४. ब्राह्मणत्व
आपण ज्या ब्राह्मणांच्या न्याय्य अधिकारासाठी संघर्ष करीत आहात, त्या ब्राह्मणांपाशी ब्राह्मणत्व आहे का? केवळ बाप वा आमचे पूर्वज ब्राह्मण म्हणून मी ब्राह्मण असे स्वतःस मानणे अगदी चूक असून त्याला वेदशास्त्रांचा कोणताही आधार नाही.
भगवान श्रीकृष्णांचे साहित्यिक अवतार श्री वेदव्यास आपला पुत्र शुकदेव गोस्वामींना सांगतात -
ब्राह्मण्यं बहुभिरवाप्यते तपोभिस्
तल्लब्ध्वा न रतिपरेण हेलितव्यम् ।
स्वाध्याये तपासि दमे च नित्ययुक्त:
क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व ।।
'अनेक प्रकारे तप करावे तेव्हा ब्राह्मणत्व मिळते. ते लाभल्यावर उपभोगाच्या मागे लागून ते ब्राह्मणत्व वाया घालवू नये. ज्याला स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा असेल, त्याने वेदाभ्यास, तप आणि इंद्रियसंयम यांमध्ये दक्ष राहावे आणि सत्कर्म करण्यासाठी झटून प्रयन्त करावा.' - महाभारत १२. ३२१. २४
श्री वेदव्यास स्पष्टपणे सांगतात की तप केल्यानेच ब्राह्मणत्व मिळते. अर्थात ब्राह्मणत्व जन्मावर अवलंबून नसते. त्यासाठी तपश्चर्या करणे अत्यंत आवश्यक असते. केवळ गळ्यात जानवे घातले म्हणून ब्राह्मण होत नाही. क्षत्रिय राजपरिवारात जन्मलेल्या विश्वामित्रांनी कठोर तपश्चर्या करून ब्राह्मणत्व प्राप्त केले होते. भगवंतांचे एक अवतार भगवान ऋषभदेव यांना शंभर पुत्र झाले. त्यांतील काही क्षत्रिय झाले, नऊ योगेंद्र आणि अन्य काही पुत्र ब्राह्मण झाले होते. या सर्वांना ब्राह्मणत्व तपश्चर्येने प्राप्त झाले.
येथे ब्राह्मणत्व मिळविण्यासाठी तप करण्याचा निर्देश श्री व्यासदेव करीत आहे आणि हे तप म्हणजे काय? तप म्हणजे सप्ताहातील एखाद्या वारी आपल्या आवडीच्या देवासाठी केळी खाणे, दूध पिणे वा साबुदाण्याची खिचडी खाणे आणि रात्री भोजन करणे! अशा प्रकारचा उपवास म्हणजे तप! पायी अनवाणी जाणे, डोक्यावरचे केस कापणे म्हणजे तप! वनात वा पर्वतावर निवास करणे म्हणजे तप! परंतु असे काही तरी करणे म्हणजे तप नव्हे. तपाविषयी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात सात्त्विक, राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकार सांगतात. ते असे -
शारीरिक तप
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शरीरं तप उच्यते ।।
'भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि मातापित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते.
वैदिक संस्कृतीनुसार आर्य अर्थात सभ्य मनुष्याने प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर अर्थात सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठावे. दंत धावन, मुखमार्जन आणि स्नानादी कृत्ये करून योग-प्राणायामाद्वारे शरीराचे बाह्य शुद्धीकरण करावे. स्वच्छ धोतर आणि उपरणे परिधान करून कपाळावर आणि शरीरावर गोपीचंदनाचा ऊर्ध्वपुंड्र टिळक धारण करावा. त्यानंतर मनोभावे भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अवतारांच्या अर्चाविग्रहांचे पंचामृत अभिषेकाद्वारे पंचोपचार वा षोडषोपचार पूजन करावे. भगवंतांना नैवेद्य, धुप-दीप अर्पण करावा. त्यांना साष्टांग प्रणाम करावा. अशा प्रकारे भगवत्सेवा करणे म्हणजे शारीरिक तप होय.
आध्यात्मिक गुरूंच्या चरणकमळांना वंदन करणे, त्यांची चरणसेवा करणे, त्यांचे पूजन करणे हे सुद्धा आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी गुरुसेवा करण्यासाठी गुरु वपू (शरीर) रूपात भेटतीलच असे नाही. त्या वेळी आम्ही त्यांच्या चित्राचे पूजन करू शकतो आणि त्याहून श्रेष्ठ आहे त्यांच्या आदेशांचे अनुशीलन करणे. भगवान श्रीकृष्ण सांगतात -
तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाय ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।।
आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्त्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्त्व जाणलेले असते. भगवद्गीता ४.३४
आध्यात्मिक गुरूंप्रमाणेच माता-पिता आणि वडिलधाऱ्यांची सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे. रामायण-महाभारतात वृद्धजनांच्या सेवा लाभाचे वर्णन पहावयास मिळते. या सर्वांचे सार सूत्र रूपाने चाणक्य पंडित सांगतात - अथ वृद्धोपसेवया ।
वेदज्ञानहीन अशा प्रत्येक तरुणाला वृद्धांचा तिटकारा येतो. त्यांचा असा भ्रम असतो की, आपण कधीच वृद्ध होणार नाही. आज अनेक लोक माता-पिता जिवंत असताना त्यांना अनेक प्रकारे क्लेश देतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रतिमांना भिंतीवर टांगून मोठे पुष्पहार घालून सुगंधी अगरबत्ती ओवाळतात. मग अशा प्रकारे दांभिकता प्रदर्शित करण्यात काय अर्थ आहे?
वस्तुतः माता-पिता जिवंत असताना आपण त्यांची सेवा केली पाहिजे. जसे प्रातःकाळी उठताच त्यांच्या चरणांना स्पर्श करून वंदन करणे. दिवसा शक्य होईल तेवढी सेवा आणि आज्ञा पालन करणे. रात्री त्यांचे पाय चेपणे. महाभारतात सांगितले आहे की, जो कोणी आपल्या माता-पित्याचे पाय चेपतो त्याच्यापासून व्याधी दूर पळून जाते.
ब्राह्मणाने स्वतःमध्ये पावित्र्य राखण्यासाठी दिवसातून तीन वेळा किंवा निदान प्रातःकाळी एकदा तरी स्नान करणे परम आवश्यक आहे. तसेच हृदयातील मलीनता नष्ट होण्यासाठी हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या महामंत्राचा जप केला पाहिजे. निरंतर हरिनाम जपामुळे अनेक दुर्गुण नष्ट होऊन मन पवित्र बनते आणि हृदयातील कपटीपणा, दुष्टपणा इत्यादी नष्ट होऊन सरळपणा प्राप्त होतो.
उपनयन संस्कारानंतर गुरुकुलात जाऊन योग्य गुरूंच्या मार्ग-दर्शनाखाली ब्रह्मचर्याचे शिक्षण घेतलेला मनुष्य सभ्य होत असे. त्यांनतर पंचविसाव्या वर्षी विवाहानंतर केवळ पुत्रप्राप्तीसाठी पत्नीशी संग करणारा उत्तम मनुष्य बाकीच्या वेळी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत असे.
आज गांधींमुळे अहिंसा हा शब्द टिंगल-टवाळीचा विषय झाला आहे. परंतु 'अहिंसा परमो धर्म' हा वेदशास्त्रांचा निर्णय आहे. त्यामुळे अहिंसेचे प्रतिपादन श्रीकृष्णांनी केलेले आहे. आता कोणालाही आश्चर्य वाटेल की, शारीरिक तप सांगणाऱ्या श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या धर्मभूमीवर अर्जुनाला हिंसा करण्यासाठी प्रेरित केले होतेच ना? परंतु हे ध्यानात ठेवले पाहिजे की, हिंसा ही अत्यावश्यक प्रसंगीत करावयाची असते. ऊठसूठ प्रत्येक क्षणी हिंसा करणे चांगले नाही. पशुहिंसा तर नाहीच नाही.
ब्राह्मणांनी हिंसक बनावे यासाठी आज ब्रिगेडी वृत्ताचे लोक ब्राह्मणांना शिव्या घालत आहेत. तर दोन-चार जन्म-ब्राह्मणही पैशाच्या लोभापायी ब्राह्मण निंदा करून द्वेष पसरवीत आहेत. तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्येचे खापर ब्राह्मणांवर फोडत आहेत. त्यांच्या या नीच वृत्तीमुळे उद्वेगाने वा क्रोधाने एखाद्या ब्राह्मणाने त्यांच्या विरुद्ध काहीतरी हिंसक कृत्य म्हणजे समस्त ब्राह्मण समाजाला लक्ष्य करून त्यांना संपविण्याची आयतीच संधी मिळेल. परंतु बुद्धिमान ब्राह्मणांनी संयम पळून श्रीकृष्णप्रणित अहिंसेचा अंगीकार केला आणि सदैव केवळ भगवंतांवरच अवलंबून राहिले, तर भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण आपल्या आश्रितांचे निश्चित रक्षण करतील.
कधी कधी आत्यंतिक हिंसा टाळण्यासाठी क्षत्रियांना काही प्रमाणात हिंसा करून दुष्टांचे निर्दालन करावे लागते. जसे छत्रपती श्रीशिवरायांनी केले होते. त्यांनी कधीच अनावश्यक हिंसा (कत्तल) केली नाही.
वाचिक ताप
वाचिक तप आपल्या जिभेने करावयाचे असते. हे तप शारीरिक तपापेक्षा कठीण असते. आपल्यामध्ये बडबड करण्याची पुष्कळच वाईट सवय असते. वाचिक तपात सर्वप्रथम येते सत्य. ब्राह्मणाने सदैव सत्यवचनी असावे. समर्थ रामदास स्वामी सांगतात - मना सत्य संकल्प जीवी धरावा. सत्याची कास कधीही सोडू नये.
एकदा एक बालक गौतम ऋषींच्या गुरूलात अध्ययनासाठी येतो. त्या वेळी गौतम ऋषि त्याच्या पित्याचे नाव आणि गोत्र याविषयी चौकशी करतात. त्या बालकाला याविषयी ज्ञान नसते त्यामुळे तो आपल्या मातेकडे जाऊन विचारतो आणि आपल्या गुरूंना येऊन सांगतो की, 'माझी माता दासी असून तिचा अनेक पुरुषांशी संपर्क आल्यामुळे तिला माहित नाही की माझे पिता कोण आहेत.' त्या बालकाचे सत्य वचन ऐकून गौतम ऋषि त्याला सांगतात की, 'तू खरा ब्राह्मण आहेस.' सत्य बोलतो तोच ब्राह्मण असतो.
कधी कधी स्वप्राण रक्षणार्थ, धर्मरक्षणार्थ वा गोमातेचे रक्षण करण्यासाठी असत्य बोलावे लागते. स्वबांधव वा राष्ट्र रक्षणार्थ शत्रूला भ्रमीत करण्यासाठी खोटे बोलावे लागते. अशा असत्यालासुद्धा सत्यच संबोधले जाते.
वाचिक तापत सत्यापेक्षा कठीण आहे प्रिय बोलणे. महाभारत सांगते -
सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यप्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयादेश धर्म सनातनः ।।
सत्य बोलावे, प्रिय बोलावे. जे सत्य तर आहे पण प्रिय नाही, असे वचन बोलू नये; त्याचप्रमाणे जे ऐकण्यास गोड, मात्र असत्य असेल तर तसेही बोलू नये हाच सनातन धर्म आहे.'
ब्राह्मणाने सत्य बोलले पाहिजे. प्रिय बोलले पाहिजे आणि हितकारक बोलले पाहिजे.
ब्राह्मणाला पुरोहित असेही संबोधले जाते. अर्थात जो आपल्या यजमानाचे वा समाजाचे हित पुढे ठेवतो, त्याला पुरोहित म्हणतात.
प्राचीन काळापासून थोर ऋषिमुनींनी सदैव समाजाचे हितचिंतन केलेले आहे. त्याचप्रमाणे समस्त आचार्य, संत-सज्जनांनी सदैव हितकारक वाणीचे उच्चारण केले आहे. त्याचप्रमाणे अर्वाचीन काळातील क्रांतिकारकांनी समस्त देशबांधवांचे हितरक्षण करण्यासाठी आत्मबलिदान केलेले आहे.
ब्राह्मणाने सदैव वेदशास्त्रांचे प्रमाण देऊन कोणालाही प्रक्षुब्ध न करता बोलावे. इत्यादी सर्व प्रकारचे वाचिक तप आहे.
आज नासासारख्या अंतराळ संशोधन संस्था असो वा ब्रिटनमधील शाळा, त्यातून गोरे लोक संस्कृत शिकत आहेत. मग आम्ही ब्राह्मणांनी वेदपठण का करू नये?
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत (१५.१५) सांगतात -
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ।।
सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेश मी वेदान्ताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.
ज्याला स्वतःचे आणि समाजाचे कल्याण साधावयाचे आहे त्याने वेद - पठणाद्वारे श्रीकृष्णांना जाणले पाहिजे. त्याने नियमितपणे वेदोत्त मंत्र आणि सूक्ते यांचे पठण, मनन आणि चिंतन केले पाहिजे. त्याने निरर्थक गोष्टींविषयी बडबड न करता स्वतःला वाचिक तपात मग्न करावे. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या ब्राह्मणांसाठी हितोपदेशमध्ये सांगितले आहे -
काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् ।
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ।।
बुद्धिमान व्यक्तींचा वेळ काव्य आणि शास्त्रविचार करण्यात जातो, मूर्खांचा काळ मात्र व्यसन, निद्रा आणि भांडण्यात जातो.
अशा प्रकारे स्वतःला बुद्धिमान मानणाऱ्या ब्राह्मणाने मनोकल्पित कादंबऱ्या, नाटके, चित्रपटातील गाणी इत्यादी न गाता केवळ भगवंतां-विषयी गुणगान केले पाहिजे.
मानसिक तप
शारीरिक तथा वाचिक तपानंतर भगवान श्रीकृष्ण मानसिक तप सांगतात -
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ।।
समाधान, सरळपणा, गांभार्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहे.
कोणत्याही प्रकारच्या इंद्रियभोगापासून मनाला विरक्त ठेवणे म्हणजे मानसिक तप होय. मन, माकड आणि लहान मूल यांना नियंत्रणात ठेवणे अतिशय कठीण असते. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो -
चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत्द्दढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।
हे कृष्ण! मन हे चंचल, उच्छ्रंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही
अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. भगवद्गीता ६.३४
अर्जुनाचे म्हणणे अगदी खरे आहे. त्यामुळे मानसिक तप करणे अतिशय कठीण होते. त्यामुळे या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात -
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ।।
असंयतात्मना योगो द्रुष्प्राप इति मे मति: ।
वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः ।।
हे महाबाहू कौंतेया ! चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत
कठीण आहे; पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्छ्रंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कारी होणे कठीण आहे. ज्याचे मन संयमित आहे आणि योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो, त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. भगवद्गीता ६.३५/३६
अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या वचनांचा गांभीर्याने अभ्यास केला तरच आम्हाला समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी यांची प्राप्ती होईल. या मानसिक तपासाठी मनाला सदैव श्रीकृष्णांच्या सेवेत संलग्न ठेवले पाहिजे. श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी विविध सेवा शास्त्रांतून सांगितलेल्या आहेत. या सर्व सेवांमध्ये त्यांच्या पवित्र नामांचा जप करणे सर्वोच्च सेवा आहे आणि कलियुगात या नामजपालाच प्राधान्य आले आहे. कलियुगाच्या समस्त किल्मिषातून मनाला मुक्त ठेवण्याविषयी ब्रह्मदेवांनी नारद मुनींना कलिसंतरण उपनिषदात हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। हा सोळा अक्षरी महामंत्र सांगितला आहे. 'महा' म्हणजे मोठा आणि 'मंत्र' म्हणजे मनाला मुक्त करणारा. तर कलियुगाच्या सर्व दोषांतून मनाला मुक्त करण्याचे कार्य हा हरे कृष्ण महामंत्र करतो. या महामंत्रात समस्त वेदमंत्रांचे सार समाविष्ट असून भगवान श्रीकृष्णांनी या नामातच आपला अवतार प्रकट केला आहे. भगवंतांनी आपली संपूर्ण शक्ती या महामंत्रात समाविष्ट केलेली आहे.
मागील तीन श्लोकांवरून आपल्याला ज्ञात झाले की, ब्राह्मणांनी शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशी ही तीन तपे केली पाहिजेत.
या नंतर भगवान श्रीकृष्ण सात्त्विक, राजसिक आणि तामसिक तपाविषयी सांगतात -
सात्त्विक तप
श्रद्धया परयातप्तं तपस्तत्त्रिविधं नरै: ।
अफलाकांक्षिभिर्युक्तै: सात्त्विकं परीचक्षते ।।
भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या आणि केवळ परमेश्वराप्रीत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रध्देने केलेल्या या त्रिविध तपाला सात्त्विक तप असे म्हणतात. - भगवद्गीता १७. १७
राजसिक तप
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ।।
सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते, त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. - भगवद्गीता १७. १८
अनेकदा सर्वसामान्य अल्पबुद्धी जनतेला आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक प्रकारचे बाबा, बुवा, अम्मा इत्यादी तथाकथित धार्मिक लोक आपल्या तपस्येची वार्ता सर्वत्र पसरवितात आणि त्यांच्या कोमल श्रद्धेचा लाभ उठवून स्वतःची पूजा करवून घेतात. आपले पाय धुवून घेणे, आरती करून घेणे वा शोभायात्रा काढणे इत्यादी कृत्रिम योजनांद्वारे आपला मान-सन्मान घडवून आणतात. या सर्व राजसिक कृत्यांमागे एकच हेतू असतो धनप्राप्ती! चित्रपटातील नट-नाट्या, खेळाडू यांचाही यात भरणा असतो.
तामसिक तप
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ।।
आत्म- पीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मुर्खपणे जी तपे केली जातात, त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते. - भगवद्गीता १७. १९
प्राचीन काळी हिरण्यकशिपू वा रावण या ब्राह्मणपुत्र राक्षसांनी भीषण तप केले होते. त्यांचा उद्देश केवळ इतरांना पीडा देणे असा होता. वृकासुर वा भस्मासुर यांनीसुद्धा तपस्या कशासाठी केली होती? तर भगवान शंकरांचा नाश करून पार्वतीचा भोग करण्यासाठी! देवतांचा नाश सर्व भोग स्वतःच भोगण्यासाठी असुर भयंकर तप करतात. जरा राजकारणी, नट, खेळाडू वा उद्योगपतींकडे बघा! हे लोक आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी पायी चालत जातात. वेगवेगळी व्रते करतात; परंतु शेवटी भगवान श्रीकृष्ण अशा तमोगुणी असुरांचा नाश करतात.
तरी बुद्धिमान मनुष्याने वेदाध्ययन, सात्त्विक तप आणि इंद्रियसंयम यांमध्ये रत राहून आणि सत्कर्मे करून सर्वांचे हित साधावे.
* * * * *
स्वाध्याये तपासि दमे च नित्ययुक्त:
क्षेमार्थी कुशलपरः सदा यतस्व ।।
'अनेक प्रकारे तप करावे तेव्हा ब्राह्मणत्व मिळते. ते लाभल्यावर उपभोगाच्या मागे लागून ते ब्राह्मणत्व वाया घालवू नये. ज्याला स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा असेल, त्याने वेदाभ्यास, तप आणि इंद्रियसंयम यांमध्ये दक्ष राहावे आणि सत्कर्म करण्यासाठी झटून प्रयन्त करावा.' - महाभारत १२. ३२१. २४
श्री वेदव्यास स्पष्टपणे सांगतात की तप केल्यानेच ब्राह्मणत्व मिळते. अर्थात ब्राह्मणत्व जन्मावर अवलंबून नसते. त्यासाठी तपश्चर्या करणे अत्यंत आवश्यक असते. केवळ गळ्यात जानवे घातले म्हणून ब्राह्मण होत नाही. क्षत्रिय राजपरिवारात जन्मलेल्या विश्वामित्रांनी कठोर तपश्चर्या करून ब्राह्मणत्व प्राप्त केले होते. भगवंतांचे एक अवतार भगवान ऋषभदेव यांना शंभर पुत्र झाले. त्यांतील काही क्षत्रिय झाले, नऊ योगेंद्र आणि अन्य काही पुत्र ब्राह्मण झाले होते. या सर्वांना ब्राह्मणत्व तपश्चर्येने प्राप्त झाले.
येथे ब्राह्मणत्व मिळविण्यासाठी तप करण्याचा निर्देश श्री व्यासदेव करीत आहे आणि हे तप म्हणजे काय? तप म्हणजे सप्ताहातील एखाद्या वारी आपल्या आवडीच्या देवासाठी केळी खाणे, दूध पिणे वा साबुदाण्याची खिचडी खाणे आणि रात्री भोजन करणे! अशा प्रकारचा उपवास म्हणजे तप! पायी अनवाणी जाणे, डोक्यावरचे केस कापणे म्हणजे तप! वनात वा पर्वतावर निवास करणे म्हणजे तप! परंतु असे काही तरी करणे म्हणजे तप नव्हे. तपाविषयी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायात सात्त्विक, राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकार सांगतात. ते असे -
शारीरिक तप
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शरीरं तप उच्यते ।।
'भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि मातापित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते.
वैदिक संस्कृतीनुसार आर्य अर्थात सभ्य मनुष्याने प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर अर्थात सूर्योदयापूर्वी दीड तास आधी उठावे. दंत धावन, मुखमार्जन आणि स्नानादी कृत्ये करून योग-प्राणायामाद्वारे शरीराचे बाह्य शुद्धीकरण करावे. स्वच्छ धोतर आणि उपरणे परिधान करून कपाळावर आणि शरीरावर गोपीचंदनाचा ऊर्ध्वपुंड्र टिळक धारण करावा. त्यानंतर मनोभावे भगवान श्री विष्णू, श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अवतारांच्या अर्चाविग्रहांचे पंचामृत अभिषेकाद्वारे पंचोपचार वा षोडषोपचार पूजन करावे. भगवंतांना नैवेद्य, धुप-दीप अर्पण करावा. त्यांना साष्टांग प्रणाम करावा. अशा प्रकारे भगवत्सेवा करणे म्हणजे शारीरिक तप होय.
आध्यात्मिक गुरूंच्या चरणकमळांना वंदन करणे, त्यांची चरणसेवा करणे, त्यांचे पूजन करणे हे सुद्धा आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी गुरुसेवा करण्यासाठी गुरु वपू (शरीर) रूपात भेटतीलच असे नाही. त्या वेळी आम्ही त्यांच्या चित्राचे पूजन करू शकतो आणि त्याहून श्रेष्ठ आहे त्यांच्या आदेशांचे अनुशीलन करणे. भगवान श्रीकृष्ण सांगतात -
तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवाय ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।।
आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्त्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्त्व जाणलेले असते. भगवद्गीता ४.३४
आध्यात्मिक गुरूंप्रमाणेच माता-पिता आणि वडिलधाऱ्यांची सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे. रामायण-महाभारतात वृद्धजनांच्या सेवा लाभाचे वर्णन पहावयास मिळते. या सर्वांचे सार सूत्र रूपाने चाणक्य पंडित सांगतात - अथ वृद्धोपसेवया ।
वेदज्ञानहीन अशा प्रत्येक तरुणाला वृद्धांचा तिटकारा येतो. त्यांचा असा भ्रम असतो की, आपण कधीच वृद्ध होणार नाही. आज अनेक लोक माता-पिता जिवंत असताना त्यांना अनेक प्रकारे क्लेश देतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रतिमांना भिंतीवर टांगून मोठे पुष्पहार घालून सुगंधी अगरबत्ती ओवाळतात. मग अशा प्रकारे दांभिकता प्रदर्शित करण्यात काय अर्थ आहे?
वस्तुतः माता-पिता जिवंत असताना आपण त्यांची सेवा केली पाहिजे. जसे प्रातःकाळी उठताच त्यांच्या चरणांना स्पर्श करून वंदन करणे. दिवसा शक्य होईल तेवढी सेवा आणि आज्ञा पालन करणे. रात्री त्यांचे पाय चेपणे. महाभारतात सांगितले आहे की, जो कोणी आपल्या माता-पित्याचे पाय चेपतो त्याच्यापासून व्याधी दूर पळून जाते.
ब्राह्मणाने स्वतःमध्ये पावित्र्य राखण्यासाठी दिवसातून तीन वेळा किंवा निदान प्रातःकाळी एकदा तरी स्नान करणे परम आवश्यक आहे. तसेच हृदयातील मलीनता नष्ट होण्यासाठी हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। या महामंत्राचा जप केला पाहिजे. निरंतर हरिनाम जपामुळे अनेक दुर्गुण नष्ट होऊन मन पवित्र बनते आणि हृदयातील कपटीपणा, दुष्टपणा इत्यादी नष्ट होऊन सरळपणा प्राप्त होतो.
उपनयन संस्कारानंतर गुरुकुलात जाऊन योग्य गुरूंच्या मार्ग-दर्शनाखाली ब्रह्मचर्याचे शिक्षण घेतलेला मनुष्य सभ्य होत असे. त्यांनतर पंचविसाव्या वर्षी विवाहानंतर केवळ पुत्रप्राप्तीसाठी पत्नीशी संग करणारा उत्तम मनुष्य बाकीच्या वेळी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत असे.
आज गांधींमुळे अहिंसा हा शब्द टिंगल-टवाळीचा विषय झाला आहे. परंतु 'अहिंसा परमो धर्म' हा वेदशास्त्रांचा निर्णय आहे. त्यामुळे अहिंसेचे प्रतिपादन श्रीकृष्णांनी केलेले आहे. आता कोणालाही आश्चर्य वाटेल की, शारीरिक तप सांगणाऱ्या श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या धर्मभूमीवर अर्जुनाला हिंसा करण्यासाठी प्रेरित केले होतेच ना? परंतु हे ध्यानात ठेवले पाहिजे की, हिंसा ही अत्यावश्यक प्रसंगीत करावयाची असते. ऊठसूठ प्रत्येक क्षणी हिंसा करणे चांगले नाही. पशुहिंसा तर नाहीच नाही.
ब्राह्मणांनी हिंसक बनावे यासाठी आज ब्रिगेडी वृत्ताचे लोक ब्राह्मणांना शिव्या घालत आहेत. तर दोन-चार जन्म-ब्राह्मणही पैशाच्या लोभापायी ब्राह्मण निंदा करून द्वेष पसरवीत आहेत. तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्येचे खापर ब्राह्मणांवर फोडत आहेत. त्यांच्या या नीच वृत्तीमुळे उद्वेगाने वा क्रोधाने एखाद्या ब्राह्मणाने त्यांच्या विरुद्ध काहीतरी हिंसक कृत्य म्हणजे समस्त ब्राह्मण समाजाला लक्ष्य करून त्यांना संपविण्याची आयतीच संधी मिळेल. परंतु बुद्धिमान ब्राह्मणांनी संयम पळून श्रीकृष्णप्रणित अहिंसेचा अंगीकार केला आणि सदैव केवळ भगवंतांवरच अवलंबून राहिले, तर भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण आपल्या आश्रितांचे निश्चित रक्षण करतील.
कधी कधी आत्यंतिक हिंसा टाळण्यासाठी क्षत्रियांना काही प्रमाणात हिंसा करून दुष्टांचे निर्दालन करावे लागते. जसे छत्रपती श्रीशिवरायांनी केले होते. त्यांनी कधीच अनावश्यक हिंसा (कत्तल) केली नाही.
वाचिक ताप
वाचिक तप आपल्या जिभेने करावयाचे असते. हे तप शारीरिक तपापेक्षा कठीण असते. आपल्यामध्ये बडबड करण्याची पुष्कळच वाईट सवय असते. वाचिक तपात सर्वप्रथम येते सत्य. ब्राह्मणाने सदैव सत्यवचनी असावे. समर्थ रामदास स्वामी सांगतात - मना सत्य संकल्प जीवी धरावा. सत्याची कास कधीही सोडू नये.
एकदा एक बालक गौतम ऋषींच्या गुरूलात अध्ययनासाठी येतो. त्या वेळी गौतम ऋषि त्याच्या पित्याचे नाव आणि गोत्र याविषयी चौकशी करतात. त्या बालकाला याविषयी ज्ञान नसते त्यामुळे तो आपल्या मातेकडे जाऊन विचारतो आणि आपल्या गुरूंना येऊन सांगतो की, 'माझी माता दासी असून तिचा अनेक पुरुषांशी संपर्क आल्यामुळे तिला माहित नाही की माझे पिता कोण आहेत.' त्या बालकाचे सत्य वचन ऐकून गौतम ऋषि त्याला सांगतात की, 'तू खरा ब्राह्मण आहेस.' सत्य बोलतो तोच ब्राह्मण असतो.
कधी कधी स्वप्राण रक्षणार्थ, धर्मरक्षणार्थ वा गोमातेचे रक्षण करण्यासाठी असत्य बोलावे लागते. स्वबांधव वा राष्ट्र रक्षणार्थ शत्रूला भ्रमीत करण्यासाठी खोटे बोलावे लागते. अशा असत्यालासुद्धा सत्यच संबोधले जाते.
वाचिक तापत सत्यापेक्षा कठीण आहे प्रिय बोलणे. महाभारत सांगते -
सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यप्रियम् ।
प्रियं च नानृतं ब्रूयादेश धर्म सनातनः ।।
सत्य बोलावे, प्रिय बोलावे. जे सत्य तर आहे पण प्रिय नाही, असे वचन बोलू नये; त्याचप्रमाणे जे ऐकण्यास गोड, मात्र असत्य असेल तर तसेही बोलू नये हाच सनातन धर्म आहे.'
ब्राह्मणाने सत्य बोलले पाहिजे. प्रिय बोलले पाहिजे आणि हितकारक बोलले पाहिजे.
ब्राह्मणाला पुरोहित असेही संबोधले जाते. अर्थात जो आपल्या यजमानाचे वा समाजाचे हित पुढे ठेवतो, त्याला पुरोहित म्हणतात.
प्राचीन काळापासून थोर ऋषिमुनींनी सदैव समाजाचे हितचिंतन केलेले आहे. त्याचप्रमाणे समस्त आचार्य, संत-सज्जनांनी सदैव हितकारक वाणीचे उच्चारण केले आहे. त्याचप्रमाणे अर्वाचीन काळातील क्रांतिकारकांनी समस्त देशबांधवांचे हितरक्षण करण्यासाठी आत्मबलिदान केलेले आहे.
ब्राह्मणाने सदैव वेदशास्त्रांचे प्रमाण देऊन कोणालाही प्रक्षुब्ध न करता बोलावे. इत्यादी सर्व प्रकारचे वाचिक तप आहे.
आज नासासारख्या अंतराळ संशोधन संस्था असो वा ब्रिटनमधील शाळा, त्यातून गोरे लोक संस्कृत शिकत आहेत. मग आम्ही ब्राह्मणांनी वेदपठण का करू नये?
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत (१५.१५) सांगतात -
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ।।
सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेश मी वेदान्ताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.
ज्याला स्वतःचे आणि समाजाचे कल्याण साधावयाचे आहे त्याने वेद - पठणाद्वारे श्रीकृष्णांना जाणले पाहिजे. त्याने नियमितपणे वेदोत्त मंत्र आणि सूक्ते यांचे पठण, मनन आणि चिंतन केले पाहिजे. त्याने निरर्थक गोष्टींविषयी बडबड न करता स्वतःला वाचिक तपात मग्न करावे. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या ब्राह्मणांसाठी हितोपदेशमध्ये सांगितले आहे -
काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम् ।
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ।।
बुद्धिमान व्यक्तींचा वेळ काव्य आणि शास्त्रविचार करण्यात जातो, मूर्खांचा काळ मात्र व्यसन, निद्रा आणि भांडण्यात जातो.
अशा प्रकारे स्वतःला बुद्धिमान मानणाऱ्या ब्राह्मणाने मनोकल्पित कादंबऱ्या, नाटके, चित्रपटातील गाणी इत्यादी न गाता केवळ भगवंतां-विषयी गुणगान केले पाहिजे.
मानसिक तप
शारीरिक तथा वाचिक तपानंतर भगवान श्रीकृष्ण मानसिक तप सांगतात -
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ।।
समाधान, सरळपणा, गांभार्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहे.
कोणत्याही प्रकारच्या इंद्रियभोगापासून मनाला विरक्त ठेवणे म्हणजे मानसिक तप होय. मन, माकड आणि लहान मूल यांना नियंत्रणात ठेवणे अतिशय कठीण असते. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो -
चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत्द्दढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।
हे कृष्ण! मन हे चंचल, उच्छ्रंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही
अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. भगवद्गीता ६.३४
अर्जुनाचे म्हणणे अगदी खरे आहे. त्यामुळे मानसिक तप करणे अतिशय कठीण होते. त्यामुळे या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात -
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ।।
असंयतात्मना योगो द्रुष्प्राप इति मे मति: ।
वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः ।।
हे महाबाहू कौंतेया ! चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत
कठीण आहे; पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्छ्रंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कारी होणे कठीण आहे. ज्याचे मन संयमित आहे आणि योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो, त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. भगवद्गीता ६.३५/३६
अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या वचनांचा गांभीर्याने अभ्यास केला तरच आम्हाला समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी यांची प्राप्ती होईल. या मानसिक तपासाठी मनाला सदैव श्रीकृष्णांच्या सेवेत संलग्न ठेवले पाहिजे. श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी विविध सेवा शास्त्रांतून सांगितलेल्या आहेत. या सर्व सेवांमध्ये त्यांच्या पवित्र नामांचा जप करणे सर्वोच्च सेवा आहे आणि कलियुगात या नामजपालाच प्राधान्य आले आहे. कलियुगाच्या समस्त किल्मिषातून मनाला मुक्त ठेवण्याविषयी ब्रह्मदेवांनी नारद मुनींना कलिसंतरण उपनिषदात हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।। हा सोळा अक्षरी महामंत्र सांगितला आहे. 'महा' म्हणजे मोठा आणि 'मंत्र' म्हणजे मनाला मुक्त करणारा. तर कलियुगाच्या सर्व दोषांतून मनाला मुक्त करण्याचे कार्य हा हरे कृष्ण महामंत्र करतो. या महामंत्रात समस्त वेदमंत्रांचे सार समाविष्ट असून भगवान श्रीकृष्णांनी या नामातच आपला अवतार प्रकट केला आहे. भगवंतांनी आपली संपूर्ण शक्ती या महामंत्रात समाविष्ट केलेली आहे.
मागील तीन श्लोकांवरून आपल्याला ज्ञात झाले की, ब्राह्मणांनी शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशी ही तीन तपे केली पाहिजेत.
या नंतर भगवान श्रीकृष्ण सात्त्विक, राजसिक आणि तामसिक तपाविषयी सांगतात -
सात्त्विक तप
श्रद्धया परयातप्तं तपस्तत्त्रिविधं नरै: ।
अफलाकांक्षिभिर्युक्तै: सात्त्विकं परीचक्षते ।।
भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या आणि केवळ परमेश्वराप्रीत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रध्देने केलेल्या या त्रिविध तपाला सात्त्विक तप असे म्हणतात. - भगवद्गीता १७. १७
राजसिक तप
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ।।
सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते, त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. - भगवद्गीता १७. १८
अनेकदा सर्वसामान्य अल्पबुद्धी जनतेला आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक प्रकारचे बाबा, बुवा, अम्मा इत्यादी तथाकथित धार्मिक लोक आपल्या तपस्येची वार्ता सर्वत्र पसरवितात आणि त्यांच्या कोमल श्रद्धेचा लाभ उठवून स्वतःची पूजा करवून घेतात. आपले पाय धुवून घेणे, आरती करून घेणे वा शोभायात्रा काढणे इत्यादी कृत्रिम योजनांद्वारे आपला मान-सन्मान घडवून आणतात. या सर्व राजसिक कृत्यांमागे एकच हेतू असतो धनप्राप्ती! चित्रपटातील नट-नाट्या, खेळाडू यांचाही यात भरणा असतो.
तामसिक तप
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ।।
आत्म- पीडा करवून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मुर्खपणे जी तपे केली जातात, त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते. - भगवद्गीता १७. १९
प्राचीन काळी हिरण्यकशिपू वा रावण या ब्राह्मणपुत्र राक्षसांनी भीषण तप केले होते. त्यांचा उद्देश केवळ इतरांना पीडा देणे असा होता. वृकासुर वा भस्मासुर यांनीसुद्धा तपस्या कशासाठी केली होती? तर भगवान शंकरांचा नाश करून पार्वतीचा भोग करण्यासाठी! देवतांचा नाश सर्व भोग स्वतःच भोगण्यासाठी असुर भयंकर तप करतात. जरा राजकारणी, नट, खेळाडू वा उद्योगपतींकडे बघा! हे लोक आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी पायी चालत जातात. वेगवेगळी व्रते करतात; परंतु शेवटी भगवान श्रीकृष्ण अशा तमोगुणी असुरांचा नाश करतात.
तरी बुद्धिमान मनुष्याने वेदाध्ययन, सात्त्विक तप आणि इंद्रियसंयम यांमध्ये रत राहून आणि सत्कर्मे करून सर्वांचे हित साधावे.
* * * * *