3. धन हेच सर्वस्व
वित्ते कलौ नृणां जन्माचारगुणोदयः।
धर्मन्यायव्यवस्थायां करणं बलमेव हि ।।
'कलियुगात केवळ 'वित्त' - पैशालाच मनुष्याचा उत्तम जन्म, योग्य व्यवहार आणि सद्गुणांचे लक्षण मानले जाईल. धर्म आणि तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल.' (भागवत पुराण १२.२.२)
कलियुगात सर्वच गोष्टींचे मोजमाप पैशाने केले जाते. ज्याच्याकडे पैसा आहे तो कसल्याही प्रवृत्तीचा असेना का! लोक त्याच्या दारात तिष्ठत उभे राहतील. 'जो वरी पैसा तो वरी बैसा' , या न्यायाने पैसा असणाऱ्याचा लोक सन्मान करतील. पैसा म्हणजे भगवान आहे. पैशाच्या जोरावर माणूस काय वाटेल ते प्राप्त करू शकतो. पैशाच्या बळाने न्याय विकत घेता येतो. सरकारी यंत्रणा वेठीला धरता येते. निवडणुकीत जिंकता येते. पण नसेल तर काहीच मिळत नाही.
एकेकाळी बहुजन समाजाला अक्षरओळख नव्हती. उच्च्वर्णीय अक्षरे शिकवित नसत. त्यामुळे बहुजन समाजाची घोर फरवणूक होत असे. इंग्रजतर सर्वांनाच लुटत. परंतु त्यांच्याकडून थोडीफार कारकुनी शिकलेले उचचर्णीय - बहुजनांसी लुबाडत. पश्चिम महाराष्ट्रात त्यामुळे अनेक धनाढ्य जमीनदार, सावकार, कुळकर्णी, पाटील इत्यादी प्रबळ झाले होते. गांधी हत्येनंतर या सर्वांचाच नाश झाला. आता स्वतंत्र भारतात सर्वजणांसाठी शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. अनेक शिक्षण संस्था उदयास आल्या आणि आताही येत आहेत. तळागाळातील सर्वच लोकांना विनामूल्य शिक्षण मिळू लागले आहे.
शिक्षणामुळे प्रगत झालेले लोक सहकारी साखर कारखाने, दूध सोसायट्या, पतसंस्था, शेतीमाल खरेदी विक्री संघ, सूतगिरण्या, मार्केट यार्ड, सहकारी बँका इत्यादी काढू लागले. यांतील सर्व खुर्चीधारी, पदाधिकारी, कारकून मंडळी बहुजन समाजातील शिक्षित लोक आहेत आणि ते सर्वजण मिळून आपल्याच जनतेला, ज्ञाती बांधवाना लुबाडत आहेत, नागवत आहेत, फसवत आहेत. परंतु साहित्य संमलने वा सार्वजनिक सभातून अजूनही धडधडीत खोट बोलतात की बहुजन समाजाला ब्राह्मण लुटत आहेत. पैशाच्या बळावर मते मिळून सत्ता घेऊन परत प्रचंड प्रमाणावर पैसा मिळवत आहेत. जनतेच्या पैशातून स्वतःचेच फोटो गल्ली बोळातून, महामार्गातून लावून आम्हालाच खोट्या शाब्दिक शुभेच्छा देत आहेत.
धनाने उन्मत्त झालेल्यांचे यथायोग्य वर्णन भगवान श्रीकृष्णांनी भगवद् गीतेच्या १६वा अध्यायात केलेले आहे. ते असे - कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत, मोहित झालेले असुरी लोक, अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शोकडो सहस्रो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, 'आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करीन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजुबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढय् मनुष्य आहे. माझ्या सारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करीन, मी दान देईन आणि या प्रमाणे मी मौजमजा करीन' अशा प्रकारे असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.'
अर्थ, वित्त, धन, द्रव्य, संपत्ती म्हणजेच पैसा. तो इतका बलवान आहे की भल्याभल्यांना बांधून ठेवतो. पितामह भीष्मदेव महाराज युधिष्ठिरांना म्हणतात -
अर्थस्य पुरुषो वासो दास्यसत्वर्थो न कस्यचित् ।
इति सत्यं महाराज बद्धोअस्म्यर्थन कौरवै: ।।
'माणूस हा अर्थाचा (पैशाचा) दास आहे. तो पैशानेच बांधला जातो. मात्र अर्थ (पैसा) कोणाचाही दास होऊ शकत नाही. म्हणूनच हे राजा, मी खरोखरच या अर्थाने (पैशाने) कौरवांशी बांधलो गेलो आहे.'
कलियुगात पैशाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. तुमच्या पाशी धन असले तर सर्व जग तुमच्या पायाशी लोळण घेईल.
पितामह भीष्मदेव महाराज युधिष्ठिरांना पैशाचे गुपित सांगतात -
दौष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृसांशा निरपत्रपाः।
ते त्वां तात निषेवेयुर यावदार्द्रकपाणयः ।।
'वाईट कुळात जन्मलेले लोभी, दुष्ट, निर्लज्ज असे जे लोक असतात, ते त्यांचा हात ओला होत आहे (पैसा मिळत आहे) तोपर्यंतच तुझी सेवा करतील.'
यस्यार्था: स च विक्रान्तो यस्यार्था: स च बुद्धिमान् ।
यस्यार्था: स महाषाहुर्यस्यार्था: स गुणाधिकः ।।
'ज्याच्याजवळ द्रव्य आहे तोच पराक्रमी असतो, ज्याच्याजवळ धन असते तोच बुद्धिमान असतो. ज्याच्याजवळ द्रव्य आहे तोच सामर्थ्यवान आणि तोच अधिक गुणवान असतो.' (रामायण ६.३.३६)
राजा भर्तृहरी म्हणतो -
यस्यास्ति वित्तम स नरः कुलिनः
स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञ: ।
स एव वक्ता स च दर्शनीय:
सर्वे गुणाः काश्चनमाश्रयन्ति ।।
'ज्याच्याजवळ वित्त (पैसा) आहे तोच मनुष्य कुलिन, तोच पंडित, खरा शास्त्रज्ञ आणि गुणवान होय. तोच वक्ता, तोच दर्शन घेण्यास योग्य समजला जातो. या जगात संपूर्ण उत्तम गुण सुवर्णाच्या आश्रयानेच राहतात.'
जरा डोळे उघडून सभोवताली बघा. सर्वत्र झगमगाट, जाहिरातबाजी, मोठे मोठे फलक लावून पैसेवाला मनुष्य आपल्या सर्व दुर्गुणांना लपवून ठेवतो. हे धनदांडगे धनाच्या बळाने सर्वांनाच आपल्या समक्ष झुकवतात.
शाड् र्गंधर पद्धति सांगते -
वयोवृद्धास्तपोवृद्धा: ज्ञानवृद्धाश्च ये परे ।
ते सर्वे धनिनद्वारे तिष्ठन्ति किंकराइव ।।
'जे वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानाने वृद्ध आहेत ते सर्व जण धनवंतांच्या दारी सेवकाप्रमाणे हात जोडून उभे असतात.'
सर्वांना आकर्षून घेण्याचे सामर्थ्य धनामध्ये आहे. भक्तश्रेष्ठ प्रह्लाद महाराज भागवतात सांगतात -
को न्वर्थतृष्णां विसृजेत्प्राणेभ्यो पि य ईप्सितः।
यं क्रीणात्यसुभि: प्रेष्ठैस्तस्करः सेवको वणिक् ।।
'गृहासक्त मनुष्यास धन प्राणापेक्षाही अधिक प्रिय असते. म्हणून या जगात विशेष करून कौटुंबिक जीवन जगणाऱ्या मनुष्यासह इतर कोण मनुष्य असा आहे, ज्याने धनसंचय करण्याची इच्छा त्यागलेली आहे? चोर, सेवक (सैनिक) आणि व्यापारी हे सर्व जण स्वतःचे प्रिय प्राणही संकटात घालून धनार्जन करण्याचा प्रयत्न करतात.'
कलियुगात पैसाच सर्वस्व असल्यामुळे शंकराचार्य म्हणतात - यावद्वित्तोपार्जनसक्त स्तावन्निजपरिवारो रक्त: ।
प्रश्चाद्धावति जर्जरदेहे वार्तां पृच्छति कोपि न गेहे ।।
'मनुष्यात जोपर्यंत पैसा मिळविण्याची क्षमता असते, तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील माणसे त्याच्यावर प्रेम दाखवतात. पण एकदा का तो मनुष्य म्हातारा होऊन इकडे तिकडे भटकू लागला की त्याच्या परिवारातील कुणीच त्याची विचारपूस करीत नाही.'
गतवयसामपि पुसां येषामर्था भवन्ति ते तरुणा: ।
अर्थेन तु ये हीना वृद्धास्ते यौवने पि च ।।
'अगदी वृद्ध - म्हातारे झाले असले तरी ज्यांच्याजवळ सगळ्या प्रकारची संपत्ती असते ते तरुणच असतात. पण ज्यांच्याजवळ द्रव्याचा अभाव असतो ते ऐन तारुण्यातही म्हातारे असतात.'
इहलोके हि धनिनां परोsपि स्वजनायते ।
स्वजनोsपि दरीद्राणां सर्वदा दुर्जनायाने ।।
'या जगात धनवंतांशी परकेलोकसुद्धा आपलेपणाने वागतात, तर दरिद्री माणसाशी त्याचे स्वजनही शत्रू प्रमाणे त्याच्याशी दुष्टपणे वागतात.'
महाभारतात युधिष्ठिर महाराज म्हणतात -
अधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो द्विजाः ।
अपुष्पादफलाद् दृक्षाद् यथा कृष्ण पतित्रिणः ।।
'हे कृष्ण, ज्याप्रमाणे फुले-फळे नसलेल्या वृक्षाचा पक्षी त्याग करतात, त्याप्रमाणे दरिद्री माणसाला त्याचे नातेवाईक, मित्र आणि ब्राह्मण सोडून देतात.'
धर्मन्यायव्यवस्थायां - धर्म (कायदा) आणि न्याय तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल.
बलवान माणूस आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्याला पाहिजे तसा कायदा बनवेल. न्यायसुद्धा त्यालाच मिळेल. फार पूर्वी इंग्लंडच्या राजाला दारू अतिशय आवडे. पण जिझस दारू पीत नसल्यामुळे बायबलमध्ये तसा उल्लेख नव्हता. राजाने सर्व पादऱ्यांना गोळा केले आणि आदेश दिला की इंग्लंडमध्ये नवीन बायबल प्रसारित केले जावे. त्यात जिझस दारू पित होता असे छापा. ज्यांनी विरोध केला त्यांना राजाने ठार मारले. आपल्या शक्तीने राजाने पाहिजे तसा नियम बनवला. सम्राट अशोकने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याच्या राज्यात पशू बळी देण्यास सक्त मनाई करणारा आदेश त्याने दिला. प्राण्यांना मारणाऱ्या व्यक्तीस मात्र तो ठार मारण्याची शिक्षा देत असे. मोगलांच्या आक्रमक इतिहासातही आपण बघतो की त्यांनी बळाने कसे आणि किती अत्याचार केले. या विषयी अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. शस्त्रबळाच्या जोरावर इंग्रजांनी भारतात आणि जगात अनेक धर्म आणि संस्कृतींचा नाश केला. अर्थात 'बळी तो कान पिळी'.
सध्या तर आपल्या देशात अनेक घोटाळे, भ्रष्टाचार, अत्याचार गाजत आहेत. सर्व जण पैसा आणि सत्तेच्या बळावर मोकाट सुटत आहेत. हेच या कलियुगाचे विशेष लक्षण आहे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
वित्ते कलौ नृणां जन्माचारगुणोदयः।
धर्मन्यायव्यवस्थायां करणं बलमेव हि ।।
'कलियुगात केवळ 'वित्त' - पैशालाच मनुष्याचा उत्तम जन्म, योग्य व्यवहार आणि सद्गुणांचे लक्षण मानले जाईल. धर्म आणि तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल.' (भागवत पुराण १२.२.२)
कलियुगात सर्वच गोष्टींचे मोजमाप पैशाने केले जाते. ज्याच्याकडे पैसा आहे तो कसल्याही प्रवृत्तीचा असेना का! लोक त्याच्या दारात तिष्ठत उभे राहतील. 'जो वरी पैसा तो वरी बैसा' , या न्यायाने पैसा असणाऱ्याचा लोक सन्मान करतील. पैसा म्हणजे भगवान आहे. पैशाच्या जोरावर माणूस काय वाटेल ते प्राप्त करू शकतो. पैशाच्या बळाने न्याय विकत घेता येतो. सरकारी यंत्रणा वेठीला धरता येते. निवडणुकीत जिंकता येते. पण नसेल तर काहीच मिळत नाही.
एकेकाळी बहुजन समाजाला अक्षरओळख नव्हती. उच्च्वर्णीय अक्षरे शिकवित नसत. त्यामुळे बहुजन समाजाची घोर फरवणूक होत असे. इंग्रजतर सर्वांनाच लुटत. परंतु त्यांच्याकडून थोडीफार कारकुनी शिकलेले उचचर्णीय - बहुजनांसी लुबाडत. पश्चिम महाराष्ट्रात त्यामुळे अनेक धनाढ्य जमीनदार, सावकार, कुळकर्णी, पाटील इत्यादी प्रबळ झाले होते. गांधी हत्येनंतर या सर्वांचाच नाश झाला. आता स्वतंत्र भारतात सर्वजणांसाठी शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. अनेक शिक्षण संस्था उदयास आल्या आणि आताही येत आहेत. तळागाळातील सर्वच लोकांना विनामूल्य शिक्षण मिळू लागले आहे.
शिक्षणामुळे प्रगत झालेले लोक सहकारी साखर कारखाने, दूध सोसायट्या, पतसंस्था, शेतीमाल खरेदी विक्री संघ, सूतगिरण्या, मार्केट यार्ड, सहकारी बँका इत्यादी काढू लागले. यांतील सर्व खुर्चीधारी, पदाधिकारी, कारकून मंडळी बहुजन समाजातील शिक्षित लोक आहेत आणि ते सर्वजण मिळून आपल्याच जनतेला, ज्ञाती बांधवाना लुबाडत आहेत, नागवत आहेत, फसवत आहेत. परंतु साहित्य संमलने वा सार्वजनिक सभातून अजूनही धडधडीत खोट बोलतात की बहुजन समाजाला ब्राह्मण लुटत आहेत. पैशाच्या बळावर मते मिळून सत्ता घेऊन परत प्रचंड प्रमाणावर पैसा मिळवत आहेत. जनतेच्या पैशातून स्वतःचेच फोटो गल्ली बोळातून, महामार्गातून लावून आम्हालाच खोट्या शाब्दिक शुभेच्छा देत आहेत.
धनाने उन्मत्त झालेल्यांचे यथायोग्य वर्णन भगवान श्रीकृष्णांनी भगवद् गीतेच्या १६वा अध्यायात केलेले आहे. ते असे - कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत, मोहित झालेले असुरी लोक, अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेले असते. शोकडो सहस्रो आशारुपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोधपरायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की, 'आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करीन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजुबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढय् मनुष्य आहे. माझ्या सारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करीन, मी दान देईन आणि या प्रमाणे मी मौजमजा करीन' अशा प्रकारे असुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.'
अर्थ, वित्त, धन, द्रव्य, संपत्ती म्हणजेच पैसा. तो इतका बलवान आहे की भल्याभल्यांना बांधून ठेवतो. पितामह भीष्मदेव महाराज युधिष्ठिरांना म्हणतात -
अर्थस्य पुरुषो वासो दास्यसत्वर्थो न कस्यचित् ।
इति सत्यं महाराज बद्धोअस्म्यर्थन कौरवै: ।।
'माणूस हा अर्थाचा (पैशाचा) दास आहे. तो पैशानेच बांधला जातो. मात्र अर्थ (पैसा) कोणाचाही दास होऊ शकत नाही. म्हणूनच हे राजा, मी खरोखरच या अर्थाने (पैशाने) कौरवांशी बांधलो गेलो आहे.'
कलियुगात पैशाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. तुमच्या पाशी धन असले तर सर्व जग तुमच्या पायाशी लोळण घेईल.
पितामह भीष्मदेव महाराज युधिष्ठिरांना पैशाचे गुपित सांगतात -
दौष्कुलेयाश्च लुब्धाश्च नृसांशा निरपत्रपाः।
ते त्वां तात निषेवेयुर यावदार्द्रकपाणयः ।।
'वाईट कुळात जन्मलेले लोभी, दुष्ट, निर्लज्ज असे जे लोक असतात, ते त्यांचा हात ओला होत आहे (पैसा मिळत आहे) तोपर्यंतच तुझी सेवा करतील.'
यस्यार्था: स च विक्रान्तो यस्यार्था: स च बुद्धिमान् ।
यस्यार्था: स महाषाहुर्यस्यार्था: स गुणाधिकः ।।
'ज्याच्याजवळ द्रव्य आहे तोच पराक्रमी असतो, ज्याच्याजवळ धन असते तोच बुद्धिमान असतो. ज्याच्याजवळ द्रव्य आहे तोच सामर्थ्यवान आणि तोच अधिक गुणवान असतो.' (रामायण ६.३.३६)
राजा भर्तृहरी म्हणतो -
यस्यास्ति वित्तम स नरः कुलिनः
स पंडितः स श्रुतवान् गुणज्ञ: ।
स एव वक्ता स च दर्शनीय:
सर्वे गुणाः काश्चनमाश्रयन्ति ।।
'ज्याच्याजवळ वित्त (पैसा) आहे तोच मनुष्य कुलिन, तोच पंडित, खरा शास्त्रज्ञ आणि गुणवान होय. तोच वक्ता, तोच दर्शन घेण्यास योग्य समजला जातो. या जगात संपूर्ण उत्तम गुण सुवर्णाच्या आश्रयानेच राहतात.'
जरा डोळे उघडून सभोवताली बघा. सर्वत्र झगमगाट, जाहिरातबाजी, मोठे मोठे फलक लावून पैसेवाला मनुष्य आपल्या सर्व दुर्गुणांना लपवून ठेवतो. हे धनदांडगे धनाच्या बळाने सर्वांनाच आपल्या समक्ष झुकवतात.
शाड् र्गंधर पद्धति सांगते -
वयोवृद्धास्तपोवृद्धा: ज्ञानवृद्धाश्च ये परे ।
ते सर्वे धनिनद्वारे तिष्ठन्ति किंकराइव ।।
'जे वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानाने वृद्ध आहेत ते सर्व जण धनवंतांच्या दारी सेवकाप्रमाणे हात जोडून उभे असतात.'
सर्वांना आकर्षून घेण्याचे सामर्थ्य धनामध्ये आहे. भक्तश्रेष्ठ प्रह्लाद महाराज भागवतात सांगतात -
को न्वर्थतृष्णां विसृजेत्प्राणेभ्यो पि य ईप्सितः।
यं क्रीणात्यसुभि: प्रेष्ठैस्तस्करः सेवको वणिक् ।।
'गृहासक्त मनुष्यास धन प्राणापेक्षाही अधिक प्रिय असते. म्हणून या जगात विशेष करून कौटुंबिक जीवन जगणाऱ्या मनुष्यासह इतर कोण मनुष्य असा आहे, ज्याने धनसंचय करण्याची इच्छा त्यागलेली आहे? चोर, सेवक (सैनिक) आणि व्यापारी हे सर्व जण स्वतःचे प्रिय प्राणही संकटात घालून धनार्जन करण्याचा प्रयत्न करतात.'
कलियुगात पैसाच सर्वस्व असल्यामुळे शंकराचार्य म्हणतात - यावद्वित्तोपार्जनसक्त स्तावन्निजपरिवारो रक्त: ।
प्रश्चाद्धावति जर्जरदेहे वार्तां पृच्छति कोपि न गेहे ।।
'मनुष्यात जोपर्यंत पैसा मिळविण्याची क्षमता असते, तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील माणसे त्याच्यावर प्रेम दाखवतात. पण एकदा का तो मनुष्य म्हातारा होऊन इकडे तिकडे भटकू लागला की त्याच्या परिवारातील कुणीच त्याची विचारपूस करीत नाही.'
गतवयसामपि पुसां येषामर्था भवन्ति ते तरुणा: ।
अर्थेन तु ये हीना वृद्धास्ते यौवने पि च ।।
'अगदी वृद्ध - म्हातारे झाले असले तरी ज्यांच्याजवळ सगळ्या प्रकारची संपत्ती असते ते तरुणच असतात. पण ज्यांच्याजवळ द्रव्याचा अभाव असतो ते ऐन तारुण्यातही म्हातारे असतात.'
इहलोके हि धनिनां परोsपि स्वजनायते ।
स्वजनोsपि दरीद्राणां सर्वदा दुर्जनायाने ।।
'या जगात धनवंतांशी परकेलोकसुद्धा आपलेपणाने वागतात, तर दरिद्री माणसाशी त्याचे स्वजनही शत्रू प्रमाणे त्याच्याशी दुष्टपणे वागतात.'
महाभारतात युधिष्ठिर महाराज म्हणतात -
अधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो द्विजाः ।
अपुष्पादफलाद् दृक्षाद् यथा कृष्ण पतित्रिणः ।।
'हे कृष्ण, ज्याप्रमाणे फुले-फळे नसलेल्या वृक्षाचा पक्षी त्याग करतात, त्याप्रमाणे दरिद्री माणसाला त्याचे नातेवाईक, मित्र आणि ब्राह्मण सोडून देतात.'
धर्मन्यायव्यवस्थायां - धर्म (कायदा) आणि न्याय तर मनुष्याच्या बळानुसार लागू होईल.
बलवान माणूस आपल्या मनगटाच्या जोरावर आपल्याला पाहिजे तसा कायदा बनवेल. न्यायसुद्धा त्यालाच मिळेल. फार पूर्वी इंग्लंडच्या राजाला दारू अतिशय आवडे. पण जिझस दारू पीत नसल्यामुळे बायबलमध्ये तसा उल्लेख नव्हता. राजाने सर्व पादऱ्यांना गोळा केले आणि आदेश दिला की इंग्लंडमध्ये नवीन बायबल प्रसारित केले जावे. त्यात जिझस दारू पित होता असे छापा. ज्यांनी विरोध केला त्यांना राजाने ठार मारले. आपल्या शक्तीने राजाने पाहिजे तसा नियम बनवला. सम्राट अशोकने बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याच्या राज्यात पशू बळी देण्यास सक्त मनाई करणारा आदेश त्याने दिला. प्राण्यांना मारणाऱ्या व्यक्तीस मात्र तो ठार मारण्याची शिक्षा देत असे. मोगलांच्या आक्रमक इतिहासातही आपण बघतो की त्यांनी बळाने कसे आणि किती अत्याचार केले. या विषयी अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. शस्त्रबळाच्या जोरावर इंग्रजांनी भारतात आणि जगात अनेक धर्म आणि संस्कृतींचा नाश केला. अर्थात 'बळी तो कान पिळी'.
सध्या तर आपल्या देशात अनेक घोटाळे, भ्रष्टाचार, अत्याचार गाजत आहेत. सर्व जण पैसा आणि सत्तेच्या बळावर मोकाट सुटत आहेत. हेच या कलियुगाचे विशेष लक्षण आहे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा