पशू + धर्म = मनुष्य
मनुष्य - धर्म = पशू
'हितोपदेश' मध्ये सांगितले आहे -
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्य एतत् पशुभीर्नराणाम् ।
धर्मो ही तेषां अधिको विशेषो धर्मेण हिनः पशूभीः समानः ।।
मनुष्य आणि प्राणी यांच्यात सामान्यतः चार गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या होय. परंतु मनुष्याला एक गोष्ट विशेषकरून दिली आहे आणि ती म्हणजे धर्म; आणि जर मनुष्य धर्महीन असेल तर तो पशुसमान आहे.
आहार :
प्रत्येक प्राणी आहारासाठी - पोटासाठी धडपडत असतो. पशू - पक्षी आपल्या गुणांनुसार आहार घेतात. कुत्री - मांजरे कोठेही बसून हाडे चघळतात वा एका तुकड्यासाठी वणवण भटकून आहार प्राप्त करतात. मनुष्याची बुद्धी थोडी विकसित असल्याने तो टेबलावर वा अन्य सुखसोयीनी युक्त असा आहार घेतो, परंतु पोट भरण्याचा आनंद पशूंना आणि मनुष्यांना सारखाच आहे.
निद्रा :
कुत्री - मांजरे रस्त्याच्या कडेला वा अडगळीच्या ठिकाणी वा कोठेही निद्रा घेतात. मनुष्य मात्र गादी - उशी, पलंग - मच्छरदाणी वा वातानुकुलीत जागी झोप घेतो. परंतु झोप लागल्यावर आपण कोठे आहोत याची काळजी प्राणी वा मनुष्य करीत नाही. झोपेचा आनंद देघांनाही सारखाच आहे. परंतु मनुष्य कधी कधी झोप मिळविण्यासाठी दारू वा मादक पदार्थ सेवन करून निद्रेचा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो.
भय :
शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्राणी आपली नखे, शिंगे वा दातांचा उपयोग करतात. ते आपल्या पिल्लांचे उत्तम प्रकारे रक्षण करतात. मनुष्यालासुद्धा शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्याची कला माहीत आहे. तो शस्त्र - अस्त्र, बंदुका, तोफा इत्यादी साधनांनी रक्षण करतो. म्हणजेच पशू आणि मनुष्यात रक्षण करण्याची वृत्ती सारखीच आहे.
मैथुन :
पशू आणि मनुष्यातील चौथी सामान्य गोष्ट म्हणजे मैथुन! मैथुन सर्वच प्राणी करतात. हत्तीसारखा प्राणी केवळ पाण्यातच मैथुन करतो, तर कावळा आपल्या जीवनात एकदाच, तर कबुतरासारखा पक्षी दिवसातून वीस वेळा, तर कित्येक प्राणी केवळ विशिष्ट ऋतुतच करतात. परंतु कलियुगातील मनुष्य इतके कामुक झाले आहेत की त्यांना वेळ, स्थान, मर्यादा यांचे भानच नाही. मनुष्य मैथुनासाठी इतका कष्ट करतो की त्याला आपल्यात आणि पशुत काही फरक आहे याची कल्पनाच नाही. पशू मैथुनाचा आनंद लुटतात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या पिल्लांची जबाबदारी सुद्धा घेतात. परंतु मनुष्य इतका धूर्त झाला आहे की तो मैथुनाचा आनंद लुटू इच्छितो, परंतु गर्भपात करून आपली जबाबदारी टाळतो.
तर सामान्यपणे या चार गोष्टी मनुष्य आणि प्राण्यात सारख्याच आहेत. परंतु पशुंपेक्षा एक गोष्ट मनुष्याला अधिक दिली आहे आणि ती म्हणजे धर्म! आणि धर्म नसलेला मनुष्य पशुंसमान आहे. कधी कधी भौतिकतावादी मनुष्य असा खोटा प्रचार करतात की धर्मामुळे मनुष्यात भांडणे, दंगे वा युद्धे होतात. परंतु प्राण्यात नाही. यास्तव धर्म ही अफुची गोळी आहे. धर्माचा नायनाट करा आणि नास्तिक व्हा, जेणेकरून आपल्याला पशुंप्रमाणे मुक्त कामाचार करता येईल.
ज्यांना आपण पशू आहोत (दोन पायांचे ) असे वाटते त्यांना तसे खुशाल वाटू दे. परंतु जे स्वतःला मानव समजतात त्यांना मात्र धर्माचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता धर्म म्हटले की पुन्हा मोठा प्रश्न निर्माण होतो की धर्म म्हणजे काय ? लोक आपापल्या सोयीप्रमाणे त्याला अनेक नांवे देतात वा जीवन पद्धतीचे प्रतीक म्हणतात. परंतु हे सर्व तथाकथित धर्म सरकारी कार्यालयात एक कागद भरून देऊन बदलून घेता येतात.
मग खरा धर्म कोणता ? तर खरा धर्म म्हणजे काय ते श्रीमद् भागवतात सांगितले आहे. धर्मम् तु साक्षात् भगवत् प्रणितम्! भगवान श्रीकृष्ण सांगतात तोच धर्म बाकी सर्व अधर्म वा विकल्प. श्रीमद् भागवतात (१.२.६) स्पष्टपणे सांगितले आहे -
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरअधोक्षजे ।
अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसीदति ।।
'ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी (हेतूरहित) आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो. '
केवळ भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे म्हणजेच परम धर्म होय. ज्या मनुष्याकडून या धर्माचे पालन होत नाही तो मनुष्य धर्मेण हीनः पशुभीः समानः आहे.
मनुष्य - धर्म = पशू
'हितोपदेश' मध्ये सांगितले आहे -
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्य एतत् पशुभीर्नराणाम् ।
धर्मो ही तेषां अधिको विशेषो धर्मेण हिनः पशूभीः समानः ।।
मनुष्य आणि प्राणी यांच्यात सामान्यतः चार गोष्टी सारख्या आहेत. त्या म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन या होय. परंतु मनुष्याला एक गोष्ट विशेषकरून दिली आहे आणि ती म्हणजे धर्म; आणि जर मनुष्य धर्महीन असेल तर तो पशुसमान आहे.
आहार :
प्रत्येक प्राणी आहारासाठी - पोटासाठी धडपडत असतो. पशू - पक्षी आपल्या गुणांनुसार आहार घेतात. कुत्री - मांजरे कोठेही बसून हाडे चघळतात वा एका तुकड्यासाठी वणवण भटकून आहार प्राप्त करतात. मनुष्याची बुद्धी थोडी विकसित असल्याने तो टेबलावर वा अन्य सुखसोयीनी युक्त असा आहार घेतो, परंतु पोट भरण्याचा आनंद पशूंना आणि मनुष्यांना सारखाच आहे.
निद्रा :
कुत्री - मांजरे रस्त्याच्या कडेला वा अडगळीच्या ठिकाणी वा कोठेही निद्रा घेतात. मनुष्य मात्र गादी - उशी, पलंग - मच्छरदाणी वा वातानुकुलीत जागी झोप घेतो. परंतु झोप लागल्यावर आपण कोठे आहोत याची काळजी प्राणी वा मनुष्य करीत नाही. झोपेचा आनंद देघांनाही सारखाच आहे. परंतु मनुष्य कधी कधी झोप मिळविण्यासाठी दारू वा मादक पदार्थ सेवन करून निद्रेचा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो.
भय :
शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्राणी आपली नखे, शिंगे वा दातांचा उपयोग करतात. ते आपल्या पिल्लांचे उत्तम प्रकारे रक्षण करतात. मनुष्यालासुद्धा शत्रुपासून स्वतःचे रक्षण करण्याची कला माहीत आहे. तो शस्त्र - अस्त्र, बंदुका, तोफा इत्यादी साधनांनी रक्षण करतो. म्हणजेच पशू आणि मनुष्यात रक्षण करण्याची वृत्ती सारखीच आहे.
मैथुन :
पशू आणि मनुष्यातील चौथी सामान्य गोष्ट म्हणजे मैथुन! मैथुन सर्वच प्राणी करतात. हत्तीसारखा प्राणी केवळ पाण्यातच मैथुन करतो, तर कावळा आपल्या जीवनात एकदाच, तर कबुतरासारखा पक्षी दिवसातून वीस वेळा, तर कित्येक प्राणी केवळ विशिष्ट ऋतुतच करतात. परंतु कलियुगातील मनुष्य इतके कामुक झाले आहेत की त्यांना वेळ, स्थान, मर्यादा यांचे भानच नाही. मनुष्य मैथुनासाठी इतका कष्ट करतो की त्याला आपल्यात आणि पशुत काही फरक आहे याची कल्पनाच नाही. पशू मैथुनाचा आनंद लुटतात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या पिल्लांची जबाबदारी सुद्धा घेतात. परंतु मनुष्य इतका धूर्त झाला आहे की तो मैथुनाचा आनंद लुटू इच्छितो, परंतु गर्भपात करून आपली जबाबदारी टाळतो.
तर सामान्यपणे या चार गोष्टी मनुष्य आणि प्राण्यात सारख्याच आहेत. परंतु पशुंपेक्षा एक गोष्ट मनुष्याला अधिक दिली आहे आणि ती म्हणजे धर्म! आणि धर्म नसलेला मनुष्य पशुंसमान आहे. कधी कधी भौतिकतावादी मनुष्य असा खोटा प्रचार करतात की धर्मामुळे मनुष्यात भांडणे, दंगे वा युद्धे होतात. परंतु प्राण्यात नाही. यास्तव धर्म ही अफुची गोळी आहे. धर्माचा नायनाट करा आणि नास्तिक व्हा, जेणेकरून आपल्याला पशुंप्रमाणे मुक्त कामाचार करता येईल.
ज्यांना आपण पशू आहोत (दोन पायांचे ) असे वाटते त्यांना तसे खुशाल वाटू दे. परंतु जे स्वतःला मानव समजतात त्यांना मात्र धर्माचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. आता धर्म म्हटले की पुन्हा मोठा प्रश्न निर्माण होतो की धर्म म्हणजे काय ? लोक आपापल्या सोयीप्रमाणे त्याला अनेक नांवे देतात वा जीवन पद्धतीचे प्रतीक म्हणतात. परंतु हे सर्व तथाकथित धर्म सरकारी कार्यालयात एक कागद भरून देऊन बदलून घेता येतात.
मग खरा धर्म कोणता ? तर खरा धर्म म्हणजे काय ते श्रीमद् भागवतात सांगितले आहे. धर्मम् तु साक्षात् भगवत् प्रणितम्! भगवान श्रीकृष्ण सांगतात तोच धर्म बाकी सर्व अधर्म वा विकल्प. श्रीमद् भागवतात (१.२.६) स्पष्टपणे सांगितले आहे -
स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरअधोक्षजे ।
अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसीदति ।।
'ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी (हेतूरहित) आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो. '
केवळ भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणे म्हणजेच परम धर्म होय. ज्या मनुष्याकडून या धर्माचे पालन होत नाही तो मनुष्य धर्मेण हीनः पशुभीः समानः आहे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421 76587
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा