हानिकारक दया
वृत्तपत्रातून अनेक वेळा विविध संस्था वा संघटना, क्लब यांचे द्वारा अनेक कल्याणकारी कार्ये केली जातात, असे आपल्याला वाचायला मिळते. केवळ दयेच्या पोटी, जी मंद किंवा वाईटाला जन्म देत नाही तिला अमन्दोदाय दया म्हणतात. परुंतु रोग्याला कुपथ्य करू देणे किंवा दारुड्याला बारपर्यंत पोहचविण्यास साहाय्य करणे यातून सुद्धा दयेचे प्रदर्शन होतेच. परंतु अशी दया ती प्राप्त करणाऱ्या व्यक्तिला हानिकारक असू शकते. जर रोग्याला त्याच्या इच्छेविरुद्ध औषध दिले किंवा दारुड्याला त्याच्या कुमार्गापासून वाचविले तर ती दया अमन्दोदाय दया होते.
महापूर वा दुष्काळाला रोखणे, मरणासन्न व्यक्तिची सेवा करणे, कोणा व्यक्तिला प्रसन्न करणे वा रुष्ट करणे, शून्यवाद -निर्विशेषवाद यांना
वाढवणे, यातील प्रत्येकात मन्दोदाय दया म्हणजे हानिकारक दया आहे. अशा कार्यातून मनुष्याला तोपर्यंत वास्तविक लाभ मिळू शकत नाही, जोपर्यंत तो स्वतःची वास्तविक स्थिती काय आहे हे जाणत नाही.
सामाजिक संस्था वा सर्वच लोक दुःख, रोग, कष्ट, गरीबी याना समूळ नष्ट करू इच्छितात. परंतु ते जाणू शकत नाहीत की हे जग 'दुःखालयम अशाश्वतम्' आहे. इंद्रियांना संतुष्ट केल्याने सुखी होऊ असा सर्वांचा समज आहे. परंतु इंद्रियांच्या भौतिक इच्छांच्या प्रती घृणा उत्पन्न केल्याने रोग, दुःख वा कष्ट चांगल्या प्रकारे बरे होऊ शकतात.
मुण्डक उपनिषद (१.२.६) सांगते, 'अज्ञानी व्यक्ती घोर अविद्येमध्ये राहून असा विचार करते की 'आम्ही जे इच्छिले ते आम्हाला मिळाले आहे. 'परंतु ती आपल्या कर्मात अनुरक्त राहून आपल्या हिताचे कार्य करते, म्हणून तिला खऱ्या सत्याचा कोणताही अनुभव नाही. ती आपल्याला फलस्वरूप पुष्कळच कमी लाभ घेऊ शकते. काही काळानंतर ती आपल्या कार्याने पदच्युत होते.
पुढे असे सांगितले आहे-
'अज्ञानात राहूनही लोक स्वतःला पंडित मानतात. असे विकृत तथा अज्ञानी लोक आंधळ्याचा हात धरून चालणाऱ्या अंध व्यक्तिप्रमाणे दुःखाला प्राप्त करतात.'
सर्वजण मोहाच्या जाळ्यात सापडून, आपल्या शाश्वत गृहाला विसरून विरुद्ध दिशेला पळत आहेत. ते आपली मदोन्मत्तता, उत्सुकता, एकाग्रता तथा दृढसंकल्पता यात इतके व्यस्त आहेत की त्यांना आपल्या शाश्वत घराविषयी विचार करण्यासही वेळ मिळत नाही . परंतु कृष्णभक्त सदैव घोषणा करतात - कृष्ण' बल, संगे चल एइ - मात्र भिक्षा चाई 'हरे कृष्ण
आंदोलनाचा संदेश आहे - भगवद् धामाला परत जाणे.
कृष्णभक्त सांगतात , 'विश्वातील सर्व लोक भेदभावाविना आमच्या परिवारातील आहे. पशु-पक्षी, वेली-झाडे सर्वजण आमचे आहेत. जेवढे चेतन प्राणी आहेत, जे विद्यमान आहे ते सर्व काही भगवान श्रीकृष्णांचेच आहेत. आम्ही आमच्या परिवारातील सर्वांना मायेच्या पाशातून सोडवून भगवद्धामाला घेऊन जाणार. आम्ही त्यांनी मायेच्या अधीन ठेवणारी दया दाखविणार नाही. जरी ते सर्वजण एकसाथ मायेच्या अधिन राहून, एकस्वरात विरोध करतील तरीही आम्ही त्यांना अमृत संदेश देऊच. कारण हीच खरी लाभदायक दया आहे.'
वृत्तपत्रातून अनेक वेळा विविध संस्था वा संघटना, क्लब यांचे द्वारा अनेक कल्याणकारी कार्ये केली जातात, असे आपल्याला वाचायला मिळते. केवळ दयेच्या पोटी, जी मंद किंवा वाईटाला जन्म देत नाही तिला अमन्दोदाय दया म्हणतात. परुंतु रोग्याला कुपथ्य करू देणे किंवा दारुड्याला बारपर्यंत पोहचविण्यास साहाय्य करणे यातून सुद्धा दयेचे प्रदर्शन होतेच. परंतु अशी दया ती प्राप्त करणाऱ्या व्यक्तिला हानिकारक असू शकते. जर रोग्याला त्याच्या इच्छेविरुद्ध औषध दिले किंवा दारुड्याला त्याच्या कुमार्गापासून वाचविले तर ती दया अमन्दोदाय दया होते.
महापूर वा दुष्काळाला रोखणे, मरणासन्न व्यक्तिची सेवा करणे, कोणा व्यक्तिला प्रसन्न करणे वा रुष्ट करणे, शून्यवाद -निर्विशेषवाद यांना
वाढवणे, यातील प्रत्येकात मन्दोदाय दया म्हणजे हानिकारक दया आहे. अशा कार्यातून मनुष्याला तोपर्यंत वास्तविक लाभ मिळू शकत नाही, जोपर्यंत तो स्वतःची वास्तविक स्थिती काय आहे हे जाणत नाही.
सामाजिक संस्था वा सर्वच लोक दुःख, रोग, कष्ट, गरीबी याना समूळ नष्ट करू इच्छितात. परंतु ते जाणू शकत नाहीत की हे जग 'दुःखालयम अशाश्वतम्' आहे. इंद्रियांना संतुष्ट केल्याने सुखी होऊ असा सर्वांचा समज आहे. परंतु इंद्रियांच्या भौतिक इच्छांच्या प्रती घृणा उत्पन्न केल्याने रोग, दुःख वा कष्ट चांगल्या प्रकारे बरे होऊ शकतात.
मुण्डक उपनिषद (१.२.६) सांगते, 'अज्ञानी व्यक्ती घोर अविद्येमध्ये राहून असा विचार करते की 'आम्ही जे इच्छिले ते आम्हाला मिळाले आहे. 'परंतु ती आपल्या कर्मात अनुरक्त राहून आपल्या हिताचे कार्य करते, म्हणून तिला खऱ्या सत्याचा कोणताही अनुभव नाही. ती आपल्याला फलस्वरूप पुष्कळच कमी लाभ घेऊ शकते. काही काळानंतर ती आपल्या कार्याने पदच्युत होते.
पुढे असे सांगितले आहे-
'अज्ञानात राहूनही लोक स्वतःला पंडित मानतात. असे विकृत तथा अज्ञानी लोक आंधळ्याचा हात धरून चालणाऱ्या अंध व्यक्तिप्रमाणे दुःखाला प्राप्त करतात.'
सर्वजण मोहाच्या जाळ्यात सापडून, आपल्या शाश्वत गृहाला विसरून विरुद्ध दिशेला पळत आहेत. ते आपली मदोन्मत्तता, उत्सुकता, एकाग्रता तथा दृढसंकल्पता यात इतके व्यस्त आहेत की त्यांना आपल्या शाश्वत घराविषयी विचार करण्यासही वेळ मिळत नाही . परंतु कृष्णभक्त सदैव घोषणा करतात - कृष्ण' बल, संगे चल एइ - मात्र भिक्षा चाई 'हरे कृष्ण
आंदोलनाचा संदेश आहे - भगवद् धामाला परत जाणे.
कृष्णभक्त सांगतात , 'विश्वातील सर्व लोक भेदभावाविना आमच्या परिवारातील आहे. पशु-पक्षी, वेली-झाडे सर्वजण आमचे आहेत. जेवढे चेतन प्राणी आहेत, जे विद्यमान आहे ते सर्व काही भगवान श्रीकृष्णांचेच आहेत. आम्ही आमच्या परिवारातील सर्वांना मायेच्या पाशातून सोडवून भगवद्धामाला घेऊन जाणार. आम्ही त्यांनी मायेच्या अधीन ठेवणारी दया दाखविणार नाही. जरी ते सर्वजण एकसाथ मायेच्या अधिन राहून, एकस्वरात विरोध करतील तरीही आम्ही त्यांना अमृत संदेश देऊच. कारण हीच खरी लाभदायक दया आहे.'
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा