गुरुवार, २२ जून, २०१७

                  ८. ब्राह्मणांची दुःखांतून सुटका 


      नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणांची प्रचंड नासाडी करण्यात आली. विशेषकरून मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात समस्त ब्राह्मण देशोधडीला लागले. खरे तर ब्राह्मणांवर असे संकट कोसळणार याची फार पूर्वीपासून सूचना पूज्य टेंब्ये स्वामींनी दिली होती आणि याचे कारण ब्राह्मणांची चांगली वागणूक नाही असे त्यांनी सूचित केले होते. १९४८ च्या मे महिन्यात ब्राह्मणेतर 
पुढाऱ्यांनी ब्राह्मणलुटीची योजना आखली होती. परंतु जानेवारी महिन्यात गांधी हत्येचे आयते कोलीत मिळाल्यामुळे ही योजना आधीच राबविण्यात आली. सुक्या सोबत ओले जळते त्याप्रमाणे अनेक निष्पाप ब्राह्मण या वणव्यात होरपळले गेले. यातून देशोधडीला लागलेले अनेक ब्राह्मण आपल्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि परिश्रमामुळे परत नावारूपाला आले. 
     याच काळात पुणेरी पतित ब्राह्मणांच्या नादाला लागून अनेक ब्राह्मण आपले ब्राह्मणोचित गुणधर्म सोडून मांस भक्षण, मदिरा सेवन, जुगार आणि व्यभिचार यात प्रगती करू लागले. पुरोगाम्यांच्या कुप्रचारामुळे 'हम दो हमारे दो' किंवा एक असे म्हणून गर्भपात करू लागले. त्यामुळे समस्त ब्राह्मणांचे अध:पतन झाले. कधी कधी चुकून इतिहास वाचणारे आम्हाला प्रश्न विचारतात की, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, लोकमान्य टिळक, सावरकर बंधू, पिंगळे, चंद्रशेखर आझाद, कान्हेरे-देशपांडे इत्यादी अनेक तेजस्वी क्रांतिवीर होऊन गेले. परंतु आता असे तेजस्वी तारे ब्राह्मणांच्या घरी जन्माला का येत नाहीत? पूर्वी या तेजस्वी सुपुत्रांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता वेदेशास्त्रांना जाणत होते. त्यांनी केलेल्या गर्भाधान संस्कारामुळे असे प्रख्यात बुद्धिमान पुत्र जन्माला आले; परंतु आता अशी नररत्ने जन्माला येत नाहीत, कारण ब्राह्मण संस्कारहीन झाले आहेत. ते गर्भाधान सारख्या पवित्र संस्कारावर विश्वास न ठेवता केवळ इंद्रियतृप्तीवर विश्वास ठेवतात आणि या इंद्रियभोगातून प्राप्त होणाऱ्या फळास कन्या व पुत्र म्हणून स्वीकारतात. शुद्ध बीजाच्या अभामुळे रसाळ गोमटी फळे मिळणे दुष्प्राप्य झाले आहे. 
      ब्राह्मणांकडे दिव्य गुणांचा अभाव असल्यामुळे काही स्वार्थी आणि धूर्त राजकारणी बहुजनांच्या एकगठ्ठा मतांच्या प्राप्तीसाठी ब्राह्मणांवर गरळ ओकतात. त्यामुळे बहुजन त्यांना सत्ता प्रदान करतात आणि दुःख भोगतात. खरे पाहता ब्राह्मण भगवद्ज्ञानहीन झाल्यामुळे स्वतःही दुःख भोगत आहेत आणि इतरेजन दिव्य ज्ञानाच्या मार्गदर्शकांच्या अभावामुळे दुःख भोगत आहेत. नास्तिक, लंपट, देशद्रोही, धर्मभ्रष्ट लोक सर्वच जातीपातीत आहेत. त्यामुळे एकमेकांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. 
     संपूर्ण वेदांचे परिपक्व  फळ असलेल्या भागवत पुराणात (५.२.२८) सांगितले आहे की, 'जेव्हा जेव्हा नास्तिक लोक उपद्रव देतात, तेव्हा तेव्हा आस्तिक लोकांना संरक्षण देण्यासाठी भगवंतांचे अवतार ग्रहलोकांतून प्रकट होत असतात.'
     कलियुगात भगवंतांनी भगवत पुराणाच्या आणि श्रीहरिनामाच्या रूपात अवतार घेतला आहे. जर या कलियुगातील ब्राह्मणांना आपले आणि समस्त समाजाचे कल्याण साधायचे असेल, तर त्यांनी केवळ श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भभागवत पुराण या दोन ग्रंथांचे अध्ययन आणि अनुसरण करण्याची सवय लावून घ्यावी; म्हणजे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट सफळ होईल. श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भगवंताचा प्राथमिक अभ्यास असून श्रीमद् भागवत जीवनाचे सारसर्वस्व आहे. ते साक्षात श्रीकृष्ण रूप आहे. म्हणून भागवताला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप म्हणून स्वीकारायला हवे. 
     भागवत पुराण (१.३.२९)  सांगते - 
     जन्म गुह्यम् भगवतो य एतत्प्रायतो नरः ।
     सायं प्रातर्गृणन् भक्त्या  दुःखग्रामाद्विमुच्यते ।। 
     'जो मनुष्य भगवंतांच्या रहस्यमय अवतारांच्या कथांचे प्रातःकाळी आणि सायंकाळी नियमपूर्वक गायन-पठण करतो, त्याची जीवनातील सर्व दुःखांपासून सुटका होते.'
     भागवत अध्ययनासमवेत भगवंतांच्या पवित्र नावांचे सामूहिक कीर्तन आणि जप करणे परम आवश्यक आहे. 
     कालेर्दोषनिधे राजन्नस्ति ह्योको महान् गुण ।
     कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग: परं व्रजेत् ।।
'हे राजन, जरी कलियुग दोषांचा सागर असला, तरीही या युगात एक महान गुण आहे - केवळ कृष्णनामाचे कीर्तन केल्याने मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो आणि दिव्य धामाची प्राप्ती करतो.' (भागवत १२.३.५१)  
     ज्याप्रमाणे एक शक्तीशाली राजा असंख्य चोरांना मारू शकतो, त्याप्रमाणे एक आध्यात्मिक सद्गुण या युगातील सर्व कल्मषांचा नाश करतो. या घोर कलियुगात झालेल्या जीवांचा उद्धार कशा प्रकारे करता येईल, हे विचारण्यासाठी श्री नारद मुनी आपले पिता तथा आध्यात्मिक गुरु श्री ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांच्यात झालेला संवाद यजुर्वेदातील 'कलिसंतरण उपनिषद' मध्ये दिलेला आहे. तो असा -  हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। इति षोडशकंनाम्ना कालिकल्मष नाशनम् । नात: परतोपाय: सर्ववेदेषु दृष्यते । 
      द्वापारयुगाच्या अंती नारद मुनी ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना दंडवत करून म्हणाले, "हे प्रभू, या कलियुगात भवसागरातून तरून जाण्यासाठी कोणता मार्ग आहे?"
     ब्रह्मदेव म्हणाले, "हे पुत्र, तू चांगला प्रश्न विचारला आहेस. सर्व वेदांचे जे अनाकलनीय गुपित आहे, ते ऐक. त्यामुळे  कलिरूपी भवसागरातून तू विनाप्रयास तरून जाशील. पहा, आदिपुरुष भगवान श्री नारायणांच्या केवळ नामोच्चारणाने  कलियुगाच्या कल्मषांचा नाश होतो."
     नारद मुनींनी पुन्हा विचारले,"ते नाम कोणते?"
     त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, " हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या सोळा नामांचा जो महामंत्र आहे, तो कलिच्या दोषांचा नाश करणारा आहे. सर्व वेदांमध्ये अन्य उपाय नाही."
     नारदांनी पुन्हा विचारले, "हे भगवंत, या महामंत्राच्या कीर्तनाची पद्धत कोणती आहे?"
     ब्रह्मदेव म्हणाले," या कीर्तनाची कोणतीही पद्धत किंवा नियम नाही."
पवित्र किंवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही वेळी याचे कीर्तन करणारा ब्रह्महत्या, हिंसा, चोरी इत्यादी सर्व पापांतून मुक्त होऊन, भवसागर तरून जातो आणि प्रामुख्याने श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करतो. म्हणून या अतिशय पतित युगात - हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या महामंत्राच्या कीर्तनाचे महत्त्व अपार आहे. 
     भागवत महापुराणाच्या अंतिम श्लोकात (१२.१३.२३) श्री सूत गोस्वामी म्हणतात - 
     नामसंकिर्तनं यस्य सर्व पापप्रणाशनम् ।
     प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरि परम् ।।
    'मी भगवान हरींना सादर प्रणाम करतो की ज्यांच्या पवित्र नामाचे सामूहिक कीर्तन सर्व पापांना नष्ट करते आणि त्यांना नमन करण्याने सर्व दुःखांतून मुक्ती मिळते.'
       
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  
                                










                     ७. ब्राह्मणांची प्रगती की अधोगती 


      आम्ही हा दावा कधीच करीत नाही की, ब्राह्मण धुतलेल्या तांदळासारखे आहेत. वास्तविक पाहता कलियुगाचा प्रारंभ झाला तो ब्राह्मणांच्या पतनामुळे! ब्राह्मण पतित झाले म्हणूनच सर्व समाज पतित झाला आहे. इतरांना दोष देत बसण्यापेक्षा आधी आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. 

इस्लामी आक्रमकांविरुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रिय लढले; परंतु इस्लामी राजवट स्थिर झाल्यावर क्षत्रियांनी जशी सुलतानांची नोकरी पत्करली तशीच ब्राह्मणांनीही स्वीकारली. कुराणाची शिकवण संस्कृतमध्ये अल्लोपनिषद् म्हणून ब्राह्मणाने सिद्ध केली. दिल्लीच्या बादशाहांसाठी यमुनातटी ब्राह्मण प्रार्थना करीत. याच काळात शास्त्र ज्ञान नसलेले निर्बुद्ध ब्राह्मण मोठ्या संख्येने निर्माण झाले. भगवंतांची उपासना सोडून भ्रामक पूजा-पाठ वाढविणाऱ्यांची संख्यासुध्दा लक्षणीय झाली आहे.     
      ब्राह्मणांनी स्वतःला कितीही देशभक्त वा हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेतले तरी बहुजन समाज ब्राह्मणांनाच का लक्ष्य करतो, याचाही विविध अंगांनी विचार करणे आवश्यक आहे. 
     आज अनेक ब्राह्मण संघटना प्रभावी संघटन करीत आहेत. ब्राह्मणांची अधिवेशने मोठ्या  संख्येने भरत आहेत. उद्योगधंदे, व्यवसाय यावर ब्राह्मणांची प्रगतीही चांगलीच वाढत आहे. टी.व्ही., सिनेमांतून ब्राह्मणांच्या मुली बिनधास्त वस्त्र उतरवून नाचत आहेत. 
     दुप्पट पैसे मिळतात म्हणून कोकणातील ब्राह्मण आपली भूमी हिंदूंऐवजी मुसलमानांना विकत आहेत. मुली मुसलमान वा ब्राह्मणेतरांशी विवाह करण्यास पुढाकार घेत आहेत. ब्राह्मण मुले थोराड झाली तरी त्यांना ब्राह्मण मुली विवाहासाठी मिळत नाहीत. हे असे का होत आहे? कारण ब्राह्मणांनी आपल्या शाश्वत धर्माचा त्याग केला आहे. ब्राह्मणांनी आपले परमशुभचिंतक आणि शाश्वत संरक्षक भगवान श्री विष्णू वा श्रीकृष्णांचा त्याग केला आहे. ब्राह्मणांनी भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय सोडून मानवनिर्मित खोट्या देवांचा स्वीकार केलेला आहे. ब्राह्मणांचे योगक्षेम स्वतः भगवंत करतात; परंतु त्या भगवंतांचा त्याग करून, त्यांच्या दिव्य उपदेशांचा त्याग करून ब्राह्मण मर्त्य मानवांची उपासना करतात. ते परम पवित्र हरिनामाचा त्याग करून मानवनिर्मित नावांचा जप करतात. 
नारद पुराणात स्पष्ट सांगितले आहे - 
      ब्राह्मणो पि मुनिर्ज्ञानी देवमन्यं न पुज्येत् ।
     मोहेन कुरते यस्तु सद्यश्चाण्डालतां व्रजेत् ।।
     सदान्यदेवताभक्तीर्ब्राह्मणानां गरियासी ।
     विदुरयति विप्रत्वं चण्डालत्वं प्रयच्छति ।।
     'मुनी आणि ज्ञानी ब्राह्मण अन्य देवतांची पूजा करणार नाहीत; परंतु जे मोहग्रस्त असे करतात ते त्याच क्षणी चांडाळांचा स्तर प्राप्त करतात. अन्य देवतांप्रति भक्ती ठेवल्यामुळे ब्राह्मणांचे विप्रत्व नष्ट होते आणि त्यांना चांडाळत्व प्रकट होते.'
      वर्तमानकाळी समस्त ब्राह्मण ब्राह्मणोचित आचरणापासून भ्रष्ट झालेले असून चांडाळ सदृश झाले आहेत. ब्राह्मणांचे पतन इतके झाले आहे की त्यांना भगवंत कोण आहेत याचेही ज्ञान नाही. ते अल्पबुद्धीचे देवतापूजकसुद्धा राहिलेले नाहीत. तर त्यापेक्षाही पतित होऊन सामान्य मानवाला विष्णूंचा अवतार म्हणून त्यांची आराधना करीत आहेत. अनंत कोटी ब्रह्माम्डांचे नायक, राजाधिराज, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत. असे असूनही ज्ञानहीन ब्राह्मण मर्त्य बाबा-बुवांना अनंत कोटी ब्रह्माण्डाचे नायक समजत आहेत.  केवढी ही अधोगती झाली आहे पहा!
      महाभारताच्या हरिवंशात म्हटले आहे - 
      यस्तु विष्णुं परित्यज्य मोहादन्यमुपासते ।
      स हेमराशिमुत्सृज्य पांशुराशिं जिघृक्षति ।।
      'जी मोहग्रस्त व्यक्ती श्री विष्णूंचा परित्याग करून अन्य देवतांची उपासना करते, ती सुवर्ण राशीचा परित्याग करून धुळीच्या राशीला ग्रहण करण्याची इच्छा ठेवते. 
      स्कंद पुराणात ब्रह्मदेव नारद मुनींनी सांगतात - 
     वासुदेवं परित्यज्य यो न्यदेवमुपासते ।
     त्यक्त्वामृतं स मूढात्मा भुंक्ते  हलाहलं विषम् ।।
     'जे लोक श्री वासुदेवांना सोडून अन्य देवतांची उपासना करतात, ते मूढात्मा अमृताचा त्याग करून हलाहल विषाचे पान करतात.'  
      शास्त्रांतील वरील स्पष्ट कथनांविषयी ब्राह्मणांनी मनन-चिंतन केले तर त्यांना कळून येईल की, आपले वास्तविक सुख कशात आहे? परंतु कलियुगात ब्राह्मणांचे दुर्दैव इतके भयंकर आहे की ते कश्यपपुत्र हिरण्यकशिपूप्रमाणे त्वरित क्रोधित होतात. स्वतःला पुरोगामी समजून शास्त्रवचनरुपी दिव्य ज्ञानाला ठोकरतात. त्यांची यथेच्छ टिंगलटवाळी करून पोथ्या जाळून टाकण्यास सांगतात. 
      श्री विष्णूंना नष्ट करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन हिरण्यकशिपू समस्त असुरांना आदेश देतो की, यज्ञशाला, ऋषीमुनींचे आश्रम, महत्त्वपूर्ण वृक्ष, गायी यांचा नाश करा. या वैदिक ब्राह्मण संस्कृतीचा नाश झाला की विष्णू आपोआप मरून जाईल. समस्त असुर तत्काळ आपल्या नेत्याच्या आदेशाचे पालन करू लागतात. हिरण्यकश्यपू देवतांना स्वर्गातून पिटाळून लावतो. त्याच्या क्रौर्यामुळे विविध ग्रहांच्या लोकपालांसह संपूर्ण प्रजा अतिशय दुःखिकष्टी होते. त्रस्त आणि भयक्रांत झाल्यामुळे ते सर्व जण कोणताही आश्रय न मिळाल्यामुळे शेवटी भगवान श्री विष्णूंना शरण जातात. ते सर्व जण निद्राचा त्याग करून, पूर्णपणे मनोनिग्रह करून आणि केवळ वायू भक्षण करून भगवान श्री विष्णूंची आराधना करतात. त्यांनी केलेल्या याचनेमुळे भगवान त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या दिव्य वाणीद्वारे सांगतात, "हे विद्वान देवतांनो! भयभीत होऊ नका. तुमचे कल्याण होवो! देव हो! तुम्ही माझ्याविषयी श्रवण-कीर्तन करून तथा माझी स्तुती करून माझे भक्त व्हा, कारण अशा कृतींमुळे सर्व जीवांना खचितच सर्व प्रकारचे वर प्राप्त होतात. मला हिरण्यकशिपूची सर्व दुष्कृत्ये माहित असून मी लवकरच ती थांबविणार आहे. तथापि, कृपया योग्य काळाची प्रतीक्षा करा."         
     सध्या ब्राह्मणांची जी दुःखद अवस्था झाली आहे त्याला जसा अन्य समाज उत्तरदायी आहे तसा स्वयं ब्राह्मण समाजही आहे. ब्रिग्रेडीवृत्ती जर हिरण्यकशिपूप्रमाणे वागत असेल, पुरोगामी, साम्यवादी वा अंनिससारखे समस्त नास्तिक धर्मावर आघात करत असतील, इसिससारख्या इस्लामी अतिरेकी संघटना वा पाश्चात्त्य ख्रिस्ती हिंदू संस्कृतीचा नाश करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतील, तर ब्राह्मणांनी तत्काळ भगवंतांना शरण गेले पाहिजे. त्यांच्या आदेशानुसार केवळ भगवंतांचेच नाम श्रवण-कीर्तन करून त्यांचे प्रामाणिक भक्त झाले पाहिजे. तरच भगवान ब्राह्मणांचे रक्षण करतील. भगवान आपल्या आश्रितांना स्पष्टपणे सांगतात - 
     यदा  देवेषु वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु ।
     धर्मे मयि च विद्वेष: स वा आशु विनश्यति ।। 
     'मनुष्य जेव्हा भगवंतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांचा, ज्ञानाचा भांडार असणाऱ्या वेदांचा, गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा (वैष्णवांचा), धर्मतत्त्वांचा आणि अंततः मज भगवंतांचा द्वेष करतो, तेव्हा खचितच तो आणि त्याची संपूर्ण संस्कृती त्वरित नष्ट होते.' - भागवत ७.४.२७
      अर्थात समस्त संकटांतून मुक्त होऊन आनंदपूर्ण जीवन जगण्यासाठी ब्राह्मणांनी प्रामाणिक बनले पाहिजे. चारित्र्यवान आणि ज्ञानवान बनले पाहिजे. केवळ आयटीचे भौतिक ज्ञान घेऊन, बक्कळ पैशाच्या जोरावर समस्त प्रकारची इंद्रियतृप्ती प्राप्त करणे म्हणजे प्रगती नव्हे. ही तर नरकामध्ये नेणारी अधोगती आहे. 
     एखाद्या शुद्राने श्रावण मासात एक वेळ दारू प्राशन केले  नाही तर त्याला पुष्कळ पुण्य प्राप्त होऊन स्वर्गात निवास करण्याची संधी मिळते, परंतु एखादा ब्राह्मण एकदा जरी नशापान करेल तर त्याला अनंतकाळासाठी नरकवासी व्हावे लागते. आताचे ब्राह्मण मात्र वेदांवर विश्वास ठेवत नाहीत. वेदांची आणि भगवंतांचीच टिंगलटवाळी करतात. त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण अशा मुर्खांना दंड देतात. 
      ब्राह्मण जर खरोखरच बुद्धिमान असतील तर त्यांनी देवांचा, ज्ञानाचे भांडार असणाऱ्या वेदांचा, सर्व प्रकारचे भौतिक आणि अध्यात्मिक सुख प्रदान करणाऱ्या गायींचा, ब्राह्मणांचा, साधूंचा अर्थात भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा, धर्मतत्वांचा आणि प्रामुख्याने भगवंतांचा द्वेष न करता, त्यांची प्रेममयी सेवा करावी. त्यामुळे त्यांचे सर्वप्रकारे रक्षण होईल. आत्मसन्मान मिळेल. प्रेम पेरले तर प्रेमाची मधुर फळे मिळतील. द्वेष पेरला तर द्वेष मिळेल. काय मिळवायचे ते ज्याचे त्याने ठरवावे.          
           
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७  







   

मंगळवार, १३ जून, २०१७

                              ६. ब्राह्मणांविरुद्ध षड्यंत्र
 

सध्याचे युग हे कलह आणि दंभ  यांनी भरलेले आहे. या युगात चांगल्या गोष्टींना उठाव मिळणे कठीण असते. वाईट गोष्टींना सदैव प्राधान्य मिळते. या युगात पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधून तिला आडात ढकलले जाते आणि वेश्येच्या गळ्यात मणिहार घालून तिला पद्मश्री प्रदान केले जाते. 
      इंग्रज जेव्हा भारतात  आले, तेव्हा त्यांनी इथला इतिहास आणि भूगोल चांगल्याप्रकारे जाणून घेतला  होता. त्यांनी विविध प्रकारच्या कूटनीतीचा वापर करून संपूर्ण भारत पादाक्रांत केला. अठरा पगड जाती आणि विविध भाषा यांनी व्यापलेल्या या विशाल देशात समस्त हिंदूना   एकत्र बांधून ठेवणारी वैदिक संस्कृती किती अद्भूत आहे याची इंग्रजांना चांगलीच जाणीव झाली. त्यांनी पाहिलं की, विविध भाषा बोलणाऱ्या लोकांवर संस्कार आणि शिक्षणाचा प्रचंड प्रभाव आहे तो रामायण, महाभारत आणि भागवत पुराणादी संस्कृत वाड्मयांचा! येथील सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातही या वैदिक शास्त्रांचा नेहमीच मुक्त वापर केला जात असे.  
      ब्राह्मण वर्ग राजे-महाराजांना उत्तम समादेश देतात आणि राजे प्रजेचे पालन  पुत्रवत करतात. वैश्य राजांना नियमित कर देतात आणि शुद्र योग्यप्रकारे श्रम करून समाजाची सर्व प्रकारे उन्नती करतात. 
     त्या काळी भारतातील गुरुकुल पद्धती इतकी विकसित होती की पाठशाळांतून शुद्र विद्यार्थी आणि शुद्र शिक्षक यांची संख्या सर्वाधिक होती, परंतु त्याच काळात इंग्लंडमध्ये शाळाच अस्तित्वात नव्हत्या. लहान मुलांनाही कारखान्यातून काम करावे लागत असे. 
        अशा काळात इंग्रजांचे राज्य भारतावर वरवंटा फिरवू लागले. इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वतंत्र करण्यासाठी १८५७ मध्ये पहिले स्वातंत्र्य युद्ध पेटले. या क्रांतीयुद्धाचे नेतृत्व ब्राह्मणांनी केले होते. त्यांनीच समस्त भारतवासीयांना पटवून दिले की, गोरे परकीय असून त्यांना आपल्या देशातून हाकलून दिले पाहिजे. ब्राह्मणांनी चालविलेल्या समाज प्रबोधनामुळे इंग्रजांनी खोटा इतिहास प्रचारात आणला तो हा की, ब्राह्मण सांगतात ती संस्कृत शास्त्रेसुद्धा परकीय आहेत. ते आर्य असून त्यांनी भारतावर आक्रमण करून मूलनिवासी द्रविडांना दास बनविले आहे. त्यांच्या या खोट्या इतिहासाचा प्रभाव फुले ते टिळकांपर्यंत अनेकांवर पडला.
     एकदा उत्तर भारतात त्रिवेणी संगमावर कुंभमेळा भरला होता. लक्षावधी हिंदू पवित्र स्नान करण्यासाठी गंगा तटावर एकत्र आले होते. त्यांची ती विशाल गर्दी पाहून इंग्रजांना मोठे आश्चर्य वाटले. ब्रिटिश सरकारकडून कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना इतक्या मोठ्या संख्येने लोक स्नान करण्यासाठी कसे काय एकत्र आले? गोरे इंग्रज मोठे चौकस वृत्तीचे, ते लोकांमध्ये फिरून चौकशी करू लागले. नागाप्रदेशापासून ते गुजरात पर्यंत, खैबर-काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतातून विविध रंगा-रूपाचे, विविध भाषा बोलणारे, विविध मतप्रवाहाचे लोक स्नान करण्यासाठी आले होते. इंग्रज अधिकाऱ्यांनी विविध लोकांकडे चौकशी केली की, तुम्ही येथे कशासाठी आलात. त्या वेळी सर्वांकडून एकच उत्तर मिळे की, आम्ही या विशिष्ट दिवशी, विशिष्ट मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी आलो आहोत. या मुहूर्तावर अमृतस्नान केल्याने समस्त पापे नष्ट होतात आणि पुण्य प्राप्त होते. इंग्रज परत चौकशी करीत की, तुम्हा अडाणी खेडूतांना कसे कळते की याच मुहूर्तावर स्नान केले पाहिजे. त्यावर उत्तर मिळे की पंचांगावरून मुहूर्त सांगितला जातो. इंग्रज परत जिज्ञासा करीत की, पंचांग कोण लिहितो आणि सांगतो? सर्वांकडून उत्तर मिळत असे की, आमच्या गावाचा ब्राह्मण, जो ग्रामोपाध्ये वा पुरोहित असतो तो पंचांग जाणतो आणि तोच मुहूर्त सांगतो. त्यानुसार आम्ही प्रवास प्रारंभ करून योग्य मुहूर्त येथे पोहोचतो. 
     इंग्रजांजी चक्रे फिरू लागली. इंग्रजांना मोठा अहंकार होता की, आमचे दळणवळण श्रेष्ठ आहे. आम्ही तार, पोस्ट, दूरध्वनी आणि रेल्वे आणली. त्यामुळे आमचा भारतभर संचार वेगाने होतो; परंतु आमच्यापेक्षा ब्राह्मणांचे वैदिक गणित, खगोलशास्त्र वा पंचांग अतिश्रेष्ठ आहे. हे मूठभर ब्राह्मण एका पंचांगातील मुहूर्तावर लक्षावधी लोकांना स्नानासाठी एकत्र आणू शकतात तर मग हे ब्राह्मण ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र का आणू शकणार नाहीत? निश्चितच आणतील!
इंग्रज अधिकारी कुंभमेळ्यात हप्ते गोळा करत नव्हते. त्यांनी तातडीने आपली गुप्तवार्ता वरिष्ठांना कळविली आणि त्यांचे नवीन धोरण आखले गेले. ते हे की, भारतीयांना अर्थात हिंदूंना शिक्षण देणे. त्यांच्या मनावर पक्के बिंबवणे की, तुमचे वैदिक ज्ञान बुरसटलेले असून इंग्रजी ज्ञान प्रगत आहे. पैशासाठी काही ब्राह्मण इंग्रजांना फशी पडले. कलकत्यातील राधाकुंड चटर्जीने तर भरपूर पैसे घेऊन इंग्रजांना ग्रंथच लिहून दिला की, वैदिक काळात ब्राह्मण गोमांस खात होते. इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव इतका विलक्षण होता की, भारतीय संस्कृतीचा विदेशातही प्रचार करणाऱ्या विवेकानंदांनी सुद्धा लिहून ठेवले आहे की, प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात, परंतु नंतर त्यांना गायीचे महत्त्व कळू लागल्यामुळे त्यांनी गोपालन प्रारंभ केले. परंतु हा त्यांचा निव्वळ तर्क आहे. सत्य इतिहास नाही की शास्त्रसिद्धान्तही नाही. 
      मॅक्समूलरच्या खोट्या सिद्धान्ताचा प्रचार केला गेला की, उत्तर भारतीय परकीय असून त्यांनी संस्कृत भाषा लादली आहे. याचा विषारी प्रभाव असा आहे की आजही दक्षिण भारतीय विशेष करून तामिळी लोक तामिळ भाषेला संस्कृतपेक्षा प्राचीन मानतात. इंग्रजांच्या खोट्या इतिहासाचा प्रभाव इतका होता की, लोकमान्य टिळकांनीही एक ग्रंथ लिहून तर्क प्रस्तुत केला की, आर्य उत्तर ध्रुवावरून भारतात आले. पुढे तर इंग्रजी ग्रंथ वाचून आपले प्रभावशाली पुरोगामी तर्क प्रस्तुत करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा  वेद-वाड्मयाच्या पोथ्या कालबाह्य असून त्या बहिष्कृत कराव्यात असे अनेकवेळा सांगितले आणि लिहूनही ठेवले. त्यापुढे आणखी प्रगती करीत प्रबोधनकार ठाकरे यांनी संपूर्ण वेदांचे परिपक्व फळ असलेल्या अमल पुराण 'भागवत' ग्रंथास छिनाल म्हणून संबोधले. इंग्रजी शाळा शिकलेल्या ज्योतिबा फुल्यांनी तर देवी-देवतांची भयानक निंदानालस्ती केलेली आहे. 
      या सर्व प्रगत हिंदुमुळे इंग्रजांचे चांगलेच फावले आणि पुढे फाळणी झाल्यानंतर स्वतंत्र हिंदुस्थानचे पंतप्रधान नेहरूंनी तर कमालच केली. संस्कृतचे जाणकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला होता की, संपूर्ण भारताला एक सूत्र ठेवण्यासाठी संस्कृत हीच राष्ट्रभाषा असावी. परंतु संस्कृतचा गंधही नसलेल्या ब्रिटिशनिष्ठ नेहरूनी संस्कृत भाषेला मृत ठरवून बहिष्कृत केले.                        
©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७


                                   ५. इंग्रजांचे आक्रमण 


बहुजन समाजाला ब्राह्मणांविषयी खोटा इतिहास शिकवून भ्रमित केले जात आहे. इंग्रज व्यापार करण्यासाठी भारतात आले होते, त्या वेळी आम्ही भारतीय एकमेकांशी भांडत होतो, लढत होतो. देश जातीपाती आणि धर्माच्या  नावाखाली विभागलेला होता; आणि याच्या उलट इंग्रज पराक्रमी, संघटित, विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक शस्त्रांनी सुसज्जित होते; त्यामुळे त्यांनी आमचा पराभव करून आम्हाला गुलाम बनविले, इत्यादी खोटा इतिहास इंग्रजांनी भारतीयांना शिकविला आणि त्यांचीच री भारतीय सत्ताधाऱ्यांनी ओढली. 
       खरा इतिहास मात्र हा आहे की, इंग्रज भारतात आले ते राज्य करण्यासाठी; परंतु रावणाप्रमाणे वेशांतर करून, व्यापारी बनून. त्यांचा कावा केवळ छत्रपती श्री शिवरायांनी ओळखला होता आणि त्यांना त्यांच्या स्थानी जखडून ठेवले होते. छत्रपती शिवरायांमुळेच आम्ही इस्लामी आक्रमणापासून मुक्त होत होतो. बहादूरशाह जाफर, टिपू सुलतान, बंगाल आणि अवध येथील नवाब तेवढेच वाचले होते. अटक ते कटक आणि दिल्ली ते कावेरीपर्यंत मराठा साम्राज्य पसरले होते. दिल्लीवर नामधारी बादशहा मराठ्यांच्या आश्रयाने जगत होता. लाल किल्ल्यावर मोगली झेंड्यासमवेत भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकत होता. शेकडो वर्षांपासून इस्लामी आक्रमणाखाली भरडला जणारा हिंदू समाज या इस्लामी  आक्रमणाचा प्रतिकार करण्यात गुंतून पडला होता. त्याला संघटित आणि व्यवस्थित होण्यासाठी काही कालावधी मिळत असतानाच इंग्रज, पोर्तुगीज इत्यादी गोऱ्यांची आक्रमणे यशस्वी होऊ लागली आणि त्यांच्या धूर्त आणि आसुरी संस्कृती (विकृती)चे आमच्यावर आक्रमण झाले. त्यांच्या वेगळ्या युरोपीय संस्कृतीचे मायाजाल आम्ही जाणू शकलो नाही. हिंदू वचनाचे पक्के आणि इंग्रजादी गोरे संधी मिळताच वचनभंग करून विश्वासघात करणारे. हिंदू शरणार्थींना आश्रय प्रदान करणारे आणि गोरे शरणार्थी म्हणून आले आणि आश्रय देणाऱ्यांचीच हत्या करणारे. हिंदू प्रामाणिक व्यापारी तर इंग्रज व्यापाऱ्यांच्या रूपातील ठग आणि लुटारू. हिंदू युद्धात पडलेल्या शत्रूंचाही सन्मान करणारे तर इंग्रज शत्रूंच्या मस्तकांना कापून फ़ुटबॉल प्रमाणे लाथाडणारे! हिंदू वनातील हिंस्त्र पशूंची मृगया करणारे, तर इंग्रज मनोरंजनासाठी निःशस्त्र गुलामांची शिकार करणारे. हिंदू मानवतेच्या सद्गुणांची पराकाष्ठा प्रदर्शित करणारे आणि गोरे चमडी असलेले लोक क्रूर असुर; इतका भयंकर पतित समाज हिंदूंच्या कल्पनेपलीकडचा होता. 
      सुलतानी आणि इंग्लिशस्तानी आक्रमणांपूर्वी भारतातील राजे एकमेकांवर आक्रमण करीत, कशासाठी? केवळ आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी किंवा सम्राट बनण्यासाठी. अनेक वेळा विजयी राजा पराजित झालेल्या राजाला परत सिंहासनावर बसवून त्याच्याकडून कर (खंडणी) घेत असे आणि आपल्या राज्याच्या विस्तारासाठी आपल्या मंडलिक राजाकडून साहाय्य घेत असे. परंतु कधीही अनावश्यक लूटमार किंवा कत्तल करीत नसे. 
     वाळवंटातून आलेल्या मुस्लिम आक्रमकांच्या दृष्टीने भारत स्वर्ग होता. ते येथे बस्तान ठोकण्यासाठी येत आणि ते शक्य झाले नाही तर लूटमार, बलात्कार, स्त्रियांचे अपहरण, मंदिर विध्वंस इत्यादी क्रौर्य करून आपल्या देशास पळून जात. त्यांचे अत्याचार बाटवाबावीपर्यंत होत. हिंदू लोक 
मुस्लिम बनल्यावर अनेक भारतीय परंपरा आणि उद्योग व्यवसाय यांच्याशी जोडलेले असत. परंतु इंग्रजांचे असे नव्हते. ते या सुवर्णभूमीत स्थायिक होण्यासाठी आले नव्हते. त्यांचा एकमेव उद्देश होता या स्वर्गीय भूमीतील समस्त ऐश्वर्य अनंत काळासाठी लुटणे. मुस्लिम आक्रमकांच्या विरुद्ध ब्राह्मण आणि क्षत्रियांनी सशस्त्र संघर्ष केला, त्यामुळे मुसलमानांनी ब्राह्मण आणि क्षत्रियांवर सर्वात जास्त अत्याचार केले, परंतु मुसलमानां-पेक्षा  इंग्रज कितीतरी धूर्त आणि लुच्चे होते. त्यांनी या दोन वर्णांपेक्षा वैश्य आणि शुद्रांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. कारण ब्राह्मण तथा क्षत्रिय पैसा कमवीत नसत. वैश्य आणि शुद्र धन कमवीत आणि राजाला कर देत. राजा त्या करातील काही अंश ब्राह्मणांना दान करीत असे. 
      वैश्य व्यापार, गोपालन आणि शेती करीत. ते सहा प्रकारची पिके घेत आणि अन्नधान्यामुळे सुसंपन्न असत. राजा कर रूपाने सहावा भाग घेत असे, परंतु इंग्रजांनी ऊस आणि नीळ यांची मोट्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी अत्याचार केले आणि समृद्ध भारतीय शेती नष्टभ्रष्ट केली. शेतकऱ्यांवर कर लादून रोख रक्कम वसूल करणे चालू केले. इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर गोहत्या घडवून विविध कारस्थानांद्वारे गोपालक वैश्यांना नष्ट केले. सर्व प्रकारचे श्रमजीवी उद्योग शुद्रांच्या हातात होते. भारतातील वस्त्रोद्योग, लोह उद्योग, चर्मोद्योग, सुवर्ण उद्योग, अन्य धातूंचे उद्योग, लाकूड उद्योग संपूर्ण विश्वात प्रसिद्ध होते. भारत सर्वात मोठा निर्यातदार होता. भारतीय संस्कृती कृषिप्रधान होती आणि अर्थव्यवस्था उद्योगप्रधान होती. भारतातील सर्व उद्योगपती शुद्र होते. इंग्रजांनी शुद्रांवर अमानवीय अत्याचार करून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडून टाकला. 
बिहार-बंगाल येथील उत्तम वस्त्रोद्योगत सहा लक्षपेक्षा अधिक कुटुंबे होती. त्या काळी एका कुटुंबात ५० ते ६० सदस्य होते. त्यांची बोटे छाटून इंग्रजांनी तलम वस्त्रोद्योग नष्ट केला. मध्य प्रदेशातील पोलादी उद्योग नष्ट करण्यासाठी इंग्रज तेथील लोकांना चाबकाने फोडून काढत आणि सर्वांसमक्ष फासावर लटकवीत. दक्षिण भारतातील सर्वांगसुंदर मंदिरे निर्माण करण्याचे कार्य पेरियार करीत. त्यांनाही मंदिर बनविण्यापासून रोखण्यात आले. शल्यचिकित्सा करण्यात कुशल असलेल्या नाभिकांना केवळ केस कापण्यासाठी कार्य करण्यास भाग पाडून धंदेबाज डॉक्टरांचा वर्ग उभा केला. 
      भारतील अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे संपूर्ण सामाजिक व्यवस्था कोसळून समाज नष्टभ्रष्ट झाला. कुटील कारस्थानी इंग्रजांनी खोटीनाटी, कपटकारस्थाने रचून, नवनवीन चाली खेळून समाजात एकमेकांविरुद्ध ईर्षा, संशय आणि भ्रम निर्माण करून समाजाला नष्ट केले. 
      इंग्रज ज्याप्रमाणे काळ्या लोकांना अस्पृश्य मानत होते, त्याप्रमाणे भारतात कोण्या जातीला अस्पृश्य मानण्याची प्रथा नव्हती. भारतात अपराधी मनुष्याला दंडित करण्यासाठी समाजातून बहिष्कृत केले जात असे. जोपर्यँत तो आपला दंड भोगत नाही, तोपर्यंत तो अस्पृश्य राहत असे. 
     विशेष पूजा-अनुष्ठानांच्या वेळी सोवळ्याचे पालन पवित्रतेच्या दृष्टीने होत असे, ते सध्याच्या वैज्ञानिकांच्या hygiene (स्वच्छता) पेक्षा अधिक शास्त्रीय होते. 
      ज्या इंग्रजांना 'उष्टे' हा शब्दच माहीत नव्हता, शौचानंतर डावा हात स्वच्छ धुतला पाहिजे हे ज्ञान नव्हते, महिनोंमहिने स्नान करणे माहीत नव्हते, वस्त्र बदलणे माहित नव्हते, त्यांना भोजनातील उष्टे-खरकटे यांचे पालन करण्यात काय विज्ञान आहे हे कसे काय कळणार? त्यांनी पद्धतशीरपणे शुद्र जातींना अस्पृश्य बनविले आणि सर्व दोषरोपण ब्राह्मणांवर केले. 
      इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील प्रत्येक मनुष्य शिक्षित होता. ज्या गावची लोकसंख्या चारशे आहे तेथे एक पाठशाळा होती. अशा पाठशाळांतून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षक शुद्र होते. मुलींना घरातूनच शिक्षण घेण्याची व्यवस्था होती.  अशा सुंदर भारताला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी सर्वप्रथम येथील गुरुकूल शिक्षण पद्धत नष्ट केली. पंधरा वर्षे काहीही करू दिले नाही आणि त्यानंतर आपले मॅकॅलोप्रणीत इंग्रजी शिक्षण चालू केले. आपल्या शासन व्यवस्थेसाठी कारकुनांची आवश्यकता असल्यामुळे इंग्रजांनी मोठ्या नगरातून ABCD शिकवणाऱ्या शाळा काढून तेथील ब्राह्मणांना शिकवून थोडा पैसा देऊन त्यांना इतरेजनांपासून तुम्ही वेगळी आहात असे शिकवून समाजात भेद पाडला.             

©  लेखन  सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव 
संपर्क : ९२४२१ ७६५८७