अज्ञानी
अति उत्साही आणि शास्त्रज्ञानहीन लोकांना काय करावे आणि काय करू नये याचे भान राहिलेले नाही. गुरु, साधू आणि शास्त्र यांची पर्वा न करता लोक आपल्या मनाप्रमाणे भक्ती करू इच्छितात. परंतु त्यांच्या अशा वागण्यामुळे समाजात केवळ गोंधळ निर्माण होत आहे याची त्यांना पर्वा नसते.
महान श्रीकृष्ण भक्त आणि आचार्य श्रीपाद रूप गोस्वामी भक्तिरसामृतसिंधू नामक ग्रंथात लिहितात -
श्रुतिस्मृति पुराणादि पञ्चरात्रविधिं विना । एकान्तिकी हरेरभक्तिरूत्पातायैव कल्पते ।।
' उपनिषद, पुराण, नारद पञ्चरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्यांची उपेक्षा करून जी भगवद्भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पाताच आहे.'
भगवदगीता आणि भागवत पुराणातून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना काय आवड़ते आणि नावडते यांचे स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. असे असूनही लोक आपल्या मनाप्रमाणे करू इच्छितात, अर्थात ते लोक स्वतःच्या मनाला प्रसन्न करू इच्छितात किंवा ते भगवंतांना न शृंगारता आपल्या मनाला शृंगारतात. त्यामुळे ते भगवंतांना आपल्यापासून दूर ठेवतात. आपण काय करावे आणि काय करू नये याचे भान या मूढ लोकांना नसते. हे लोक आपल्या मनाच्या रथात बसून सर्वत्र धावत असतात.
कलियुगाचा प्रभाव दिवसेंदिवस कसा वाढत चालला आहे हे आपण या सर्व घटनांमधून जणू शकतो. आज मुंबई सारख्या महानगरातील धनाढ्य आणि धर्मज्ञानहीन मस्तवाल हिंदू लोक आपल्या घरातून ख्रिस्त्यांची अंधश्रद्धा जोपासताना दिसून येत आहेत. हे मूर्ख लोक हिंदूंच्या श्रद्धांना नाक मुरडतात आणि ख्रिसमस ट्री वा सांताक्लॉज सारख्या अंधश्रद्धांचे मात्र अवडंबर माजवतात.
तसेच पाश्चिमात्यांचे अंधानुकरण कसे वाढत आहे हेही आपण जाणले पाहिजे. ख्रिस्ती मिशनरी कश्याप्रकारे आपला खोटा धर्म हिंदूंच्या गळी उतरवीत आहेत हेही प्रकर्षाने कळून येते. मूर्ख हिंदू ओल्ड मॅन जाळतात, दारू ढोसून धिंगाणा घालतात वा केक हादडतात. गोव्यात तथाकथित उच्च वर्णीय तरुण- तरुणी तोकडे कपडे घालून नंगानाच करतात आणि स्वतःला धन्य मानतात. परंतु आपण कधी ख्रिस्त्यांना वा मुसलमानांना हिंदू सणासुदीला रांगोळी घालताना, मोदक खाताना, आंब्याची तोरणे बांधताना पहिले आहे का?
त्यांच्या सणाला हिंदू शुभेछया देतात, पण ते कधी हिंदू सणाला होर्डिंग्ज लावतात का? त्यांचे नेते वा पाद्री - मुल्ला मौलवी हिंदूंचे अभिनंदन करतात का? जरा विचार करा! मात्र हिंदू पुढारी वा बडी धेंडे हिंदूंचीच भलावण करताना थकत नाहीत. कलियुगाचा प्रभावच मोठा विचित्र आहे.
श्री व्यासदेव युधिष्ठिर महाराजांना सांगतात-
अधर्मरूपो धर्मो हि कश्चिदस्ति नाराधिप ।
धर्मश्चा धर्मरूपोअस्ति तच्च ज्ञेयं विपश्चिता ।।
" हे राजा, कधी कधी धर्मालाच अधर्माचे रूप येते आणि अधर्मच धर्माचे रूप धारण करत असतो; हि गोष्ट ज्ञानी मनुष्याने लक्षात ठेवली पाहिजे. -महाभारत, शांतिपर्व ३३.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा