ब्राह्मणद्वेष
आदरणीय श्रीमान दिलीपराव अलोणी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्यासंबंधी वृत्तपत्रातील वार्ता वाचून उत्सुकतेपोटी आपल्याशी भ्रमणध्वनीवर केलेले संभाषण आणि मुंबईतील श्री श्री राधाकृष्ण मंदिरातील प्रत्यक्ष भेटीअंती झालेला वार्तालाप यांवरून आम्हाला आपल्या दुःखाची जाणीव झाली. आपण परदुःखेदुःखी आहात हे पाहून आम्हास आपली विशेष काळजी वाटली. आपल्या बोलण्यातून कळून आले की, काही विशिष्ट जात्यंध व्यक्ती बहुजन समाजाला भ्रमित करण्यासाठी ब्राह्मणद्वेष पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विद्वान, देशभक्त, प्रामाणिक, निःस्पृह आणि उत्तम गुणांनी युक्त असलेल्या ब्राह्मणांवर चिखलफेक करण्याचे मोठे कार्य हाती घेतले आहे. विविध वृत्तपत्रे, पुस्तके, पत्रके छापणे, भाषण देणे, दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील चर्चा संत्रातून रेटून खोटे बोलणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अपप्रचार करणे, इत्यादी विविध मार्गांनी ब्राह्मण विरोधी धुळवड उडवली जात आहे. या मुर्खांच्या तीव्र टीकेमुळे किंवा त्यांनी केलेल्या निंदानालस्तीमुळे आपण व्यथित झाला आहात. आपल्याप्रमाणे अनेक सुज्ञ लोकसुद्धा दुःखिकाष्टी झाले असणार यात तिळमात्र शंका नाही. या सर्व गोष्टींचा मनःस्ताप होणे हे आपल्यासारख्या कोमल हृदयी मनुष्यासाठी खरोखर कठीण आहे.
दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी आपण सजग आहात हे पाहून समाधान वाटले. अपप्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण करीत असलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. आपल्या न्यायपूर्ण लढ्यास आमचा मनःपूर्वक पाठींबा आणि शुभेच्छा. आपल्या या कार्याच्या अनुषंगाने मी आपल्याशी काही चर्चा पत्ररूपाने करू इच्छितो आणि यासाठी आपणही उत्सुक असाल अशी आशा व्यक्त करतो.
सर्वप्रथम आपण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये चाललेल्या संघर्षाविषयी काही चर्चा करूया. तसे पाहता ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संघर्ष सत्ययुगापासूनचा आहे. हा संघर्ष काही मोजक्याच व्यक्तींमध्ये होत असे. संपूर्ण समाज यात सहभागी होत नसे. उदाहरणार्थ - सत्ययुगात विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यातील संघर्ष. या संघर्षात विश्वामित्रांनी अनेक विनाशकारी अस्त्रांचा प्रयोग वशिष्ठांवर केला; परंतु वशिष्ठांनी आपल्या ब्रह्मदंडाच्या तेजाने ती सर्व अस्त्रें नष्ट केली. त्यामुळे विश्वामित्रांनी कठोर तपस्येद्वारे ब्रह्मतेज प्राप्त केले. त्यांनी क्षात्रवृत्तीचा त्याग करून ब्रह्मर्षीपद प्राप्त केले.
या संघर्षांनंतर झालेला मोठा संघर्ष म्हणजे परशुरामांचे कार्य; परशुराम हे भगवान श्री विष्णूंचे शक्त्यावेश अवतार आहेत. त्यामुळे त्यांनी आसुरी प्रवृत्ती धारण केलेल्या नास्तिक आणि दुष्ट क्षत्रियांचा संहार केला; परंतु सीता स्वयंवरात शिवधनुष्य भंग केल्यानंतर अयोध्येला परतणाऱ्या श्री रामाना परशुरामांनी विष्णूधनुष्य पेलण्याचे आव्हान दिले. त्यावेळी प्रभू श्री रामांनी त्यांच्याकडील विष्णूधनुष्य हिरावून घेते वेळी त्यांची अद्भुत शक्तीही हिरावून घेतली. त्यानंतर मात्र परशुराम महेंद्र पर्वतावर निवास करून ब्राह्मणाचे शांततामय जीवन कंठू लागले. पुढे त्यांचा एकदा क्षत्रियाशी संघर्ष झाला. अर्थात यावेळी तो क्षत्रिय त्यांचाच प्रिय शिष्य भीष्मदेव होते. भीष्मदेवांनी या संघर्ष युद्धाद्वारे परशुरामांना प्रसन्न केले, मात्र परशुराम भीष्मादेवांचा निर्णायक पराभव करू शकले नाहीत.
