गुरुवार, २२ जून, २०१७

                  ८. ब्राह्मणांची दुःखांतून सुटका 


      नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणांची प्रचंड नासाडी करण्यात आली. विशेषकरून मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात समस्त ब्राह्मण देशोधडीला लागले. खरे तर ब्राह्मणांवर असे संकट कोसळणार याची फार पूर्वीपासून सूचना पूज्य टेंब्ये स्वामींनी दिली होती आणि याचे कारण ब्राह्मणांची चांगली वागणूक नाही असे त्यांनी सूचित केले होते. १९४८ च्या मे महिन्यात ब्राह्मणेतर 
पुढाऱ्यांनी ब्राह्मणलुटीची योजना आखली होती. परंतु जानेवारी महिन्यात गांधी हत्येचे आयते कोलीत मिळाल्यामुळे ही योजना आधीच राबविण्यात आली. सुक्या सोबत ओले जळते त्याप्रमाणे अनेक निष्पाप ब्राह्मण या वणव्यात होरपळले गेले. यातून देशोधडीला लागलेले अनेक ब्राह्मण आपल्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि परिश्रमामुळे परत नावारूपाला आले. 
     याच काळात पुणेरी पतित ब्राह्मणांच्या नादाला लागून अनेक ब्राह्मण आपले ब्राह्मणोचित गुणधर्म सोडून मांस भक्षण, मदिरा सेवन, जुगार आणि व्यभिचार यात प्रगती करू लागले. पुरोगाम्यांच्या कुप्रचारामुळे 'हम दो हमारे दो' किंवा एक असे म्हणून गर्भपात करू लागले. त्यामुळे समस्त ब्राह्मणांचे अध:पतन झाले. कधी कधी चुकून इतिहास वाचणारे आम्हाला प्रश्न विचारतात की, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, सावरकर बंधू, पिंगळे, चंद्रशेखर आझाद, कान्हेरे-देशपांडे इत्यादी अनेक तेजस्वी क्रांतिवीर होऊन गेले. परंतु आता असे तेजस्वी तारे ब्राह्मणांच्या घरी जन्माला का येत नाहीत? पूर्वी या तेजस्वी सुपुत्रांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता वेदेशास्त्रांना जाणत होते. त्यांनी केलेल्या गर्भाधान संस्कारामुळे असे प्रख्यात बुद्धिमान पुत्र जन्माला आले; परंतु आता अशी नररत्ने जन्माला येत नाहीत, कारण ब्राह्मण संस्कारहीन झाले आहेत. ते गर्भाधान सारख्या पवित्र संस्कारावर विश्वास न ठेवता केवळ इंद्रियतृप्तीवर विश्वास ठेवतात आणि या इंद्रियभोगातून प्राप्त होणाऱ्या फळास कन्या व पुत्र म्हणून स्वीकारतात. शुद्ध बीजाच्या अभामुळे रसाळ गोमटी फळे मिळणे दुष्प्राप्य झाले आहे. 
      ब्राह्मणांकडे दिव्य गुणांचा अभाव असल्यामुळे काही स्वार्थी आणि धूर्त राजकारणी बहुजनांच्या एकगठ्ठा मतांच्या प्राप्तीसाठी ब्राह्मणांवर गरळ ओकतात. त्यामुळे बहुजन त्यांना सत्ता प्रदान करतात आणि दुःख भोगतात. खरे पाहता ब्राह्मण भगवद्ज्ञानहीन झाल्यामुळे स्वतःही दुःख भोगत आहेत आणि इतरेजन दिव्य ज्ञानाच्या मार्गदर्शकांच्या अभावामुळे दुःख भोगत आहेत. नास्तिक, लंपट, देशद्रोही, धर्मभ्रष्ट लोक सर्वच जातीपातीत आहेत. त्यामुळे एकमेकांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. 
     संपूर्ण वेदांचे परिपक्व  फळ असलेल्या भागवत पुराणात (५.२.२८) सांगितले आहे की, 'जेव्हा जेव्हा नास्तिक लोक उपद्रव देतात, तेव्हा तेव्हा आस्तिक लोकांना संरक्षण देण्यासाठी भगवंतांचे अवतार ग्रहलोकांतून प्रकट होत असतात.'
     कलियुगात भगवंतांनी भगवत पुराणाच्या आणि श्रीहरिनामाच्या रूपात अवतार घेतला आहे. जर या कलियुगातील ब्राह्मणांना आपले आणि समस्त समाजाचे कल्याण साधायचे असेल, तर त्यांनी केवळ श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भभागवत पुराण या दोन ग्रंथांचे अध्ययन आणि अनुसरण करण्याची सवय लावून घ्यावी; म्हणजे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट सफळ होईल. श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भगवंताचा प्राथमिक अभ्यास असून श्रीमद् भागवत जीवनाचे सारसर्वस्व आहे. ते साक्षात श्रीकृष्ण रूप आहे. म्हणून भागवताला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप म्हणून स्वीकारायला हवे. 
     भागवत पुराण (१.३.२९)  सांगते - 
     जन्म गुह्यम् भगवतो य एतत्प्रायतो नरः ।
     सायं प्रातर्गृणन् भक्त्या  दुःखग्रामाद्विमुच्यते ।। 
     'जो मनुष्य भगवंतांच्या रहस्यमय अवतारांच्या कथांचे प्रातःकाळी आणि सायंकाळी नियमपूर्वक गायन-पठण करतो, त्याची जीवनातील सर्व दुःखांपासून सुटका होते.'
     भागवत अध्ययनासमवेत भगवंतांच्या पवित्र नावांचे सामूहिक कीर्तन आणि जप करणे परम आवश्यक आहे. 
     कालेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्योको महान् गुण ।
     कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग: परं व्रजेत् ।।
'हे राजन, जरी कलियुग दोषांचा सागर असला, तरीही या युगात एक महान गुण आहे - केवळ कृष्णनामाचे कीर्तन केल्याने मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो आणि दिव्य धामाची प्राप्ती करतो.' (भागवत १२.३.५१)  
     ज्याप्रमाणे एक शक्तीशाली राजा असंख्य चोरांना मारू शकतो, त्याप्रमाणे एक आध्यात्मिक सद्गुण या युगातील सर्व कल्मषांचा नाश करतो. या घोर कलियुगात झालेल्या जीवांचा उद्धार कशा प्रकारे करता येईल, हे विचारण्यासाठी श्री नारद मुनी आपले पिता तथा आध्यात्मिक गुरु श्री ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांच्यात झालेला संवाद यजुर्वेदातील 'कलिसंतरण उपनिषद' मध्ये दिलेला आहे. तो असा -  हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। इति षोडशकंनाम्ना कालिकल्मष नाशनम् । नात: परतोपाय: सर्ववेदेषु दृष्यते । 
      द्वापारयुगाच्या अंती नारद मुनी ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना दंडवत करून म्हणाले, "हे प्रभू, या कलियुगात भवसागरातून तरून जाण्यासाठी कोणता मार्ग आहे?"
     ब्रह्मदेव म्हणाले, "हे पुत्र, तू चांगला प्रश्न विचारला आहेस. सर्व वेदांचे जे अनाकलनीय गुपित आहे, ते ऐक. त्यामुळे  कलिरूपी भवसागरातून तू विनाप्रयास तरून जाशील. पहा, आदिपुरुष भगवान श्री नारायणांच्या केवळ नामोच्चारणाने  कलियुगाच्या कल्मषांचा नाश होतो."
     नारद मुनींनी पुन्हा विचारले,"ते नाम कोणते?"
     त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, " हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या सोळा नामांचा जो महामंत्र आहे, तो कलिच्या दोषांचा नाश करणारा आहे. सर्व वेदांमध्ये अन्य उपाय नाही."
     नारदांनी पुन्हा विचारले, "हे भगवंत, या महामंत्राच्या कीर्तनाची पद्धत कोणती आहे?"
     ब्रह्मदेव म्हणाले," या कीर्तनाची कोणतीही पद्धत किंवा नियम नाही."
पवित्र किंवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही वेळी याचे कीर्तन करणारा ब्रह्महत्या, हिंसा, चोरी इत्यादी सर्व पापांतून मुक्त होऊन, भवसागर तरून जातो आणि प्रामुख्याने श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करतो. म्हणून या अतिशय पतित युगात - हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या महामंत्राच्या कीर्तनाचे महत्त्व अपार आहे. 
     भागवत महापुराणाच्या अंतिम श्लोकात (१२.१३.२३) श्री सूत गोस्वामी म्हणतात - 
     नामसंकिर्तनं यस्य सर्व पापप्रणाशनम् ।
     प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरि परम् ।।
    'मी भगवान हरींना सादर प्रणाम करतो की ज्यांच्या पवित्र नामाचे सामूहिक कीर्तन सर्व पापांना नष्ट करते आणि त्यांना नमन करण्याने सर्व दुःखांतून मुक्ती मिळते.'
       
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  
                                










                     ७. ब्राह्मणांची प्रगती की अधोगती 


      आम्ही हा दावा कधीच करीत नाही की, ब्राह्मण धुतलेल्या तांदळासारखे आहेत. वास्तविक पाहता कलियुगाचा प्रारंभ झाला तो ब्राह्मणांच्या पतनामुळे! ब्राह्मण पतित झाले म्हणूनच सर्व समाज पतित झाला आहे. इतरांना दोष देत बसण्यापेक्षा आधी आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. 

इस्लामी आक्रमकांविरुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय लढले; परंतु इस्लामी राजवट स्थिर झाल्यावर क्षत्रियांनी जशी सुलतानांची नोकरी पत्करली तशीच ब्राह्मणांनीही स्वीकारली. कुराणाची शिकवण संस्कृतमध्ये अल्लोपनिषद् म्हणून ब्राह्मणाने सिद्ध केली. दिल्लीच्या बादशाहांसाठी यमुनातटी ब्राह्मण प्रार्थना करीत. याच काळात शास्त्र ज्ञान नसलेले निर्बुद्ध ब्राह्मण मोठ्या संख्येने निर्माण झाले. भगवंतांची उपासना सोडून भ्रामक पूजा-पाठ वाढविणाऱ्यांची संख्यासुध्दा लक्षणीय झाली आहे.     
      ब्राह्मणांनी स्वतःला कितीही देशभक्त वा हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेतले तरी बहुजन समाज ब्राह्मणांनाच का लक्ष्य करतो, याचाही विविध अंगांनी विचार करणे आवश्यक आहे. 
     आज अनेक ब्राह्मण संघटना प्रभावी संघटन करीत आहेत. ब्राह्मणांची अधिवेशने मोठ्या  संख्येने भरत आहेत. उद्योगधंदे, व्यवसाय यावर ब्राह्मणांची प्रगतीही चांगलीच वाढत आहे. टी.व्ही., सिनेमांतून ब्राह्मणांच्या मुली बिनधास्त वस्त्र उतरवून नाचत आहेत. 
     दुप्पट पैसे मिळतात म्हणून कोकणातील ब्राह्मण आपली भूमी हिंदूंऐवजी मुसलमानांना विकत आहेत. मुली मुसलमान वा ब्राह्मणेतरांशी विवाह करण्यास पुढाकार घेत आहेत. ब्राह्मण मुले थोराड झाली तरी त्यांना ब्राह्मण मुली विवाहासाठी मिळत नाहीत. हे असे का होत आहे? कारण ब्राह्मणांनी आपल्या शाश्वत धर्माचा त्याग केला आहे. ब्राह्मणांनी आपले परमशुभचिंतक आणि शाश्वत संरक्षक भगवान श्री विष्णू वा श्रीकृष्णांचा त्याग केला आहे. ब्राह्मणांनी भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय सोडून मानवनिर्मित खोट्या देवांचा स्वीकार केलेला आहे. ब्राह्मणांचे योगक्षेम स्वतः भगवंत करतात; परंतु त्या भगवंतांचा त्याग करून, त्यांच्या दिव्य उपदेशांचा त्याग करून ब्राह्मण मर्त्य मानवांची उपासना करतात. ते परम पवित्र हरिनामाचा त्याग करून मानवनिर्मित नावांचा जप करतात. 
नारद पुराणात स्पष्ट सांगितले आहे - 
      ब्राह्मणो पि मुनिर्ज्ञानी देवमन्यं न पुज्येत् ।
     मोहेन कुरते यस्तु सद्यश्चाण्डालतां व्रजेत् ।।
     सदान्यदेवताभक्तीर्ब्राह्मणानां गरियासी ।
     विदुरयति विप्रत्वं चण्डालत्वं प्रयच्छति ।।
     'मुनी आणि ज्ञानी ब्राह्मण अन्य देवतांची पूजा करणार नाहीत; परंतु जे मोहग्रस्त असे करतात ते त्याच क्षणी चांडाळांचा स्तर प्राप्त करतात. अन्य देवतांप्रति भक्ती ठेवल्यामुळे ब्राह्मणांचे विप्रत्व नष्ट होते आणि त्यांना चांडाळत्व प्रकट होते.'
      वर्तमानकाळी समस्त ब्राह्मण ब्राह्मणोचित आचरणापासून भ्रष्ट झालेले असून चांडाळ सदृश झाले आहेत. ब्राह्मणांचे पतन इतके झाले आहे की त्यांना भगवंत कोण आहेत याचेही ज्ञान नाही. ते अल्पबुद्धीचे देवतापूजकसुद्धा राहिलेले नाहीत. तर त्यापेक्षाही पतित होऊन सामान्य मानवाला विष्णूंचा अवतार म्हणून त्यांची आराधना करीत आहेत. अनंत कोटी ब्रह्माम्डांचे नायक, राजाधिराज, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत. असे असूनही ज्ञानहीन ब्राह्मण मर्त्य बाबा-बुवांना अनंत कोटी ब्रह्माण्डाचे नायक समजत आहेत.  केवढी ही अधोगती झाली आहे पहा!
      महाभारताच्या हरिवंशात म्हटले आहे - 
      यस्तु विष्णुं परित्यज्य मोहादन्यमुपासते ।
      स हेमराशिमुत्सृज्य पांशुराशिं जिघृक्षति ।।
      'जी मोहग्रस्त व्यक्ती श्री विष्णूंचा परित्याग करून अन्य देवतांची उपासना करते, ती सुवर्ण राशीचा परित्याग करून धुळीच्या राशीला ग्रहण करण्याची इच्छा ठेवते. 
      स्कंद पुराणात ब्रह्मदेव नारद मुनींनी सांगतात - 
     वासुदेवं परित्यज्य यो न्यदेवमुपासते ।
     त्यक्त्वामृतं स मूढात्मा भुंक्ते  हलाहलं विषम् ।।
     'जे लोक श्री वासुदेवांना सोडून अन्य देवतांची उपासना करतात, ते मूढात्मा अमृताचा त्याग करून हलाहल विषाचे पान करतात.'  
      शास्त्रांतील वरील स्पष्ट कथनांविषयी ब्राह्मणांनी मनन-चिंतन केले तर त्यांना कळून येईल की, आपले वास्तविक सुख कशात आहे? परंतु कलियुगात ब्राह्मणांचे दुर्दैव इतके भयंकर आहे की ते कश्यपपुत्र हिरण्यकशिपूप्रमाणे त्वरित क्रोधित होतात. स्वतःला पुरोगामी समजून शास्त्रवचनरुपी दिव्य ज्ञानाला ठोकरतात. त्यांची यथेच्छ टिंगलटवाळी करून पोथ्या जाळून टाकण्यास सांगतात. 
      श्री विष्णूंना नष्ट करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन हिरण्यकशिपू समस्त असुरांना आदेश देतो की, यज्ञशाला, ऋषीमुनींचे आश्रम, महत्त्वपूर्ण वृक्ष, गायी यांचा नाश करा. या वैदिक ब्राह्मण संस्कृतीचा नाश झाला की विष्णू आपोआप मरून जाईल. समस्त असुर तत्काळ आपल्या नेत्याच्या आदेशाचे पालन करू लागतात. हिरण्यकश्यपू देवतांना स्वर्गातून पिटाळून लावतो. त्याच्या क्रौर्यामुळे विविध ग्रहांच्या लोकपालांसह संपूर्ण प्रजा अतिशय दुःखिकष्टी होते. त्रस्त आणि भयक्रांत झाल्यामुळे ते सर्व जण कोणताही आश्रय न मिळाल्यामुळे शेवटी भगवान श्री विष्णूंना शरण जातात. ते सर्व जण निद्राचा त्याग करून, पूर्णपणे मनोनिग्रह करून आणि केवळ वायू भक्षण करून भगवान श्री विष्णूंची आराधना करतात. त्यांनी केलेल्या याचनेमुळे भगवान त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या दिव्य वाणीद्वारे सांगतात, "हे विद्वान देवतांनो! भयभीत होऊ नका. तुमचे कल्याण होवो! देव हो! तुम्ही माझ्याविषयी श्रवण-कीर्तन करून तथा माझी स्तुती करून माझे भक्त व्हा, कारण अशा कृतींमुळे सर्व जीवांना खचितच सर्व प्रकारचे वर प्राप्त होतात. मला हिरण्यकशिपूची सर्व दुष्कृत्ये माहित असून मी लवकरच ती थांबविणार आहे. तथापि, कृपया योग्य काळाची प्रतीक्षा करा."         
     सध्या ब्राह्मणांची जी दुःखद अवस्था झाली आहे त्याला जसा अन्य समाज उत्तरदायी आहे तसा स्वयं ब्राह्मण समाजही आहे. ब्रिग्रेडीवृत्ती जर हिरण्यकशिपूप्रमाणे वागत असेल, पुरोगामी, साम्यवादी वा अंनिससारखे समस्त नास्तिक धर्मावर आघात करत असतील, इसिससारख्या इस्लामी अतिरेकी संघटना वा पाश्चात्त्य ख्रिस्ती हिंदू संस्कृतीचा नाश करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतील, तर ब्राह्मणांनी तत्काळ भगवंतांना शरण गेले पाहिजे. त्यांच्या आदेशानुसार केवळ भगवंतांचेच नाम श्रवण-कीर्तन करून त्यांचे प्रामाणिक भक्त झाले पाहिजे. तरच भगवान ब्राह्मणांचे रक्षण करतील. भगवान आपल्या आश्रितांना स्पष्टपणे सांगतात - 
     यदा  देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु ।
     धर्मे मयि च विद्वेष: स वा आशु विनश्यति ।। 
     'मनुष्य जेव्हा भगवंतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांचा, ज्ञानाचा भांडार असणाऱ्या वेदांचा, गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा (वैष्णवांचा), धर्मतत्त्वांचा आणि अंततः मज भगवंतांचा द्वेष करतो, तेव्हा खचितच तो आणि त्याची संपूर्ण संस्कृती त्वरित नष्ट होते.' - भागवत ७.४.२७
      अर्थात समस्त संकटांतून मुक्त होऊन आनंदपूर्ण जीवन जगण्यासाठी ब्राह्मणांनी प्रामाणिक बनले पाहिजे. चारित्र्यवान आणि ज्ञानवान बनले पाहिजे. केवळ आयटीचे भौतिक ज्ञान घेऊन, बक्कळ पैशाच्या जोरावर समस्त प्रकारची इंद्रियतृप्ती प्राप्त करणे म्हणजे प्रगती नव्हे. ही तर नरकामध्ये नेणारी अधोगती आहे. 
     एखाद्या शुद्राने श्रावण मासात एक वेळ दारू प्राशन केले  नाही तर त्याला पुष्कळ पुण्य प्राप्त होऊन स्वर्गात निवास करण्याची संधी मिळते, परंतु एखादा ब्राह्मण एकदा जरी नशापान करेल तर त्याला अनंतकाळासाठी नरकवासी व्हावे लागते. आताचे ब्राह्मण मात्र वेदांवर विश्वास ठेवत नाहीत. वेदांची आणि भगवंतांचीच टिंगलटवाळी करतात. त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण अशा मुर्खांना दंड देतात. 
      ब्राह्मण जर खरोखरच बुद्धिमान असतील तर त्यांनी देवांचा, ज्ञानाचे भांडार असणाऱ्या वेदांचा, सर्व प्रकारचे भौतिक आणि अध्यात्मिक सुख प्रदान करणाऱ्या गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा अर्थात भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा, धर्मतत्वांचा आणि प्रामुख्याने भगवंतांचा द्वेष न करता, त्यांची प्रेममयी सेवा करावी. त्यामुळे त्यांचे सर्वप्रकारे रक्षण होईल. आत्मसन्मान मिळेल. प्रेम पेरले तर प्रेमाची मधुर फळे मिळतील. द्वेष पेरला तर द्वेष मिळेल. काय मिळवायचे ते ज्याचे त्याने ठरवावे.          
           
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७