कामांध पुरुष
न पश्यति मदोन्मतो ह्यर्थी दोषान्न पश्यति।।
"जन्माने आंधळा असलेला पाहू शकत नाही. कामाधंसुद्धा पाहू शकत नाही. मदाने धुंद झालेला पाहू शकत नाही आणि धनवंतसुद्धा पाहू शकत नाही." - चाणक्य पंडित
३१ डिसेंबरच्या मंदधुंद रात्री बंगळुरू सारख्या प्रगत अन भौतिक शिक्षणाच्या जोरावर लाखो रुपये प्राप्त करून देणाऱ्या नगरात मद्य प्राशन केलेल्या मुक्त तरुणींवर अति मद्य प्यालेल्या कामांध तरुणांनी अतिप्रसंग केल्याच्या अनेक घटना घडल्या! अशाच काही उत्तेजक घटना भारतातील काही महानगरातून आणि उपनगरातूनही घडल्या. टी. व्ही., इंटरनेट, मोबाईल वरून सर्वत्र याचा प्रसारही वेगाने झाला आणि स्त्री स्वातंत्र्य, तिची सुरक्षा वा सरकारी गलथानपणा यावरून चर्चा, टिपण्या झडू लागल्या. कर्नाटकाच्या गृहमंत्र्याने निर्ल्लजपणे टिपणी केली, " नववर्षाची संध्याकाळ आणि नाताळ या दिवशी अशा घटना होतातच. आम्ही शक्य ती काळजी घेतो."
अशी काळजी घेण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्यावेळी अशा घटना घडत होत्या त्यावेळी तेथे १५०० पोलिसांची लक्षणीय उपस्थिती होती आणि त्यांनी बघ्याची भूमिकासुद्धा पार पडली. यावर गदारोळ झाल्यावर नगर पोलीस आयुक्तानी मल्लिनाथी केले, "अशाप्रकारच्या विनयभंगाची तक्रारच आलेली नाही!" आयुक्त हा गृहमंत्र्याचाच पोपट असल्यामुळे तोही त्यांचीच री ओढणार!
कलियुगात अशा घटना प्रचंड प्रमाणात घडणार असे वर्णन वेद शास्त्रातून केलेले आहे आणि त्यावर मात करण्यासाठी प्रभावी उपायसुद्धा सांगितलेले आहेत. पण त्यांच्याकडे दूर्लक्ष करून स्वतः ला प्रगत आणि स्वतंत्र समजणाऱ्यांना जागे कोण करणार?
जन्माने आंधळा मनुष्य पाहू शकत नाही, हे तर सर्वच डोळस माणसांना माहित आहे. परंतु जो कामवासनेने पीडित आहे, ज्याने नशापान केले आहे आणि ज्याच्या ढुंगणाखाली बापजाद्यांचा फुकटचा पैसा आहे असा मस्तवाल मनुष्यसुद्धा डोळे असूनही पाहू शकत नाही.
आताची समाज व्यवस्था 'यथा प्रजा तथा राजा' अशी आहे. स्त्री असो वा पुरुष सर्वांनाच स्वैर वागायचे आहे. त्यांना कसलीच बंधने नकोत. जो कोणी आमच्या इंद्रियतृप्तीला साहाय्य करेल त्यालाच आम्ही मत देवून आमचा राजा (लोकप्रतिनिधी ) म्हणून निवडू आणि त्याने आमच्या स्वैराचाराला विरोध केला तर मात्र त्याला धूळ चारू. त्यामुळे सत्तान्ध मनुष्य मोठ्या चतुराईने अशा लोकांच्या स्वैराचाराला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि आपली सत्ता पिपासा पूर्ण करतो. त्यामुळे जसे लोक तसे त्यांचे प्रतिनिधी! एकमेकांना पूरक.
परंतु प्राचीन भारतीय संस्कृतीत असे नव्हते. अगदी छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातही असली थेर मुळीच नव्हती. त्याकाळी 'यथा राजा तथा प्रजा' अशी समाज रचना होती. छत्रपती शिवराय स्वतः निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे होते. तसा त्यांचा दंडकच होता. त्यामुळे त्यांच्या घरात, सैन्यात आणि प्रजेत त्यांचे पालन केले जात होते. पण आता असे होणार नाही, कारण सर्वच पक्ष आणि त्यांची सरकारे बरबटलेली आहेत.
प्रशासकीय अधिकारी, पोलीस, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, योगगुरु, पाद्री, मुल्ला-मौलवी, खेळाडू इत्यादी सर्वच क्षेत्रातील पुरुष आणि स्त्रिया कामवासनेने पीडित आहेत. या कामाग्नीत भर घालण्यासाठी प्रगत स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आहेत.
पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यांत स्वतःला धान्य मानणाऱ्या लोकांचे प्राबल्य अतिशय वेगाने वाढत आहे त्यामुळे त्यातून उत्पन्न होणारे दुष्परिणामही भोगावेच लागणार यात तिळमात्र शंका नाही. जे आई बाप आपल्या वयात येणाऱ्या मुलीला भाकरी भाजावयास लावत नाहीत त्यांना त्या मुलीपासून आयुष्यभर चटके खावेच लागणार. प्रगतीच्या नावाखाली मुलींनी तोकडे कपडे घातल्यावर मुले चेकाळणाराच! तुम्ही असे म्हणूच शक्यत नाही, 'आमच्या मुलीने तोकडे वा लांडे कपडे घातले तरी तुमच्या मुलाला मात्र आवरा. त्याला मुलीशी कसे वागावे हे शिकवा.' अहो, जरा विचार करा, तुम्ही पुरुषांच्या तोंडासमोर चिंचा हलवणार आणि अपेक्षा करणार कि आम्ही असे केले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटताकामनाये, पाणी सुटत असेल तर त्यांनी लाळ प्रसविणाऱ्या ग्रंथीच कापून टाकाव्यात! हे कसे काय शक्य आहे?
अवधूत गीता सांगते -
अग्निकुण्डसमा नारी घृतकुंभसमो नरः ।
संसर्गेण विलीयेत तस्मातां परिवर्जयेत ।।
"स्त्री ही प्रज्वलित अग्निकुंडासमान असून पुरुष घट्ट झालेल्या तुपासमान असतो. जर दोघांच्यात जवळीक आली तर पुरुष विरघळल्याविना राहणार नाही."
आजची उफाडी तरुणी विचार करते की, 'मी कसलेही कपडे घालेन, माझे सुडौल शरीर मुसमुसलेले असेलही, त्याने तिचे शरीर जरी कामोत्तेजक वाटत असले तरी पुरुषाने तिच्याकडे केवळ आकर्षित व्हावे, पण त्याने तिच्या अंगचटीला लागता कामा नये. त्याने असे वागणे म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण कारणे , आमचे लैंगिक शोषण करणे ठरेल. परंतु असे असले तरी एकदा धर्ममर्यादा ओलांडल्यावर पुरुषातील कामाग्नी कोणाचाही आणि कशाचाही विचार करीत नाही. तो आपला कुप्रभाव तीव्रतेने दाखवणाराच! त्यामुळे तरुणींनी आपले शील सांभाळत नेहमी स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तुम्ही कशाही वागणार आणि पुरुषांना, पोलिसांना, शासनाला वा भारतीय संस्कृतीला मात्र दोष देणार?
तरुणी पुरुषांनाच दोष का देतात? कारण त्या सर्वांचे उत्तरदायित्व पुरुषांवर असते.
महाभारताच्या शांतिपर्वात(२६६. ४०) सांगितले आहे -
नापराधोअस्ति नारीणां नर एवापराध्यति ।
सर्वकार्यापराध्यत्वात नापराध्यन्ति चांगनाः ।।
"स्त्रिया वाईट मार्गाला लागल्या तर त्यात त्यांचा कसलाही अपराध नाही. याबाबतीत पुरुष सर्वस्वी दोषी असतो. अशा प्रकारच्या सर्व उदाहरणांमध्ये प्रथम अपराध पुरुषांकडून होत असल्यामुळे स्त्रियांना दोष देता येत नाही."
पुरुषप्रधान व्यवस्था मोडून काढली पाहिजे असा आरडाओरडा करणाऱ्या मुक्त स्त्रिया मात्र कठीण प्रसंगी स्वबळावर विसंबून न राहता पुरुषांच्या सभ्यतेची तत्काळ अपेक्षा करतात! हा त्यांचा आपलपोटेपणा आहे याचे त्यांना भान नसते.
आजच्या तथाकथित प्रगत समाजात अतिशय दोषपूर्ण घटक सक्रिय झाले आहेत. ते नेमके कोणते, यावर भाष्य करताना ट्रिटिंग पोर्नोग्राफी अडिक्शनचे डॉ. केविन स्कीनर म्हणतात, "आजकाल प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्या चेतनेवर होणारा कामुकतेचा भडीमार संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात इतका कधीच झाला नव्हता. कामवासना चाळवणारे घटक आणि कामवासनेच्या प्रभावाला आपण सर्वजण बळी पडत असल्यामुळे आजचा समाज डोळ्यांदेखत अधोगतीला जात असल्याचे आपण पाहू शकत नाही. आजच्या अशा कामवासनेला बळी पडलेले कोट्यवाधी लोक असतील."
आदरणीय सिंधुताई सपकाळ म्हणतात, "पूर्ण शरीर झाकेल इतके कपडे स्त्रीजातीने घालावयास हवे तेव्हाच समाज हा सत्कार करेल, नाहीतर बलात्कार हे होताच राहतील."