सप्रेम नमस्कार.
आपल्यासंबंधी वृत्तपत्रातील वार्ता वाचून उत्सुकतेपोटी आपल्याशी भ्रमणध्वनीवर केलेले संभाषण आणि मुंबईतील श्री श्री राधाकृष्ण मंदिरातील प्रत्यक्ष भेटीअंती झालेला वार्तालाप यांवरून आम्हाला आपल्या दुःखाची जाणीव झाली. आपण परदुःखेदुःखी आहात हे पाहून आम्हास आपली विशेष काळजी वाटली. आपल्या बोलण्यातून कळून आले की, काही विशिष्ट जात्यंध व्यक्ती बहुजन समाजाला भ्रमित करण्यासाठी ब्राह्मणद्वेष पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी विद्वान, देशभक्त, प्रामाणिक, निःस्पृह आणि उत्तम गुणांनी युक्त असलेल्या ब्राह्मणांवर चिखलफेक करण्याचे मोठे कार्य हाती घेतले आहे. विविध वृत्तपत्रे, पुस्तके, पत्रके छापणे, भाषण देणे, दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील चर्चा संत्रातून रेटून खोटे बोलणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अपप्रचार करणे, इत्यादी विविध मार्गांनी ब्राह्मण विरोधी धुळवड उडवली जात आहे. या मुर्खांच्या तीव्र टीकेमुळे किंवा त्यांनी केलेल्या निंदानालस्तीमुळे आपण व्यथित झाला आहात. आपल्याप्रमाणे अनेक सुज्ञ लोकसुद्धा दुःखिकाष्टी झाले असणार यात तिळमात्र शंका नाही. या सर्व गोष्टींचा मनःस्ताप होणे हे आपल्यासारख्या कोमल हृदयी मनुष्यासाठी खरोखर कठीण आहे.
दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी आपण सजग आहात हे पाहून समाधान वाटले. अपप्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण करीत असलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. आपल्या न्यायपूर्ण लढ्यास आमचा मनःपूर्वक पाठींबा आणि शुभेच्छा. आपल्या या कार्याच्या अनुषंगाने मी आपल्याशी काही चर्चा पत्ररूपाने करू इच्छितो आणि यासाठी आपणही उत्सुक असाल अशी आशा व्यक्त करतो.
सर्वप्रथम आपण ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये चाललेल्या संघर्षाविषयी काही चर्चा करूया. तसे पाहता ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संघर्ष सत्ययुगापासूनचा आहे. हा संघर्ष काही मोजक्याच व्यक्तींमध्ये होत असे. संपूर्ण समाज यात सहभागी होत नसे. उदाहरणार्थ - सत्ययुगात विश्वामित्र आणि वसिष्ठ यांच्यातील संघर्ष. या संघर्षात विश्वामित्रांनी अनेक विनाशकारी अस्त्रांचा प्रयोग वशिष्ठांवर केला; परंतु वशिष्ठांनी आपल्या ब्रह्मदंडाच्या तेजाने ती सर्व अस्त्रें नष्ट केली. त्यामुळे विश्वामित्रांनी कठोर तपस्येद्वारे ब्रह्मतेज प्राप्त केले. त्यांनी क्षात्रवृत्तीचा त्याग करून ब्रह्मर्षीपद प्राप्त केले.
या संघर्षांनंतर झालेला मोठा संघर्ष म्हणजे परशुरामांचे कार्य; परशुराम हे भगवान श्री विष्णूंचे शक्त्यावेश अवतार आहेत. त्यामुळे त्यांनी आसुरी प्रवृत्ती धारण केलेल्या नास्तिक आणि दुष्ट क्षत्रियांचा संहार केला; परंतु सीता स्वयंवरात शिवधनुष्य भंग केल्यानंतर अयोध्येला परतणाऱ्या श्री रामाना परशुरामांनी विष्णूधनुष्य पेलण्याचे आव्हान दिले. त्यावेळी प्रभू श्री रामांनी त्यांच्याकडील विष्णूधनुष्य हिरावून घेते वेळी त्यांची अद्भुत शक्तीही हिरावून घेतली. त्यानंतर मात्र परशुराम महेंद्र पर्वतावर निवास करून ब्राह्मणाचे शांततामय जीवन कंठू लागले. पुढे त्यांचा एकदा क्षत्रियाशी संघर्ष झाला. अर्थात यावेळी तो क्षत्रिय त्यांचाच प्रिय शिष्य भीष्मदेव होते. भीष्मदेवांनी या संघर्ष युद्धाद्वारे परशुरामांना प्रसन्न केले, मात्र परशुराम भीष्मादेवांचा निर्णायक पराभव करू शकले नाहीत.
त्रेतायुगात भगवान श्री राम क्षत्रिय कुळात प्रकटले आणि ब्राह्मणपुत्र राक्षसराज रावणाचा विनाश केला. हा सुद्धा एक अद्भुत संघर्ष होता.
त्रेतायुगात आणखी एक संघर्ष झाला होता. या वेळी अंबरीष महाराज आणि दुर्वास मुनी होते. क्षत्रिय अंबरीष महाराज हे भगवान श्री विष्णूंचे महान भक्त होते. त्यांची भगवद्भक्ती इतकी महान होती की त्रैलोक्यात त्यांच्या भक्तीचे गोडवे गायिले जात. त्यामुळे दुर्वास मुनींनी त्यांचा अकारण अपमान केला आणि त्यांना ठार मारण्यासाठी अग्निमय राक्षस निर्माण केला. भगवद्भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेल्या सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचा नास केला आणि त्याचे निर्माता दुर्वासांचा पाठलाग केला. दुर्वास मुनींनी आपल्या रक्षणासाठी स्वर्गात इंद्राकडे, ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांकडे आणि कैलासात शिवांकडे याचना केली; परंतु त्या तिघांनी असमर्थता दर्शवली तेव्हा दुर्वास मुनी वैकुंठात नारायणांकडे गेले. नारायणांनी त्यांना सांगितले की, सुदर्शनाचा ताप केवळ अंबरीष महाराजच शांत करू शकतात. तू त्यांच्या चरणांशी शरणागत होऊन क्षमा माग. तेव्हा दुर्वास मुनी भूतलावर येऊन अंबरीषांच्या चरणांशी लोळण घेतात. शेवटी अंबरीषांच्या प्रार्थनेवरून सुदर्शन चक्र शांत होऊन वैकुंठास परत जाते.
द्वापार युगाच्या अंती कौरव-पांडवांच्या भीषण युद्धात द्रोणाचार्यांचा संघर्ष होतो. द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा यांच्या संघर्षात द्रुपद पराजीत होतो. प्रतिशोध घेण्यासाठी द्रुपद यज्ञाद्वारे धृष्टद्युम्न नामक पुत्राची उत्पत्ती करतो. कशासाठी? तर केवळ द्रोणाचार्यांचा विनाश करण्यासाठी! महाभारताचे युद्ध क्षत्रियांमध्ये असते. या युद्धात ब्राह्मणांनी भाग घ्यायाचा नसतानाही द्रोणाचार्य भाग घेतात. ब्राह्मणांचे कार्य आहे शस्त्र आणि शास्त्र यांचे ज्ञान क्षत्रियांना देणे. त्यांनी युद्ध करायचे नसते. परंतु कौरवांचे धन घेतल्यामुळे द्रोणाचार्यांना युद्धात भाग घ्यावा लागतो. द्रोणाचार्यांच्या या युद्धकृतीमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांना मारण्याचा आदेश देतात आणि धृष्टद्युम्न निःशस्त्र द्रोणाचार्यांचा वध करतो.
या काही मोजक्याच घटनांचे वर्णन अतिशय संक्षिप्त रूपात येथे करण्यात आले आहे. तशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे वर्णन 'संघर्ष' या ग्रंथात विस्ताराने करण्यात येईल.
सत्य, त्रेता आणि द्वापार युगानंतर आले कलियुग! या भयावह कलियुगाचा प्रारंभ ब्राह्मण शापने झाला. या पृथ्वीवरील शेवटचे सम्राट परीक्षित महाराज यांना शृंगी नामक ब्राह्मण पुत्राने शाप दिला की, माझ्या पित्याचा अवमान करणाऱ्या राजाला तक्षक सर्प सातव्या दिवशी दंश करील. शृंगीचे पिता शमीक ऋषींना जेव्हा हे वृत्त कळते, तेव्हा ते आपल्या पुत्राची कठोर शब्दांत निंदा करतात आणि राजाला असा शाप देणे पूर्णपणे चूक आहे असे सांगतात. परिक्षित महाराज हे अर्जुनाचे पौत्र आणि भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त असतात. ब्राह्मणाचा शाप परतविण्याची क्षमता त्यांच्यात असते. तरीही ते तो शाप भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणून स्वीकारतात. ते आपल्या सर्वस्वाचा त्याग करून गंगातटावर बसतात. तेथे ते श्री व्यासपुत्र शुकदेव गोस्वामींकडून सात दिवस आणि सात रात्री भागवत कथा श्रावण करतात आणि तक्षकाने दंश केल्यावर सरळ भगवद्धामास प्रयाण करतात.
भागवत पुराणात (१. १. १०) कलियुगातील जीवांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे -
प्रायेणाल्पायुष: सभ्य कलावस्मिन् युगे जना: ।
मन्दा: सुमन्दमतयॊ मन्दभाग्या ह्योपद्रताः ।।
' हे सभ्य! कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत. ते भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत.'
कलियुगातील सर्वच वर्णाच्या लोकांचे हे वर्णन आहे. दंभ आणि कलह यांनी भरलेल्या या युगात सर्व जण भांडत आहेत. कलियुगाच्या प्रभावामुळे शृंगीचे झालेले पतन हा ब्राह्मणांच्या पतनाचा आरंभ आहे. आळस आणि मंद बुद्धीमुळे शास्त्रांचा चुकीचा अर्थ काढून ब्राह्मणांनी क्षत्रियांना तिरस्कृत केले आणि क्षत्रियांनी वैश्यांना तिरस्कृत केले आणि या तिन्ही वर्णांनी त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या शूद्रांना तिरस्कृत केले. त्यामुळे काय झाले? अन्य त्रियुगातील दैवी वर्णाश्रम धर्म कलियुगात विकृत आसुरी वर्णाश्रम धर्म झाला. लोक स्वतःला नाममात्र जन्मजात विशिष्ठ जातीचे म्हणून संबोधू लागले. या सर्व वर्णांमध्ये निकृष्ठ हीन वृत्तीचे गुण दिसू लागले. खरे पाहता हे वर्ण त्या त्या मनुषांच्या कर्माप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागलेले होते. मूळ रूपाने या चार वर्णांची रचना अशा प्रकारे केली आहे की, समाज भौतिकधृष्टया प्रगती करेल आणि चार आश्रमांची रचना अध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. ही एक अशी पद्धत आहे की ज्यामुळे सभ्य मनुष्य सफलतापूर्वक मानवजीवनाचा हेतू अर्थात आत्मसाक्षात्कार प्राप्त करेल. वर्णाश्रम संस्था अशाकरिता रचलेली होती की तिच्या योगाने मनुष्याला परम सत्याचा अनुभव येऊ शकतो. एका वर्णने दुसऱ्या वर्णावर कृत्रिम वर्चस्व लादावे याकरिता ही समाजरचना मुळीच नाही. खरे पाहता अन्य तिन्ही युगांतील शूद्रांचे आचरणही इतके श्रेष्ठ होते की आज त्या युगातील शूद्र प्रगट झाल्यास कलियुगातील ब्राह्मण त्याच्यापुढे निकृष्ट आणि तिरस्करणीय वाटतील. पूर्वीच्या युगात आताचे गलिच्छ प्रकार मुळीच नव्हते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
कलियुग प्रारंभ झाल्यानंतर साधारणपणे २५०० वर्षांनंतर इतिहासप्रसिद्ध ब्राह्मण-क्षत्रिय संघर्ष झाला. हा संघर्ष चाणक्य पंडित आणि धनानंद तथा त्याचे आठ पुत्र यांच्यात झाला! या संघर्षात चाणक्य पंडिताने आपले ब्राह्मणत्व गुंडाळून ठेवले नाही. 'साधी राहणी आणि उच्च विचार सरणी' याचा आदर्श चाणक्य पंडिताने आपल्या आचरणात ठेवला. उन्मत्त, सत्तालोलुप आणि प्रजेप्रति निष्ठूर असलेल्या नवनंदांचा विनाश करून चाणक्याने मातृभूमीचा गौरव वाढविला. वैदिक शास्त्रांत निपुण असा सम्राट, जो त्याने स्वतः प्रशिक्षित केला होता, त्या चंद्रगुप्त मौर्याला साम्राज्यावर स्थापित केले आणि सर्व काही संपन्न झाल्यावर चाणक्य पंडितांनी संन्यास ग्रहण करून सर्वस्वाचा त्याग केला.
पुढे बौद्धांचा नास्तिक प्रभाव भारतात आणि भारताबाहेर वाढल्यावर वैदिक धर्म प्रायः लोप पावला. अशा वेळा श्रीपाद शंकराचार्य (आद्य) प्रकट झाले आणि त्यांनी वैदिक धर्माला परत गतवैभव प्राप्त करून दिले.
त्यांनतर भारतभूमीवर इस्लामच्या आक्रमणाची शृंखला प्रारंभ झाली. या महाभयंकर आक्रमकांशी ब्राह्मण आणि क्षत्रियांनी प्रखर संघर्ष केला. काही वेळा ते विजयी झाले तरी संपूर्ण भारत इस्लाममय झाला. आता या इस्लामी आक्रमकांच्या काळात भारतीयांना हिंदू म्हणून संबोधण्यात येऊ लागले. इस्लामच्या पाशवी आक्रमणापुढे हतवीर्य झालेल्या ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी विविध सुलतानांकडे चाकरी करण्यास प्रारंभ केला. जबरदस्तीमुळे काही लोक बाटले तर काही जण लाचारपणे, तर काही जण अंशतः स्वधर्माचे पालन करीत होते.
शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतभूमीला परत स्वतंत्र करण्याचे कार्य छत्रपती शिवरायांनी आरंभले. त्यांच्या या हिंदवी स्वराज्यात सर्वांना स्थान होते. परंतु यावेळी क्षत्रियांनी हाती शस्त्र शिवरायांना विरोध केला आणि ब्राह्मणांनी शास्त्रांचा चुकीचा अर्थ सांगून विरोध केला. दोघेही दोषी असूनही सध्या मात्र या इतिहासाचे विकृतीकरण सादर केले जात आहे.
जेव्हा ब्रिटिश येथे आले, तेव्हा त्यांनी भारताचा सूक्ष्मरीत्या अभ्यास केला. त्यांनी विविध क्षत्रियांसाठी विविध रेजिमेंट काढून त्यांना आपले बूट साफ करावयास लावले. तसेच ब्राह्मणांना A B C D शिकवून बाबू-क्लार्क बनवून आपली गुलामगिरी स्वीकारण्यास भाग पाडले. 'फूट पाडा आणि राज्य करा' या नीतीने त्यांनी अठरापगड जातींना आपल्या गुलामगिरी व्यवस्थित अडकवले. ब्रिटिशांनी खोटा इतिहास रेटून सांगण्यास आणि शिकविण्यास प्रारंभ केला. ते सांगू लागले की, ब्राह्मण हेच परकीय असून त्यांनाच तुडवा-बुडवा. ब्रिटिशांच्या हाती सत्ता असल्यामुळे त्यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांतून खोटा इतिहास पसरविण्यास चालू केले. ब्रिटिश आपल्या योजनेत यशस्वी झाले आणि त्यांचाच कित्ता गिरवत आज येथील सर्वपक्षीय सत्ताधारी यशस्वी होत आहेत.
बहुजन समाजातील धूर्त राजकीय नेत्यांना चांगलेच माहित आहे की, आपल्या समाजाची दिशाभूल केली तरच ते एकगठ्ठा मते आम्हाला देतील आणि मग आम्ही आरामात सत्ता उपभोगू शकता; परंतु बहुजन समाजाला योग्य तो मार्ग ब्राह्मण लोक दाखवतील आणि त्यांना बुद्धिमान करतील आणि आम्ही सत्ताभ्रष्ट होऊ. यासाठी त्यांनी काही पैसा धूर्त आणि लुच्च्या लोकांसमोर फेकला आणि आपला कार्यभाग साधून घेतला.
खोटा इतिहास रेटून बोला, ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपली तुंबडी भरा. यात हे जात्यंध लोक यशस्वी होत आहेत. कारण त्यांना पक्के ठाऊक आहे की ३% असलेले ब्राह्मण आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत. तसेच या ३% असलेल्यांवर सत्तेत येण्यासाठी काहीच उपयोग नाही; त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष यांची बाजू घेणार नाही.
या सर्व विषयांची पत्ररूपाने सविस्तर चर्चा आम्ही आमच्या बुद्धीनुसार, आमच्या आकलन क्षमतेनुसार आपल्यापाशी करीत आहोत.
कळावे
आपला शुभचिंतक
विनय शंकर गोडसे
या काही मोजक्याच घटनांचे वर्णन अतिशय संक्षिप्त रूपात येथे करण्यात आले आहे. तशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे वर्णन 'संघर्ष' या ग्रंथात विस्ताराने करण्यात येईल.
सत्य, त्रेता आणि द्वापार युगानंतर आले कलियुग! या भयावह कलियुगाचा प्रारंभ ब्राह्मण शापने झाला. या पृथ्वीवरील शेवटचे सम्राट परीक्षित महाराज यांना शृंगी नामक ब्राह्मण पुत्राने शाप दिला की, माझ्या पित्याचा अवमान करणाऱ्या राजाला तक्षक सर्प सातव्या दिवशी दंश करील. शृंगीचे पिता शमीक ऋषींना जेव्हा हे वृत्त कळते, तेव्हा ते आपल्या पुत्राची कठोर शब्दांत निंदा करतात आणि राजाला असा शाप देणे पूर्णपणे चूक आहे असे सांगतात. परिक्षित महाराज हे अर्जुनाचे पौत्र आणि भगवान श्रीकृष्णांचे महान भक्त असतात. ब्राह्मणाचा शाप परतविण्याची क्षमता त्यांच्यात असते. तरीही ते तो शाप भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणून स्वीकारतात. ते आपल्या सर्वस्वाचा त्याग करून गंगातटावर बसतात. तेथे ते श्री व्यासपुत्र शुकदेव गोस्वामींकडून सात दिवस आणि सात रात्री भागवत कथा श्रावण करतात आणि तक्षकाने दंश केल्यावर सरळ भगवद्धामास प्रयाण करतात.
भागवत पुराणात (१. १. १०) कलियुगातील जीवांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे -
प्रायेणाल्पायुष: सभ्य कलावस्मिन् युगे जना: ।
मन्दा: सुमन्दमतयॊ मन्दभाग्या ह्योपद्रताः ।।
' हे सभ्य! कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत. ते भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत.'
कलियुगातील सर्वच वर्णाच्या लोकांचे हे वर्णन आहे. दंभ आणि कलह यांनी भरलेल्या या युगात सर्व जण भांडत आहेत. कलियुगाच्या प्रभावामुळे शृंगीचे झालेले पतन हा ब्राह्मणांच्या पतनाचा आरंभ आहे. आळस आणि मंद बुद्धीमुळे शास्त्रांचा चुकीचा अर्थ काढून ब्राह्मणांनी क्षत्रियांना तिरस्कृत केले आणि क्षत्रियांनी वैश्यांना तिरस्कृत केले आणि या तिन्ही वर्णांनी त्यांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या शूद्रांना तिरस्कृत केले. त्यामुळे काय झाले? अन्य त्रियुगातील दैवी वर्णाश्रम धर्म कलियुगात विकृत आसुरी वर्णाश्रम धर्म झाला. लोक स्वतःला नाममात्र जन्मजात विशिष्ठ जातीचे म्हणून संबोधू लागले. या सर्व वर्णांमध्ये निकृष्ठ हीन वृत्तीचे गुण दिसू लागले. खरे पाहता हे वर्ण त्या त्या मनुषांच्या कर्माप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागलेले होते. मूळ रूपाने या चार वर्णांची रचना अशा प्रकारे केली आहे की, समाज भौतिकधृष्टया प्रगती करेल आणि चार आश्रमांची रचना अध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. ही एक अशी पद्धत आहे की ज्यामुळे सभ्य मनुष्य सफलतापूर्वक मानवजीवनाचा हेतू अर्थात आत्मसाक्षात्कार प्राप्त करेल. वर्णाश्रम संस्था अशाकरिता रचलेली होती की तिच्या योगाने मनुष्याला परम सत्याचा अनुभव येऊ शकतो. एका वर्णने दुसऱ्या वर्णावर कृत्रिम वर्चस्व लादावे याकरिता ही समाजरचना मुळीच नाही. खरे पाहता अन्य तिन्ही युगांतील शूद्रांचे आचरणही इतके श्रेष्ठ होते की आज त्या युगातील शूद्र प्रगट झाल्यास कलियुगातील ब्राह्मण त्याच्यापुढे निकृष्ट आणि तिरस्करणीय वाटतील. पूर्वीच्या युगात आताचे गलिच्छ प्रकार मुळीच नव्हते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.
कलियुग प्रारंभ झाल्यानंतर साधारणपणे २५०० वर्षांनंतर इतिहासप्रसिद्ध ब्राह्मण-क्षत्रिय संघर्ष झाला. हा संघर्ष चाणक्य पंडित आणि धनानंद तथा त्याचे आठ पुत्र यांच्यात झाला! या संघर्षात चाणक्य पंडिताने आपले ब्राह्मणत्व गुंडाळून ठेवले नाही. 'साधी राहणी आणि उच्च विचार सरणी' याचा आदर्श चाणक्य पंडिताने आपल्या आचरणात ठेवला. उन्मत्त, सत्तालोलुप आणि प्रजेप्रति निष्ठूर असलेल्या नवनंदांचा विनाश करून चाणक्याने मातृभूमीचा गौरव वाढविला. वैदिक शास्त्रांत निपुण असा सम्राट, जो त्याने स्वतः प्रशिक्षित केला होता, त्या चंद्रगुप्त मौर्याला साम्राज्यावर स्थापित केले आणि सर्व काही संपन्न झाल्यावर चाणक्य पंडितांनी संन्यास ग्रहण करून सर्वस्वाचा त्याग केला.
पुढे बौद्धांचा नास्तिक प्रभाव भारतात आणि भारताबाहेर वाढल्यावर वैदिक धर्म प्रायः लोप पावला. अशा वेळा श्रीपाद शंकराचार्य (आद्य) प्रकट झाले आणि त्यांनी वैदिक धर्माला परत गतवैभव प्राप्त करून दिले.
त्यांनतर भारतभूमीवर इस्लामच्या आक्रमणाची शृंखला प्रारंभ झाली. या महाभयंकर आक्रमकांशी ब्राह्मण आणि क्षत्रियांनी प्रखर संघर्ष केला. काही वेळा ते विजयी झाले तरी संपूर्ण भारत इस्लाममय झाला. आता या इस्लामी आक्रमकांच्या काळात भारतीयांना हिंदू म्हणून संबोधण्यात येऊ लागले. इस्लामच्या पाशवी आक्रमणापुढे हतवीर्य झालेल्या ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी विविध सुलतानांकडे चाकरी करण्यास प्रारंभ केला. जबरदस्तीमुळे काही लोक बाटले तर काही जण लाचारपणे, तर काही जण अंशतः स्वधर्माचे पालन करीत होते.
शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतभूमीला परत स्वतंत्र करण्याचे कार्य छत्रपती शिवरायांनी आरंभले. त्यांच्या या हिंदवी स्वराज्यात सर्वांना स्थान होते. परंतु यावेळी क्षत्रियांनी हाती शस्त्र शिवरायांना विरोध केला आणि ब्राह्मणांनी शास्त्रांचा चुकीचा अर्थ सांगून विरोध केला. दोघेही दोषी असूनही सध्या मात्र या इतिहासाचे विकृतीकरण सादर केले जात आहे.
जेव्हा ब्रिटिश येथे आले, तेव्हा त्यांनी भारताचा सूक्ष्मरीत्या अभ्यास केला. त्यांनी विविध क्षत्रियांसाठी विविध रेजिमेंट काढून त्यांना आपले बूट साफ करावयास लावले. तसेच ब्राह्मणांना A B C D शिकवून बाबू-क्लार्क बनवून आपली गुलामगिरी स्वीकारण्यास भाग पाडले. 'फूट पाडा आणि राज्य करा' या नीतीने त्यांनी अठरापगड जातींना आपल्या गुलामगिरी व्यवस्थित अडकवले. ब्रिटिशांनी खोटा इतिहास रेटून सांगण्यास आणि शिकविण्यास प्रारंभ केला. ते सांगू लागले की, ब्राह्मण हेच परकीय असून त्यांनाच तुडवा-बुडवा. ब्रिटिशांच्या हाती सत्ता असल्यामुळे त्यांनी आपल्या शाळा महाविद्यालयांतून खोटा इतिहास पसरविण्यास चालू केले. ब्रिटिश आपल्या योजनेत यशस्वी झाले आणि त्यांचाच कित्ता गिरवत आज येथील सर्वपक्षीय सत्ताधारी यशस्वी होत आहेत.
बहुजन समाजातील धूर्त राजकीय नेत्यांना चांगलेच माहित आहे की, आपल्या समाजाची दिशाभूल केली तरच ते एकगठ्ठा मते आम्हाला देतील आणि मग आम्ही आरामात सत्ता उपभोगू शकता; परंतु बहुजन समाजाला योग्य तो मार्ग ब्राह्मण लोक दाखवतील आणि त्यांना बुद्धिमान करतील आणि आम्ही सत्ताभ्रष्ट होऊ. यासाठी त्यांनी काही पैसा धूर्त आणि लुच्च्या लोकांसमोर फेकला आणि आपला कार्यभाग साधून घेतला.
खोटा इतिहास रेटून बोला, ब्राह्मणांना शिव्या घाला आणि आपली तुंबडी भरा. यात हे जात्यंध लोक यशस्वी होत आहेत. कारण त्यांना पक्के ठाऊक आहे की ३% असलेले ब्राह्मण आमचे काहीच वाकडे करू शकत नाहीत. तसेच या ३% असलेल्यांवर सत्तेत येण्यासाठी काहीच उपयोग नाही; त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष यांची बाजू घेणार नाही.
या सर्व विषयांची पत्ररूपाने सविस्तर चर्चा आम्ही आमच्या बुद्धीनुसार, आमच्या आकलन क्षमतेनुसार आपल्यापाशी करीत आहोत.
कळावे
आपला शुभचिंतक
विनय शंकर गोडसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा