५. इंग्रजांचे आक्रमण
बहुजन समाजाला ब्राह्मणांविषयी खोटा इतिहास शिकवून भ्रमित केले जात आहे. इंग्रज व्यापार करण्यासाठी भारतात आले होते, त्या वेळी आम्ही भारतीय एकमेकांशी भांडत होतो, लढत होतो. देश जातीपाती आणि धर्माच्या नावाखाली विभागलेला होता; आणि याच्या उलट इंग्रज पराक्रमी, संघटित, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक शस्त्रांनी सुसज्जित होते; त्यामुळे त्यांनी आमचा पराभव करून आम्हाला गुलाम बनविले, इत्यादी खोटा इतिहास इंग्रजांनी भारतीयांना शिकविला आणि त्यांचीच री भारतीय सत्ताधाऱ्यांनी ओढली.
खरा इतिहास मात्र हा आहे की, इंग्रज भारतात आले ते राज्य करण्यासाठी; परंतु रावणाप्रमाणे वेशांतर करून, व्यापारी बनून. त्यांचा कावा केवळ छत्रपती श्री शिवरायांनी ओळखला होता आणि त्यांना त्यांच्या स्थानी जखडून ठेवले होते. छत्रपती शिवरायांमुळेच आम्ही इस्लामी आक्रमणापासून मुक्त होत होतो. बहादूरशाह जाफर, टिपू सुलतान, बंगाल आणि अवध येथील नवाब तेवढेच वाचले होते. अटक ते कटक आणि दिल्ली ते कावेरीपर्यंत मराठा साम्राज्य पसरले होते. दिल्लीवर नामधारी बादशहा मराठ्यांच्या आश्रयाने जगत होता. लाल किल्ल्यावर मोगली झेंड्यासमवेत भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकत होता. शेकडो वर्षांपासून इस्लामी आक्रमणाखाली भरडला जणारा हिंदू समाज या इस्लामी आक्रमणाचा प्रतिकार करण्यात गुंतून पडला होता. त्याला संघटित आणि व्यवस्थित होण्यासाठी काही कालावधी मिळत असतानाच इंग्रज, पोर्तुगीज इत्यादी गोऱ्यांची आक्रमणे यशस्वी होऊ लागली आणि त्यांच्या धूर्त आणि आसुरी संस्कृती (विकृती)चे आमच्यावर आक्रमण झाले. त्यांच्या वेगळ्या युरोपीय संस्कृतीचे मायाजाल आम्ही जाणू शकलो नाही. हिंदू वचनाचे पक्के आणि इंग्रजादी गोरे संधी मिळताच वचनभंग करून विश्वासघात करणारे. हिंदू शरणार्थींना आश्रय प्रदान करणारे आणि गोरे शरणार्थी म्हणून आले आणि आश्रय देणाऱ्यांचीच हत्या करणारे. हिंदू प्रामाणिक व्यापारी तर इंग्रज व्यापाऱ्यांच्या रूपातील ठग आणि लुटारू. हिंदू युद्धात पडलेल्या शत्रूंचाही सन्मान करणारे तर इंग्रज शत्रूंच्या मस्तकांना कापून फ़ुटबॉल प्रमाणे लाथाडणारे! हिंदू वनातील हिंस्त्र पशूंची मृगया करणारे, तर इंग्रज मनोरंजनासाठी निःशस्त्र गुलामांची शिकार करणारे. हिंदू मानवतेच्या सद्गुणांची पराकाष्ठा प्रदर्शित करणारे आणि गोरे चमडी असलेले लोक क्रूर असुर; इतका भयंकर पतित समाज हिंदूंच्या कल्पनेपलीकडचा होता.
सुलतानी आणि इंग्लिशस्तानी आक्रमणांपूर्वी भारतातील राजे एकमेकांवर आक्रमण करीत, कशासाठी? केवळ आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी किंवा सम्राट बनण्यासाठी. अनेक वेळा विजयी राजा पराजित झालेल्या राजाला परत सिंहासनावर बसवून त्याच्याकडून कर (खंडणी) घेत असे आणि आपल्या राज्याच्या विस्तारासाठी आपल्या मंडलिक राजाकडून साहाय्य घेत असे. परंतु कधीही अनावश्यक लूटमार किंवा कत्तल करीत नसे.
वाळवंटातून आलेल्या मुस्लिम आक्रमकांच्या दृष्टीने भारत स्वर्ग होता. ते येथे बस्तान ठोकण्यासाठी येत आणि ते शक्य झाले नाही तर लूटमार, बलात्कार, स्त्रियांचे अपहरण, मंदिर विध्वंस इत्यादी क्रौर्य करून आपल्या देशास पळून जात. त्यांचे अत्याचार बाटवाबावीपर्यंत होत. हिंदू लोक
मुस्लिम बनल्यावर अनेक भारतीय परंपरा आणि उद्योग व्यवसाय यांच्याशी जोडलेले असत. परंतु इंग्रजांचे असे नव्हते. ते या सुवर्णभूमीत स्थायिक होण्यासाठी आले नव्हते. त्यांचा एकमेव उद्देश होता या स्वर्गीय भूमीतील समस्त ऐश्वर्य अनंत काळासाठी लुटणे. मुस्लिम आक्रमकांच्या विरुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रियांनी सशस्त्र संघर्ष केला, त्यामुळे मुसलमानांनी ब्राह्मण आणि क्षत्रियांवर सर्वात जास्त अत्याचार केले, परंतु मुसलमानां-पेक्षा इंग्रज कितीतरी धूर्त आणि लुच्चे होते. त्यांनी या दोन वर्णांपेक्षा वैश्य आणि शुद्रांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. कारण ब्राह्मण तथा क्षत्रिय पैसा कमवीत नसत. वैश्य आणि शुद्र धन कमवीत आणि राजाला कर देत. राजा त्या करातील काही अंश ब्राह्मणांना दान करीत असे.
वैश्य व्यापार, गोपालन आणि शेती करीत. ते सहा प्रकारची पिके घेत आणि अन्नधान्यामुळे सुसंपन्न असत. राजा कर रूपाने सहावा भाग घेत असे, परंतु इंग्रजांनी ऊस आणि नीळ यांची मोट्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी अत्याचार केले आणि समृद्ध भारतीय शेती नष्टभ्रष्ट केली. शेतकऱ्यांवर कर लादून रोख रक्कम वसूल करणे चालू केले. इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर गोहत्या घडवून विविध कारस्थानांद्वारे गोपालक वैश्यांना नष्ट केले. सर्व प्रकारचे श्रमजीवी उद्योग शुद्रांच्या हातात होते. भारतातील वस्त्रोद्योग, लोह उद्योग, चर्मोद्योग, सुवर्ण उद्योग, अन्य धातूंचे उद्योग, लाकूड उद्योग संपूर्ण विश्वात प्रसिद्ध होते. भारत सर्वात मोठा निर्यातदार होता. भारतीय संस्कृती कृषिप्रधान होती आणि अर्थव्यवस्था उद्योगप्रधान होती. भारतातील सर्व उद्योगपती शुद्र होते. इंग्रजांनी शुद्रांवर अमानवीय अत्याचार करून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडून टाकला.
बिहार-बंगाल येथील उत्तम वस्त्रोद्योगत सहा लक्षपेक्षा अधिक कुटुंबे होती. त्या काळी एका कुटुंबात ५० ते ६० सदस्य होते. त्यांची बोटे छाटून इंग्रजांनी तलम वस्त्रोद्योग नष्ट केला. मध्य प्रदेशातील पोलादी उद्योग नष्ट करण्यासाठी इंग्रज तेथील लोकांना चाबकाने फोडून काढत आणि सर्वांसमक्ष फासावर लटकवीत. दक्षिण भारतातील सर्वांगसुंदर मंदिरे निर्माण करण्याचे कार्य पेरियार करीत. त्यांनाही मंदिर बनविण्यापासून रोखण्यात आले. शल्यचिकित्सा करण्यात कुशल असलेल्या नाभिकांना केवळ केस कापण्यासाठी कार्य करण्यास भाग पाडून धंदेबाज डॉक्टरांचा वर्ग उभा केला.
भारतील अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे संपूर्ण सामाजिक व्यवस्था कोसळून समाज नष्टभ्रष्ट झाला. कुटील कारस्थानी इंग्रजांनी खोटीनाटी, कपटकारस्थाने रचून, नवनवीन चाली खेळून समाजात एकमेकांविरुद्ध ईर्षा, संशय आणि भ्रम निर्माण करून समाजाला नष्ट केले.
इंग्रज ज्याप्रमाणे काळ्या लोकांना अस्पृश्य मानत होते, त्याप्रमाणे भारतात कोण्या जातीला अस्पृश्य मानण्याची प्रथा नव्हती. भारतात अपराधी मनुष्याला दंडित करण्यासाठी समाजातून बहिष्कृत केले जात असे. जोपर्यँत तो आपला दंड भोगत नाही, तोपर्यंत तो अस्पृश्य राहत असे.
विशेष पूजा-अनुष्ठानांच्या वेळी सोवळ्याचे पालन पवित्रतेच्या दृष्टीने होत असे, ते सध्याच्या वैज्ञानिकांच्या hygiene (स्वच्छता) पेक्षा अधिक शास्त्रीय होते.
ज्या इंग्रजांना 'उष्टे' हा शब्दच माहीत नव्हता, शौचानंतर डावा हात स्वच्छ धुतला पाहिजे हे ज्ञान नव्हते, महिनोंमहिने स्नान करणे माहीत नव्हते, वस्त्र बदलणे माहित नव्हते, त्यांना भोजनातील उष्टे-खरकटे यांचे पालन करण्यात काय विज्ञान आहे हे कसे काय कळणार? त्यांनी पद्धतशीरपणे शुद्र जातींना अस्पृश्य बनविले आणि सर्व दोषरोपण ब्राह्मणांवर केले.
इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील प्रत्येक मनुष्य शिक्षित होता. ज्या गावची लोकसंख्या चारशे आहे तेथे एक पाठशाळा होती. अशा पाठशाळांतून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षक शुद्र होते. मुलींना घरातूनच शिक्षण घेण्याची व्यवस्था होती. अशा सुंदर भारताला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी सर्वप्रथम येथील गुरुकूल शिक्षण पद्धत नष्ट केली. पंधरा वर्षे काहीही करू दिले नाही आणि त्यानंतर आपले मॅकॅलोप्रणीत इंग्रजी शिक्षण चालू केले. आपल्या शासन व्यवस्थेसाठी कारकुनांची आवश्यकता असल्यामुळे इंग्रजांनी मोठ्या नगरातून ABCD शिकवणाऱ्या शाळा काढून तेथील ब्राह्मणांना शिकवून थोडा पैसा देऊन त्यांना इतरेजनांपासून तुम्ही वेगळी आहात असे शिकवून समाजात भेद पाडला.
वाळवंटातून आलेल्या मुस्लिम आक्रमकांच्या दृष्टीने भारत स्वर्ग होता. ते येथे बस्तान ठोकण्यासाठी येत आणि ते शक्य झाले नाही तर लूटमार, बलात्कार, स्त्रियांचे अपहरण, मंदिर विध्वंस इत्यादी क्रौर्य करून आपल्या देशास पळून जात. त्यांचे अत्याचार बाटवाबावीपर्यंत होत. हिंदू लोक
मुस्लिम बनल्यावर अनेक भारतीय परंपरा आणि उद्योग व्यवसाय यांच्याशी जोडलेले असत. परंतु इंग्रजांचे असे नव्हते. ते या सुवर्णभूमीत स्थायिक होण्यासाठी आले नव्हते. त्यांचा एकमेव उद्देश होता या स्वर्गीय भूमीतील समस्त ऐश्वर्य अनंत काळासाठी लुटणे. मुस्लिम आक्रमकांच्या विरुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रियांनी सशस्त्र संघर्ष केला, त्यामुळे मुसलमानांनी ब्राह्मण आणि क्षत्रियांवर सर्वात जास्त अत्याचार केले, परंतु मुसलमानां-पेक्षा इंग्रज कितीतरी धूर्त आणि लुच्चे होते. त्यांनी या दोन वर्णांपेक्षा वैश्य आणि शुद्रांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. कारण ब्राह्मण तथा क्षत्रिय पैसा कमवीत नसत. वैश्य आणि शुद्र धन कमवीत आणि राजाला कर देत. राजा त्या करातील काही अंश ब्राह्मणांना दान करीत असे.
वैश्य व्यापार, गोपालन आणि शेती करीत. ते सहा प्रकारची पिके घेत आणि अन्नधान्यामुळे सुसंपन्न असत. राजा कर रूपाने सहावा भाग घेत असे, परंतु इंग्रजांनी ऊस आणि नीळ यांची मोट्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी अत्याचार केले आणि समृद्ध भारतीय शेती नष्टभ्रष्ट केली. शेतकऱ्यांवर कर लादून रोख रक्कम वसूल करणे चालू केले. इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर गोहत्या घडवून विविध कारस्थानांद्वारे गोपालक वैश्यांना नष्ट केले. सर्व प्रकारचे श्रमजीवी उद्योग शुद्रांच्या हातात होते. भारतातील वस्त्रोद्योग, लोह उद्योग, चर्मोद्योग, सुवर्ण उद्योग, अन्य धातूंचे उद्योग, लाकूड उद्योग संपूर्ण विश्वात प्रसिद्ध होते. भारत सर्वात मोठा निर्यातदार होता. भारतीय संस्कृती कृषिप्रधान होती आणि अर्थव्यवस्था उद्योगप्रधान होती. भारतातील सर्व उद्योगपती शुद्र होते. इंग्रजांनी शुद्रांवर अमानवीय अत्याचार करून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडून टाकला.
बिहार-बंगाल येथील उत्तम वस्त्रोद्योगत सहा लक्षपेक्षा अधिक कुटुंबे होती. त्या काळी एका कुटुंबात ५० ते ६० सदस्य होते. त्यांची बोटे छाटून इंग्रजांनी तलम वस्त्रोद्योग नष्ट केला. मध्य प्रदेशातील पोलादी उद्योग नष्ट करण्यासाठी इंग्रज तेथील लोकांना चाबकाने फोडून काढत आणि सर्वांसमक्ष फासावर लटकवीत. दक्षिण भारतातील सर्वांगसुंदर मंदिरे निर्माण करण्याचे कार्य पेरियार करीत. त्यांनाही मंदिर बनविण्यापासून रोखण्यात आले. शल्यचिकित्सा करण्यात कुशल असलेल्या नाभिकांना केवळ केस कापण्यासाठी कार्य करण्यास भाग पाडून धंदेबाज डॉक्टरांचा वर्ग उभा केला.
भारतील अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे संपूर्ण सामाजिक व्यवस्था कोसळून समाज नष्टभ्रष्ट झाला. कुटील कारस्थानी इंग्रजांनी खोटीनाटी, कपटकारस्थाने रचून, नवनवीन चाली खेळून समाजात एकमेकांविरुद्ध ईर्षा, संशय आणि भ्रम निर्माण करून समाजाला नष्ट केले.
इंग्रज ज्याप्रमाणे काळ्या लोकांना अस्पृश्य मानत होते, त्याप्रमाणे भारतात कोण्या जातीला अस्पृश्य मानण्याची प्रथा नव्हती. भारतात अपराधी मनुष्याला दंडित करण्यासाठी समाजातून बहिष्कृत केले जात असे. जोपर्यँत तो आपला दंड भोगत नाही, तोपर्यंत तो अस्पृश्य राहत असे.
विशेष पूजा-अनुष्ठानांच्या वेळी सोवळ्याचे पालन पवित्रतेच्या दृष्टीने होत असे, ते सध्याच्या वैज्ञानिकांच्या hygiene (स्वच्छता) पेक्षा अधिक शास्त्रीय होते.
ज्या इंग्रजांना 'उष्टे' हा शब्दच माहीत नव्हता, शौचानंतर डावा हात स्वच्छ धुतला पाहिजे हे ज्ञान नव्हते, महिनोंमहिने स्नान करणे माहीत नव्हते, वस्त्र बदलणे माहित नव्हते, त्यांना भोजनातील उष्टे-खरकटे यांचे पालन करण्यात काय विज्ञान आहे हे कसे काय कळणार? त्यांनी पद्धतशीरपणे शुद्र जातींना अस्पृश्य बनविले आणि सर्व दोषरोपण ब्राह्मणांवर केले.
इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील प्रत्येक मनुष्य शिक्षित होता. ज्या गावची लोकसंख्या चारशे आहे तेथे एक पाठशाळा होती. अशा पाठशाळांतून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षक शुद्र होते. मुलींना घरातूनच शिक्षण घेण्याची व्यवस्था होती. अशा सुंदर भारताला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी सर्वप्रथम येथील गुरुकूल शिक्षण पद्धत नष्ट केली. पंधरा वर्षे काहीही करू दिले नाही आणि त्यानंतर आपले मॅकॅलोप्रणीत इंग्रजी शिक्षण चालू केले. आपल्या शासन व्यवस्थेसाठी कारकुनांची आवश्यकता असल्यामुळे इंग्रजांनी मोठ्या नगरातून ABCD शिकवणाऱ्या शाळा काढून तेथील ब्राह्मणांना शिकवून थोडा पैसा देऊन त्यांना इतरेजनांपासून तुम्ही वेगळी आहात असे शिकवून समाजात भेद पाडला.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
संपर्क : ९२४२१ ७६५८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा