कामशास्त्र नैपुण्य
सध्याच्या तथाकथित मनुष्य जीवनाचे सुस्पष्ट वर्णन संपूर्ण वेदांचे परिपक्व फळ असलेल्या भागवत पुराणात पुढील प्रमाणे केलेले आहे --
दाम्पत्ये भिरुचिर्हेतुर्मायैव व्यावहारिके ।
स्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिर्विप्रत्वे सूत्रमेव हि ।।
पुरुष आणि स्त्रिया केवळ बाह्य आकर्षणामुळे एकत्र राहतील आणि व्यावहारिक सफलता कपटावर अवलंबून असेल. पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांचा निर्णय कामशास्त्रातील त्यांच्या निपुणतेनुसार केला जाईल. - भागवत पुराण १२.२.३
या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की, कलियुगातील स्त्री-पुरुष कशा प्रकारे एकमेकांच्या शारीरिक आकर्षणामुळे अर्थात कामवासनेमुळे एकत्र येतात. स्त्रिया तंग-तोकडे कपडे, भडक कामुक शृंगार करून पुरुषांना उत्तेजित करतात. विशिष्ट वस्त्रांमुळे विषयवासनेच्या दृष्टीने स्त्री आकर्षक वाटलीच पाहिजे तरच तिला चांगली स्त्री संबोधले जाते. त्याच प्रकारे स्त्रियांना पुरुषही कामवासनेच्या दृष्टीने चांगले दिसले तरच स्त्रिया त्यांच्याकडे बघतात. चित्रपट, टी.व्ही. इंटरनेट द्वारे यांचे सदैव प्रदर्शन केले जाते. नटनट्यांची लफडी-कुलंगडी, चित्रांसह वृत्तपत्रे-मासिके यांतून मोठ्या प्रमाणात छापली जातात आणि आवडीने वाचली जातात.
कलियुगातील माणसे सदैव उन्मत्त अवस्थेतच असतात. नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म - सदैव वाईट कृत्ये करण्यात मग्न असतात. मूर्ख माणसे सदैव भिन्न लिंगी व्यक्तिद्वारे आकर्षित होतात. घराघरातून योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे युवक - युवती शारीरिक भोगाप्रति जबरदस्त आकृष्ट होतात. मुला-मुलींनी एकत्र मिसळणे, हास्यविनोद करणे, भ्रमणध्वनीतून विविध कामुक संदेशांची/चित्रांची देवाण घेवाण करणे सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. बेळगावातील एका डॉक्टरच्या २३ वर्षीय मुलाने तरुणींना मॉडेल बनवितो या आकर्षक योजनेनुसार आपल्या जाळ्यात ओढले आणि शेकडो तरुणींची अर्ध/पूर्ण नग्न चित्रे आपल्या भ्रमणध्वनी आणि संगणकात संग्रहित केली. यात कित्येक विवाहित तरुणी सुद्धा आहेत. जर बेळगावच्या टिळकवाडी सारख्या उपनगरात इतक्या तरुणी आकृष्ट होतात तर मग विचार करा संपूर्ण जगातील किती कोट्यवधी तरुण-तरुणी या आकर्षणात फसल्या असतील.
स्त्रिया आणि पुरुष तरुण्यावस्था प्राप्त होताच शारीरिक भोगाच्या इच्छेने एकमेकांशी घनिष्ठता प्राप्त करण्यासाठी आणि 'काम' व्यवहारातील यशोशिखर गाठण्यासाठी प्रत्येक संधीचा पुरेपूर उपभोग घेतात. असे करण्यासाठी त्यांना काही निवडक प्रसंगच मिळतात. परंतु त्यांची चेतना सदैव एकमेकांच्या शरीराचा स्पर्श करणे, त्यांची विवस्त्र शरीरे बघणे आणि संभोगरत होण्याच्या विचारात मग्न असते. या सर्व आकर्षक कामाला ते 'प्रेम' असे गोंडस नाव देतात. परंतु हे सर्व काही आहे 'कामप्राविण्य'.
या युगात स्त्रियांशी अवैध संबंधामुळे अनेक स्त्रिया आणि त्यांच्यापासून जन्मलेली बालके अनाथ होत आहेत. तरुण तरुणी काही काळ एकत्र राहून नंतर विभक्त होतात. स्त्रिया पुरुषांशी फारकत घेऊन स्वतंत्र राहू इच्छितात आणि त्यामुळेच एका स्वतंत्र स्त्रिचा भोग अन्य पुरुष घेतात. कोणत्याही जाहिरातीत आपण बधू शकता स्त्रियांची अर्धनग्न चित्रे! लोक स्त्रियांप्रति सन्मानाची भावना हरवून बसले आहेत. ते स्त्री शरीराचे शोषण करण्यासाठी विविध वस्त्रे, आभूषणे व अन्य वस्तूंद्वारे प्रसार माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत. शारीरिक आकर्षणातून एकत्र येणारे स्त्री-पुरुष विवाहाला औपचारिक तडजोड समजतात. जोपर्यंत ते एकमेकांपासून इंद्रियसुख प्राप्त करतात, तोपर्यंत एकत्र राहतात आणि नंतर विवाह विच्छेद करतात.
तसे पाहिले तर तात्त्विक रूपाने तरुण-तरुणींचे तथाकथित सुंदर-सुडौल शरीर म्हणजे काय आहे? केवळ एक चामड्याची झोळी! ज्यात केवळ कफ-पित्त-वायू-मल-मूत्र-मांस, चरबी-रक्त-हाडे आणि अन्य कितीतरी घाणेरडे पदार्थ भरलेले असतात. कुत्रा-कुत्री, डुकर-डुक्रीण जसे एकमेकांशी संभोग करतात तसेच नर-नारीही करतात. त्यांनी कामशास्त्रातील प्राविण्य प्रदर्शित करणे म्हणजे काहीतरी विशेष करणे असे नव्हे. हे काही अद्भूत कृत्य नसून ही तर एक शारीरिक क्रिया आहे. एक साधारण नैसर्गिक अनुभवाची प्रतिक्रिया आहे. तरीही प्रत्येक जण यात मग्न आहे. जगातील श्रेष्ठ राजे-महाराजे केवळ स्त्री सहवासासाठी युद्ध करीत. ज्युलियस सिझर प्रचंड पराक्रमी, अनेकांवर त्याचे नियंत्रण होते. पण क्लिओपात्राशी संभोग करता यावा म्हणून तो तिच्याशी लोचटपणे लगट करी. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनची पत्नी त्याची उत्तम प्रकारे सेवा करीत असे पण आईनस्टाईन तिच्यावर आसक्त न होता आपल्या चुलत बहिणीवर आसक्त असे. चाकांच्या खुर्चीविना काहीच हालचार करू न शकणाऱ्या एका प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञाने आपल्या नर्सला गर्भवती केले. एकूण काय भारतीय असो वा अमेरिकन राष्ट्रप्रमुख असो, कोणी श्रीमंत असो वा रस्त्याकडेचा भिकारी असो, सर्व जण या मैथुनक्रीयेत व्यस्त आहेत.
बहुसंख्य लोकांना देव, देश, धर्म वा संस्कृती यांची मुळीच आवड नाही. मग त्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या अध्यात्मशास्त्रांची आवड कशी असणार?
राजा भर्तृहरी आपल्या वैराग्य शतकमध्ये लिहितो -
उडुराजमुखी, मृगराजकटी
र्गजराजविराजित मन्दगतिः ।
यदि सा वनिता हृदये निहिता,
क्व तपः? क्व जपः? क्व समाधिरतिः? ।।
चंद्रासारखे मुख असलेली, सिंहासारखी कटी असलेली, गजराजासारखी डौलदार पण मंद गती असलेली सुंदरी जर हृदयात ठाण मांडून बसली असेल, तर कुठले तप, कुठला जप आणि कुठली समाधीची आवड?
डॉ. केविन स्कीन (टिटिंग पोर्नीग्राफी ऑडिक्शन) म्हणतात, "सांप्रत प्रसार माध्यमांद्वारे लोकांच्या चेतनेवर होणारा कामुकतेचा भडीमार संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात इतका कधीच झाला नव्हता. लैंगिक वासना चालविणारे घटक आणि कामवासनेच्या प्रभावाला आपण सर्वजण बळी पडत असल्यामुळे आजचा समाज डोळ्यांसमक्ष अधोगतीला जात असल्याचे आपण पाहू शकत नाही. आजच्या अशा समाजात कामवासनेला बळी पडलेले कोट्यवधी लोक असतील."
गरुड पुराणात सांगितले आहे कामातुरांणा न भयं न लज्जा. तर हे आजच्या युगातील कामातुरता वाढविणारे घटक म्हणजे सध्याचे व्यापारी जगत आणि प्रसार माध्यमे होत. जे आपला माल खपविण्यासाठी या कामुकतेचा पुरेपूर वापर करतात. उद्योजकांना पक्के ठाऊक आहे की, लोक कामुकतेकडे त्वरित आणि अगदी सहजरीत्या खेचले जातात. यासाठीच ते कामाकर्षणाचा पुरेपूर वापर आपल्या जाहिरातीतून करतात.
पैसे कमविण्यासाठी काम निपुणतेचा सढळ वापर आपल्याला हॉलीवूड आणि बॉलीवूड सारख्या चित्रपटसृष्टीत अगदी सर्रासपणे केला जातो. त्यात स्त्री-पुरुषांचे शारीरिक आकर्षण प्रधान असते. संभोग दाखविणारे चित्रपट, मासिके, इंटरनेट, केबल टी.व्ही. यांची जणू स्पर्धाच चाललेली आहे. अन्य उद्योगधंद्यांपेक्षा यातून प्रचंड पैसा मिळविला जातो.
आजची स्वतंत्र स्त्री विचार करते की, तिने केवळ तितकीच कामुकता व्यक्त करावी की ज्यामुळे पुरुषाने तिच्याकडे आकर्षित तर व्हावेच, पण त्यांनी तिचे लैंगिक शोषण करू नये. परंतु एकदा धर्माच्या मर्यादा पार केल्यावर काम कोणाचाही आणि कशाचाही विचार करीत नाही. तो आपले रंग उधळणारच. अग्नीजवळ लोणी येताच वितळणारच.
विश्वामित्रपराशर प्रभृतयो वाताम्बुपर्णशना -
स्ते पि स्त्रीमुखपड्कजं सुललितं दृष्ट् वैव मोहं गताः ।
शाल्यन्नम् सघृतं पयोदधियुतं भु जन्ति ये मानवाः
तेषामिन्द्रियनिग्रहो यदि भवेद्विन्ध्यस्तरेत्सागरे ।।
'विस्वामित्र, पराशरादी वारा, पाणी, झाडाची पाने खाऊन तपश्चर्या करणारे भले भले महर्षी सुद्धा सुंदर स्त्रियांची मुखकमळे बघताच त्यांच्या मोहात पडले आणि आपली तपश्चर्या हरवून बसले. मग साळीचा सुरेख भात वर साजूक तूप, उत्तम दूध आणि साईचे दही असलेले अन्न जी माणसे नेहमी खातात त्यांचा जर इंद्रिय निग्रह झाला तर मग विंध्य पर्वत समुद्रात तरंगायला लागेल.
स्त्री-पुरुष यांच्यातील व्यावहारिक सफलता कपटावर अवलंबून असेल. विदेशी लोकांप्रमाणे आता भारतीय लोक सुद्धा कपटी व्यावहारिकता अवलंबित आहेत. सुंदर कन्या असेल तर बाप भरपूर धन घेऊन वराला कन्या देत आहे. विवाहानंतर पतीला पत्नीसाठी प्रचंड कष्ट करावे लागते. पती जर दाग दागिने, साड्या, चित्रपट, हॉटेल वा अन्य चैनीच्या गरजा पुरवित असेल तर पत्नी त्याला रतिसुख देते किंवा ते मिळविण्यासाठी पती हर प्रकारे धडपडतो. कधी कधी पुरुष पत्नी उत्तम गुणांची असूनही बाहेर शेण खातो. तर कधी पत्नी आपल्या प्रियकराशी संगनमत करून पतीला ठार मारते किंवा पती पत्नीला ठार मारतो. अर्थात पुरुषत्त्व आणि स्त्रीत्व यांचा निर्णय कामशास्त्रातील त्यांच्या निपुणतेनुसार केला जाईल.
या श्लोकातील अंतिम तीन शब्द आहेत - विप्रत्वे सूत्रमेवहि अर्थात कलियुगात कोणताही मनुष्य वेशभूषेवरून पुरोहित वा ब्राह्मण म्हणून संबोधलं जाईल. भारतातील विप्रलोक जानवे धारण करतात आणि विश्वभरातील इतर धर्मांतील पुरोहित विविध अलंकार किंवा काही विशिष्ट चिन्हे धारण करतात. कलियुगात अशी काहीतरी चिन्हे धारण करून कोणीही माणूस धार्मिक नेता बनू शकतो. भले त्याला ईश्वर विषयी ज्ञान असो वा नसो. पाद्री, मुल्ला-मौलवी, पुरोहित, भिक्षुक वा अन्य नावाने ओळखले जाणारे प्रत्येक धर्मातील पुरोहित केवळ बाह्यवस्त्र आणि काही अलंकार धारण करतात. हा त्यांचा देखावा असतो. परंतु यातील कोणीही आपापल्या धर्माचे खरे स्वरूप जाणत नाही. आपण कोणत्याही धर्म ग्रंथांचा प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आपल्याला आढळून येईल की धर्माचे खरे स्वरूप आहे भगवंतांवर अहैतुकी प्रेम करणे. परंतु कलियुगात प्रत्येक जण विपरीत कार्य करण्यास मग्न आहे. © लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
सध्याच्या तथाकथित मनुष्य जीवनाचे सुस्पष्ट वर्णन संपूर्ण वेदांचे परिपक्व फळ असलेल्या भागवत पुराणात पुढील प्रमाणे केलेले आहे --
दाम्पत्ये भिरुचिर्हेतुर्मायैव व्यावहारिके ।
स्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिर्विप्रत्वे सूत्रमेव हि ।।
पुरुष आणि स्त्रिया केवळ बाह्य आकर्षणामुळे एकत्र राहतील आणि व्यावहारिक सफलता कपटावर अवलंबून असेल. पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांचा निर्णय कामशास्त्रातील त्यांच्या निपुणतेनुसार केला जाईल. - भागवत पुराण १२.२.३
या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की, कलियुगातील स्त्री-पुरुष कशा प्रकारे एकमेकांच्या शारीरिक आकर्षणामुळे अर्थात कामवासनेमुळे एकत्र येतात. स्त्रिया तंग-तोकडे कपडे, भडक कामुक शृंगार करून पुरुषांना उत्तेजित करतात. विशिष्ट वस्त्रांमुळे विषयवासनेच्या दृष्टीने स्त्री आकर्षक वाटलीच पाहिजे तरच तिला चांगली स्त्री संबोधले जाते. त्याच प्रकारे स्त्रियांना पुरुषही कामवासनेच्या दृष्टीने चांगले दिसले तरच स्त्रिया त्यांच्याकडे बघतात. चित्रपट, टी.व्ही. इंटरनेट द्वारे यांचे सदैव प्रदर्शन केले जाते. नटनट्यांची लफडी-कुलंगडी, चित्रांसह वृत्तपत्रे-मासिके यांतून मोठ्या प्रमाणात छापली जातात आणि आवडीने वाचली जातात.
कलियुगातील माणसे सदैव उन्मत्त अवस्थेतच असतात. नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म - सदैव वाईट कृत्ये करण्यात मग्न असतात. मूर्ख माणसे सदैव भिन्न लिंगी व्यक्तिद्वारे आकर्षित होतात. घराघरातून योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे युवक - युवती शारीरिक भोगाप्रति जबरदस्त आकृष्ट होतात. मुला-मुलींनी एकत्र मिसळणे, हास्यविनोद करणे, भ्रमणध्वनीतून विविध कामुक संदेशांची/चित्रांची देवाण घेवाण करणे सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. बेळगावातील एका डॉक्टरच्या २३ वर्षीय मुलाने तरुणींना मॉडेल बनवितो या आकर्षक योजनेनुसार आपल्या जाळ्यात ओढले आणि शेकडो तरुणींची अर्ध/पूर्ण नग्न चित्रे आपल्या भ्रमणध्वनी आणि संगणकात संग्रहित केली. यात कित्येक विवाहित तरुणी सुद्धा आहेत. जर बेळगावच्या टिळकवाडी सारख्या उपनगरात इतक्या तरुणी आकृष्ट होतात तर मग विचार करा संपूर्ण जगातील किती कोट्यवधी तरुण-तरुणी या आकर्षणात फसल्या असतील.
स्त्रिया आणि पुरुष तरुण्यावस्था प्राप्त होताच शारीरिक भोगाच्या इच्छेने एकमेकांशी घनिष्ठता प्राप्त करण्यासाठी आणि 'काम' व्यवहारातील यशोशिखर गाठण्यासाठी प्रत्येक संधीचा पुरेपूर उपभोग घेतात. असे करण्यासाठी त्यांना काही निवडक प्रसंगच मिळतात. परंतु त्यांची चेतना सदैव एकमेकांच्या शरीराचा स्पर्श करणे, त्यांची विवस्त्र शरीरे बघणे आणि संभोगरत होण्याच्या विचारात मग्न असते. या सर्व आकर्षक कामाला ते 'प्रेम' असे गोंडस नाव देतात. परंतु हे सर्व काही आहे 'कामप्राविण्य'.
या युगात स्त्रियांशी अवैध संबंधामुळे अनेक स्त्रिया आणि त्यांच्यापासून जन्मलेली बालके अनाथ होत आहेत. तरुण तरुणी काही काळ एकत्र राहून नंतर विभक्त होतात. स्त्रिया पुरुषांशी फारकत घेऊन स्वतंत्र राहू इच्छितात आणि त्यामुळेच एका स्वतंत्र स्त्रिचा भोग अन्य पुरुष घेतात. कोणत्याही जाहिरातीत आपण बधू शकता स्त्रियांची अर्धनग्न चित्रे! लोक स्त्रियांप्रति सन्मानाची भावना हरवून बसले आहेत. ते स्त्री शरीराचे शोषण करण्यासाठी विविध वस्त्रे, आभूषणे व अन्य वस्तूंद्वारे प्रसार माध्यमातून प्रोत्साहन देत आहेत. शारीरिक आकर्षणातून एकत्र येणारे स्त्री-पुरुष विवाहाला औपचारिक तडजोड समजतात. जोपर्यंत ते एकमेकांपासून इंद्रियसुख प्राप्त करतात, तोपर्यंत एकत्र राहतात आणि नंतर विवाह विच्छेद करतात.
तसे पाहिले तर तात्त्विक रूपाने तरुण-तरुणींचे तथाकथित सुंदर-सुडौल शरीर म्हणजे काय आहे? केवळ एक चामड्याची झोळी! ज्यात केवळ कफ-पित्त-वायू-मल-मूत्र-मांस, चरबी-रक्त-हाडे आणि अन्य कितीतरी घाणेरडे पदार्थ भरलेले असतात. कुत्रा-कुत्री, डुकर-डुक्रीण जसे एकमेकांशी संभोग करतात तसेच नर-नारीही करतात. त्यांनी कामशास्त्रातील प्राविण्य प्रदर्शित करणे म्हणजे काहीतरी विशेष करणे असे नव्हे. हे काही अद्भूत कृत्य नसून ही तर एक शारीरिक क्रिया आहे. एक साधारण नैसर्गिक अनुभवाची प्रतिक्रिया आहे. तरीही प्रत्येक जण यात मग्न आहे. जगातील श्रेष्ठ राजे-महाराजे केवळ स्त्री सहवासासाठी युद्ध करीत. ज्युलियस सिझर प्रचंड पराक्रमी, अनेकांवर त्याचे नियंत्रण होते. पण क्लिओपात्राशी संभोग करता यावा म्हणून तो तिच्याशी लोचटपणे लगट करी. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनची पत्नी त्याची उत्तम प्रकारे सेवा करीत असे पण आईनस्टाईन तिच्यावर आसक्त न होता आपल्या चुलत बहिणीवर आसक्त असे. चाकांच्या खुर्चीविना काहीच हालचार करू न शकणाऱ्या एका प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञाने आपल्या नर्सला गर्भवती केले. एकूण काय भारतीय असो वा अमेरिकन राष्ट्रप्रमुख असो, कोणी श्रीमंत असो वा रस्त्याकडेचा भिकारी असो, सर्व जण या मैथुनक्रीयेत व्यस्त आहेत.
बहुसंख्य लोकांना देव, देश, धर्म वा संस्कृती यांची मुळीच आवड नाही. मग त्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या अध्यात्मशास्त्रांची आवड कशी असणार?
राजा भर्तृहरी आपल्या वैराग्य शतकमध्ये लिहितो -
उडुराजमुखी, मृगराजकटी
र्गजराजविराजित मन्दगतिः ।
यदि सा वनिता हृदये निहिता,
क्व तपः? क्व जपः? क्व समाधिरतिः? ।।
चंद्रासारखे मुख असलेली, सिंहासारखी कटी असलेली, गजराजासारखी डौलदार पण मंद गती असलेली सुंदरी जर हृदयात ठाण मांडून बसली असेल, तर कुठले तप, कुठला जप आणि कुठली समाधीची आवड?
डॉ. केविन स्कीन (टिटिंग पोर्नीग्राफी ऑडिक्शन) म्हणतात, "सांप्रत प्रसार माध्यमांद्वारे लोकांच्या चेतनेवर होणारा कामुकतेचा भडीमार संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात इतका कधीच झाला नव्हता. लैंगिक वासना चालविणारे घटक आणि कामवासनेच्या प्रभावाला आपण सर्वजण बळी पडत असल्यामुळे आजचा समाज डोळ्यांसमक्ष अधोगतीला जात असल्याचे आपण पाहू शकत नाही. आजच्या अशा समाजात कामवासनेला बळी पडलेले कोट्यवधी लोक असतील."
गरुड पुराणात सांगितले आहे कामातुरांणा न भयं न लज्जा. तर हे आजच्या युगातील कामातुरता वाढविणारे घटक म्हणजे सध्याचे व्यापारी जगत आणि प्रसार माध्यमे होत. जे आपला माल खपविण्यासाठी या कामुकतेचा पुरेपूर वापर करतात. उद्योजकांना पक्के ठाऊक आहे की, लोक कामुकतेकडे त्वरित आणि अगदी सहजरीत्या खेचले जातात. यासाठीच ते कामाकर्षणाचा पुरेपूर वापर आपल्या जाहिरातीतून करतात.
पैसे कमविण्यासाठी काम निपुणतेचा सढळ वापर आपल्याला हॉलीवूड आणि बॉलीवूड सारख्या चित्रपटसृष्टीत अगदी सर्रासपणे केला जातो. त्यात स्त्री-पुरुषांचे शारीरिक आकर्षण प्रधान असते. संभोग दाखविणारे चित्रपट, मासिके, इंटरनेट, केबल टी.व्ही. यांची जणू स्पर्धाच चाललेली आहे. अन्य उद्योगधंद्यांपेक्षा यातून प्रचंड पैसा मिळविला जातो.
आजची स्वतंत्र स्त्री विचार करते की, तिने केवळ तितकीच कामुकता व्यक्त करावी की ज्यामुळे पुरुषाने तिच्याकडे आकर्षित तर व्हावेच, पण त्यांनी तिचे लैंगिक शोषण करू नये. परंतु एकदा धर्माच्या मर्यादा पार केल्यावर काम कोणाचाही आणि कशाचाही विचार करीत नाही. तो आपले रंग उधळणारच. अग्नीजवळ लोणी येताच वितळणारच.
विश्वामित्रपराशर प्रभृतयो वाताम्बुपर्णशना -
स्ते पि स्त्रीमुखपड्कजं सुललितं दृष्ट् वैव मोहं गताः ।
शाल्यन्नम् सघृतं पयोदधियुतं भु जन्ति ये मानवाः
तेषामिन्द्रियनिग्रहो यदि भवेद्विन्ध्यस्तरेत्सागरे ।।
'विस्वामित्र, पराशरादी वारा, पाणी, झाडाची पाने खाऊन तपश्चर्या करणारे भले भले महर्षी सुद्धा सुंदर स्त्रियांची मुखकमळे बघताच त्यांच्या मोहात पडले आणि आपली तपश्चर्या हरवून बसले. मग साळीचा सुरेख भात वर साजूक तूप, उत्तम दूध आणि साईचे दही असलेले अन्न जी माणसे नेहमी खातात त्यांचा जर इंद्रिय निग्रह झाला तर मग विंध्य पर्वत समुद्रात तरंगायला लागेल.
स्त्री-पुरुष यांच्यातील व्यावहारिक सफलता कपटावर अवलंबून असेल. विदेशी लोकांप्रमाणे आता भारतीय लोक सुद्धा कपटी व्यावहारिकता अवलंबित आहेत. सुंदर कन्या असेल तर बाप भरपूर धन घेऊन वराला कन्या देत आहे. विवाहानंतर पतीला पत्नीसाठी प्रचंड कष्ट करावे लागते. पती जर दाग दागिने, साड्या, चित्रपट, हॉटेल वा अन्य चैनीच्या गरजा पुरवित असेल तर पत्नी त्याला रतिसुख देते किंवा ते मिळविण्यासाठी पती हर प्रकारे धडपडतो. कधी कधी पुरुष पत्नी उत्तम गुणांची असूनही बाहेर शेण खातो. तर कधी पत्नी आपल्या प्रियकराशी संगनमत करून पतीला ठार मारते किंवा पती पत्नीला ठार मारतो. अर्थात पुरुषत्त्व आणि स्त्रीत्व यांचा निर्णय कामशास्त्रातील त्यांच्या निपुणतेनुसार केला जाईल.
या श्लोकातील अंतिम तीन शब्द आहेत - विप्रत्वे सूत्रमेवहि अर्थात कलियुगात कोणताही मनुष्य वेशभूषेवरून पुरोहित वा ब्राह्मण म्हणून संबोधलं जाईल. भारतातील विप्रलोक जानवे धारण करतात आणि विश्वभरातील इतर धर्मांतील पुरोहित विविध अलंकार किंवा काही विशिष्ट चिन्हे धारण करतात. कलियुगात अशी काहीतरी चिन्हे धारण करून कोणीही माणूस धार्मिक नेता बनू शकतो. भले त्याला ईश्वर विषयी ज्ञान असो वा नसो. पाद्री, मुल्ला-मौलवी, पुरोहित, भिक्षुक वा अन्य नावाने ओळखले जाणारे प्रत्येक धर्मातील पुरोहित केवळ बाह्यवस्त्र आणि काही अलंकार धारण करतात. हा त्यांचा देखावा असतो. परंतु यातील कोणीही आपापल्या धर्माचे खरे स्वरूप जाणत नाही. आपण कोणत्याही धर्म ग्रंथांचा प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आपल्याला आढळून येईल की धर्माचे खरे स्वरूप आहे भगवंतांवर अहैतुकी प्रेम करणे. परंतु कलियुगात प्रत्येक जण विपरीत कार्य करण्यास मग्न आहे. © लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
sadhu wachn vinayak
उत्तर द्याहटवा