सोमवार, ३ एप्रिल, २०१७

             रामराज्य - गांधींचे  अन् अण्णांचे! 


      ब्रिटिश राजवटीत भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जागृती करण्यासाठी मोहनदास करमचंद गांधी भारतभर भ्रमण करीत होते. ब्रिटिशांच्या अधीन असलेल्या संस्थानांमधून भ्रमण करीत असतात ते एके दिनी कोकणातील सावंतवाडी या संस्थानात आले. त्याकाळी आणि आजही सावंतवाडी नगरी हिरव्यागार झाडी झुडपांनी आणि विशाल वृक्षांनी  व्यापलेली आहे. नारळ, सुपारी, अंबा, काजू, कोकम, फणस, सगवान  वा अन्य किती तरी वृक्षांनी  आणि  डोंगरांनी सावंतवाडी बहरलेले आहे. वनसंपदेने  समृद्ध आहे. नाशिक पासून ते कोल्हापूर पर्यँत महामार्गावरून जाताना दिसणारे बोडके डोंगर कोकणात नाहीत. 
        तीनशे वर्षांपूर्वी मोती सरोवराकाठी खेम-सावंतांनी बांधलेले श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आज सरोवरापासून दूर वाटते. कारण  पूर्वीच्या खेम सावंत राजांनी सरोवरात भर घालून सरोवर लहान केले आणि प्रजेच्या कल्याणार्थ नवीन भूमी उपलब्ध करून दिली होती. असो. 
        तर या ब्रिटिश संस्थानात १९२० च्या सुमारास कधीतरी गांधी जनजागृती कारण्यासीठी आले. आडपंचा लावून गांधी भ्रमण करीत.  त्याकाळी कोकणात सर्वच लोक आडपंचा लावत. त्यामुळे तेथे गांधींच्या 
आडपंचाचे आकर्षण कोणालाच नव्हने. त्याकाळी गांधींच्या निवासस्थानाची आणि न्याहारीची व्यवस्था मेख-सावंतांच्या राजवाडचात केलेली होती. गांधी सकाळी उठल्यावर त्यांना स्नानासाठी उनपाणी देणे आणि न्याहरी देणे इत्यादी सेवा एक सेवक करीत होता. कोकणातील साधीच वेशभूषा त्या सेवकाने केली होती. कोकणी अर्धी चड्डी, वर बंडी आणि खांद्यावर एक पंचा असा त्या सेवकाचा वेश होता. गांधी सेवकाकडून स्मित  हास्य करीत सेवा स्वीकार करित आणि मग दिवसभर संस्थानातील ग्रामीण भागात फेरफटका मारण्यास जात. अनेकांच्या गाठीभेटी, चर्चा, संवाद वा प्रचारात गांधींचा  संपूर्ण दिवस जात असे. 
      गांधींनी आधी बघितलेला ब्रिटिश भारत आणि सावंतवाडी संस्थानातील भारत यात पुष्कळच अंतर होते. बहुतेक करून संपूर्ण भारत ब्रिटिशांमुळे कंगाल झाला होता. लोकांना खावयास दोन घास अन्न नाही की, ल्यावयास वस्त्र नाही. परंतु सावंतवाडी संस्थातील लोक जरी गरीब असले तरी कष्टाळू आणि समाधानी होते. अंगभर चार माणसांना पुरतील इतकी वस्त्रे एकटाच माणूस घालतो आहे अशी युरोपियन प्रथा तेथे नव्हती. लोक साधीच पण नीटनेटकी वस्त्रे परिधान करीत. गांधींना हे विशेष वाटले. 
             येथील कोकणी समाज हा आपल्यापेक्षा अधिकच पापभीरू आणि देवभक्त आहे. यांना आपल्यापेक्षा अधिकच पुराण-शास्त्रे कळतात. आपण ज्या 'साधी रहाणी आणि उच्च विचार सरणी' याचा सर्वत्र प्रचार करीत आहोत, तो तर येथील लोकांमध्ये निसर्गतः आहेच. प्रामाणिकपणा, सचोटी, सत्यनिष्ठा कोकणवासियात पूर्वीपासूनच आहे. ज्या रामराज्यासाठी मी सर्वत्र प्रचार करतो आहे ते तर येथेच अनुभवण्यास मिळत आहे. येथील राजा पुत्रवत प्रजेची काळजी घेत आहे. येथे गांधीविचार थोपण्याची आवश्यकताच नाही. माझ्या कल्पनेतील रामराज्य या सावंतवाडीतच आहे. 
            गांधींची   एकवीस दिवसांची सावंतवाडी यात्रा संपून परतीचा दिवस उजाडला. निरोपाची वेळ निकट आली, सकाळी न्याहरी आणून देणाऱ्या  सेवकाला गांधी म्हणाले, "मी येथे ज्याच्या या राजवाडचात निवास केला त्या राजाला मला भेटायचे आहे." 
       गेले एकवीस दिवस चड्डी-बंडी परिधान केलेला तो सेवक हात जोडून विन्रमतेने म्हणाला, "तो राजा मीच आहे."
       हे ऐकताच गांधी एक माड उंच उडाले. आश्चर्यचकीत होऊन आवासून त्या सेवकाकडे बघतच राहिले. काय बोलावे हे त्यांना सुचेनाच!
      होय! तो साधारण वस्त्रातील विनम्र सेवक म्हणजेच सावंतवाडी संस्थानाचे राजा, पंचम खेमराज उपाख्य श्रीमंत बापूसाहेब महाराज होत!
      लोक गांधींना बापू म्हणत आणि या बापूंनी आपल्या समक्ष आणखी एक बापू हात जोडून विनम्रतेने उभा असलेला  पहिला. गांधी भारतभर ढोल पिटत होते 'साधी राहणी आणि उच्च विचार सरणी', 'रामराज्य' इत्यादी! पण हे सावंतवाडीत पूर्वीपासूनच होते. ते पाहून गांधी थक्क झाले होते. 
         श्रीमंत बापूसाहेबांनी गांधींना सर्व राजवाडा आणि श्री पाटेश्वर महादेवाचे मंदिर स्वतः फिरवून दाखविले. हे सर्व पाहून निःशब्द गांधीनी  सावंतवाडीतील राजा आणि त्याच्या रामराज्याचा निरोप घेतला. 
      पुढे भारताला स्वातंत्र्य  मिळाले, गांधी हत्येचा परिपूर्ण लाभ उठत गांधींच्या काँग्रेसने साठ वर्ष भारतावर रावणीराज्य स्थापून प्रंचड भ्रष्ठाचार केला आणि  गांधींच्या मनातील रामराज्य  अस्तित्त्वात येवू दिले नाही. समस्त भारतीयांची चाललेली कुतरओढ पाहून आणखीन एका गांधींचा उदय झाला. भ्रष्ठाचार मुक्त भारतासाठी अण्णा हजारेंच्या रूपाने नवीन गांधी प्रकटले. समस्त मीडियाने मोठा गाजावाजा करून या नूतन अण्णा गांधींची वावटळ सर्वत्र उडवून दिली होती. 
         नुकताच त्यांच्या जीवनावर एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि डब्यात गेलाही. त्यावेळा अण्णागांधी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबईत आले होते. गांधींचा प्रतिवारसा  सांगणाऱ्या  या अण्णांची आणि त्यांच्या सेवक सेविकेची उत्तम व्यवस्था जुहू येथील हरे कृष्ण मंदिरात केली होती. प्रत्येकासाठी तीन स्वतंत्र वातानुकूलीत कक्ष आणि महाप्रसाद यांची सेवा करण्यासाठी एक ब्रह्माचारीही मंदिराने नियुक्त केला होता. तेथील आदरतिथ्याने अण्णा भारावून गेले. 
     मंदिरातील काकड(मंगल) आरती आणि दर्शन आरतीमध्ये  भाग घेण्याची इचछा अण्णांनी प्रकट केली. ज्यांच्या कृपाछत्राखाली आपण विश्रांतीसुखाचा अनुभव घेतो त्या श्री श्री सीताराम, श्री श्री राधाकृष्ण, श्री चैतन्य महाप्रभु आणि आचार्य श्रील प्रभुपाद यांचे दर्शन घेणे, त्यांना धन्यवाद देणे आवश्यक आहे. हे गांधी विचार आणि कृतीला धरूनच होते. 
    छान स्वादिष्ट कृष्णप्रसाद ग्रहण करून अण्णा निद्राधीन झाले. विश्रांतीसुखाचा असा काही अनुभव घेतला की, अण्णा आदल्या रात्रीची योजना विसरून गेले. ते मंगल आरतीला उठले नाहीत की दर्शन आरतीला! देवाचीये द्वारी उभा क्षण भरी' हा विचारही त्यांना शिवला नाही. 
    उशीरा उठून अण्णांनी सरळ चित्रपटसृष्टीतील धेंडांचे दर्शन घेतले, दिवस घालवाल आणि आपले गाव गाठले. 
       सांगण्याचे तात्पर्य म्हणजे बोलणारे  गांधीवादी रामराज्य कधीच आणू शकत नाहीत. परंतु न बोलता 'नमो' मात्र सर्वत्र देवदर्शन घेत 'मुमें गांधी आणि बगल में शिवराय' ठेवून रामराज्याकडे जात आहेत. 
आम्ही या लेखात गांधीना 'महात्मा' शब्द का चिकटवला नाही याचे काहींना आश्चर्य वाटेल. मी गोडसे आहे असा तर्क व्यर्थ आहे. कारण गांधी महात्मा नव्हते, नव्हते म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी 'महात्मा' या शब्दाची व्याख्या भगवद्गीतेत (९. १३/१४) केलेली आहे -- 
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रितः।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा  भूतादिमव्ययम् ।।
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च द्दढव्रताः।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपसते ।।
'हे  पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण, ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी, पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून जाणतात. 
हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझे उपासना करतात.' 
      हि व्याख्या राजकारणी वा समाजसुधारकांना लागू पडत नाही म्हणून आम्ही त्याचा उपयोग गांधी वा अन्य कोणासाठीही करीत नाही, क्षमस्व! 
    लेखन सेवा - विनय शंकर गोडसे 
      ९२४२१७६५८७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा