गुरुवार, ३० मार्च, २०१७

      शाळेत न गेलेले श्रीशिवराय छत्रपती झाले!


भ्रमणध्वनीच्या शोधामुळे जग अधिकच जवळ आलेले आहे यात शंकाच नाही. त्याचा चांगल्याप्रकारे वापर कसा करावा याची बुद्धिमत्ता नसल्यामुळे दुरुपयोग अधिक प्रमाणात होत आहे. या भ्रमणध्वनीतील  व्हाट्स अँपमुळे तर बरीच धमाल उडवली जाते. द्वेष, मत्सर वा अफवाही पसरवल्या जातात. या अँपमुळे छत्रपती शिवरायांचा गुणगौरवही मोठ्या  प्रमाणात पसरवीला जात आहे. अनेक वेळा शिवरायांचा गौरव करता करता, आपण न कळत त्यांचे अवमूल्यनही करीत आहोत याचे आम्हाला भानही रहात नाही. अधुनमधून एक संदेश फिरत असतो की, शाळेत नापास झालेली लता मंगेशकर गानकोकिळा  झाली! दहावी नापास सचिन तेंडूलकर भारतरत्न झाला ! पेट्रोल पंपावरचा  कामगार धिरू अंबानी जगप्रसिद्ध उद्योगपती झाला!  अशी अनेक उदाहरणे देत देत शेवटी संदेश  असतो , शाळेत न गेलेला शिवबा छत्रपती झाला. माझा राजा किती महान होता याचे ढोल वाजवता-वाजवता आपण इतरांना चुकीचा संदेश देत आहोत याचे भान आंधळ्या शिवभक्तांना रहात नाही. या संदेशामुळे अनेक अज्ञानी विचार करतात की, शाळा शिकून काहीच लाभ नाही! एका अंगाने हे   मॅकॉले पद्धतीचे  शिक्षण आम्हाला पैसे मिळवून देत असेलही, परंतु या भौतिक शिक्षणामुळे आम्ही आमचा स्व-धर्म, स्व-राज्य, स्व-किय, स्व-भाषा आणि स्व-अभिमान विसरून जातो. अनेकदा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या  जड विद्याचा आम्हाला काहीच लाभ होत नाही. मी एक पौरोहित्य करणारा असून या कार्यात मला माझ्या शालेय शिक्षणाचा काहीच लाभ झाला नाही. अर्थात केवळ श्रम जाहले. असो!  शाळेत न जाताच अर्थात शिक्षण न घेताच, अडाणी शिवराय छत्रपती झाले असा खोटा अभिमान बाळगणे म्हणजे घोर अज्ञान आहे. आम्ही आमच्या छत्रपतींची विटंबना करीत आहोत. जरा विचार कराच!        
      छत्रपती शिवराय ज्या काळात जन्माला आले होते त्या काळाचा ही आपल्याला जरा विचार करावयास हवा! त्याकाळी इस्लामी क्रौर्यामुळे समृद्ध वैदिक शिक्षण पद्धत उद्ध्वस्त  झाली होती. तक्षशिला-नालंदा सारख्या विश्वप्रसिद्ध महाविद्यालयांच्या ग्रंथालयांना  लावलेल्या आगी सहा मासापेक्षा अधिक काळ जळत होत्या. यावरून आपण तर्क करू शकतो किती प्रकारची ज्ञान संपदा इस्लामी आक्रमकांनी नष्ट केली असेल?        अनेक राजे आणि  त्यांची राज्ये पाशवी इस्लामी अत्याचारांनी नष्ट झाली. या राजांच्या आश्रयाने रहाणारे गुणी शिक्षक, साधू-संत, कलाकार, वैद्य इत्यादी नष्ट-भ्रष्ट झाले. गुरुकुल पद्धत नष्ट झाली. थोडीफार होती ती पुढे इंग्रजांनी समूळ नष्ट केली. आचार्य चाणक्य अन् सम्राट चंद्रगुप्त यांनी  भरभरटीला आणलेली व्यवस्था जवळ जवळ लुप्त झाली होती.       
     सतत इस्लामी वरवंट्याच्या खाली ३०० वर्षे महाराष्ट भरडला जात होता. त्यामुळे कुठेच पाठशाळा अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या पुत्राला शाळेत धाडण्याचा प्रश्नच उद्भवला नाही! याचा अर्थ शिवबाराजे अडाणी वा अशिक्षिती होते असा मुळीच होत नाही.     
     चाळीस एक वर्षांपूर्वी एका कुविचारी पुरोगाम्याने तर्क प्रस्तुत केला होता की, शिवाजी महाराज निरक्षर होते. कारण त्यांचे हस्ताक्षर कुठेच उपलब्ध नाही. त्याच्या या तर्कावर बाबासाहेब पुरंदरे त्याला म्हणाले होते की, अजूनपर्यंत औरंगजेबाची विजार तरी कुठे मिळाली आहे? असो.     छत्रपती शिवरायांचे सूर्यवंशी भोसले घराणे आणि त्यांचे आजोळ चंद्रवंशी जाधव घराणे सुसंस्कृत, सुशिक्षित आणि घरंदाज होते. शहाजी राजांच्या आश्रयाला अनेक विद्वान ब्राह्मण, कवी, पंडित, शास्त्री इत्यादी होते. स्वतः शहाजीराजे संस्कृत, मराठी, फारसी, हिंदी आणि कन्नड यांचे जाणकार होते. ते अतिशय धार्मिक, साहसी, स्वाभिमानी, स्वतंत्रवृत्तीचे होते. तसेच जिजाऊसाहेब अत्यंत धीरगंभीर होत्या. देवाधर्मावर त्यांची अढळ श्रद्धा होती. वेद-पुराण इत्यादी शास्त्रांवर त्यांची श्रद्धा होती.  सत्वशीलता, संयम, विवेकशीलता, द्रष्टेपणा, न्यायीवृत्ती, करारीपणा, डोळस व्यवहारज्ञान, कार्यनिष्ठा इत्यादी गुणांची खाण होत्या जिजाऊसाहेब! माता-पित्याकडून हे सर्व सद्गुण छत्रपती शिवरायांमध्ये पूर्णपणे संस्कारित झाले होते.    जिजाऊसाहेबांनी  आपल्या लाडक्या शिवबाकडे उत्तमप्रकारे लक्ष दिले होते. महादेव भट महाभास हे गुरुजी शिकविण्यासाठी होते. त्याकाळच्या भीषण सुलतानी संकटातही वैदिक संस्कृती काही अंशी टिकून होती. त्यामुळेच जिजाऊसाहेबांनी शिवबाराजेंना रामायण, महाभारत, पुराणे आणि इतिहास यांचे शिक्षण दिले होते. संस्कृत आणि फारसी भाषाही शिकविल्या  होत्या. लेखन-वाचन वा गणित यांच्या शिक्षणासोबत अश्वारोहण, मल्लविद्या, तलवार, दांडपट्टा, धनुष्यबाण चालविणे, भालाफेक करणे इत्यादी शास्त्रांचे ज्ञानही शिवबाराजेंना मिळाले होते.    
     महाराजांना बालपणीच मिळालेल्या शिक्षणाचे वर्णन शिवभारतात केलेले आहे. त्यानुसार श्रुति, स्मृति, पुराणे, भारत, राजनीती, सर्वशास्त्रे, रामायण, व्यायाम, वास्तुविद्या, फलज्योतिष, धनुर्वेद, सामुद्रिक निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित, हत्ती-घोडे-रथ-आरोहण, त्यांची लक्षणे, चढणे-उतरणे, दौड मारणे, उडी मारणे, तलवार, धनुष्य, चक्र, भाला, पट्टा, शक्तीयुद्ध, बाहुयुद्ध, दुर्ग अभेद्य करणे, दुर्लक्ष्य निशाण वेधणे, दुर्गम स्थानातून निसटून जाणे, इंगित जाणणे, जादुगिरी आणि विष उतरवणे, रत्न परीक्षा, अवधाने, सर्व विद्या शास्त्रे आणि कला हे शिक्षण छत्रपती शिवरायांनी बालपणीच घेतले.      
     १२ एप्रिल १६६३ मध्ये फिलीफ गीफर्ड नामक इंग्रजाने राजापूरच्या  वखारीतून सुरतेला पाठविलेल्या पत्रात उल्लेख केला आहे की, शाहिस्तेखानाच्या प्रसंगावरचे पत्र स्वतः महाराजांनी लिहून राहुजींना पाठविले.        
      दुसऱ्या  सुरत लुटीचे वेळी शिवरायांनी स्वतः स्वाक्षरी केलेले पत्र फ्रेचांना पाठविले होते. त्याचा उल्लेख डचांनी केलेला आहे. तसेच अनेक तहांच्या कागदांवर महाराजांनी स्वतः स्वाक्षरी केल्या आहेत. अकबर बादशहाप्रमाणे महाराज निरक्षर नव्हते. महाराजांना संस्कृतची आवड होतीच. फारसी आणि हिंदीचे ज्ञान होते. बालपणी सहा वर्ष कर्नाटकात वडिलांपाशी निवास केला तेव्हा तेथे कन्नडसुद्धा शिकले होते.         त्यांना दुर्गबांधणीचे उत्तमज्ञान होतेच. राजव्यवहार कोष, कारणकौस्तुभ, शिवभारत इत्यादी ग्रंथरचनेला शिवरायांनीच मार्गदर्शन केले होते. असे असताना 'माझा राजा न शिकता छत्रपती झाला' असे म्हणणे केवढे हास्यास्पद आहे!            
     शिवरायांचे सर्व घराणे सुशिक्षित होते. त्यांनी आपले चिरंजीव संभाजीराजे यांना संस्कृत शिकविण्यासाठी केशव पंडिताना नियुक्त केले होते. त्यांच्याकडून शंभूराजांनी आपल्या चौदाव्या वर्षी संपूर्ण रामायण आणि अन्य पुराणे शिकून घेतली. त्यांनी रचलेला 'बुधभूषण' ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
     तंजावरच्या ग्रंथालयातील एका जुन्या हस्तलिखित पोथीत शिवरायांच्या अंगी कोणकोणते गुण होते याची एक सूची दिलेली असून ती पुढील प्रमाणे आहे - देवाचे ठायी निष्ठा, बळे पखर, राजकलेची अदब, तरतिबर हारवेष उत्तम, दरशनी, रत्नपरीक्षा, अश्वपरीक्षा, शस्त्रपरीक्षा, बोलणे, रसिक, नेत्रांमध्ये लज्जा, शाळीग्राम परीक्षा, गजपरीक्षा, उत्तम न्याय करणे, शहाणपण, राजकारणी, मनुष्यपारखी, घोडेस्वारी, हत्ती चालविणे, वरकवित्वशक्ती, प्रामाणिक, शूर, उदार, वित्पन्न, सखोल, धीर इत्यादी.     
     तरी समस्त शिवप्रेमींनी आंधळेपणाने कोणताही संदेश वाचू नये आणि इतरांना पाठवून गोंधळ उडवू नये. सावधान! 
    लेखन सेवा - विनय शंकर गोडसे 
      ९२४२१७६५८७
----------------------------------- 


सोमवार, २७ मार्च, २०१७

 राजे पुन्हा जन्माला यावे !

     आमच्या बेळगावात असो वा कोल्हापूर-सोलापूरात , कधी कधी काही रिक्षांवर वर भगव्या रंगात लिहिलेले आढळते, 'राजे, पुन्हा जन्माला यावे.'  हे वाक्य वाचताच अंगावर रोमांच उभे राहतात. रक्त सळसळते. उर भरून येतो. शिवरायांच्या पावन स्मृतींचा गंगा महासागर हृदयात उचम्बळून येतो. हे असे का होते? सर्व सामान्य मराठी माणसाला छत्रपती शिवराय हेच आपले तारणहार असल्याचे का वाटते? कारण एकच आहे आणि ते म्हणजे मराठी माणूस आजही अन्यायग्रस्त आहे. त्याला तोंड दाबून लाथा-बुक्यांचा मार खावा लागतो आहे. कधी धनदांडग्यांकडून, तर कधी परप्रांतीय अमराठी लोकांकडून, तर कधी धर्मांधांकडून!छत्रपती शिवराय जन्माला येण्यापूर्वी संपूर्ण भारत इस्लामी अत्याचारांनी ग्रस्त होता. महाराष्ट्रात सुलतानी कारभाराचा वरवंटा फिरत होता. येथे इस्लामी  सत्ता होती आणि ती विशिष्ट धर्माची होती. बादशहा वा सुलतान आणि त्यांचे प्रशासक इस्लामचे बंदे होते. इस्लामचेच कायदे-कानून सर्वोच्च होते. त्यामुळे सर्व कारभार कुराणानुसार चालत होता. त्यामुळे येथील उलेमा नेहमीच मूर्तिपूजा आणि इस्लामविरोधी कृत्ये सक्तीने मोडून काढण्यासाठी बादशहाला प्रेरीत करीत. सुलतानही अल्लाचे सच्चे  प्रतिनिधी म्हणवून घेत आणि हिंदूंचा भयंकर छळ करीत.मुसलमानी राजकारभारात भारतातील हिंदू, बौद्ध, जैन व शिखांना शेकडो वर्षे भयानक नारकीय यातनांचे दुःख भोगवे लागत असे. सुलतानी अत्याचारांमुळे हिंदूंचे आणि अन्यांचे धार्मिक, आर्थिक वा सामाजिक जीवन नष्ट- भ्रष्ट झाले होते. त्यांनी हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली विशाल आणि भव्य मंदिरे उद्ध्वस्त केली. मंदिरातील मूर्तिना  फोडून त्यांचा वापर मशिदिंच्या पायऱ्या  म्हणून करण्यात आला. त्यातून काही मंदिरे व तीर्थक्षेत्रे वाचली तर त्यावर भयंकर कर लादला जात असे. तत्कालीन विदेशी प्रवासी बर्नियरने लिहून ठेवले आहे की, एका  सूर्य ग्रहणाचे वेळी बादशहाला यमुना स्नान करणाऱ्या  हिंदूंकडून एक लक्ष रुपये 'कर' रूपाने मिळाले होते.

     होळी, दिवाळी वा सणांवर सार्वजनिक उत्सवांवर बंदी लादलेली होती. त्यामुळेच हिंदू, जैन, बौद्ध आणि शिख लोक उत्सवानंदापासून वंचीत राहिले. बाटवाबाटवी प्रचंड प्रमाणात चाले. प्रत्येक बादशाह आपल्या सत्ता रोहणाप्रसंगी गाझी बनण्यासाठी अनेकानेक हिंदूंची मस्तके उडवीत असे.
     समस्त बादशहांनी हिंदूंकडून जिझिया कर निष्ठूरपणे वसूल केला होता. मनुची नामक इटालियन प्रवाश्याने औरंगजेबाने लादलेल्या जिझिया कराविषयी लिहून ठेवले आहे. ते असे की, औरंगजेबाच्या जिझिया कराला काही सरदारांनी विरोध केला. परंतु औरंग्या आपल्या निर्णयापासून किंचितही हटला नाही. त्यावेळी प्रचंड भूकंप झाला. त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, 'आपला हा अन्याय निसर्गाला न आवडल्यामुळे त्याने भूकंपाद्वारे आपला क्रोध व्यक्त केला आहे.'
     त्यावेळी छदमीपणे  उत्तर देत औरंग्या म्हणाला, ''तुम्ही म्हणता तसे मुळीच नाही. भूकंप झाला याचा अर्थ पृथ्वी जिझिया लावला म्हणून आनंदाने डोलते आहे.''
     अनेक प्रकारे सुलतान हिंदूंची छळवणूक करीत, त्यांची अनेक वर्णने तत्कालीन कागद-पत्रातून व ग्रंथातून पाहण्यास मिळतात. असे असूनही आज कालचे बी-ग्रेडी पाकिस्तानी हस्तक खोटा इतिहास सांगून मराठयांची आणि बहुजनांची फसवणूक करीत आहेत. खरे जाणण्यासाठी जिज्ञासू वाचकांनी वा धर्माभिमानी हिंदूंनी शिवकथाकार श्री. विजयराव देशमुसख रचित ' शककर्ते शिवराय' हा ग्रंथ अवश्य वाचावा.

    त्या काळी सुलतानी छळांचे अनेक भयंकर प्रकार होते. त्यांचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी पुढील प्रमाणे केले आहे--
प्राणी राजदंड पावत , जेरबंद चाबूक वेत 
दरेमार तळवे मार होत, या नाव आदिभूतिक 
मोघरी मोर बुधले  मार, चौखुरून डंगारणे मार 
बुक्क्या गचांड्या गुडघे मार, या नाव आदिभूतिक
तीर मार सुळी देती, नेत्र वृषण काढिती
 नखोनखी सुया मारिती, या नाव आदिभूतिक
कानी खुंटया आदळती, अपानी मुखी मारिती 
खाल काढुनी टाकिती, या नाव आदिभूतिक
सारी ओढूनी घेती, टेंभे लावुनी भाजती 
ऐशा नाना विपत्ती, या नावे आदिभूतिक । 
     या समस्त सुलतानी संकंटांच्या जोडीने भीषण दुष्काळ पडून प्रजेची दुर्दशा उडत असे.
     आजही अशीच स्थिती आहे. पूर्वीप्रमाणे उघड आक्रमण करता येत नसल्याने विविध प्रकारे हिंदूंना नडण्याचे वा छळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अति स्वतंत्र्यामुळे आणि मुक्त शिक्षण वा सामाजिक पुढारलेपणाने हिंदू मुली स्वेच्छेने वा फसवून धर्माधांच्या शय्याधीन होत आहेत. राज्य वा केंद्र शासनाकडून विविध मार्गाने पैसा उकळवीला जात आहे. गोमांस खाण्यासाठी चटावलेले जन्महिंदू धर्माधांच्या हॉटेलातून गर्दी करीत आहोत. सल्लू, आमीर, शहारूख, सैफ आदिंसमवेत ब्राह्मण मुली दाखवून चित्रपटानूत प्रचंड पैसा मिळवून त्यातील मोठा हिस्सा पाकपुरस्कृत अतिरेक्यांना दिला जात आहे. हिंदूंना आपले सणसुद्धा शास्त्रोक्तरित्या पाळता येत नाही. कारखाने वा कत्तलखान्यातील भयंकर प्रदूषित विष मैलायुक्त पाणी नद्या आणि समुद्रात  सोडून समस्त जलचर आणि भूचर प्राण्यांना पीडा दिली जात आहे. असे असूनही काही मूठभर ढोंगी, प्रशासनाला हाताशी धरून गणेश मूर्तीदान घेऊन कचरागाडीतून  खाणीत फेकून देत आहेत, या बदमाशांना हजारो बकरी-गायिंची कत्तल दिसत नाही. पण कुत्र्यामांजरांचा मात्र पुळका येतो.
     वाळू बंदीच्या नावाखाली शेकडो गवंडी-मेस्त्रींना भुकेले ठेवले जात आहे. शेतकऱ्याच्या  पिकाऊ जमीनी नगरविकासाच्या गोंडस नावाखाली गळंकृत केल्या जात आहेत. हे सर्व करण्यासाठी स्वकीय बांधव कधी भगवा फेटा बांधून तर कधी लालपिवळी फडकी गळ्यात बांधून, तर कधी वाटोळी टोपी टाळक्यावर घालून आम्हालाच फसवत आहेत.
     अंनिस, समाजवादी, पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी  लांडगे लचके तोडून प्रजेला छळत असल्यामुळेच सर्वसामान्य माणसाला वाटते की, 'राजे, पुन्हा जन्माला यावे.' का ? कारण शिवबाराजे परत जन्माला आले तरच आम्ही समस्त संकटातून मुक्त होऊ! परंतु हे शक्य आहे का? मुळीच नाही. कारण राजे जन्माला येण्यासाठी शहाजीराजे आणि जिजाऊसाहेब जन्माला येणे अवश्यक आहे. परंतु आजची नारी आपले पोट -पाट अधिकाधिक प्रदशिर्त करण्यासाठी उतावळी झालेली आहे. आपल्या पुष्ट मांडया आणि बाहू परपुरुषाला दाखविण्यात अग्रेसर आहेत. हे सर्व करण्यासाठी त्यांचे पती त्यांना प्रोत्साहन देत आहेत. आपली पत्नी देवी पेक्षा भाग्या म्हणून प्रदर्शित करण्यासाठी पतींमध्ये चढाओढ लागलेली आहे. इंद्रियभोग म्हणजेच सर्वस्व आहे. यातच खरा आनंद आहे, यातच आमची प्रतिष्ठा आहे असे मनणाऱ्या  कामांध द्विपाद पशुंच्या पोटी छत्रपती शिवराय कसे काय जन्माला येतील? शक्य नाही आणि जरी जन्माला आले तरी काय करणार? कारण आता भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे. १९२० मध्ये गांधींनी षंढत्वाची गोळी खाऊ घातली आणि सर्वांना अहिंसक बनविले. तेव्हा पासून क्षत्रियांनी तलवार धारण करणेच सोडून दिले. त्यामुळे शिवबाराजेंना भवानी तलवारीच्या धाकाने दुष्टाचे दमन करता येणार नाही. त्यांनी भवानी धरताच त्यांना रासुका, मोक्का वा अन्य कायद्याने कारागृहात डांबले जाईल. त्यातून काही वर्षांनी सुटका झाल्यावर त्यांच्यावर सतत पाळत ठेवून त्यांना साहाय्य करणाऱ्या  मावळ्यांना फोडून अन्य पक्षांच्या दावणीला बांधले जाईल. आपल्या बुद्धिमत्तेने अनेक अडचणींवर मात करून शिवबा राजे स्वराज्य स्थापनेसाठी लोकशाही मार्गाने जाऊ लागताच त्यांच्यावर बंदी आणली जाईल. का, तर ते म्हणतील 'हे स्वराज्य व्हावे ही तो श्रीची इच्छा. या एकाच वाक्यावर त्यांना न्यायालयात खेचले जाईल. त्यांच्यावर आरोप ठेवला जाईल की, 'तुम्ही विशिष्ट धर्मियांसाठी मते मागत आहात.'
     अनेक अडथळ्यातून शिवबाराजे सहिसलामत सुटत आहेत हे पाहून बाजी घोरपडे वा मंबाजी भोसले सारखे त्यांचे भाऊबंद  इतरांना सुपारी देतील आणि खोटे नाटे आरोप लावून 'ऍट्रोसिटी ' अंर्तगत आठ-दहा वर्षांसाठी विना-जामिन कारागृहात खितपत पाडतील.
     इतके सर्व सोसूनही राजे सुटले तर काही लोक फुसकुल्या सोडतील, 'अरे! हा भटाळलेला  आहे, हा गोब्राह्मणांचें रक्षण करणारा  आहे. याला मत देऊ नका.'
     तर अनेक भाऊबंद  म्हणतील, 'हा तर दारू देत नाही, मांसाहारी पाटर्या देत नाही, गुटखा खात नाही आणि देतपण नाही. याला निवडून देऊ नका.'काही बुद्धिजीवी रयतेचा बुद्धीभेद करतील की, 'हा अफझल वा औरंगजेबासारख्या सुफी अवलियांचा काटा काढणारा आहे. हा डांसबार आणि वाईनचा अभ्यासक्रम बंद करेल. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी बेरोजगार होतील. हा इंग्रजी शिक्षण गुलामीचे लक्षण म्हणणारा आहे. संस्कृत प्रणित मराठी भाषा लादणारा आहे. याला मुळीच मत देऊ नका. आयपीएल क्रिकेट, उघडया-नागडया नाचणाऱ्या  वेश्यांचे चित्रपट म्हणजे कला-अविष्कार, बार-रेस्टारंट म्हणजे प्रगत संस्कृती, विकसीत लेक सिटी सारखी महानगरे निर्माण करण्याच्या विरोधात हा आहे. याला निवडणुकीत धूळ चारा.
      अशा अनेकानेक कारणांनी शिवबाराजेंना स्वराज्य निर्माण करण्यापासून रोखले जाईल आणि शेवटी विस्मृतीच्या गहन अंधारात कधीही परत जन्माला न येण्यासाठी राजे निघून जातील.
लेखनसेवा - विनय शंकर गोडसे
संपर्क : ९२४२१७६५८७   

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

                                       श्रीकृष्णाष्टकं 


     विविध वेदशास्त्रांमध्ये भगवान श्रीकृष्णांची अनेक सुंदर श्लोकांद्वारे स्तुती केलेली आहे . या प्राचीन वेद शास्त्रांव्यतिरिक्त  अनेक आचार्यांनी  संस्कृत भाषेतून भगवान श्रीकृष्णांवर विविध स्तुति स्तोत्रांचा वर्षाव  केलेला आहे. इस्लामी आक्रमणानंतर कलियुगाचा प्रभाव अधिक तीव्रतेने वाढू लागल्यावर  संस्कृत भाषेची काही प्रमाणात पीछेहाट होऊन  सर्व सामान्य लोकांचे सोडाच, पण ब्राह्मणांनासुद्धा  संस्कृत कळणे कठीण झाले. 
     सर्व सामान्य व्यक्तींना भगवद्भक्ती कळावी यासाठी अनेक साधू-संतांनी विविध स्थानिक भाषांमधून अभंगांयी रचना करून भगवान श्रीकृष्णांची  स्तुती गायीली आहे. त्यांनी रचलेली कवने कृष्णभक्तीच्या अवीट गोडीने ओथंबलेली आहेत. जेव्हा ही  स्तुती कर्णेन्द्रियांद्वारे हृदय मंदिरात प्रवेश करतात तेव्हा पाषाण बनलेले हृदयसुद्धा नवनीतासमान कोमल होते. त्यातील मलीनता दूर होते आणि त्या हृदय मंदिरात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात . 
     सांप्रतच्या कलह आणि दंभ यांनी संत्रस्त झालेल्या जीवांना दिव्यानंदाची प्रचीती येण्यासाठी भगवंतांच्या स्तुतीची नितांत आवश्यकता आहे. भगवान श्रीकृष्णांवर अनेक प्रकारे रचलेल्या स्तुतींमध्ये ' सहस्त्रनाम ',' शतक', ' दशक ' आणि 'अष्टक' असे विविध प्रकार आहेत. 
     विश्वभरातील हरे कृष्ण मंदिरातून वा केंद्रांतून वर्षभर विविध अष्टके गायीली जातात . भक्त  सुमधुर स्वरात गाउन भगवंतांयी प्रेममयी आराधना करतात. या अष्टकांमध्ये ब्राह्ममुहूर्तावर  श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर रचित 'श्री गुरुवाष्टकं' नित्य गायीले जाते. त्यानंतर  हरे कृष्ण महामंत्राच्या निर्धारित माळा प्रारंभ करण्यापूर्वी  श्री चैतन्य महाप्रभू  रचित 'श्री शिक्षाष्टकं ' अवश्य उच्चारले जाते.  सहा  गोस्वामींच्या आविर्भाव दिनी 'श्री षडगोस्वाम्याष्टकं ' गौर पूर्णिमेला सार्वभौम भट्टाचार्य विरचित ' श्री शचीतनयाष्टकं ',  जगन्नाथ रथयात्रेत  ' श्री जगन्नाथाष्टकं ' आणि कार्तिक मासात ' श्री दामोदराष्टकं ' विशेष उत्सहाने गायीले जाते.
     अशा अनेकानेक अष्टकांपैकी ' श्रीकृष्णाष्टकं' एक विशेष अष्टक आहे. याची रचना श्रीपाद आद्य शंकराचार्यांनी केलेली आहे. आद्य शंकराचार्य भगवंतांचे निष्ठावान भक्त होते. त्यांनी रचलेली 'श्री पांडुरंगाष्टकं ', 'श्री अच्युताष्टकं ' ,' श्री नृसिंहाष्टकं ' इत्यादी स्तुति-स्तोत्रे  प्रसिद्ध आहेत. 
     महान आचार्यांनी रचलेल्या स्तुती-स्तोत्रांचे  गायन , चिन्तन वा मनन केले तर आमचे  आध्यात्मिक जीवन अधिकच  समृद्ध होईल यात तिळमात्र  संशय नाही. 
      या 'श्री कृष्णाष्टकं' चा पहिला श्लोक पुढिला प्रमाणे आहे --
                       भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं  
                             स्वभक्तचित्तरंजनम् सदैव नंदानंदम् ।
                      सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं 
                            अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरम् ।। १ ।। 
     व्रजभूमीचे एकमेव भूषण असणाऱ्या , समस्त पापांचा नाश करणाऱ्या  , स्वभक्तांच्या मनाला आनंदित करणाऱ्या  भगवान श्रीकृष्णांना मी सदैव भजतो . ज्यांच्या मस्तकावर सुंदर मोरपिसांचा मुकुट असून हातात मधुर स्वरांची बासुरी आहे, तसेच ते प्रेमतरंगानी युक्त असा सागर आहेत अशा नटनागर श्रीकृष्णांना मी नमन करतो .
     या भौतिक जगत मनुष्यगण अन्य मर्त्य मनुष्याला  ' भूषण'  पदवी प्रदान करून त्यांचा  गौरव करतात . जसे ग्रामभूषण , नगरभूषण, महाराष्ट्रभूषण वा भारतभूषण इत्यादी पदव्यांनी अलंकृत केले जाते. परंतु हे सर्व कालौघात  विस्मृतीत जाते. परंतु भगवंतांचे  तसे नाही. भगवान श्रीकृष्ण अनंत कोटी ब्रह्माण्डांचे  भूषण आहेत. त्यांची  किर्ती वा यश कधीही नष्ट होत नाही. वास्तविक भगवान श्रीकृष्ण 'गोलोक वृंदावन' नामक दिव्य आध्यात्मिक जगतात निवास करतात. ते त्यांचे   हे आध्यात्मिक धाम या पृथ्वीवरही प्रकट करतात; त्याला 'भौम वृंदावन' असे संबोधले जाते. लौकिक दृष्ट्या हे वृंदावन उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हयात आज ही पाहावयास मिळते . 
     आध्यात्मिक शक्तीने परीपूर्ण  असलेल्या वृंदावनाचे एकमेव भूषण 'भगवान श्रीकृष्ण' आहेत! महान कृष्णभक्त श्रील बिल्वमंगल ठाकूर म्हणतात  --     ' व्रजे प्रसिद्धम् नवनीत चौरं । '                  व्रजभूमी वृंदावनाचे अधिपती नंद महाराज आणि त्यांची अर्धांगिनी यशोदा या दोघांसाठी भगवान श्रीकृष्ण जीव की प्राण आहोत. ब्रजभूमीतील बालगोपाळांसाठी ते सर्वोत्तम सखा आहोत आणि गोपबालिकांसाठी प्राणधन,  सर्वोत्तम प्रियकर आहोत. समस्त साधुगणांसाठी ते आराध्य भगवान आहोत.
     स्वतः भगवान श्रीकृष्ण आपला  प्रियतम भक्त उद्धव यांस  सांगतात , 'मी एक क्षणासुद्धा वृंदावनाचा  त्याग करीत नाही. यास्तव या अष्टकाच्या प्रारंभी आचार्य म्हणतात - ' भजे व्रजैकमण्डनं ' मी व्रजभूमीचे  एकमेव भूषण असणाऱ्या  श्रीकृष्णांना भाजतो. 
                              समस्त पापखण्डनं 
     भगवान श्रीकृष्ण समस्त पापांचे खंडन करतात, विनाश करतात. आम्ही समस्त जीव या भौतिक जगात अनेकानेक जन्मापासून, इंद्रियतृप्तीच्या अभिलाषेमुळे उन्मत्त झालो आहोत. त्यामुळे आमच्या हातून अनेकानेक पापकर्म वा अपराध घडत असतात. ' अपराध सहस्राणी क्रियन्ते अहर्निशम् मया। ' या पापकर्मांमुळे आम्हाला  अनेक प्रकारची दुःखे  भोगावी लागतात. मृत्यूनंतर यमराज अनेक शिक्षा भोगण्यासाठी  नारकीय लोकात डांबून विविध प्रकारे दंड देतात. परंतु भगवान श्रीकृष्ण आपल्या अहैतुकी कृपेने आमच्या समस्त पापांचे  खंडन करतात. विविध प्रकारच्या पापकर्मातून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारची प्रायःश्चितें  शास्त्रातून सांगितलेली आहोत. या सर्वांमध्ये प्रभावी उपाय आहे  गंगा स्नान किंवा कुंभमेळ्यात विशिष्ट मुहूर्तावर स्नान! अशी पवित्र स्नाने करून मनुष्य पूर्व संचित पाप कर्मांपासून मुक्त होतो. परंतु पाप करण्याची वृत्ती, जी त्याच्या हृदयात ठाण मांडून बसलेली आहे ती काही नष्ट होत नाही. त्यामुळे तो परत परत पापकर्म करीत असतो. त्याच्या हृदयातील पापकर्मांचे बीज अन्य कोणत्याही उपायाने नष्ट होत नाही. केवळ भगवान श्रीकृष्णच ते बीज नष्ट करू शकतात. श्रीकृष्ण आपल्या पवित्र नामाद्वारे पापी व्यक्तीच्या हृदयातील पापकर्मांचे  समुळ  उच्चाटन करतात. 
     ज्यावेळी पापी मनुष्य श्रीकृष्णांच्या पवित्र नामाच्या संपर्कात येतो आणि पवित्र कृष्णनामांचे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।।  उच्चारण करू लागतो त्यावेळी श्रीकृष्ण त्याच्या समस्त पापांचे खंडन करतात. हे कसे घडते ? जसे एखाद्या वृक्षावर शेकडो कावळे बसलेले असतील तर त्यांना हुसकावुन लावसाठी शेकडो दगड मारण्याची  आवश्यकता नसते. केवळ एक दगड मारला की झाले! त्याचप्रमाणे आमच्या हृदयात अनेक पापरूपी कावळे बसलेले आहेत. त्यांना हाकलून देण्यासाठी केवळ एकच  हरिनाम पुरेसे आहे. 
                                     स्वभक्तचित् रंजनम 
     भगवान श्रीकृष्ण स्वभक्तांच्या चित्ताला  सदैव आनंद प्रदान करतात. श्रीकृष्णांचे एक नाम आहे 'गोविंद' जे गायीना  आणि आमच्या इंद्रियांना आनंद देतात. जेव्हा आम्ही श्रीकृष्णांच्या मधुर बाळलीलांचे, वीररसयुक्त शौर्याचे वर्णन श्रवण करतो तेव्हा आमच्या कर्णाना  अतिशय आनंद होतो. जेव्हा आम्ही मंदिरातील शृंगार आरतीच्या वेळी श्रीकृष्णांचे दर्शन घेतो, त्यांची चित्रे पहातो तेव्हा आमच्या नेत्रांना आनंद मिळतो. भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेले पुष्प प्रसाद म्हणून हूंगतो तेव्हा आमच्या घाणेंद्रियांना दिव्यानंद प्राप्त होतो. भक्त अतिव प्रेमाने भगवान श्रीकृष्णांना विविध प्रकारचे भोज्य, प्येय, गेह्य , च्युस्य,  लेह्य  वा चर्व्य  पदार्थ अर्पण करतो आणि नंतर ते पदार्थ भगवंतांचा  कृपाप्रसाद म्हणून  आम्हाला प्राप्त होतात,. तो महाप्रसाद मुखाद्वारे जीभेला प्राप्त होतो तेव्हा त्या अमृतमयी प्रसादाच्या ग्रहणाने भक्तांना अवीट आनंद मिळतो. अशा प्रकारे विविध मार्गांनी भगवान श्रीकृष्ण स्वभक्तांचे चित्तरंजन करतात. 
                                 सदैवनंदनंदनम्
     श्रीकृष्ण 'केवळ आनंदकन्द ' आहोत. ते आनंदाचे स्रोत आहेत. वेदांमध्ये ' ओम  आनंदोमेयोभ्यासाद  ' असे त्यांचे  वर्णन केलेले आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः नित्य आनंदांत मग्न असतात. त्यामुळेच ते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या गायी-वासरांनी, गोप-गोपींना, वृक्ष-वेलींना, पशू-पक्षांना, यमुना, पृथ्वी, देवी-देवता आणि स्वभक्तांना आनंद प्रदान करतात. अशा नंदनंदनास  अर्थात नंद महाराजांच्या पुत्रास मी सदैव भजतो. 
     श्रीकृष्ण आनंद देतात, परंतु त्यापेक्षा अधिक आनंद श्रीकृष्ण संकीर्तनाने मिळतो . श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रीकृष्णसंकीर्तनाला आनंदाचा  सागर म्हटले आहे. हा श्रीकृष्णसंकीर्तनाचा आनंदरूपी सागर सदैव वाढतच असतो. या आनंदसागराला नेहमी भरतीचे  उधाण आलेले असते. ओहोटी मुळी नसतेच !
                              सुपिच्छगुच्छमस्तकं 
      श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर सुंदरसा मोरपिसांचा मुकुट धारण करतात. श्रीकृष्णांना मोरपीस अतिशय आवडते. त्यामुळे त्यांनी मोरपिसाला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यासाठी  स्वतःच्या मस्तकावर धारण केले आहे. भगवंतांना मोर अत्यंत प्रिय आहे. कारण मोर नित्य ब्रह्मचारी असतो. तो अन्य पशू-पक्षांप्रमाणे मैथून करीत नाही. मोर जेव्हा अत्यानंदाने नृत्य करतो तेव्हा त्याच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागतात. या अश्रूंचे  सेवन लांडोर करते आणि त्यांची  वंशवृद्धी होते. अशा या प्रेमस्वरूप मोराची पिसे नेत्रांना आनंददायी वाटतात. त्या पिसांमधील रंगसंगती अतिशय नयनरम्य आणि आकर्षक असतो. 
                                   सुनादवेणूहस्तकं 
     भगवान श्रीकृष्णांच्या हातात वेणू असून ती त्यांच्या अधरांचे  पान करीत मधुर नाद उत्पन्न करीत असते. या वेणूला विविध नावे असून त्यानुसार श्रीकृष्णांना विविध नामांनी पुकारले जाते. उदा. वेणूगोपाळ, मुरलीधर, बंशीधारी, इत्यादी. 
     श्रील रूप गोस्वामी रचित 'भक्तिरसामृतसिंधू' नामक ग्रंथाच्या  'प्रेमाचे  उद्दीपन' नामक सव्वीसाव्या अध्यायात कृष्णकृपामूर्ती ए.सी. भक्तीवेदान्त स्वामी प्रभुपद श्रीकृष्णांच्या बासरी विषयी लिहितात, "श्रीकृष्णांची बासुरी इतकी अद्भुत आहे की तिच्या ध्वनीने परमहंसांची ध्यानक्रियाही भंग होऊ शकते. श्रीकृष्णांच्या बासुरीची वेणू, मुरली आणि वंशी असो तीन प्रकार आहेत. वेणू अतिशय लहान असून सहा इंचाहून  अधिक लांब नसते तिला सहा छिद्रे  असतात. मुरली आठ इंच लांबीची असते आणि तिच्या टोकाला एक छिद्र अन् मध्यभागी चार छिद्रे असतात. तिच्यातून अतिशय मधुर ध्वनी उत्पन्न होत असतो. वंशी पंधरा इंच लांब असते आणि तिच्यावर नऊ छिद्रे असतात. श्रीकृष्ण यथासमय या सर्व बासऱ्यांचे वादन करीत असतात. श्रीकृष्णांकडे 'महानंदा' किंवा ' संमोहनी' नामक एक मोठी वंशीसुद्धा आहे. त्याहून अधिक लांब बासुरीला ' आकर्षिणी ' असे म्हणतात. ' आनंदिनी' नामक बासरी आकर्षिणीहून अधिक लांब असते. ही आनंदिनी वंशी गोपबालकांना अतिशय प्रिय असते. तिला ' वंशुली ' असेही म्हणतात. कधीकधी या बासऱ्यांना रत्नांनी मढविले जाते. या बसाऱ्या  कधी संगमरवरापासून, तर कधी वेळूपासून निर्माण केल्या जातात. रत्नांनी निर्माण केलेल्या बासरीला 'संमोहिनी' म्हणतात आणि सुवर्णाने निर्मिलेल्या बासरीला 'आकर्षिणी' म्हणतात.
     श्रीकृष्ण वंशीवटा खाली उभे राहून बासरी वादन करू लागताच गायीवासरे, मोर-पोपट, यमुनेचे जळ, लता-वृक्षा स्तब्ध हऊन तो मधुर स्वर ऐकू लागतात. गोपी आपली गृहकृत्ये विसरून श्रीकृष्णांकडे धाव घेवू  लागतात. 
     भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मधुर वेणू वादनाने ब्रह्मदेवांना गायत्री मंत्र प्रदान केला आहे. 
                                            अनंगरंगसागर 
      भगवान श्रीकृष्ण विविध प्रेम तरंगांनी युक्त असा सागर आहेत. या पृथ्वीवरील सागर खाऱ्या  पाण्याचा असून त्यात विविध प्रकारचे तरंग उमटत असतात. वर्षा ऋतुत या सागराचे तरंग (लाटा ) भीषण रौद्र रूप धारण करतात. तर कधी सौम्य रूप. परंतु श्रीकृष्ण प्रेमसागर आहेत. ते आपल्या विविध लीलांद्वारे आपल्या भक्तांना प्रेमरस प्रदान करतात. श्रीकृष्ण अद्भुत प्रेमरससागर असून त्यात प्रामुख्याने शांतरस, दास्यरस, साख्यरस, वात्सल्यरस आणि माधुर्यरस त्यांच्या भक्तांना प्राप्त होत असतो. 
     विविध प्रकारचे प्रेमरस प्रदान करणाऱ्या  या अनंगरंगसागरातून दिव्य अमृताचा सर्वश्रेष्ठ रस आहे ' श्रीहरिनाम संकीर्तन!' श्री चैतन्य महाप्रभू सांगतात. "हे हरिनाम संकीर्तन दिव्य आनंद सागराचे सतत निरंतर वधर्न करीतय असते. ज्या अमृताची आस आपल्याला आहे त्या अमृताये पान आपण या संकीर्तनाने करू शकतो."             
                              नमामि कृष्णनागरम्
     नारदीय पुराणात भगवंतांच्या अर्चा विग्रहाना बघताच  क्षणी त्यांना प्रणाम करून त्यांचा  आदर करण्यासंबंधी  सांगितले आहे-
                              एकोअपि कृष्णाय  कृतः प्रणामो 
                                  दशाश्वमेधावभृथैर्न तुल्यः।
                             दशाश्वमेधी पुनरेति जन्म 
                                   कृष्णप्रणामी न पुनर्भवाय ।। 

      'श्रीकृष्णांना एकदा केलेला प्रणाम दहा अश्वमेध यज्ञ केल्याने मिळणाऱ्या  फळाहून अधिक श्रेष्ठ आहे. कारण दहा अश्वमेध यज्ञ करणारा परत जन्म घेतो, परंतु श्रीकृष्णांना प्रणाम करणारा पुनर्जन्म घेत नाही. " अन्य युगात संपन्न होणारे  अश्वमेध वा गोमेध यज्ञ कलियुगात निषिद्ध मानले आहेत. परंतु तरीही कोणी असे यज्ञ संपन्न करीत असेल तर त्यापासून प्राप्त होणारे फळ अल्प काळातच  नष्ट होते. अशा यज्ञ कर्त्यास   या पृथ्वीवर परत जन्म घ्यावा लागतो. तथापि, जर कोणी एकदाच  श्रीकृष्णांच्या अर्चा विग्रहांना नम्रपणे प्रणाम करील तर तो मनुष्य परत या भौतिक जगात जन्म घेणार नाही. त्याला अध्यात्मिक धामाची प्राप्ती होईल. 
लेखन सेवा - विनय शंकर गोडसे 
9242176587
                                   -----------------------------