शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

मुर्खांच्या आणि धूर्तांच्या प्रश्नांना उत्तरे 


विघ्नसंतोषी, अज्ञानी, धूर्त  आणि मूर्ख लोक नेहमीच  अनावश्यक  आणि द्वेषमूलक प्रश्न विचारून समाजात नेहमीच गोंधळ घालतात. या लोकांना उत्पात निर्माण करण्यात आसुरी आनंद मिळतो. कधी यांना पैसा मिळतो म्हणून हे लोक असले प्रश्न विचारतात. तर कधी धूर्त राजकारणी आपल्या लाभासाठी असल्या कंड्या पिकवतात. काही अल्पज्ञानी असल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा फोक्त सल्ला देतात. तर काहींना वाटते की डुकरांशी कुस्ती खेळण्याने काहीही लाभ होत नाही; उलट आपणच मलीन होतो. परंतु काळ सोकावतो; याचे वेळीच खंडन केले नाही तर याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागणार नसले तरी आमच्या मुलाबाळांना आणि नातवंडांना नक्कीच लागणार आहेत. हिटलरने जूंच्या विरोधात आधी लेख लिहिले, नंतर पत्रके वाटली, पुस्तके छापली, भाषणे दिली आणि मग त्यांचे भीषण हत्याकांड घडवून आणले. त्याच मार्गाने लेनिनने रशियात साम्यवाद रुजवला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्टॅलिनने प्रत्यक्ष कृती करून आपल्याच रशियन बांधवांचे, तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त लोकांचे हत्याकांड घडून आणले. मोहमद अली जिनाने याच मार्गाचा पुरेपूर वापर करीत लक्षावधी हिंदूंचे भीषण हत्याकांड घडवून स्वतंत्र इस्लामिक असे पाकिस्तान नामक राष्ट्र जन्मास घातले. त्याच मार्गाने काश्मिरातील हिंदू पंडितांचे मुडदे पाडले आणि त्यांना काश्मिरातून हुसकावून लावले. त्याच मार्गाने ब्राह्मण विरोधी लिखाण करून त्यांचे उद्योग-धंदे, घरेदारे आणि संपत्ती लुटण्याचा मनसुबा काही जणांनी रचलेला आहे आणि त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी विकृत इतिहास प्रस्तुत करून अज्ञानी तरुणांची डोकी भडकावली जात आहेत. 
महाभारतात ( शान्तिपर्व १३८. ७९) सांगितले आहे - 
      अपि सर्वस्वमुत्सृज्य रक्षेदात्मानमात्मना ।।
'आपल्याजवळील सर्वस्वाचा त्याग करून सुद्धा माणसाने स्वःताचे रक्षण करावे.' 
सध्या सर्वस्वाचा त्याग करण्याची वेळ निकट आलेली नाही असा भास होत असला तरी आम्ही आमच्या परीने दुष्टांचे वा शंकेखोरांचे शब्दरूपी अस्त्राने  आमच्यापरीने, लहान स्वरूपात  खंडन करू इच्छितो. 
     महाभारताच्या सभापर्वात (५५. ७) सांगितले आहे -
     अल्पोअपि ह्यरिरत्यर्थं वर्धमानःपराक्रमै:।
     वल्मीको मूलज इव ग्रसते वृक्षमन्तिकात् ।।
     'शत्रू कितीही लहान असला तरी तो आपल्या पराक्रमाने वाढत जातो आणि ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाजवळ असलेले वारूळ शेवटी वृक्षाला खाऊन टाकते, त्याप्रमाणे हा वाढणारा शत्रू आपल्या प्रतिपक्षाचा नाश करतो. 

हे मूर्ख एकीकडे म्हणतात की वेद, पुराण, महाभारत, रामायण इत्यादी काल्पनिक वा भाकड कथा आहेत, मग त्याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी काही विधायक कार्य का करीत नाहीत? वस्तुतः या भाकड कथा नसून समस्त भारतीयांना एका  सूत्रात बंधू ठेवणाऱ्या भक्कम रेशीम गाठी आहेत. या गाठी तोडल्याविना भारतीयांना आपले गुलाम करता येणार नाही, हे ओळखूनच  इंग्रजांनी पद्धतशीरपणे याच्या विध्वंसासाठी बुद्धिभेद करून  मिथ्या इतिहास भारतीयांच्या गळी उतरविला आणि आपल्या तथाकथित शिक्षण पद्धतीचा फास आवळला. त्यांचीच री ओढत नंतरच्या समस्त राजकारण्यांनी हीच पद्धत चालू ठेवली आहे. 
   या शंकेखोरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही आमच्या अल्पबुद्धीनुसार प्रयत्न करीत आहोत. ज्या शुभचिंतकांना यामध्ये अधिक शास्त्रोक्त भर घालावयाची असेल तर त्यांचे मनःपूर्वक स्वागत. 


मूर्खांचे प्रश्न -


1) भारतात 33 करोड देव आणि लाखो बुवा बापू   आहेत मग भारत गरीब का आहे?
उत्तर : देव आणि गरीबीचा संबंध काय? हे या दीड शहाण्या माणसाने आधी स्पष्ट सांगावे. 
महाराष्ट्रात अकरा मराठा मुख्यमंत्री होऊनही मराठा बांधव अजूनही गरीब का आहेत? मायावती उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री होत्या परंतु केवळ त्याच आणि त्यांचे बंधू का श्रीमंत का? जगाला बसून खाऊ घालता येईल इतका गहू एकटी अमेरिका पिकवते, तरीही अमेरिका इतरांना का देत नाही? देवाचे अस्तीत्व नाकारणाऱ्या रशियादी देशात गरीब लोक का? अनेक अरबी देश प्रचंड श्रीमंत असूनही अनेक मुसलमान युरोपात निर्वासित म्हणून भीक का मागतात? अरब समस्त मुसलमानांना पोसू शकतात. 
    प्राचीन काळापासून या पृथ्वीवर चंद्रवंशी आणि सूर्यवंशी क्षत्रिय घराण्यातील सम्राट वा चक्रवर्ती राजे राज्य करीत. हे राजे वेदानुयायी होते आणि वेदांनुसार प्रामाणिकपणें राज्य चालवीत. राजा हा भगवान श्री विष्णूंचा प्रतिनिधी असल्यामुळे तो आपल्या प्रजेचे पालन आपल्या पुत्रांप्रमाणे  करीत असे. तो आपल्या धर्माचरणाने आणि चारित्र्याने सर्वांसमक्ष आदर्श ठेवून प्रजेला उत्तम नागरिक आणि भगवद्भक्त बनवीत असे. ही परंपरा अगदी १२०० वर्षांपूर्वीही अस्तित्वात होती. परंतु इस्लामी आक्रमणानंतर याचा ह्रास होऊ लागला. विदेशी लोकांचे गोडवे गाणाऱ्या धूर्तांनी  आणि मूर्खांनी लक्षपूर्वक विदेशी प्रवाशांची वर्णने वाचावीत. त्यावरून आपल्याला कळून येते की, त्या काळी  भारतात सर्व प्रकारची सुबत्ता होती. येथे कोणीही भिकारी नव्हते. येथील राजे प्रत्येक व्यक्तिला त्याच्या गुण आणि कर्मानुसार त्याला सर्वकाही प्रदान करीत.  त्याकाळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. इस्लामी आक्रमणानंतर मात्र भारतीयांची शोचनीय अवस्था झाली. लोक भिके कंगाल झाले. इस्लामशी झुंझ देत काही क्षत्रियांनी आपली संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न केला. अगदी छत्रपती शियरयांनीही आपल्या प्रजेची अशाचप्रकारे काळजी घेतली होती. परंतु इंग्रजी राजवटीत यावर वरवंटा फिरवण्यात आला. मात्र धूर्त लोक आपली कातडी वाचविण्यासाठी याचे खापर केवळ ब्राह्मणांवर फोडतात आणि स्वतःचे दोष झाकून ठेवतात. 

वस्तुतः या भूतलावरील समस्त संपत्तीचे स्वामी केवळ भगवान आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी जो वाटा ठेवला आहे त्यावर आम्ही संतुष्ट असले पाहिजे. परंतु आता सर्वच लोक स्वार्थी झाले आहेत. इतरांची फसवणूक करणे वा शोषण करणे इतकेच सर्वजण जाणतात. कोणी कोणास साहाय्य करू इच्छित नाही. समस्त राजकारणी केवळ इतरांची फसवणूक करीत आहेत आणि दोष देवाला देतात. काय, ही लबाडी  नव्हे का? आम्ही जे पेरतो तेच उगवते. आम्ही जी कर्मे केली आहेत त्याप्रमाणे आम्हाला फळ मिळणार. शिपाई आणि सेनापती दोघांनाही सारख्याच प्रमाणात वेतन मिळते का? प्राध्यापकाला आणि कारकुनाला सारखेच वेतन मिळते का? नाही ना? मग यासाठी आपण सरकारला दोष देता का? मग स्वतःचे दोष झाकण्यासाठी इतरांवर वा देवावर आरोप करणे हा कोणता न्याय आहे? 
महाभारतात (शल्यपर्व ६५. २०) सांगितले आहे -
   अध्रुवा सर्वमर्त्येषु श्रीरूपालक्ष्यते भृक्षम्।।
    ' सर्वच माणसांचे वैभव आणि ऐश्वर्य पूर्णपणे चंचल आणि न टिकणारे आहे असे दिसून येते.' 
जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले
तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -

 माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे
असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे
त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी
मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून माझे जीवन
नक्कीच सुखी करू शकतो

मी स्त्री व्हावे की पुरूष, 
काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण
सर्व अवयव ठिकठाक असणे, 
हे देखील माझ्या हाती नव्हते. 
मात्र जे काही मिळालेय 
त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी
घेणे, हे माझ्या हाती आहे. 
सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. 
हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे 
माझ्या आयुष्यात देखील काही 
दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती 
असावीत हे देखील ठरवण्याचा 
माझा अधिकार नाही. त्यामुळे 
माझ्या दु:खांचे भांडवल न करता, 
मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी
सकारात्मक प्रयत्न करत राहीन. 
माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, 
परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण 
नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार 
अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. 
हे विश्व मी निर्माण केलेले नाही. 
किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, 
या माझ्या मताला देखील काही किंमत 
नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का?
असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत
राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे,
अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार
नाही हे मला ठरवता येईल. 
हे ही नसे थोडके !
आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या 
पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या 
अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते 
याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला 
दूर ठेवले पाहिजे.
 मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत 
दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही 
मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी 
असले पाहिजे. जग अधिक चांगले, 
सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची 
संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, 
तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.

1 टिप्पणी: