कुराणानुसार चालत होता. त्यामुळे येथील उलेमा नेहमीच मूर्तिपूजा आणि इस्लामविरोधी कृत्ये सक्तीने मोडून काढण्यासाठी बादशहाला प्रेरीत करीत. सुलतानही अल्लाचे सच्चे  प्रतिनिधी म्हणवून घेत आणि हिंदूंचा भयंकर छळ करीत.मुसलमानी राजकारभारात भारतातील हिंदू, बौद्ध, जैन व शिखांना शेकडो वर्षे भयानक नारकीय यातनांचे दुःख भोगवे लागत असे. सुलतानी अत्याचारांमुळे हिंदूंचे आणि अन्यांचे धार्मिक, आर्थिक वा सामाजिक जीवन नष्ट- भ्रष्ट झाले होते. त्यांनी हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली विशाल आणि भव्य मंदिरे उद्ध्वस्त केली. मंदिरातील मूर्तिना  फोडून त्यांचा वापर मशिदिंच्या पायऱ्या  म्हणून करण्यात आला. त्यातून काही मंदिरे व तीर्थक्षेत्रे वाचली तर त्यावर भयंकर कर लादला जात असे. तत्कालीन विदेशी प्रवासी बर्नियरने लिहून ठेवले आहे की, एका  सूर्य ग्रहणाचे वेळी बादशहाला यमुना स्नान करणाऱ्या  हिंदूंकडून एक लक्ष रुपये 'कर' रूपाने मिळाले होते.

     होळी, दिवाळी वा सणांवर सार्वजनिक उत्सवांवर बंदी लादलेली होती. त्यामुळेच हिंदू, जैन, बौद्ध आणि शिख लोक उत्सवानंदापासून वंचीत राहिले. बाटवाबाटवी प्रचंड प्रमाणात चाले. प्रत्येक बादशाह आपल्या सत्ता रोहणाप्रसंगी गाझी बनण्यासाठी अनेकानेक हिंदूंची मस्तके उडवीत असे.
     समस्त बादशहांनी हिंदूंकडून जिझिया कर निष्ठूरपणे वसूल केला होता. मनुची नामक इटालियन प्रवाश्याने औरंगजेबाने लादलेल्या जिझिया कराविषयी लिहून ठेवले आहे. ते असे की, औरंगजेबाच्या जिझिया कराला काही सरदारांनी विरोध केला. परंतु औरंग्या आपल्या निर्णयापासून किंचितही हटला नाही. त्यावेळी प्रचंड भूकंप झाला. त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, 'आपला हा अन्याय निसर्गाला न आवडल्यामुळे त्याने भूकंपाद्वारे आपला क्रोध व्यक्त केला आहे.'
     त्यावेळी छदमीपणे  उत्तर देत औरंग्या म्हणाला, ''तुम्ही म्हणता तसे मुळीच नाही. भूकंप झाला याचा अर्थ पृथ्वी जिझिया लावला म्हणून आनंदाने डोलते आहे.''
     अनेक प्रकारे सुलतान हिंदूंची छळवणूक करीत, त्यांची अनेक वर्णने तत्कालीन कागद-पत्रातून व ग्रंथातून पाहण्यास मिळतात. असे असूनही आज कालचे बी-ग्रेडी पाकिस्तानी हस्तक खोटा इतिहास सांगून मराठयांची आणि बहुजनांची फसवणूक करीत आहेत. खरे जाणण्यासाठी जिज्ञासू वाचकांनी वा धर्माभिमानी हिंदूंनी शिवकथाकार श्री. विजयराव देशमुसख रचित ' शककर्ते शिवराय' हा ग्रंथ अवश्य वाचावा.

    त्या काळी सुलतानी छळांचे अनेक भयंकर प्रकार होते. त्यांचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी पुढील प्रमाणे केले आहे--
प्राणी राजदंड पावत , जेरबंद चाबूक वेत 
दरेमार तळवे मार होत, या नाव आदिभूतिक 
मोघरी मोर बुधले  मार, चौखुरून डंगारणे मार 
बुक्क्या गचांड्या गुडघे मार, या नाव आदिभूतिक
तीर मार सुळी देती, नेत्र वृषण काढिती
 नखोनखी सुया मारिती, या नाव आदिभूतिक
कानी खुंटया आदळती, अपानी मुखी मारिती 
खाल काढुनी टाकिती, या नाव आदिभूतिक
सारी ओढूनी घेती, टेंभे लावुनी भाजती 
ऐशा नाना विपत्ती, या नावे आदिभूतिक । 
     या समस्त सुलतानी संकंटांच्या जोडीने भीषण दुष्काळ पडून प्रजेची दुर्दशा उडत असे.
     आजही अशीच स्थिती आहे. पूर्वीप्रमाणे उघड आक्रमण करता येत नसल्याने विविध प्रकारे हिंदूंना नडण्याचे वा छळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अति स्वतंत्र्यामुळे आणि मुक्त शिक्षण वा सामाजिक पुढारलेपणाने हिंदू मुली स्वेच्छेने वा फसवून धर्माधांच्या शय्याधीन होत आहेत. राज्य वा केंद्र शासनाकडून विविध मार्गाने पैसा उकळवीला जात आहे. गोमांस खाण्यासाठी चटावलेले जन्महिंदू धर्माधांच्या हॉटेलातून गर्दी करीत आहोत. सल्लू, आमीर, शहारूख, सैफ आदिंसमवेत ब्राह्मण मुली दाखवून चित्रपटानूत प्रचंड पैसा मिळवून त्यातील मोठा हिस्सा पाकपुरस्कृत अतिरेक्यांना दिला जात आहे. हिंदूंना आपले सणसुद्धा शास्त्रोक्तरित्या पाळता येत नाही. कारखाने वा कत्तलखान्यातील भयंकर प्रदूषित विष मैलायुक्त पाणी नद्या आणि समुद्रात  सोडून समस्त जलचर आणि भूचर प्राण्यांना पीडा दिली जात आहे. असे असूनही काही मूठभर ढोंगी, प्रशासनाला हाताशी धरून गणेश मूर्तीदान घेऊन कचरागाडीतून  खाणीत फेकून देत आहेत, या बदमाशांना हजारो बकरी-गायिंची कत्तल दिसत नाही. पण कुत्र्यामांजरांचा मात्र पुळका येतो.
     वाळू बंदीच्या नावाखाली शेकडो गवंडी-मेस्त्रींना भुकेले ठेवले जात आहे. शेतकऱ्याच्या  पिकाऊ जमीनी नगरविकासाच्या गोंडस नावाखाली गळंकृत केल्या जात आहेत. हे सर्व करण्यासाठी स्वकीय बांधव कधी भगवा फेटा बांधून तर कधी लालपिवळी फडकी गळ्यात बांधून, तर कधी वाटोळी टोपी टाळक्यावर घालून आम्हालाच फसवत आहेत.
     अंनिस, समाजवादी, पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी  लांडगे लचके तोडून प्रजेला छळत असल्यामुळेच सर्वसामान्य माणसाला वाटते की, 'राजे, पुन्हा जन्माला यावे.' का ? कारण शिवबाराजे परत जन्माला आले तरच आम्ही समस्त संकटातून मुक्त होऊ! परंतु हे शक्य आहे का? मुळीच नाही. कारण राजे जन्माला येण्यासाठी शहाजीराजे आणि जिजाऊसाहेब जन्माला येणे अवश्यक आहे. परंतु आजची नारी आपले पोट -पाट अधिकाधिक प्रदशिर्त करण्यासाठी उतावळी झालेली आहे. आपल्या पुष्ट मांडया आणि बाहू परपुरुषाला दाखविण्यात अग्रेसर आहेत. हे सर्व करण्यासाठी त्यांचे पती त्यांना प्रोत्साहन देत आहेत. आपली पत्नी देवी पेक्षा भाग्या म्हणून प्रदर्शित करण्यासाठी पतींमध्ये चढाओढ लागलेली आहे. इंद्रियभोग म्हणजेच सर्वस्व आहे. यातच खरा आनंद आहे, यातच आमची प्रतिष्ठा आहे असे मनणाऱ्या  कामांध द्विपाद पशुंच्या पोटी छत्रपती शिवराय कसे काय जन्माला येतील? शक्य नाही आणि जरी जन्माला आले तरी काय करणार? कारण आता भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे. १९२० मध्ये गांधींनी षंढत्वाची गोळी खाऊ घातली आणि सर्वांना अहिंसक बनविले. तेव्हा पासून क्षत्रियांनी तलवार धारण करणेच सोडून दिले. त्यामुळे शिवबाराजेंना भवानी तलवारीच्या धाकाने दुष्टाचे दमन करता येणार नाही. त्यांनी भवानी धरताच त्यांना रासुका, मोक्का वा अन्य कायद्याने कारागृहात डांबले जाईल. त्यातून काही वर्षांनी सुटका झाल्यावर त्यांच्यावर सतत पाळत ठेवून त्यांना साहाय्य करणाऱ्या  मावळ्यांना फोडून अन्य पक्षांच्या दावणीला बांधले जाईल. आपल्या बुद्धिमत्तेने अनेक अडचणींवर मात करून शिवबा राजे स्वराज्य स्थापनेसाठी लोकशाही मार्गाने जाऊ लागताच त्यांच्यावर बंदी आणली जाईल. का, तर ते म्हणतील 'हे स्वराज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा. या एकाच वाक्यावर त्यांना न्यायालयात खेचले जाईल. त्यांच्यावर आरोप ठेवला जाईल की, 'तुम्ही विशिष्ट धर्मियांसाठी मते मागत आहात.'
     अनेक अडथळ्यातून शिवबाराजे सहिसलामत सुटत आहेत हे पाहून बाजी घोरपडे वा मंबाजी भोसले सारखे त्यांचे भाऊबंद  इतरांना सुपारी देतील आणि खोटे नाटे आरोप लावून 'ऍट्रोसिटी ' अंर्तगत आठ-दहा वर्षांसाठी विना-जामिन कारागृहात खितपत पाडतील.
     इतके सर्व सोसूनही राजे सुटले तर काही लोक फुसकुल्या सोडतील, 'अरे! हा भटाळलेला  आहे, हा गोब्राह्मणांचें रक्षण करणारा  आहे. याला मत देऊ नका.'
     तर अनेक भाऊबंद  म्हणतील, 'हा तर दारू देत नाही, मांसाहारी पाटर्या देत नाही, गुटखा खात नाही आणि देतपण नाही. याला निवडून देऊ नका.'काही बुद्धिजीवी रयतेचा बुद्धीभेद करतील की, 'हा अफझल वा औरंगजेबासारख्या सुफी अवलियांचा काटा काढणारा आहे. हा डांसबार आणि वाईनचा अभ्यासक्रम बंद करेल. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी बेरोजगार होतील. हा इंग्रजी शिक्षण गुलामीचे लक्षण म्हणणारा आहे. संस्कृत प्रणित मराठी भाषा लादणारा आहे. याला मुळीच मत देऊ नका. आयपीएल क्रिकेट, उघडया-नागडया नाचणाऱ्या  वेश्यांचे चित्रपट म्हणजे कला-अविष्कार, बार-रेस्टारंट म्हणजे प्रगत संस्कृती, विकसीत लेक सिटी सारखी महानगरे निर्माण करण्याच्या विरोधात हा आहे. याला निवडणुकीत धूळ चारा.
      अशा अनेकानेक कारणांनी शिवबाराजेंना स्वराज्य निर्माण करण्यापासून रोखले जाईल आणि शेवटी विस्मृतीच्या गहन अंधारात कधीही परत जन्माला न येण्यासाठी राजे निघून जातील.
लेखनसेवा - विनय शंकर गोडसे
संपर्क : ९२४२१७६५८७