पितृ पक्ष
प्रत्येक वर्षी भाद्रपद मासात जो कृष्णपक्ष येतो त्या पंधरा दिवसात पौर्णिमेनंतर प्रतिपदा ते आमावस्येपर्यंत पितरांसाठी विशेष विधी संपन्न केला जातो. या सकाम कर्माच्या विधीला 'श्राद्ध' असे म्हणतात. श्रील गोपाल भट्ट गोस्वामी म्हणतात, "श्रद्धाद्वारे केले जाणारे कर्म म्हणजे 'श्राद्ध' होय."
वर्षातील हे पंधरा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी राखून ठेवलेले असतात. या दिवसांमध्ये पूर्वजांना जळ आणि अन्न अर्पण केले जाते. आपले माता-पिता ज्या महिन्यात ज्या तिथीला निधन पावले त्या तिथीला त्यांच्या स्मरणार्थ पिंडदान केले जाते. या कर्मकांडीय विधीत केवळ तीनच पिंढ्यांना श्राद्ध कर्म अर्पण केले जाते. पिता ज्या महिन्यात ज्या तिथीला निधन पावले होते त्या तिथीला पिता, पितामह आणि प्रपितामह अर्थात - वडील, आजोबा आणि पणजोबा यांना जळ आणि अन्न अर्पण केले जाते. तसेच माता ज्या तिथीला गेली आहे त्या तिथीला आई, तिची सासू आणि सासूची सासू यांनाही श्राद्ध अर्पण केले जाते. परंतु, केवळ तीनच पिढ्यांना श्राद्ध अर्पण केले जाते. मग बाकीचे नातेवाईक वा आप्तेष्ट यांचे काय? तर या सर्व ज्ञात-अज्ञात पूर्वजांसाठी या पंधरवड्यात श्राद्ध कर्म केले जाते. वडीलांची ज्या दिवशी तिथी असते ती या पंधरवाड्यात जेव्हा येते तेव्हा आई-वडील, काका-काकू आजोबा-पणजोबा, आजी-पणजी, मामा-मावशी, सख्खे आणि चुलत बंधू, पुत्र, कन्या, पुतणे आणि कुलगुरु वा कुलपुरोहित तसे गुरुजनांना सर्वांनाच जळ आणि अन्न अर्पण केले जाते.
वर्षातून एकदाच येणाऱ्या तिथीला आपण आपल्या पितरांना भोजन अर्पण करतो. मग कोणी विचारेल की, आम्ही तिन्ही वेळा भोजन करतो आणि तेही प्रत्येक दिवशी! मग पितरांना वर्षातून एकदाच का? कारण, पृथ्वीवरील कालगणना आणि पितृलोकातील कालगणना भिन्न आहे. पृथ्वीवरील एक वर्ष पितृलोकातील एक दिवसाएवढे आहे. अर्थात, आपण दरवर्षी अर्पण केलेले अन्न पितरांना प्रात्प होते.
अर्जुनाची शंका
भगवद्गीतेत (१.४१) अर्जुन शंका उपस्थित करतो -
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ।।
" अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कूळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलार्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते."
अर्जुनाची शंका रास्त आहे. कलह आणि दांभिकतेच्या या युगात वर्णसंकारांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकाना आपल्या माता-पित्यांची मृत्युतिथी ठाऊक नाही. त्यांनी पितरांसाठी श्राद्ध-कर्म केव्हा करावे? अशा पितरांच्या अज्ञात तिथीसाठी पक्षाच्या पंधराव्या दिवशी (अमावास्येला) श्राद्ध कर्म करावे. ही तिथी समस्त पितरांसाठी निर्धारित आहे, म्हणून या तिथीला सर्वपित्री आमावस्या म्हणतात.
वरील श्लोकाच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात - "सकाम कर्मांच्या विधीविधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जळ आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पणक्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसादरूपाने खाल्ल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या पापकर्मांतून मुक्त होतो. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगीत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काहीजण स्थूल भौतिक शरीराची देखील प्राप्त करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्ये भूतपिशाच्च म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्च योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना साहाय्य करणे, ही वंशपरंपरा असते. भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे, त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि सहस्रो पूर्वजांची सर्व प्राकाराच्या कष्टांतून मुक्तता करू शकतो."
अर्थात, ज्याला कोणत्याही सकाम कर्मांच्या विधीमध्ये गुंतायचे नाही आणि स्वतःचा तसेच पूर्वजांचाही उद्धार करायचा आहे, त्याने शतप्रतिशत श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रह्लादांचे उदाहरण
श्री नृसिंह देवांनी हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर आपला भक्त प्रह्लाद यास वरदान मागण्यास सांगितले. परंतु, प्रह्लाद महाराज स्वतःकरिता काहीच मागण्यास इच्छूक नव्हते. नृसिंह देवांनी पुन्हा आग्रह केल्यावर प्रह्लाद म्हणाले, "हे भगवन! आपण पतितपावन असल्यामुळे मला एक वर द्यावा. माझ्या पित्याच्या मृत्यूसमयी तुम्ही त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकल्याने, तो खचितच शुद्ध झालेला आहे; परंतु, तुमचे अनुपम सामर्थ्य आणि परम सत्तेविषयी तो अज्ञानी असल्यामुळे त्यांनी अनावश्यकच आपणावर क्रोध प्रकट केला. तसेच, आपणच हिरण्याक्षाला मारले आहे, असा चुकीचा विचार त्यांनी केला. त्यांनी अखिल जीवांचे आध्यात्मिक गुरु असणाऱ्या, आपली घोर निंदा केली. आपला भक्त असणाऱ्या मला मारण्यासाठी उग्र पापकर्में केली. कृपया त्यांना या सर्व पापांपासून तुम्ही मुक्त करावे, अशी माझी तुम्हांस विनंती आहे."
यावर श्री नृसिंहदेव उत्तरले, "हे परम पवित्र प्रह्लाद! हे साधुपुरुष! तुझे पिता आपल्या एकवीस पूर्वजांसह पवित्र झालेले आहेत. तुझा जन्म या कुळामध्ये झालेला असल्याने हे संपूर्ण कूळ पवित्र झालेले आहे.
या श्लोकाच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात, "मनुष्य चार किंवा पाच पिढ्यांपर्यंत आपल्या कुळाची गणना करू शकतो; परंतु, भगवंतांनी येथे एकवीस पिढ्यांचा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांनी दिलेला वर इतर भक्तांच्याही कुळाला लागू पडतो. भक्ताने वर्तमान कुळापूर्वी अन्य कुळांमध्येही जन्म घेतलेला असतो. त्यामुळे वैष्णवाचा एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा जन्म होतो, तेव्हा भगवत्कृपेने तो केवळ त्याच कुळाचा नव्हे तर पूर्व जन्मांतील अन्य कुळांचाही उद्धार करतो."
मनुष्य श्राद्ध कर्मात केवळ याच कुळातील तीन पिढ्यांना जल अर्पण करू शकतो; परंतु, जर त्याने मुक्तिदात्या भगवान श्री मुकुंदांच्या चरणकमळांचा नित्य आश्रय घेऊन त्यांची प्रेममयी भक्ती केली तर तो एकवीस पिढ्यांचा उद्धार कोणतेही श्राद्ध कर्म न करताच करू शकतो.
तसेच श्री नृसिंहदेव प्रह्लाद महाराजांना सांगतात, "हे प्रह्लाद! तुझा पिता मृत्युसमयी माझ्या दिव्य देहाच्या केवळ स्पर्शानेच शुद्ध झालेला आहे. तरीही पित्याच्या मृत्यूनंतर और्ध्वदेहिक कर्मे करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे, कारण अशा कर्मांमुळे पिता उच्चतर ग्रहांवर उन्नत होऊन तेथे उत्तम नागरिक अथवा भक्त होऊ शकतो."
या संदर्भात श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्पष्ट करतात की, हिरण्यकशिपू मृत्युसमयी जरी शुद्ध झाला होता, तरी त्याला उच्चतर ग्रहांवर पुन्हा भक्ताचा जन्म घ्यावा लागला. भगवंतांनी प्रह्लाद महाराजांना शास्त्रमर्यादा रक्षणार्थ पित्याची और्ध्वदेहिक कार्ये करण्यास सांगितले, कारण ते कोणत्याही परिस्थितीत नियामक तत्त्वांचे उल्लघंन करीत नाहीत. प्रभू रामचंद्रांनी पुष्करला आपले पिता, दशरथ महाराजांचे श्राद्ध संपन्न केले होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील गयेला आपले पिता, जगन्नाथ मिश्रांचे श्राद्ध केले होते.
श्रील प्रभुपाद तात्पर्यात लिहितात, "भगवंतांनी प्रह्लाद महाराजांना वेदोक्त संस्कार नियमांचे पालन करण्यास सांगितले. याचे कारण असे की, प्रह्लाद महाराज पित्याच्या मृत्यूमुळे सम्राट होणार होते आणि इतर लोक त्यांचे उदाहरण अनुसरणार होते. पुढे नृसिंह देवांनी त्यांना राज्यकर्तव्यांचे योग्य रीतीने पालन करण्यास सांगितले, कारण त्यांचे कर्तव्य पालन पाहून सर्वसामान्य लोक भगवद्भक्त होणार होते. भक्ताने ऐहिक कार्यांवर आसक्त असू नये; त्याने ही कार्ये अशा पद्धतीने केली पाहिजेत की त्यामुळे सामान्य लोकांना वेदांपासून दूर न जाण्याची शिकवण मिळाली पाहिजे."
भागवतातील सप्तम स्कंधातील चौदाव्या अध्यायात नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना आदर्श कौटुंबिक जीवनाविषयी संबोधित करताना सांगतात, "धनवान ब्राह्मणाने भाद्रपद मासातील कृष्णपक्षाच्या काळात पितरांचे श्राद्ध करावे. त्याचप्रमाणे त्याने अश्विन मासामधील महालयाच्या काळात पितरांच्या नातेवाईकांचे श्राद्ध करावे."
ये कुर्वन्ति महिपाल श्राद्धं चैकादशीदिने ।
त्रयस्ते नरकं यान्ति दाता भोक्ता च प्रेरकः ।।
"मनुष्याने जर एकादशीस पितरांचे श्राद्ध केले, तर श्राद्ध करणारा दाता, ज्या पितरांसाठी श्राद्ध केले जाते ते पितर आणि अशा श्राद्धास प्रेरणा देणारा प्रेरक पुरोहित, हे तिघेही नरकात जातात."
किती खर्च करावा?
श्रील प्रभुपाद म्हणतात की, भारतात लोक आपल्या जीवनात तीन वेळा मोठ्या प्रमाणावर खर्च करतात - १) पुत्र प्राप्तीनंतर, २) कन्येच्या विवाहाप्रसंगी आणि ३) माता-पित्याच्या श्राद्ध समयी. श्राद्धासाठी अनावश्यक खर्च टाळावा. दोन किंवा तीन ब्राह्मणांना श्राद्ध दिनी भोजनाचे आमंत्रण द्यावे.
सांप्रत कलियुगाच्या प्रभामुळे उत्तम ब्राह्मण मिळणे दुष्कर आहे. अशा वेळी भगवद्भक्तांना भोजन, दक्षिणा आणि वस्त्र दान करावे. त्यातही जे भक्त निर्धन आहेत किंवा ज्यांना धनाची नितांत आवश्यकता आहे, अशा भक्तांना दान द्यावे. हे सर्व करण्यास शक्य नसल्यास श्राद्ध तिथीस भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात अन्न-धान्य, फळे, वस्त्र आणि दक्षिणा अर्पण करावी.
श्राद्ध पात्र कोणास द्यावे?
ज्या गृहस्थांना श्राद्ध तिथीस आपल्या घरी भोजन अर्पण करणे शक्य आहे, त्यांनी दोन किंवा तीन वैष्णवांना घरी आमंत्रित करावे. त्या वैष्णवांच्या मुखातून हरिकथा आणि हरिनाम श्रवण करून त्यांना भोजन अर्पण करावे. हे कार्य करताना आमंत्रित केलेला भक्त जन्माने ब्राह्मण नसला तरी काळजी करू नये. श्रील अद्वैत आचार्यांनी नामाचार्य हरिदास ठाकुरांना श्राद्ध पात्राचे मुख्य स्थान दिले होते. श्रील हरिदास ठाकूर जन्माने यवन परिवारातील होते, तरीही त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यावेळी स्मार्त ब्राह्मणांनी अद्वैत आचार्यांची निंदा केली होती. शरणागत भक्तांसाठी श्राद्धकर्म अनावश्यक
श्रील प्रभुपाद आपल्या वाणीने, लेखणीने आणि कृतीने सर्वांना शुद्ध कृष्ण-भक्त होण्यासाठी प्रेरित करतात. ते म्हणतात, "एका समर्पित कृष्णभक्तसाठी सर्व प्रकारची कर्मकांडे करण्याची आवश्यकता नसते." यासाठी ते भागवतातील (११.५.४१) श्लोक उद्धृत करतात,
देवर्षि भूताप्तनृणां पितृणां
न किडकरो नायनृणां च राजन ।
सर्वात्मना यः शरणं शरण्यं
गतो मुकुन्दं परिह्यत्य कर्तम् ।।
"ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्रीमुकुंदांच्या
चरणकमळांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभिर्याने भक्तिमार्गाचा अंगिकार केला आहे, त्याची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋण फेडणे बंधनकारक नसते."
अर्थात, यासाठी श्रीकृष्णांचा पूर्णपणे शरणागत भक्त होणे परम आवश्यक आहे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
अर्जुनाची शंका
भगवद्गीतेत (१.४१) अर्जुन शंका उपस्थित करतो -
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ।।
" अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कूळ तसेच कुळपरंपरा नष्ट करणाऱ्यांसाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जलार्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते."
अर्जुनाची शंका रास्त आहे. कलह आणि दांभिकतेच्या या युगात वर्णसंकारांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकाना आपल्या माता-पित्यांची मृत्युतिथी ठाऊक नाही. त्यांनी पितरांसाठी श्राद्ध-कर्म केव्हा करावे? अशा पितरांच्या अज्ञात तिथीसाठी पक्षाच्या पंधराव्या दिवशी (अमावास्येला) श्राद्ध कर्म करावे. ही तिथी समस्त पितरांसाठी निर्धारित आहे, म्हणून या तिथीला सर्वपित्री आमावस्या म्हणतात.
वरील श्लोकाच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात - "सकाम कर्मांच्या विधीविधानांनुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जळ आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णुपूजेने ही अर्पणक्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसादरूपाने खाल्ल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या पापकर्मांतून मुक्त होतो. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मांमुळे पूर्वज दुःख भोगीत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काहीजण स्थूल भौतिक शरीराची देखील प्राप्त करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्ये भूतपिशाच्च म्हणून राहणे भाग पडते. म्हणून वंशज जेव्हा प्रसादरूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूतपिशाच्च योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना साहाय्य करणे, ही वंशपरंपरा असते. भक्तिमार्गाचा अवलंब न करणाऱ्यांना या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्तिमार्गाशी संलग्न आहे, त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखादा शेकडो आणि सहस्रो पूर्वजांची सर्व प्राकाराच्या कष्टांतून मुक्तता करू शकतो."
अर्थात, ज्याला कोणत्याही सकाम कर्मांच्या विधीमध्ये गुंतायचे नाही आणि स्वतःचा तसेच पूर्वजांचाही उद्धार करायचा आहे, त्याने शतप्रतिशत श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रह्लादांचे उदाहरण
श्री नृसिंह देवांनी हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर आपला भक्त प्रह्लाद यास वरदान मागण्यास सांगितले. परंतु, प्रह्लाद महाराज स्वतःकरिता काहीच मागण्यास इच्छूक नव्हते. नृसिंह देवांनी पुन्हा आग्रह केल्यावर प्रह्लाद म्हणाले, "हे भगवन! आपण पतितपावन असल्यामुळे मला एक वर द्यावा. माझ्या पित्याच्या मृत्यूसमयी तुम्ही त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकल्याने, तो खचितच शुद्ध झालेला आहे; परंतु, तुमचे अनुपम सामर्थ्य आणि परम सत्तेविषयी तो अज्ञानी असल्यामुळे त्यांनी अनावश्यकच आपणावर क्रोध प्रकट केला. तसेच, आपणच हिरण्याक्षाला मारले आहे, असा चुकीचा विचार त्यांनी केला. त्यांनी अखिल जीवांचे आध्यात्मिक गुरु असणाऱ्या, आपली घोर निंदा केली. आपला भक्त असणाऱ्या मला मारण्यासाठी उग्र पापकर्में केली. कृपया त्यांना या सर्व पापांपासून तुम्ही मुक्त करावे, अशी माझी तुम्हांस विनंती आहे."
यावर श्री नृसिंहदेव उत्तरले, "हे परम पवित्र प्रह्लाद! हे साधुपुरुष! तुझे पिता आपल्या एकवीस पूर्वजांसह पवित्र झालेले आहेत. तुझा जन्म या कुळामध्ये झालेला असल्याने हे संपूर्ण कूळ पवित्र झालेले आहे.
या श्लोकाच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात, "मनुष्य चार किंवा पाच पिढ्यांपर्यंत आपल्या कुळाची गणना करू शकतो; परंतु, भगवंतांनी येथे एकवीस पिढ्यांचा उल्लेख केलेला असल्यामुळे त्यांनी दिलेला वर इतर भक्तांच्याही कुळाला लागू पडतो. भक्ताने वर्तमान कुळापूर्वी अन्य कुळांमध्येही जन्म घेतलेला असतो. त्यामुळे वैष्णवाचा एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा जन्म होतो, तेव्हा भगवत्कृपेने तो केवळ त्याच कुळाचा नव्हे तर पूर्व जन्मांतील अन्य कुळांचाही उद्धार करतो."
मनुष्य श्राद्ध कर्मात केवळ याच कुळातील तीन पिढ्यांना जल अर्पण करू शकतो; परंतु, जर त्याने मुक्तिदात्या भगवान श्री मुकुंदांच्या चरणकमळांचा नित्य आश्रय घेऊन त्यांची प्रेममयी भक्ती केली तर तो एकवीस पिढ्यांचा उद्धार कोणतेही श्राद्ध कर्म न करताच करू शकतो.
तसेच श्री नृसिंहदेव प्रह्लाद महाराजांना सांगतात, "हे प्रह्लाद! तुझा पिता मृत्युसमयी माझ्या दिव्य देहाच्या केवळ स्पर्शानेच शुद्ध झालेला आहे. तरीही पित्याच्या मृत्यूनंतर और्ध्वदेहिक कर्मे करणे हे पुत्राचे कर्तव्य आहे, कारण अशा कर्मांमुळे पिता उच्चतर ग्रहांवर उन्नत होऊन तेथे उत्तम नागरिक अथवा भक्त होऊ शकतो."
या संदर्भात श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्पष्ट करतात की, हिरण्यकशिपू मृत्युसमयी जरी शुद्ध झाला होता, तरी त्याला उच्चतर ग्रहांवर पुन्हा भक्ताचा जन्म घ्यावा लागला. भगवंतांनी प्रह्लाद महाराजांना शास्त्रमर्यादा रक्षणार्थ पित्याची और्ध्वदेहिक कार्ये करण्यास सांगितले, कारण ते कोणत्याही परिस्थितीत नियामक तत्त्वांचे उल्लघंन करीत नाहीत. प्रभू रामचंद्रांनी पुष्करला आपले पिता, दशरथ महाराजांचे श्राद्ध संपन्न केले होते. श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील गयेला आपले पिता, जगन्नाथ मिश्रांचे श्राद्ध केले होते.
श्रील प्रभुपाद तात्पर्यात लिहितात, "भगवंतांनी प्रह्लाद महाराजांना वेदोक्त संस्कार नियमांचे पालन करण्यास सांगितले. याचे कारण असे की, प्रह्लाद महाराज पित्याच्या मृत्यूमुळे सम्राट होणार होते आणि इतर लोक त्यांचे उदाहरण अनुसरणार होते. पुढे नृसिंह देवांनी त्यांना राज्यकर्तव्यांचे योग्य रीतीने पालन करण्यास सांगितले, कारण त्यांचे कर्तव्य पालन पाहून सर्वसामान्य लोक भगवद्भक्त होणार होते. भक्ताने ऐहिक कार्यांवर आसक्त असू नये; त्याने ही कार्ये अशा पद्धतीने केली पाहिजेत की त्यामुळे सामान्य लोकांना वेदांपासून दूर न जाण्याची शिकवण मिळाली पाहिजे."
भागवतातील सप्तम स्कंधातील चौदाव्या अध्यायात नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना आदर्श कौटुंबिक जीवनाविषयी संबोधित करताना सांगतात, "धनवान ब्राह्मणाने भाद्रपद मासातील कृष्णपक्षाच्या काळात पितरांचे श्राद्ध करावे. त्याचप्रमाणे त्याने अश्विन मासामधील महालयाच्या काळात पितरांच्या नातेवाईकांचे श्राद्ध करावे."
एकादशी तिथीस श्राद्ध निषिद्ध
आपले वाड-वडील एकादशी तिथीला गेले असतील, तर श्राद्ध विधी एकादशीस न करता द्वादशीस करावा. श्रील जीव गोस्वामी या संदर्भात विविध शास्त्रांचा उल्लेख करून स्पष्ट करतात. ब्रह्मवैवर्त पुराणात म्हटले आहे -ये कुर्वन्ति महिपाल श्राद्धं चैकादशीदिने ।
त्रयस्ते नरकं यान्ति दाता भोक्ता च प्रेरकः ।।
"मनुष्याने जर एकादशीस पितरांचे श्राद्ध केले, तर श्राद्ध करणारा दाता, ज्या पितरांसाठी श्राद्ध केले जाते ते पितर आणि अशा श्राद्धास प्रेरणा देणारा प्रेरक पुरोहित, हे तिघेही नरकात जातात."
किती खर्च करावा?
श्रील प्रभुपाद म्हणतात की, भारतात लोक आपल्या जीवनात तीन वेळा मोठ्या प्रमाणावर खर्च करतात - १) पुत्र प्राप्तीनंतर, २) कन्येच्या विवाहाप्रसंगी आणि ३) माता-पित्याच्या श्राद्ध समयी. श्राद्धासाठी अनावश्यक खर्च टाळावा. दोन किंवा तीन ब्राह्मणांना श्राद्ध दिनी भोजनाचे आमंत्रण द्यावे.
सांप्रत कलियुगाच्या प्रभामुळे उत्तम ब्राह्मण मिळणे दुष्कर आहे. अशा वेळी भगवद्भक्तांना भोजन, दक्षिणा आणि वस्त्र दान करावे. त्यातही जे भक्त निर्धन आहेत किंवा ज्यांना धनाची नितांत आवश्यकता आहे, अशा भक्तांना दान द्यावे. हे सर्व करण्यास शक्य नसल्यास श्राद्ध तिथीस भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात अन्न-धान्य, फळे, वस्त्र आणि दक्षिणा अर्पण करावी.
श्राद्ध पात्र कोणास द्यावे?
ज्या गृहस्थांना श्राद्ध तिथीस आपल्या घरी भोजन अर्पण करणे शक्य आहे, त्यांनी दोन किंवा तीन वैष्णवांना घरी आमंत्रित करावे. त्या वैष्णवांच्या मुखातून हरिकथा आणि हरिनाम श्रवण करून त्यांना भोजन अर्पण करावे. हे कार्य करताना आमंत्रित केलेला भक्त जन्माने ब्राह्मण नसला तरी काळजी करू नये. श्रील अद्वैत आचार्यांनी नामाचार्य हरिदास ठाकुरांना श्राद्ध पात्राचे मुख्य स्थान दिले होते. श्रील हरिदास ठाकूर जन्माने यवन परिवारातील होते, तरीही त्यांना हा सन्मान देण्यात आला. त्यावेळी स्मार्त ब्राह्मणांनी अद्वैत आचार्यांची निंदा केली होती. शरणागत भक्तांसाठी श्राद्धकर्म अनावश्यक
श्रील प्रभुपाद आपल्या वाणीने, लेखणीने आणि कृतीने सर्वांना शुद्ध कृष्ण-भक्त होण्यासाठी प्रेरित करतात. ते म्हणतात, "एका समर्पित कृष्णभक्तसाठी सर्व प्रकारची कर्मकांडे करण्याची आवश्यकता नसते." यासाठी ते भागवतातील (११.५.४१) श्लोक उद्धृत करतात,
देवर्षि भूताप्तनृणां पितृणां
न किडकरो नायनृणां च राजन ।
सर्वात्मना यः शरणं शरण्यं
गतो मुकुन्दं परिह्यत्य कर्तम् ।।
"ज्याने सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग करून मोक्षदात्या श्रीमुकुंदांच्या
चरणकमळांचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभिर्याने भक्तिमार्गाचा अंगिकार केला आहे, त्याची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यांच्या संबंधी कोणतीही कर्तव्ये किंवा ऋण फेडणे बंधनकारक नसते."
अर्थात, यासाठी श्रीकृष्णांचा पूर्णपणे शरणागत भक्त होणे परम आवश्यक आहे.
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : 92421
76587
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा