शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

                           हिंदुनी कोणाच्या आश्रयास जावे ?

आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही. कोणीही यावे आणि हिंदुंच्या टपलीत मारावे आणि सहज फसवावे. आजचा तरुण हिंदू नथुराम गोडसेंनी गांधींना का मारले याची जिज्ञासा करतो आहे. सम्राट कृष्णदेवरायाच्या विशाल साम्राज्याचा सत्य इतिहास दडपून अकबराचा खोटा इतिहास थोपण्याचे षडयंत्र विफल केले जात आहे. मागील ७० वर्षातील फसवणुकीच्या कथा आता कळू लागल्या आहेत. आताचा तरुण हिंदू स्वदेश, स्वधर्म, स्वहित आणि स्वाभिमान यांची योग्य प्रकारे चिकित्सा करू लागला आहे. हे पाहून अनेक आसुरी प्रवृत्तीचे लोकही हिंदुंना भ्रष्ट करण्यासाठी अधिक वेगाने सक्रिय झाले आहेत. वेदशास्त्रे, देवीदेवता आणि सणांची वेगवेगळ्या सुधारणेच्या नावाखाली टिंगल टवाळी करून सातत्याने बुद्धीभेद केला जात आहे. गायींचा उपयोग नाही. ब्राह्मणांचा तिरस्कार करा. दोन चार भणंग साधुंमुळे सर्वच साधुंचा तिरस्कार करण्यास सांगणे, मात्र पाद्री आणि मुल्ला-मौलवी कसे चांगले असतात यांचे उदात्तिकरण प्रत्येक चित्रपटातून सतत करणे. चार कोटी बांग्लादेशी आणि आता एक लाख रोहिंग्या मुसलमानांना मानवतेच्या नावाखाली भारतात वसवण्याचे कारस्थान चालवणे आणि देशोधडीला लागलेल्या काश्मिरी पंडितांविषयी थोबाड बंद ठेवणे. अशी एक नव्हे अनेक कारस्थाने साम्यवादी, पुरोगामी, समाजवादी, अंनिस आणि समस्त राजकीय पक्षांकडून सातत्याने चालू आहेत. 
    अशा भयावह स्थितीत जे बुद्धीमान हिंदू आहेत हे या संकटांना ओळखून आपल्या बुद्धी चातुर्याने काही योजना प्रयोगात आणू इच्छितात. काही कट्टर हिंदू दुष्टांचे पारिपत्य करण्यास अतिशय उत्साही आहेत. परंतू  म्हणावे तसे यश मिळत नाही, का? कारण सर्वंकष विजयासाठी आवश्यक असलेले भगवंतांचे अधिष्ठान त्यांच्या चळवळीत नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या सर्वोत्तम उपदेशांचे ज्ञान आत्मसात करून त्यानुसार चालण्याची इच्छाही नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात-  
    तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । 
    सर्व काळी माझे स्मरण करीत युद्ध कर.                      
    पूर्वीच्या युगातून ज्या ज्या वेळी देवता असुरांकडून पराभूत होत त्या त्या वेळी त्या शक्तिशाली देवतासुद्धा विनम्रतेने भगवंताना शरण जात आणि संरक्षणासाठी प्रार्थना करीत. त्यांनी केलेल्या याचनेमुळे भगवंत त्यांच्यावर प्रसन्न होत आणि त्यांचे संरक्षण करीत. आजही आम्ही हिंदुनी जर प्रामाणिकपणे अभय प्रदान करणाऱ्या भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय स्वीकारला तर भगवान श्रीकृष्ण निश्चित आमचे रक्षण करतील. आपल्या हितरक्षणासाठी प्रार्थना करणाऱ्या देवतांना आश्वस्त करताना भगवान सांगतात -
    यदा देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु ।
    धर्मे मयि च विव्देषः स वा आशु विनश्यति ।।
    'मनुषय जेव्हा भगवंतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांचा, ज्ञानाचे भांडार असणाऱ्या वेदांचा, गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा, धर्मतत्त्वांचा आणि अंततः मज भगवंतांचा द्वेष करतो, तेव्हा खचितच तो आणि त्याची संपूर्ण संस्कृती त्वरित नष्ट होते. ' भागवत ७.४.२७  
   थोडा धीर धारा आणि वाट पहा, भगवंतांची लाठी कशाप्रकारे कार्य करते.