निर्गुण निराकार
जेव्हा कधी आध्यात्मिक विषयावर चर्चा प्रारंभ होते, त्यावेळी बहुतेक करून काही तथाकथित बुद्धिमान असा दावा करतात की भगवंत निर्गुंण आहेत. ते निराकार आहेत. या विषयावर वाद - विवाद करते वेळी त्या लोकांना बराच हुरूप चढतो. असे लोक मायावादी म्हणून समजले जातात. त्यांच्या बडबडीमुळे खरा जिज्ञासू मनुष्य गोंधळून जातो.
वस्तुतः हे निर्गुण - निराकार शब्द काय सांगतात ते आपण पाहूया. या भौतिक जगात सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण आहेत. हे गुण तथा भौतिक प्रकृती भगवान श्रीकृष्णांच्या आधीन आहे. भगवान सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्या शक्तींचा वापर स्वतःच्या उद्दिष्टांसाठी करू शकतात. परंतु असे करताना त्यांच्यावर या गुणांचा जराही प्रभाव पडू शकत नाही. परंतु बाकीच्या देवता वा मनुष्य या गुणांच्या आधीन असतात, या गुणांनी युक्त असलेल्यांना सगुण म्हणतात. परंतु श्रीकृष्ण या गुणांच्या पलीकडे असल्याने त्यांना आपण निर्गुण म्हणू शकतो. परंतु मायावादी म्हणतात तसे काही भगवान निर्गुण नाहीत.
तसेच मायावादी म्हणतात भगवंत निराकार आहेत. परंतु भगवंतांना पूर्ण आकारही आहे. आम्हाला भौतिक आकार आहे. आमचा आत्मा आणि शरीर भिन्न आहे. आमचे शरीर भूमी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच भौतिक गोष्टींपासून बनलेले आहे. आमच्या शरीरात कफ, पित्त, वायु, मल, मूत्र, मांस, रक्त असे अनेक पदार्थ आहेत. त्यामुळे आमचे शरीर विशिष्ट आकाराचे आहे. या शरीराला साकार म्हणतात. परंतु भगवान श्रीकृष्णांचे शरीर आणि आत्मा यात काहीच अंतर नाही. तसेच त्यांचे शरीर ( विग्रह ) भौतिक पदार्थांपासून बनलेले नाही. ते संपूर्ण दिव्य आणि शुद्ध आध्यात्मिक आहे. त्यांना भौतिक पदार्थांचा आकार नाही.
मायावादी समजतात तसे भगवंत कधीही निराकार होत नाहीत. परंतु ते साकार असूनही आमच्याप्रमाणे नाहीत. त्यांचे शरीर सच्चिदानंद आहे. मायावादी म्हणतात त्यांचे निराकार स्वरूप आहे किंवा ब्रह्मज्योती आहे. परंतु आस्तिक समजतात ती ब्रह्मज्योती तर भगवंतांच्या दिव्य कांतीचा केवळ प्रकाश आहे वा प्रकाशापलीकडे स्वयं भगवान आहेत.
श्रीमद्भागवतात परम सत्याची संकल्पना पुढीलप्रमाणे दिली आहे - ' परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. '
भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे; ते आदिपुरुष आहेत. यास्तव श्री इशोपनिषद् म्हणते, ' हे भगवान ! हे सर्व जीवांचे पोषणकर्ता ! आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा आणि आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या.
तर आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की भगवान श्रीकृष्णांना शाश्वत, सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु ते रूप त्यांच्या भक्तानाच पहावयास मिळते. नास्तिक लोकांसमोर ते प्रकट होत नाहीत.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
जेव्हा कधी आध्यात्मिक विषयावर चर्चा प्रारंभ होते, त्यावेळी बहुतेक करून काही तथाकथित बुद्धिमान असा दावा करतात की भगवंत निर्गुंण आहेत. ते निराकार आहेत. या विषयावर वाद - विवाद करते वेळी त्या लोकांना बराच हुरूप चढतो. असे लोक मायावादी म्हणून समजले जातात. त्यांच्या बडबडीमुळे खरा जिज्ञासू मनुष्य गोंधळून जातो.
वस्तुतः हे निर्गुण - निराकार शब्द काय सांगतात ते आपण पाहूया. या भौतिक जगात सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण आहेत. हे गुण तथा भौतिक प्रकृती भगवान श्रीकृष्णांच्या आधीन आहे. भगवान सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्या शक्तींचा वापर स्वतःच्या उद्दिष्टांसाठी करू शकतात. परंतु असे करताना त्यांच्यावर या गुणांचा जराही प्रभाव पडू शकत नाही. परंतु बाकीच्या देवता वा मनुष्य या गुणांच्या आधीन असतात, या गुणांनी युक्त असलेल्यांना सगुण म्हणतात. परंतु श्रीकृष्ण या गुणांच्या पलीकडे असल्याने त्यांना आपण निर्गुण म्हणू शकतो. परंतु मायावादी म्हणतात तसे काही भगवान निर्गुण नाहीत.
तसेच मायावादी म्हणतात भगवंत निराकार आहेत. परंतु भगवंतांना पूर्ण आकारही आहे. आम्हाला भौतिक आकार आहे. आमचा आत्मा आणि शरीर भिन्न आहे. आमचे शरीर भूमी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या पाच भौतिक गोष्टींपासून बनलेले आहे. आमच्या शरीरात कफ, पित्त, वायु, मल, मूत्र, मांस, रक्त असे अनेक पदार्थ आहेत. त्यामुळे आमचे शरीर विशिष्ट आकाराचे आहे. या शरीराला साकार म्हणतात. परंतु भगवान श्रीकृष्णांचे शरीर आणि आत्मा यात काहीच अंतर नाही. तसेच त्यांचे शरीर ( विग्रह ) भौतिक पदार्थांपासून बनलेले नाही. ते संपूर्ण दिव्य आणि शुद्ध आध्यात्मिक आहे. त्यांना भौतिक पदार्थांचा आकार नाही.
मायावादी समजतात तसे भगवंत कधीही निराकार होत नाहीत. परंतु ते साकार असूनही आमच्याप्रमाणे नाहीत. त्यांचे शरीर सच्चिदानंद आहे. मायावादी म्हणतात त्यांचे निराकार स्वरूप आहे किंवा ब्रह्मज्योती आहे. परंतु आस्तिक समजतात ती ब्रह्मज्योती तर भगवंतांच्या दिव्य कांतीचा केवळ प्रकाश आहे वा प्रकाशापलीकडे स्वयं भगवान आहेत.
श्रीमद्भागवतात परम सत्याची संकल्पना पुढीलप्रमाणे दिली आहे - ' परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत. परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. '
भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे; ते आदिपुरुष आहेत. यास्तव श्री इशोपनिषद् म्हणते, ' हे भगवान ! हे सर्व जीवांचे पोषणकर्ता ! आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा आणि आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या.
तर आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की भगवान श्रीकृष्णांना शाश्वत, सच्चिदानंद स्वरूप आहे. परंतु ते रूप त्यांच्या भक्तानाच पहावयास मिळते. नास्तिक लोकांसमोर ते प्रकट होत नाहीत.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा