गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७



                                        A Lustful Person


Na Pashyati Janmaandhahaa Kaamaandho Naiv Pashyati
Na Pashyati Madonmatto Hyarthi Doshaanna Pashyati
The person born blind cannot see. Even the person blinded by sexual desire can’t see. Neither the one blinded by his power nor a rich man can see. –Chanakya Pandit
There was an incident of gang rape of a young medical intern in a running bus in New Delhi a few months back. She was thrown out of the running bus after being beaten severely. She died after a few days. This triggered a nationwide outcry resulting in many agitations, stone pelting, seminars, speeches etc. which forced the government at the Centre to make a strong law to protect women from sexual assaults. This has given the hope that the women may feel secure a bit more. Yet most of the women in the country are still unaware that they can get justice against sexual harassment legally and those guilty can be punished under the law. Even those who are aware, very few show the courage to come forward and file a complaint.
But a few courageous women came forward and filed a complaint against Laxman Mane. So far five women have lodged a complaint against him at police station.
A few years back, the then governor of Andhra Pradesh N. D. Tiwari was caught on camera indulging in lewd behavior. He was subsequently removed from the post. Then a young man filed a petition in the court stating that Tiwari was his biological father. Tiwari initially denied the charges but after the court ordered his DNA test, it was proved that he was indeed the biological father of the young man.
This incident pertains to Tehelka.com editor Tarun Tejpal molesting his own colleague in Goa in 2013. He was arrested and the case is still on.
The editor who exposed the dirty secrets of many senior politicians, leaders, professionals is now himself a victim of his own deeds. He had sent many to jail, but now experiencing the same fate. Why such things happen? There are very simple reasons to it:
The false ego, that only I know the dirty secrets of the mighty leaders and only I can make them pay for it.
The huge publicity and monetary benefits gained out of these scandals
The acceptance of so called civilized culture of non-vegetarian food and alcohol drinking. This doesn’t satiate sexual desires and results in increasing uncontrolled behavior
The persistent demand that women should be treated equal at all levels and be involved in all activities. This demand is not for the benefit of women, but to get their company and if possible their sexual exploitation.
The wish that a lady working with us should be just 20 years old and beautiful like full bloomed lotus.
Tarun Tejpal fell morally due to these reasons and caught himself in the legal tangle. He himself fell in the ditch he dug for others. You reap what you sow.
Naarinaamam Nayanaadeshhaa 
Suraanaamapi Durjayhaa
Sa Yen Vijito Loke 
Haribhaktaha Sa Uchyate
It is very difficult even for the gods to ignore women’s eye signs. But the one, who has overcome this, is known in the universe as devotee of Lord Hari. - Padma Puran 61.12
Prajapati Daksha says to Narad Muni in the sixth chapter of Shrimadbhaagawat Purana, ‘Sexual pleasure is indeed the root cause of all sorrows; but the common man does not give up his materialistic pleasures until he himself experiences how this life is full of difficulties. That’s why he should be allowed to enjoy these so called earthly pleasures. But at the same time, he should be given the opportunity to earn the knowledge that shows the false happiness of the materialistic pleasures. Once he earns this knowledge, he himself will start loathing the materialistic pleasures. Those who recluse themselves from such false earthly pleasures of life after experiencing their myth and hollowness, really keep themselves from such things much better than those who give up these pleasures on the advice of others.’
Today’s media is so fast that any crime gets quick publicity. Despite this, the news of incidences of sexual atrocities keeps increasing every day. We see/read the misdeeds of mighty people from village to metropolis on the TV/ internet. It shows that people from all walks of life, from sportspersons to film personalities, from police to government officials, from doctors to nurses, from so called saints to mulla-maulavis, padre to nuns, rich to poor- all are engrossed in sexual pleasures. The news of sexual harassment, atrocities, murders, kidnappings, molestations, stalking- all sorts of crimes which originate from sexual wants are a daily occurrence.
Even Prophet Mohammad had to live with those barbaric people who were engrossed in sexual pleasures while he was spreading the message of Islam in Arabian Desert. He realized that these people live the life of wild animals. They incest on their mothers, sisters and even own daughters. It is nearly impossible to keep them away from committing such sins. They won’t just listen to anyone. That’s why Prophet Mohammad asked them to get married to four women to satisfy their libido. In the Holy Bible Jesus Christ, too, says to those who want sexual pleasures but are deprived, to get married. Even the Hindu Vedas state to stay away from sex if one wants to experience divine enlightenment.
It is seen that a person overtaken by the sexual desire, tries to chase woman on the road. He stalks her; tries all the tricks to get her. Sometimes he sweet talks her, sometimes establishes friendship and encourages acquaintance. Sometimes he uses social service to create a good reputation for him. Everything is fine if she willingly responds to these acts positively; but if she refuses his advances then all hell broke loose. In olden days, one would send rose bookeys or love letters to the woman of his desire; now-a-days one uses e-mails, Facebook, SMSs etc. Sometimes he bluntly asks for her love. But if the woman complaints to her relatives about him, he is in for a clean bashing.
Maarkandeya Purana says-
Kaamhaa Sarvaatmanaa Heyahaa 
Sa Cheda Dhaatum Na Shakyate
Swabhaaryaam Prati Kartavyahaa 
Saiva Tasya Hi Bheshajam
Sex is always a good riddance. But if it is impossible to get rid of it, then one should use it only with his wife since she is the only cure for the sexual desire.
After seeing all the bad news about sexual crimes, a civilized person is right in asking the question- Why it happens. Why somebody gets so sexually charged up? Why he becomes a monster even when the victim is his sister, mother or daughter?
------------------------------

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

लाखो बुवा बापू  आहेत मग भारत गरीब का आहे?
आपल्या भारतात नेहमीच  विचारला जाणारा प्रश्न ! प्राचीन काळापासून आपल्या देशात वैदिक संस्कृती नांदत आहे. यातील एक अविभाज्य घटक आहे 'साधू-संत'! अन्य युगांमध्ये साधू-संत अर्थात ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेत समर्पित केले आहे आणि जे लोक भगवंतांपासून विमुख होऊन या भौतिक जगात दुःख भोगत आहेत अशांचा उद्धार करण्यासाठी झटत  आहेत. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी  अशा साधूंचे वर्णन अशाप्रकारे केले आहे - ' जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची  जाणावा।' स्वतः तुकाराम महाराज आपल्या वचनांनुसार वागत असत. का? कारण त्यांना भगवद्भक्ती कळलेली होती. त्यांना स्वतःला धनसंपत्तीची आवश्यकता भासत नसे. परंतु कोणी गोरगरीब त्यांच्यापाशी आला तर ते त्याला निश्चित साहाय्य करीत. महाराज त्याला केवळ आर्थिक साहाय्य करून त्याला त्याची इंद्रियतृप्ती वाढविण्यासाठी साहाय्य करीत  नसत, तर त्याला या क्षणभंगूर दुःखमय जगाची जाणीव सुद्धा करून देत आणि त्याला श्री विठ्ठलांच्या चरणकमळांजवळ आणून त्याचा उद्धार करीत. 
परंतु आता असे साधू भेटणे दुरापस्त झाले आहेत. कारण हे कलियुग आहे.  कलह आणि दंभ यांनी भरलेल्या या युगात सत्य कथन करणाऱ्या साधूंची वानवा आहे. एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे -
सीदन्ति सन्तो विलसंत्यसन्त: पुत्रा म्रियन्ते जनकश्चिरायु:।
परेषू मैत्री स्वजनेषु वैरं पश्यन्तु लोका: कलिकौतुकानि।।
'संत सज्जनांना यातना भोगाव्या लागतात , तर दुष्ट दुर्जन वैभवात लोळतात! पुत्र मृत्यू पावत आहेत, तर पिता चिरायू होत आहे! परक्यांशी मैत्री आणि स्वजनांशी वैर केले जात आहे! लोकहो, हा  कलियुगाचा चमत्कार पहा.'
  जे वास्तविक संत आहेत ते तुकाराम महाराजांप्रमाणे खरीखुरी शिकवण देतात - 'गीता-भागवत करिती श्रावण। अखंड चिंतन विठोबाचे । ' आणि जे बुवा, बापू, बाबा, अम्मा इत्यादी लोक याच्या विपरीत शिकवण देऊन लोकांना भ्रमित करतात  ते सर्वजण लुच्चे  आणि धूर्त आहेत. अशांच्या नादाला लागून लोक आपले जीवन व्यर्थ घालवत आहेत. जसे देवाधर्माच्या  नावाने फसवणूक करणारे बाबा-बुवा आहेत तसेच देव अस्तित्वात नाही, देव माणसाने निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे, बामणाने  आपले पोट भरण्यासाठी हे सर्व थोथांड निर्माण केले आहे, मी देव मनात नाही, मानव सेवा हीच  माधव सेवा आहे इत्यादी बडबड करणारेही बाबा लोकही तेवढेच लबाड आहेत. असे लोक कधी देशसेवा तर कधी समाजसेवा, रुग्णाची सेवा तर कधी  गरिबांची सेवा इत्यादी गोंडस नावाखाली लोकांची फसवणूक करतात. समाजसेवी संस्था काढून अंधश्रद्ध निर्मूलनाच्या नावाखाली  परदेशातून प्रचंड पैसे मिळवून  थोडीफार समाजसेवा करतात आणि बाकीचा पैसा आपल्यासाठी वा आपल्या कुटुंबियांसाठी वापरतात. 
  कधीकधी  देव न मानणारे धूर्त बाबा  आदिवासींची सेवा करतात त्यासाठी प्रचंड त्यागही करतात. मग विदेशी लोक त्याचा सत्कार करतात, त्यामुळे हुरळून जाऊन हे देव न मानणारे आपला मोह आवरू शकत नाहीत आणि भगवंतांच्या लीलांशी स्वतःची तुलना करून स्वतःचे  मोठेपण अधोरेखित करतात. श्रीरामांची लीला न कळल्यामुळे ते बडबडतात,"वनवासात निवास करताना सीतेला सुवर्ण मृगाचा मोह झाला पण माझ्या पत्नीला माझ्या समवेत वनात राहताना कसलाही  मोह झाला नाही." या वाक्यावर मूर्ख लोक टाळ्यांचा कडकडाटही करतात. आता आशा धूर्त  लोकांना आमचे विचारणे असे आहे," अरे लबाडांनो, जर भगवंत अस्तित्वात नाहीत, तुम्ही देव मानतच नाहीत तर मग आमचे आराध्य भगवान श्री श्री सीता राम यांचे उदाहरण का घेता? ज्या ज्ञानोबा-तुकोबांनी ज्यांच्या पवित्र नामाचा सतत गजर करून लक्षावधी पामरांचा उद्धार केला आहे आणि आजही करीत आहेत, त्यांच्या आराध्य भगवंतांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आपल्याला जर श्री रामांवर  विश्वास नाही, आपल्या बोडक्यात रामलीला शिरत नाही वा कळतही नाही तर त्यांचे नाव घेऊन स्वतःचा डंका का वाजवता? बरे सीतेला सोनेरी हरिणाचा मोह झाला आणि तुमच्या बायकोला झाला नाही ही आत्मप्रौढी कशाला हवी? भगवदलीला न जाणताच स्वतःचे गुणगान गाण्यापेक्षा  जरा हेही जाणून घ्या की तुम्हालाही  मोह झाला आहे की नाही? अरे, मोह झाल्याविनाच तुम्हाला मुलेबाळे झाली का? शारीरिक आकर्षणाच्या मोहानेच मुलेबाळे होतात हे आपणास बहुदा माहित नसावे!" असो!
     कधीकधी सवंग लोकप्रियता वा सरकारी मानसन्मान मिळावा यासाठी  काही थोर संत साहित्याचे अभ्यासकही अशा नास्तिकांना धर्मसुधारक म्हणून त्यांची नसलेली थोरवी गातात. तर हे विशेष प्रकारचे ढोंगी बुवा समाजात मोठ्याप्रमाणावर  वाढत आहेत. त्यांच्यापासूनही सावध राहायला हवे. 
  खरा साधू आणि खोटा साधू ओळखण्यासाठी सुद्धा दिव्य वेद ज्ञानाची आवश्यकता  असते. छत्रपती शिवरायांच्या आचरणातून आपण हे शिकू शकतो. शिवरायांनी योग्य साधुसंतांची उत्तमप्रकारे काळजी घेतली होती आणि ढोंगी  लोकांना दंडीतही केले होते. 
  आमची फसवणूक करणारे बाबा बुवा आम्हालाच का भेटतात? कारण आमची वृत्तीही  तशीच आहे. लबाडाला लुबाडच गाठ पडणार! जर आपल्या अंतःकरणात खरोखर प्रामाणिकपणे भगवंतांना जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला खरा साधूच भेटणार. 
 आज भारतात आणि विश्वभरात धंदेवाईक, ढोंगी गुरु, बापू वा बुवांचे प्रस्थ वाढले आहे.  तुमची दुःखे मी हरण करिन तुम्ही माझ्याच नावाचा जप करा कारण कलियुगात मीच अवतार आहे अशी भलावण करणारे लुच्चे गुरु अनेक झालेले आहेत. पैशाचा पाऊस पडणारे, हवेतून काहीतरी काढून देणारे सुद्धा आहेत. अशांचे अचूक वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले आहे -
  ऐसे संत झाले कळी। तोंडी तंबाखूची नळी।।
  स्नानसंध्या बुडाली| पुढे भांग वाढविली ।।
  भांग भुर्का हे साधन । पची पडे मद्यपान ।।
  तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ।।
  या कलियुगात असे तथाकथित संत असून त्यांच्या तोंडी तंबाकूची नळी (सिगारेट, बिडी, हुक्का, चिलीम इत्यादी ) असते. त्यांनी स्नान संध्या इत्यादी आचार बुडवून भांग ओढण्याची प्राप्ती केलेली आहे. भांग, दारू, वाईन, चहा, कॉफ़ी इत्यादी मद्यपान सभ्यतेचे लक्षण झाले आहे. हेच त्यांच्या पचनी पडले आहे. हे सर्वजण ढोंगी असल्यामुळे त्यांचे ठायी पांडुरंग कसा असेल? 
  कोणताही प्रामाणिक आणि प्रमाणित सदगुरु, साधू, संत, बापू वा बुवा वेदांचे सार अर्थात गीता-भागवत सोडून अन्य कोणताही उपदेश करीत नाही. 
  श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात -
  हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।।
  वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन । एक नारायण सार जप ।।
  जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ।।
  हरिपाठे गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ।।
  ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र । याने कुळगोत्र वर्जियलें ।। 
 वेद ज्ञानाचे सत्य अचूकतेने पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका  खऱ्या  साधूला पार पाडावी लागते. अशा संतांच्या मार्गाचे अनुसरण आम्ही केले तर आम्ही सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो. 
 (अपूर्ण)
© विनय शंकर गोडसे 
संपर्क - ९२४२१७६५८७


शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

 भारतात 33 कोटी  देव असूनही भारतात  गरीब का आहेत ?

           आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असा भ्रम असलेल्या मुर्खांना  आणि धूर्तांना वाटते की ३३ कोटी देवता का? हे मूर्ख एकीकडे देव अस्तित्वात नाही असे ओरडतात आणि दुसरी कडे देवतांची गणती करतात! वस्तुतः देवी-देवता वा भगवंत अस्तित्वात आहेत म्हणून तर नास्तिक त्यांचे अस्तित्व नाकारतात. जर भगवंत अस्तित्वातच  नसते तर त्यांचे अस्तित्व नाकारण्याचा प्रश्नच आला नसता! जरा डोकं असल्यास अशा वस्तू वा प्राण्याविषयी कल्पना करून पहा की जो अस्तित्वातच नाही. शक्यच नाही. कारण अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा वा पदार्थांचाच मनुष्य विचार करू शकतो. भगवंतांनी निर्माण केलेल्या पदार्थांचाच वापर करून आपण काही अन्य नवीन पदार्थ निर्माण करू शकतो.
         शास्त्रज्ञांनी कितीही नवं निर्मितीचा दावा केला तरी व्यर्थ आहे. कारण समस्त नाव निर्मितीसाठी भगवंतांनी निर्माण केलेल्या भौतिक पदार्थांची नितांत आवश्यकता असतेच.
         आपल्या या खंडप्राय भारत देशात अनेक प्रकारचे धार्मिक लोक निवास करतात. तसेच मूर्ख आणि अज्ञानी लोकही आहेत. जे धार्मिक आहेत त्यांनी आपापल्या आवडीनुसार विविध देवी-देवतांचा स्वीकार केलेला आहे. या देवी-देवता थोड्या-थोडक्या नसून तब्बल ३३ कोटी आहेत. त्यामुळे मानव चांगलाच भ्रमात पडतो! कोणास स्वीकारावे आणि कोणास नाकारावे हेच काळत नाही. वेदज्ञानहीन लोक तर स्वनिर्मित बाबा- बुवांना देव मानतात. तर काहींना वाटते की, एकच गॉड वा एकच अल्ला याना मानणे किती सोप आहे! त्यामुळे काही भांडण्याचा प्रश्नच नाही. परंतु असे मानण्यात फार मोठा धोकाही असतोच: कारण यांचे उपासक कट्टर होतात आणि इतरांना अतिशय पीडतात. परंतु भारतात सर्वांना त्यांच्या त्यांच्या आवडी प्रमाणे, श्रद्धे प्रमाणे उपासना करण्याचा अधिकार प्राचीन काळा पासून आहे. येथे कोणावरही बळजबरी केली जात नाही.
          जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती! प्रत्येक व्यक्तीची आवड-निवड भिन्न असल्यामुळे, त्यांच्या मागण्याही भिन्न असतात. त्यामुळे त्यांच्या पूर्ततेसाठी भगवंतांनी भिन्न भिन्न देवतांची निर्मिती केली आहे. परंतु कलियुगाच्या प्रभावामुळे लोकांना वेद ज्ञानाची जाणीव नाही. वेद ज्ञान प्रदान करणाऱ्या ब्राह्मणांची प्रचंड कमतरता आहे. तसेच फसवण्याची वृत्ती सर्वत्र बोकाळलेली आहे. दिव्य ज्ञानाच्या अभावामुळे कोणाकडे काय मागावे हेही लोकांना कळत नाही. त्यामुळे लोक कोणाकडेही जाऊन काहीही मागतात आणि आपल्या मागणीची पूर्तता झाली नाही की बोंबाबोंब करतात. त्यामुळे लोक गरीब आहेत.
            श्रीमद् भागवत पुराणाच्या दुसऱ्या स्कंधात कोणत्या देवाकडे काय मागावे याविषयी सांगितले आहे. आम्ही आमच्या लहरीनुसार कोणाकडे काहीही मागून चालत नाही. ज्याप्रमाणे कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन कोणतीही मागणी करता येत नाही, अगदी त्याच प्रमाणे कोणत्याही देवाकडे वाटेल ते मागून चालत नाही. 
    भागवत पुराण सांगते, "निराकार ब्रह्मज्योतीच्या तेजात विलीन होण्याची ज्याची कामांना आहे त्याने वेदपतीची उपासना करावी, ज्याला इंद्रिय सुखाची लालसा आहे त्याने स्वर्गाधिपती इंद्राची पूजा करावी.  ज्याला चांगल्या मुलाबाळांची इच्छा आहे त्याने श्रेष्ठ प्रजापतीची पूजा करावी. ज्याला चांगल्या सुदैवाची अपेक्षा आहे त्याने ईहलोकाची अधिष्ठात्री दुर्गादेवीची पूजा करावी. शक्तिमान बनण्याची इच्छा असणाऱ्याने अग्निदेवाची आराधना करावी.  ज्याला केवळ धनाची इच्छा आहे त्याने वसूंची पूजा करावी.  ज्याला वीरयोद्धा होण्याची इच्छा आहे त्याने रुद्रांची उपासना करावी. अन्नधान्यांची भरभराट व्हावी अशी इच्छा असणाऱ्याने अदितीची उपासना करावी.  ज्याला स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे त्याने अदितीपुत्रांची आराधना करावी. ज्याला  ईहलोकीचे राज्य हवे आहे त्याने  विश्वदेवांची उपासना करावी. ज्याला सुदृढ शरीराची इच्छा आहे त्याने  पृथ्वीची उपासना करावी. ज्याला स्थैर्याची अभिलाषा आहे त्याने क्षितिज आणि पृथ्वी यांची एकत्र उपासना करावी. सुंदर असावे असे वाटत असेल तर गंधर्वलोकातील रहिवाशांची उपासना करावी. उत्तम पत्नीची कामना असणाऱ्याने अप्सरांची आणि उर्वशी यांची पूजा करावी. ज्याला इतरांवर अधिपत्य गाजवण्याची इच्छा आहे त्याने विश्वाधिकारी ब्रह्मदेवांची पूजा करावी. प्रसिद्धीची अपेक्षा असणाऱ्याने भगवंतांची आराधना करावी. ज्याला धनाची लालसा आहे त्याने वरूणदेवाची पूजा करावी. ज्याला विद्वान होण्याची इच्छा आहे त्याने शिवांची आराधना करावी आणि ज्याला सुखी पती पत्नी प्रेम अनुभवायचे आहे तर त्याने शिवपत्नी उमा हिची उपासना करावी." 
   अनेकानेक लोकांच्या विविध कामना पूर्ण करण्यासाठी ३३ कोटी देवतांची भगवंतांनी निर्मिती केली आहे. या मर्त्य लोकात निवास करणारा  बद्ध , अज्ञानी किंवा मूर्ख जीव उपभोग घेण्याच्या सर्वच क्षेत्रात निपुण नसतो. परंतु विविध देवीदेवतांची उपासना करून तो आपले भोग प्राप्त करू शकतो. ३३ कोटी देवतांकडून सुख प्राप्त करण्याची साधने उपलब्ध असूनही काही लोक आपल्या मनाप्रमाणे काहीतरी करू इच्छितात वा स्वनिर्मित मार्गांचा अवलंब करतात  त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नाही आणि दोष देवाला देतात.  
   हे कलियुग आहे, येथे संघटन करून , दबाव गट निर्माण करून , बेताल बडबड करून वा काही तरी पुस्तके खरडून आपल्याला देवतांकडून काहीही प्राप्त करून घेता येत नाही. येथे आरक्षण, वशिला वा अन्य मार्ग चालत नाही. 
    संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सांगतात," जो मनो मार्गे गेला तो येथेचि मुकला आणि जो हरिपाठी गेला तोची स्थिरावला।"
  अर्थात देवीदेवतांकडून आपल्याला काही प्राप्त करावयाचे असेल तर आपण आपल्या लहरीप्रमाणे वाटेल तशी मागणी करू शकत नाही. आम्ही आमच्या मानसिक तर्काने वा कुतर्काने काहीच मिळवू शकत नाही. देवतांकडून काही लाभ प्राप्त करावयाचा असेल तर भगवंतांनी सांगितलेल्या मार्गानेच आपल्याला गेले पाहिजे. स्वनिर्मित मार्गाने आम्ही काहीही प्राप्त करू शकत नाही. 
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या  द्वितीय अध्यायातील दहाव्या  श्लोकात  सांगतात -
सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोअस्त्विष्टकामधुक्।।
"सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णुंप्रीत्यर्थ, यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की,'तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील."
      इतका सोपा उपाय असताना लोक मुर्खासारखे निरर्थक प्रश्न विचारून स्वतःला आणि समाजाला सुखापासून दूर ठेवता. 
    यापुढील श्लोकात भगवान अधिक स्पष्टपणे सांगतात -
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु  वः ।
परस्परं भावयन्तः श्रेय: परमवाप्स्यथ ।।
"यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हाला ही संतुष्ट करतील  आणि याप्रमाणे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने, सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल."
युधिष्ठीर महाराज यांच्या काळात असे समृद्धीचे राज्य सर्वत्र नांदत होते. परंतु कलियुगाचा प्रारंभ होताच सर्व काही बिघडू लागले. लोक आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू लागले. त्यामुळे आताची ही भीषण परिस्थिती उद्भावली आहे. 
भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात -
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता:।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव स:।।
" विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्याने संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे". 
   आता कळले का? डोक्यात काही प्रकाश पडला का ? ३३ कोटी देवदेवता असूनही लोक का गरीब आहेत? आज समस्त जातीपातीचे अन् धर्माचे बहुसंख्य लोक, नास्तिक, राजकारणी, तथाकथीत बुद्धिजीवी, समाजवादी, साम्यवादी लोक चोरी करण्यात अग्रेसर आहेत. इतरांचा न्याय अधिकार लुबाडण्यात पुढे आहेत. मग असे चोर कसे काय सुखी राहतील?  

           तसेच लोक नास्तिकांच्या आहारी जाऊन धर्मद्रोह करतात, वेद शास्त्रांची , साधू-सजन्नांची निदा करतात. आपल्यावर उपकार करणाऱ्याची निंदानालस्ती करतात. वेद, गाय, ब्राह्मण यांनी केलेल्या कृपेची अवहेलना करून कृतघ्न होतात. माता पिता, गुरुजन वा बांधवांशी द्रोह केल्यामुळे सुद्धा गरिबी येते.
* * * * * 


मुर्खांच्या आणि धूर्तांच्या प्रश्नांना उत्तरे 


विघ्नसंतोषी, अज्ञानी, धूर्त  आणि मूर्ख लोक नेहमीच  अनावश्यक  आणि द्वेषमूलक प्रश्न विचारून समाजात नेहमीच गोंधळ घालतात. या लोकांना उत्पात निर्माण करण्यात आसुरी आनंद मिळतो. कधी यांना पैसा मिळतो म्हणून हे लोक असले प्रश्न विचारतात. तर कधी धूर्त राजकारणी आपल्या लाभासाठी असल्या कंड्या पिकवतात. काही अल्पज्ञानी असल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा फोक्त सल्ला देतात. तर काहींना वाटते की डुकरांशी कुस्ती खेळण्याने काहीही लाभ होत नाही; उलट आपणच मलीन होतो. परंतु काळ सोकावतो; याचे वेळीच खंडन केले नाही तर याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागणार नसले तरी आमच्या मुलाबाळांना आणि नातवंडांना नक्कीच लागणार आहेत. हिटलरने जूंच्या विरोधात आधी लेख लिहिले, नंतर पत्रके वाटली, पुस्तके छापली, भाषणे दिली आणि मग त्यांचे भीषण हत्याकांड घडवून आणले. त्याच मार्गाने लेनिनने रशियात साम्यवाद रुजवला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्टॅलिनने प्रत्यक्ष कृती करून आपल्याच रशियन बांधवांचे, तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त लोकांचे हत्याकांड घडून आणले. मोहमद अली जिनाने याच मार्गाचा पुरेपूर वापर करीत लक्षावधी हिंदूंचे भीषण हत्याकांड घडवून स्वतंत्र इस्लामिक असे पाकिस्तान नामक राष्ट्र जन्मास घातले. त्याच मार्गाने काश्मिरातील हिंदू पंडितांचे मुडदे पाडले आणि त्यांना काश्मिरातून हुसकावून लावले. त्याच मार्गाने ब्राह्मण विरोधी लिखाण करून त्यांचे उद्योग-धंदे, घरेदारे आणि संपत्ती लुटण्याचा मनसुबा काही जणांनी रचलेला आहे आणि त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी विकृत इतिहास प्रस्तुत करून अज्ञानी तरुणांची डोकी भडकावली जात आहेत. 
महाभारतात ( शान्तिपर्व १३८. ७९) सांगितले आहे - 
      अपि सर्वस्वमुत्सृज्य रक्षेदात्मानमात्मना ।।
'आपल्याजवळील सर्वस्वाचा त्याग करून सुद्धा माणसाने स्वःताचे रक्षण करावे.' 
सध्या सर्वस्वाचा त्याग करण्याची वेळ निकट आलेली नाही असा भास होत असला तरी आम्ही आमच्या परीने दुष्टांचे वा शंकेखोरांचे शब्दरूपी अस्त्राने  आमच्यापरीने, लहान स्वरूपात  खंडन करू इच्छितो. 
     महाभारताच्या सभापर्वात (५५. ७) सांगितले आहे -
     अल्पोअपि ह्यरिरत्यर्थं वर्धमानःपराक्रमै:।
     वल्मीको मूलज इव ग्रसते वृक्षमन्तिकात् ।।
     'शत्रू कितीही लहान असला तरी तो आपल्या पराक्रमाने वाढत जातो आणि ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाजवळ असलेले वारूळ शेवटी वृक्षाला खाऊन टाकते, त्याप्रमाणे हा वाढणारा शत्रू आपल्या प्रतिपक्षाचा नाश करतो. 

हे मूर्ख एकीकडे म्हणतात की वेद, पुराण, महाभारत, रामायण इत्यादी काल्पनिक वा भाकड कथा आहेत, मग त्याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी काही विधायक कार्य का करीत नाहीत? वस्तुतः या भाकड कथा नसून समस्त भारतीयांना एका  सूत्रात बंधू ठेवणाऱ्या भक्कम रेशीम गाठी आहेत. या गाठी तोडल्याविना भारतीयांना आपले गुलाम करता येणार नाही, हे ओळखूनच  इंग्रजांनी पद्धतशीरपणे याच्या विध्वंसासाठी बुद्धिभेद करून  मिथ्या इतिहास भारतीयांच्या गळी उतरविला आणि आपल्या तथाकथित शिक्षण पद्धतीचा फास आवळला. त्यांचीच री ओढत नंतरच्या समस्त राजकारण्यांनी हीच पद्धत चालू ठेवली आहे. 
   या शंकेखोरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही आमच्या अल्पबुद्धीनुसार प्रयत्न करीत आहोत. ज्या शुभचिंतकांना यामध्ये अधिक शास्त्रोक्त भर घालावयाची असेल तर त्यांचे मनःपूर्वक स्वागत. 


मूर्खांचे प्रश्न -


1) भारतात 33 करोड देव आणि लाखो बुवा बापू   आहेत मग भारत गरीब का आहे?
उत्तर : देव आणि गरीबीचा संबंध काय? हे या दीड शहाण्या माणसाने आधी स्पष्ट सांगावे. 
महाराष्ट्रात अकरा मराठा मुख्यमंत्री होऊनही मराठा बांधव अजूनही गरीब का आहेत? मायावती उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री होत्या परंतु केवळ त्याच आणि त्यांचे बंधू का श्रीमंत का? जगाला बसून खाऊ घालता येईल इतका गहू एकटी अमेरिका पिकवते, तरीही अमेरिका इतरांना का देत नाही? देवाचे अस्तीत्व नाकारणाऱ्या रशियादी देशात गरीब लोक का? अनेक अरबी देश प्रचंड श्रीमंत असूनही अनेक मुसलमान युरोपात निर्वासित म्हणून भीक का मागतात? अरब समस्त मुसलमानांना पोसू शकतात. 
    प्राचीन काळापासून या पृथ्वीवर चंद्रवंशी आणि सूर्यवंशी क्षत्रिय घराण्यातील सम्राट वा चक्रवर्ती राजे राज्य करीत. हे राजे वेदानुयायी होते आणि वेदांनुसार प्रामाणिकपणें राज्य चालवीत. राजा हा भगवान श्री विष्णूंचा प्रतिनिधी असल्यामुळे तो आपल्या प्रजेचे पालन आपल्या पुत्रांप्रमाणे  करीत असे. तो आपल्या धर्माचरणाने आणि चारित्र्याने सर्वांसमक्ष आदर्श ठेवून प्रजेला उत्तम नागरिक आणि भगवद्भक्त बनवीत असे. ही परंपरा अगदी १२०० वर्षांपूर्वीही अस्तित्वात होती. परंतु इस्लामी आक्रमणानंतर याचा ह्रास होऊ लागला. विदेशी लोकांचे गोडवे गाणाऱ्या धूर्तांनी  आणि मूर्खांनी लक्षपूर्वक विदेशी प्रवाशांची वर्णने वाचावीत. त्यावरून आपल्याला कळून येते की, त्या काळी  भारतात सर्व प्रकारची सुबत्ता होती. येथे कोणीही भिकारी नव्हते. येथील राजे प्रत्येक व्यक्तिला त्याच्या गुण आणि कर्मानुसार त्याला सर्वकाही प्रदान करीत.  त्याकाळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. इस्लामी आक्रमणानंतर मात्र भारतीयांची शोचनीय अवस्था झाली. लोक भिके कंगाल झाले. इस्लामशी झुंझ देत काही क्षत्रियांनी आपली संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न केला. अगदी छत्रपती शियरयांनीही आपल्या प्रजेची अशाचप्रकारे काळजी घेतली होती. परंतु इंग्रजी राजवटीत यावर वरवंटा फिरवण्यात आला. मात्र धूर्त लोक आपली कातडी वाचविण्यासाठी याचे खापर केवळ ब्राह्मणांवर फोडतात आणि स्वतःचे दोष झाकून ठेवतात. 

वस्तुतः या भूतलावरील समस्त संपत्तीचे स्वामी केवळ भगवान आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी जो वाटा ठेवला आहे त्यावर आम्ही संतुष्ट असले पाहिजे. परंतु आता सर्वच लोक स्वार्थी झाले आहेत. इतरांची फसवणूक करणे वा शोषण करणे इतकेच सर्वजण जाणतात. कोणी कोणास साहाय्य करू इच्छित नाही. समस्त राजकारणी केवळ इतरांची फसवणूक करीत आहेत आणि दोष देवाला देतात. काय, ही लबाडी  नव्हे का? आम्ही जे पेरतो तेच उगवते. आम्ही जी कर्मे केली आहेत त्याप्रमाणे आम्हाला फळ मिळणार. शिपाई आणि सेनापती दोघांनाही सारख्याच प्रमाणात वेतन मिळते का? प्राध्यापकाला आणि कारकुनाला सारखेच वेतन मिळते का? नाही ना? मग यासाठी आपण सरकारला दोष देता का? मग स्वतःचे दोष झाकण्यासाठी इतरांवर वा देवावर आरोप करणे हा कोणता न्याय आहे? 
महाभारतात (शल्यपर्व ६५. २०) सांगितले आहे -
   अध्रुवा सर्वमर्त्येषु श्रीरूपालक्ष्यते भृक्षम्।।
    ' सर्वच माणसांचे वैभव आणि ऐश्वर्य पूर्णपणे चंचल आणि न टिकणारे आहे असे दिसून येते.' 
जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले
तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार : -

 माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे
असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे
त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी
मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून माझे जीवन
नक्कीच सुखी करू शकतो

मी स्त्री व्हावे की पुरूष, 
काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण
सर्व अवयव ठिकठाक असणे, 
हे देखील माझ्या हाती नव्हते. 
मात्र जे काही मिळालेय 
त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी
घेणे, हे माझ्या हाती आहे. 
सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. 
हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे 
माझ्या आयुष्यात देखील काही 
दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती 
असावीत हे देखील ठरवण्याचा 
माझा अधिकार नाही. त्यामुळे 
माझ्या दु:खांचे भांडवल न करता, 
मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी
सकारात्मक प्रयत्न करत राहीन. 
माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, 
परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण 
नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार 
अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. 
हे विश्व मी निर्माण केलेले नाही. 
किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, 
या माझ्या मताला देखील काही किंमत 
नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का?
असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत
राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे,
अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार
नाही हे मला ठरवता येईल. 
हे ही नसे थोडके !
आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या 
पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या 
अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते 
याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला 
दूर ठेवले पाहिजे.
 मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत 
दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही 
मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी 
असले पाहिजे. जग अधिक चांगले, 
सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची 
संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, 
तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.