रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

                                       कृतघ्न पवार 

आपल्या अवती भवती, मित्रमंडळीत, नात्यागोत्यात, ज्ञाती आणि देशबांधवात तथा संपूर्ण विश्वरभरात दोन प्रकारची आढळतात; एक आहे 'कृतज्ञ' आणि दुसरा 'कृतघ्न'! आपल्यावर उपकार करणाऱ्या व्यक्तीप्रति जो मनुष्य सदैव ऋणी असतो त्याला 'कृतज्ञ' म्हणतात. आपल्यावर कृपा करणाऱ्या व्यक्तीप्रति त्याचे हृदय सदैव कृतज्ञतेच्या भावनेने ओथंबलेले असते. असा मनुष्य आपल्याला सुखाचे दोन घास भरवणाऱ्याच्या हाताचा कधीही चावा घेत नाही आणि याच्या विरुद्ध असतो त्याला 'कृतघ्न' म्हणतात. कलियुगात अशा कृतघ्न माणसांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. मतदारांची फसवणूक करणारे, पक्षबदलू राजकारणी, मोठमोठे धनदांडगे, क्रिकेटपटू, नटनट्या, तथाकथीत सामाजिक कार्यकर्ते असे अनेकानेक क्षेत्रातील तथाकथीत लब्धप्रतिष्ठित लोक 'कृतघ्न' असतात. अशा 'कृतघ्न' लोकांमघ्ये सर्वश्रेष्ठ आहेत शरद पवार! सध्या सत्ताभ्रष्ट असलेले पवार सतत ब्राह्मणद्वेष पसरवून ब्राह्मणेतर समाजाची दिशाभूल करण्यात अग्रेसर आहेत. वास्तविक पाहता पवार यांना जे उच्चस्थान प्राप्त झाले आहे ते सुद्धा एका ब्राह्मणामुळेच आणि या ब्राह्मणाचे नाव आहे बिडेश कुलकर्णी! ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अनुयायी होते बिडेश कुलकर्णी! नेताजींच्या गूढ मृत्यू नंतर बिडेश कुलकर्णी नेहरूंचे सेवक झाले आणि कांग्रेसी खासदार झाले. पुढे त्यांना त्यांच्या नेहरूनिष्ठेमुळे  पदूचेरीचे नायब राज्यपाल होण्याचे भाग्य लाभले. त्यानंतर कुलकर्णी इंदिरा गांधींचे निकटचे समादेशकही झाले. त्या काळी भारतीय सेनेत मेजर पदावर कार्यरत असलेला अभय कुलकर्णी हा बिडेश कुलकर्णी यांचा ज्येष्ठ पुत्र शरद पवारांचा मित्र होता. दोघेही सुट्टीच्या काळात उघड्या जीप मधून पुणे-बारामती असा थरारक प्रवास करीत आपल्या तारुण्याचा जल्लोष साजरा करीत. तेव्हा बिडेश कुलकर्णींनी विचार केला की, एक चांगला होतकरू मराठा तरुण वाया जाण्यापूर्वीच राजकारणात गुंतवला पाहिजे. ब्राह्मणी दूरदृष्टी असलेल्या बिडेश कुलकर्णींनी एक दिवस शरद पवारांना आपल्या सोबत घेतले आणि सरळ यशवंतराव चव्हाणांकडे नेले आणि सांगितले की, हा माझ्या मुलाचा मित्र आहे, याला आपल्या मायेच्या पंखाखाली घ्या. समस्त जातीपातींचे नेते असलेल्या बुद्धिमान यशवंतराव यांचा वरदहस्त मस्तकावर प्राप्त होताच शरद पवार युवक काँग्रेसचे नेते झाले आणि बघता बघता राजकीय गुरुंचेही बाप झाले. त्यांचा बाकीचा इतिहास सर्वांनाच ज्ञात असल्यामुळे परत उगाळण्यात काही अर्थ नाही. 

सांगण्याचे तात्पर्य हे की, पुराण काळापासून ते सम्राट चंद्रगुप्त मौर्य असो की छत्रपती शिवराय, समस्त राजा-महाराजांचे गुरु, समादेशक वा प्रधानमंत्री हे सर्वजण ब्राह्मणच होते. या सर्व ब्राह्मणांनी आपला राजा, देव, देश आणि धर्माची निःस्वार्थपणे सेवा केलेली होती आणि त्यामुळे सर्वच राजे त्यांच्याप्रति सदैव 'कृतज्ञ' होते, पण पवारांसारखा कोणी एखादाच अपवादात्मक 'कृतघ्न' असतो, ब्राह्मणद्वेषी  असतो.                                                                
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 

संपर्क : 92421 76587

1 टिप्पणी:

  1. Major Abhay Kulkarni,has gone long back,
    but his memories remain in my heart and mind,I met him few times at Mahar regimental center,Sagar,M.P.
    Thank you for post presenting truth about PAWAR SAHEB.

    उत्तर द्याहटवा