भारतात 33 कोटी देव असूनही भारतात गरीब का आहेत ?
आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असा
भ्रम असलेल्या मुर्खांना आणि धूर्तांना वाटते की ३३ कोटी देवता का? हे
मूर्ख एकीकडे देव अस्तित्वात नाही असे ओरडतात आणि दुसरी कडे देवतांची गणती
करतात! वस्तुतः देवी-देवता वा भगवंत अस्तित्वात आहेत म्हणून तर नास्तिक
त्यांचे अस्तित्व नाकारतात. जर भगवंत अस्तित्वातच
नसते तर त्यांचे अस्तित्व नाकारण्याचा प्रश्नच आला नसता! जरा डोकं असल्यास
अशा वस्तू वा प्राण्याविषयी कल्पना करून पहा की जो अस्तित्वातच नाही.
शक्यच नाही. कारण अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा वा पदार्थांचाच मनुष्य
विचार करू शकतो. भगवंतांनी निर्माण केलेल्या पदार्थांचाच वापर करून आपण
काही अन्य नवीन पदार्थ निर्माण करू शकतो.
शास्त्रज्ञांनी कितीही नवं निर्मितीचा दावा केला तरी व्यर्थ आहे. कारण समस्त नाव निर्मितीसाठी भगवंतांनी निर्माण केलेल्या भौतिक पदार्थांची नितांत आवश्यकता असतेच.
आपल्या या खंडप्राय भारत देशात
अनेक प्रकारचे धार्मिक लोक निवास करतात. तसेच मूर्ख आणि अज्ञानी लोकही
आहेत. जे धार्मिक आहेत त्यांनी आपापल्या आवडीनुसार विविध देवी-देवतांचा
स्वीकार केलेला आहे. या देवी-देवता थोड्या-थोडक्या नसून तब्बल ३३ कोटी
आहेत. त्यामुळे मानव चांगलाच भ्रमात पडतो! कोणास स्वीकारावे आणि कोणास
नाकारावे हेच काळत नाही. वेदज्ञानहीन लोक तर स्वनिर्मित बाबा- बुवांना देव
मानतात. तर काहींना वाटते की, एकच गॉड वा एकच अल्ला याना मानणे किती सोप
आहे! त्यामुळे काही भांडण्याचा प्रश्नच नाही. परंतु असे मानण्यात फार मोठा
धोकाही असतोच: कारण यांचे उपासक कट्टर होतात आणि इतरांना अतिशय पीडतात.
परंतु भारतात सर्वांना त्यांच्या त्यांच्या आवडी प्रमाणे, श्रद्धे प्रमाणे
उपासना करण्याचा अधिकार प्राचीन काळा पासून आहे. येथे कोणावरही बळजबरी केली जात नाही.
जितक्या व्यक्ती तितक्या
प्रवृत्ती! प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड भिन्न असल्यामुळे, त्यांच्या
मागण्याही भिन्न असतात. त्यामुळे त्यांच्या पूर्ततेसाठी भगवंतांनी भिन्न
भिन्न देवतांची निर्मिती केली आहे. परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे लोकांना
वेद ज्ञानाची जाणीव नाही. वेद ज्ञान प्रदान करणाऱ्या ब्राह्मणांची प्रचंड
कमतरता आहे. तसेच फसवण्याची वृत्ती सर्वत्र बोकाळलेली आहे. दिव्य
ज्ञानाच्या अभावामुळे कोणाकडे काय मागावे हेही लोकांना कळत नाही. त्यामुळे
लोक कोणाकडेही जाऊन काहीही मागतात आणि आपल्या मागणीची पूर्तता झाली नाही की
बोंबाबोंब करतात. त्यामुळे लोक गरीब आहेत.
श्रीमद् भागवत पुराणाच्या
दुसऱ्या स्कंधात कोणत्या देवाकडे काय मागावे याविषयी सांगितले आहे. आम्ही
आमच्या लहरीनुसार कोणाकडे काहीही मागून चालत नाही. ज्याप्रमाणे कोणत्याही
सरकारी कार्यालयात जाऊन कोणतीही मागणी करता येत नाही, अगदी त्याच प्रमाणे
कोणत्याही देवाकडे वाटेल ते मागून चालत नाही.
भागवत पुराण सांगते, "निराकार
ब्रह्मज्योतीच्या तेजात विलीन होण्याची ज्याची कामांना आहे त्याने वेदपतीची
उपासना करावी, ज्याला इंद्रिय सुखाची लालसा आहे त्याने स्वर्गाधिपती
इंद्राची पूजा करावी. ज्याला चांगल्या मुलाबाळांची इच्छा आहे त्याने
श्रेष्ठ प्रजापतीची पूजा करावी. ज्याला चांगल्या सुदैवाची अपेक्षा आहे
त्याने ईहलोकाची अधिष्ठात्री दुर्गादेवीची पूजा करावी. शक्तिमान बनण्याची
इच्छा असणाऱ्याने अग्निदेवाची आराधना करावी. ज्याला केवळ धनाची इच्छा आहे
त्याने वसूंची पूजा करावी. ज्याला वीरयोद्धा होण्याची इच्छा आहे त्याने
रुद्रांची उपासना करावी. अन्नधान्यांची भरभराट व्हावी अशी इच्छा असणाऱ्याने
अदितीची उपासना करावी. ज्याला स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे त्याने
अदितीपुत्रांची आराधना करावी. ज्याला ईहलोकीचे राज्य हवे आहे त्याने
विश्वदेवांची उपासना करावी. ज्याला सुदृढ शरीराची इच्छा आहे त्याने
पृथ्वीची उपासना करावी. ज्याला स्थैर्याची अभिलाषा आहे त्याने क्षितिज आणि
पृथ्वी यांची एकत्र उपासना करावी. सुंदर असावे असे वाटत असेल
तर गंधर्वलोकातील रहिवाशांची उपासना करावी. उत्तम पत्नीची कामना असणाऱ्याने
अप्सरांची आणि उर्वशी यांची पूजा करावी. ज्याला इतरांवर अधिपत्य
गाजवण्याची इच्छा आहे त्याने विश्वाधिकारी ब्रह्मदेवांची पूजा करावी.
प्रसिद्धीची अपेक्षा असणाऱ्याने भगवंतांची आराधना करावी. ज्याला धनाची
लालसा आहे त्याने वरूणदेवाची पूजा करावी. ज्याला विद्वान होण्याची इच्छा
आहे त्याने शिवांची आराधना करावी आणि ज्याला सुखी पती पत्नी प्रेम
अनुभवायचे आहे तर त्याने शिवपत्नी उमा हिची उपासना करावी."
अनेकानेक लोकांच्या विविध कामना पूर्ण
करण्यासाठी ३३ कोटी देवतांची भगवंतांनी निर्मिती केली आहे. या मर्त्य लोकात
निवास करणारा बद्ध , अज्ञानी किंवा मूर्ख जीव उपभोग घेण्याच्या सर्वच
क्षेत्रात निपुण नसतो. परंतु विविध देवीदेवतांची उपासना करून तो आपले भोग
प्राप्त करू शकतो. ३३ कोटी देवतांकडून सुख प्राप्त करण्याची साधने उपलब्ध
असूनही काही लोक आपल्या मनाप्रमाणे काहीतरी करू इच्छितात वा स्वनिर्मित
मार्गांचा अवलंब करतात त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नाही आणि दोष
देवाला देतात.
हे कलियुग आहे, येथे संघटन करून , दबाव
गट निर्माण करून , बेताल बडबड करून वा काही तरी पुस्तके खरडून
आपल्याला देवतांकडून काहीही प्राप्त करून घेता येत नाही. येथे आरक्षण,
वशिला वा अन्य मार्ग चालत नाही.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात," जो मनो मार्गे गेला तो येथेचि मुकला आणि जो हरिपाठी गेला तोची स्थिरावला।"
अर्थात
देवीदेवतांकडून आपल्याला काही प्राप्त करावयाचे असेल तर आपण आपल्या
लहरीप्रमाणे वाटेल तशी मागणी करू शकत नाही. आम्ही आमच्या मानसिक तर्काने वा
कुतर्काने काहीच मिळवू शकत नाही. देवतांकडून काही लाभ प्राप्त करावयाचा
असेल तर भगवंतांनी सांगितलेल्या मार्गानेच आपल्याला गेले पाहिजे.
स्वनिर्मित मार्गाने आम्ही काहीही प्राप्त करू शकत नाही.
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या द्वितीय अध्यायातील दहाव्या श्लोकात सांगतात -
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोअस्त्विष्टकामधुक्।।
"सृष्टीच्या
आरंभी प्रजापतीने श्री विष्णुंप्रीत्यर्थ, यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना
निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की,'तुम्ही या यज्ञापासून
सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी
आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील."
इतका सोपा उपाय असताना लोक मुर्खासारखे निरर्थक प्रश्न विचारून स्वतःला आणि समाजाला सुखापासून दूर ठेवता.
यापुढील श्लोकात भगवान अधिक स्पष्टपणे सांगतात -
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेय: परमवाप्स्यथ ।।
"यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हाला ही संतुष्ट करतील आणि याप्रमाणे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने, सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल."
युधिष्ठीर महाराज यांच्या काळात असे
समृद्धीचे राज्य सर्वत्र नांदत होते. परंतु कलियुगाचा प्रारंभ होताच सर्व
काही बिघडू लागले. लोक आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू
लागले. त्यामुळे आताची ही भीषण परिस्थिती उद्भावली आहे.
भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात -
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता:।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव स:।।
" विविध
जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्याने
संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू
पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच
आहे".
आता कळले का? डोक्यात काही प्रकाश पडला
का ? ३३ कोटी देवदेवता असूनही लोक का गरीब आहेत? आज समस्त जातीपातीचे अन्
धर्माचे बहुसंख्य लोक, नास्तिक, राजकारणी, तथाकथीत बुद्धिजीवी, समाजवादी,
साम्यवादी लोक चोरी करण्यात अग्रेसर आहेत. इतरांचा न्याय अधिकार लुबाडण्यात
पुढे आहेत. मग असे चोर कसे काय सुखी राहतील?
तसेच लोक नास्तिकांच्या आहारी
जाऊन धर्मद्रोह करतात, वेद शास्त्रांची , साधू-सजन्नांची निदा करतात.
आपल्यावर उपकार करणाऱ्याची निंदानालस्ती करतात. वेद, गाय, ब्राह्मण यांनी
केलेल्या कृपेची अवहेलना करून कृतघ्न होतात. माता पिता, गुरुजन वा
बांधवांशी द्रोह केल्यामुळे सुद्धा गरिबी येते.
* * * * *
एकदम छान सर्वानी वाचावा असा लेख आहे।।।
उत्तर द्याहटवा