गुरुवार, १९ जानेवारी, २०१७


Want Ram or Kaam (Sex)?


A lady vice chancellor of a university in Bengaluru, Karnatak has shown her intellectual bankruptcy recently by criticizing Vedic epics such as Ramayan and Mahabharata. She states that these epics have incidences that show women have been sexually exploited. The root cause of (today’s) atrocities on women is in these epics. This so called lady intellectual says that the reason for sexual exploitation of women by men is these scriptures! It is such a pity that our country is full of many such so called literate intellectuals. The fact is all these allegations have no base and are factually incorrect.
It has come to light recently that many editors, writers, journalists, judges, businessmen, ministers, politicians, doctors, sportsmen, police, so called saints are involved in sexual exploitation. But if minutely observed, you will find out that none of these sexophiles have read Ramayan or Mahabharata. They did not get the inspiration of sexual exploitation from these epics at all. In fact, those who read these scriptures, the will to sexually exploit women will not generate in their minds in the first place. On the contrary, even a literate man gets sexually incited if he has not received the preaching from these great novels. Because sex (‘Kaam’) resides in the mind of man. But Kaam (sex) doesn’t dwell in the minds of those men who have installed Ram in their minds.
Despite the fact that the increase in sexual crimes of late is the result of lack of great teachings from Ramayan and Mahabharata, the so called intellectuals attribute it on these epics. Nobody speaks about those who arouse sexual feelings in men by showing naked or half-naked women on TVs, cinemas, internet, newspapers or commercial advertizing. Women are condemned to atrocities like circumcision in the name of religion in countries like Iraq. Thousands of teenage girls in the Islamic countries of Africa have to bear severe pain when they are subjected to beating by wooden planks on their chests. Why? So that their breasts should not grow big and thereby attract the attention of men. These atrocities are taking place all over the world. Yet a whole lot of deft and guile communists, socialists, social reformers, truth seekers, blind faith opponents, politicians, egalitarians, feminists etc. have kept mum on the issue.
These hypocrites and people, who have not read even a single page of Ramayan, Mahabharat and the Vedas, Puranas, are very articulate on TV but these idiots don’t have an iota of real knowledge.
We have written this book in order to give great vision to those who do not have the divine knowledge of the Vedas. It can be seen by reading the epics like Ramayan and Mahabharata that kings and saints of that time had sought welfare of the society. Be it great Emperor Chandragupta Maurya or Vikramaditya, Maharana Pratap or Chhatrapati Shivaji, Queen of Jhanshi or Bhagat Singh, Chandrashekhar Azad, Shankaracharya, Madhvacharya, Ramanujacharya, Dnyaneshwar or Tukaram, Gadge Baba or Baba Ramdev, all the patriots and spiritual gurus have imbibed morality prescribed in the Ramayana, Mahabharata and Puranas. They have shown it through their thoughts, acts and proponents that a woman is just like deity.
It is exactly the opposite case with be it Nehru-Gandhi or Tiwari-Digvijay Singh and all the politicians and pseudo spiritual heads and so called religious gurus, which are found to be drenched in sexual acts . All these lecherous men don’t fear or feel ashamed about their sexual acts. Where there is no ‘Ram’, there is ‘Kaam’ (Sex) and it is our sincere effort to fight this immoral sexuality. One can praise or criticize this effort, but we surely make these hypocrites ashamed.
Vinay Godse

शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कोणी तरी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत !




१- हैद्राबादचा निजाम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  इस्लाम कबूल करण्यासाठी तीन कोटी रुपये देत होता, परंतु डॉ. बाबासाहेबांनी ते का घेतले नाहीत?

२- डॉ. बाबासाहेबांनी फाळणीच्या वेळी स्पष्ट सांगितले होते की पाकिस्तानातील हिंदूंना येथे सुरक्षित आणावे आणि येथील सर्व मुसलमानांना पाकिस्तानात सुरक्षित पाठवावे. पण असे का केले नाही?

३- फाळणी नंतर हजारो दलितांना कराचीत डांबून ठेवले, त्यांना इस्लाम कबूल करण्यास भाग पडले. ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले. त्यांना मरे पर्यंत वेठबिगर म्हणून राबवून घेतले. त्यांचे हालहाल करण्यात आले तरीही त्याविषयी कोणीच का बोलत नाही वा लिहिताही नाही?

४- डॉ. बाबासाहेबांनी वडाळ्याला सिद्धार्थ कॉलेज चालू केले त्यावेळी त्यांनी ब्राह्माण प्राध्यापक का ठेवले? इतरांना का संधी दिली नाही?

५- त्या काळी संसदेत स्वतंत्र भारताचा ध्वज कोणता असावा या वर चर्चा चालू होती. ८० टक्के खासदारांचे मत होते की प्राचीन काळापासून भारताचा ध्वज भगवा होता आणि आताही तोच असावा, पण नेहरूंचा त्यास विरोध होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी त्या काळच्या बलवान हिंदू संघटनेला सांगितले होते की, तुम्ही दोन हजार भगवे झेंडे घेऊन संसदेवर मोर्चा काढा आणि भगवा झेंडाच राष्ट्रध्वज झालाच पाहिजे या घोषणांनी संसद भवन दणाणून सोडा. मी संसदेत त्याची भक्कम मागणी करेन. मग त्यावेळी बलवान हिंदू संघटनेने तसे का केले नाही?

६- डॉ. बाबासाहेबांचे नातू गणपतीचे पूजन का करतात?

७- डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्या नंतर अमरावती आणि अकोला येथील  जे महार बांधव बौद्ध धर्म स्वीकारण्यास तयार नव्हते तेव्हा त्यांची घरेदारे का जाळण्यात आली?

८- मराठा माणूस स्वतःला मोठ्या अभिमानाने 'मराठा' म्हणवून घेतो. परंतु पुरोगामी, सत्यशोधक, समाजवादी, काँग्रेसी, ब्रिगेडी लेखक आपल्या पुस्तकातून मराठ्यांना बहुजन म्हणून का संबोधतात? मराठ्यांचे सत्व, अभिमान, पराक्रम, देशप्रेम इत्यादी  संपवण्याची चाल तर नाही ना?

९-  पुरोगामी, सत्यशोधक, समाजवादी, काँग्रेसी, ब्रिगेडी लेखक रामायण, महाभारत इत्यादी बनावट आहे असे बडबडतात, मग ते हीच पुस्तके का वाचतात? 

१०- विठ्ठल दगडाचा आहे तर मग खासदार आठवले त्याची आषाढी एकादशीला पूजा का करतात?

११- सर्व काही बामणांनी केले तर मग तेच महान होते असे आड मार्गाने सांगून हे बदमाश लेखक महान राजे, महाराजे वा सम्राटांना कमी का लेखतात?

१२- हे बदमाश लेखक सार्वजनिक स्थानी छत्रपती शिवरायांना महान म्हणतात आणि त्यांनी केलेल्या देवपूजेला, दानधर्माला, संतांच्या दिव्य शिकवणुकीची निंदा का करतात?

१३- देश रक्षणासाठी सीमेवर जाण्यासाठी आरक्षण का मागितले जात नाही?

१४- क्रिकेट सारख्या खेळात पवार साहेब आरक्षण का मागत नाहीत?

१5- आषाढी-कार्तिकीला लाखो वारकरी विठ्ठल भेटीच्या दर्शनाच्या दिव्य ओढीने पंढरपुरास पायी जातात. सरकार, पोलीस इत्यादींना त्यातून अतिरिक्त पैसा मिळतो. परंतु शासकीय पातळीवर विठ्ठल भक्तांची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्याकडे सरकारचे लक्ष्य न वेधता  पुरोगामी, सत्यशोधक, समाजवादी, काँग्रेसी, ब्रिगेडी लेखक वा पत्रकार, टी.व्ही. वाले तेथे साठलेल्या विष्ठे विषयीच का बोलतात?

 असे माझे अनेक प्रश्न आहेत. परंतु आपल्या डोक्यास ताण पडू नये म्हणून तूर्तास इतकेच पुरे आहेत. मग वाट कोणाची बघता ? डोकं असेल तर मग खाजवा आणि द्या समर्पक उत्तरे.  ही शब्दांची लढाई आहे शब्दांनीच लढूया. 

आपला शुभचिंतक 
विनय शंकर गोडसे 

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

                             अबब ! काय ही भोगयोग्याची माया?


विक्रम चौधरी हा भोगी सध्या अमेरिकेत पुष्कळच चर्चेत आहे. विश्वभर पसरलेल्या तब्बल ७०० योगा स्टुडियोचा मालक असलेला हा अब्जाधीश न्यायालयीन तडाख्यात साफ बुडाला आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली लॉस एंजिलिस न्यायालयाने त्याला ५०३ कोटी रुपयांची भरपाई देण्यास फरमावले  आहे. हे  प्रचंड घबाड त्याची  भूतपूर्व वकीलीण  मीनाक्षी बोडेन यांना मिळणार आहे आणि त्यावर बोनस म्हणून तिला विक्रमच्या ४३ अलिशान कारसुद्धा मिळणार आहेत.

कोलकत्यातून योग शिकवता शिकवता विक्रम अमेरिकेत पोहचला आणि आपले मायाजाल पसरविण्यास प्रारंभ केला. योग  शिकविण्यासाठी तो आपल्या  प्रत्येक  विद्यार्थ्याकडून ११.५ लक्ष रुपये शुल्क घेत असे. मदिरा आणि मदिराक्षींच्या आहारी जाऊन त्याने पाच सहस्त्रांपेक्षा अधिक स्त्रियांचा भोग घेतला होता.

७० वर्षाचा हा भोगगुरु सध्या अमेरिकेतून फरार आहे.

प्रचंड धनसंपदा आणि विविध प्रकारची इंद्रियतृप्तीची अनेकानेक साधने, सर्वप्रकारची नशा, मुक्त लैंगिक भोगाची सुविधा आणि मांसाहाराची रेलचेल असूनही अमेरिकेतील लोक समाधानी नाहीत. त्यामुळे ते लोक सतत आंतरिक समाधानाच्या शोधात असतात. त्यांच्या  या कमकुवतपणाचा लाभ उठवण्यासाठी अनेक तथाकथित भारतीय योगगुरु अमेरिकेस जात असतात. त्यातील अनेक जण प्रचंड प्रसिद्धी आणि पैसासुद्धा प्राप्त करतात.

वस्तुतः योग या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे भगवंतांशी तुटलेला संबंध परत जोडणे. परंतु अनेक तथाकथित ढोंगी गुरु शारीरिक कसरती करून सुडौल शरीर आणि भोगवृत्ती वृद्धिंगत करण्याचा प्रसार करतात. तर काही जण खोटा प्रचार करून, काही मंत्र  कानात सांगून लोकांना भ्रमित करतात की तुम्ही भगवान होऊ शकता
आणि लोक पैसा देऊन फसतात.

काही वर्षांपूर्वी रजनीश नामक पाखंडी मनुष्याने 'संभोगातून समाधीकडे' हा एक नवा अविष्कार करून अनेकांना फसवले होते. अनेक दिग्गज त्याच्या नादाला लागले आणि बरबाद झाले!

आजचा मानव विस्मृतीच्या गहन अंधकारात नाही. तो विशिष्ट देश, खंड, समाज, जाती-पाती, धर्म, यांनी जखडलेला नाही. त्याने संपूर्ण विश्वात भौतिक सुखसोयींमध्ये, भौतिक शिक्षणात, आर्थिक प्रगतीत, खाण्यापिण्यात, वस्त्रालंकार घालण्यात आणि अन्य अनेक प्रकारच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. तरीही मानवांमध्ये प्रचंड विषमता, भिन्नता दिसून येते. लैंगिक शोषणात बेसुमार वाढ झाली आहे.

सदैव कामरत असलेल्या भोगी विक्रम चौधरीची अवस्था आता अतिशय दयनीय झाली आहे. अशी अवस्था समस्त परस्त्री भोगींची होतच असते. महाभारतातील उद्योगपर्वत याचे यथार्थ वर्णन केलेले आहे -
       शीलं प्रधानं पुरूषे तद्यस्येह प्रणश्यति ।
       न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभि:।।
      "माणसाला शील (चारित्र्य) हेच मुख्य आणि महत्त्वाचे आहे. या जगात ज्याचे चारित्र्य नष्ट झाले त्याला जीविताचा, धनाचा अथवा नातलगांचा काहीही उपयोग नाही."



बुधवार, ४ जानेवारी, २०१७

                                            कामांध पुरुष 


न पश्यति जन्मान्ध कामान्धो नैव पश्यति ।
न  पश्यति मदोन्मतो ह्यर्थी दोषान्न  पश्यति।।
"जन्माने आंधळा असलेला पाहू शकत नाही. कामाधंसुद्धा  पाहू शकत नाही. मदाने धुंद झालेला  पाहू शकत नाही आणि धनवंतसुद्धा  पाहू शकत नाही." - चाणक्य पंडित

  ३१ डिसेंबरच्या मंदधुंद रात्री बंगळुरू सारख्या  प्रगत अन  भौतिक शिक्षणाच्या जोरावर लाखो रुपये प्राप्त करून देणाऱ्या नगरात मद्य प्राशन केलेल्या मुक्त तरुणींवर अति मद्य प्यालेल्या कामांध तरुणांनी अतिप्रसंग केल्याच्या अनेक घटना घडल्या! अशाच काही उत्तेजक घटना भारतातील काही महानगरातून आणि उपनगरातूनही घडल्या. टी. व्ही., इंटरनेट, मोबाईल वरून सर्वत्र याचा प्रसारही वेगाने झाला आणि स्त्री स्वातंत्र्य, तिची सुरक्षा वा सरकारी गलथानपणा यावरून चर्चा, टिपण्या झडू लागल्या. कर्नाटकाच्या गृहमंत्र्याने निर्ल्लजपणे टिपणी केली, " नववर्षाची संध्याकाळ आणि नाताळ या दिवशी अशा घटना होतातच. आम्ही शक्य ती काळजी घेतो."
      अशी काळजी घेण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्यावेळी अशा घटना घडत होत्या त्यावेळी तेथे १५०० पोलिसांची लक्षणीय उपस्थिती होती आणि त्यांनी बघ्याची भूमिकासुद्धा पार पडली. यावर गदारोळ झाल्यावर नगर पोलीस आयुक्तानी मल्लिनाथी केले, "अशाप्रकारच्या विनयभंगाची तक्रारच आलेली नाही!" आयुक्त हा गृहमंत्र्याचाच पोपट असल्यामुळे तोही त्यांचीच री ओढणार!
   कलियुगात अशा घटना प्रचंड प्रमाणात घडणार असे वर्णन वेद शास्त्रातून केलेले आहे आणि त्यावर मात करण्यासाठी प्रभावी उपायसुद्धा सांगितलेले आहेत. पण त्यांच्याकडे दूर्लक्ष करून स्वतः ला प्रगत आणि स्वतंत्र समजणाऱ्यांना  जागे कोण  करणार?
        जन्माने आंधळा मनुष्य पाहू शकत नाही, हे तर सर्वच डोळस माणसांना माहित आहे. परंतु जो कामवासनेने पीडित आहे, ज्याने नशापान केले आहे आणि ज्याच्या ढुंगणाखाली बापजाद्यांचा फुकटचा पैसा आहे असा मस्तवाल मनुष्यसुद्धा डोळे असूनही पाहू शकत नाही.
      आताची  समाज व्यवस्था  'यथा प्रजा तथा राजा' अशी आहे. स्त्री असो वा पुरुष सर्वांनाच स्वैर वागायचे आहे. त्यांना कसलीच बंधने नकोत. जो कोणी आमच्या इंद्रियतृप्तीला साहाय्य करेल त्यालाच आम्ही मत देवून आमचा राजा (लोकप्रतिनिधी ) म्हणून निवडू आणि त्याने आमच्या स्वैराचाराला विरोध केला तर मात्र त्याला धूळ चारू. त्यामुळे सत्तान्ध मनुष्य मोठ्या चतुराईने अशा लोकांच्या स्वैराचाराला पूर्णपणे पाठिंबा देतो आणि आपली सत्ता पिपासा पूर्ण करतो. त्यामुळे जसे लोक तसे त्यांचे प्रतिनिधी! एकमेकांना पूरक.
परंतु प्राचीन भारतीय संस्कृतीत असे नव्हते. अगदी छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातही असली थेर मुळीच नव्हती. त्याकाळी 'यथा राजा तथा प्रजा' अशी समाज रचना होती. छत्रपती शिवराय स्वतः निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे होते. तसा त्यांचा दंडकच होता. त्यामुळे त्यांच्या घरात, सैन्यात आणि प्रजेत त्यांचे पालन केले जात होते. पण आता असे होणार नाही, कारण सर्वच पक्ष आणि त्यांची सरकारे बरबटलेली आहेत.
             प्रशासकीय अधिकारी, पोलीस,  डॉक्टर, वकील, न्यायाधीश, योगगुरु, पाद्री, मुल्ला-मौलवी, खेळाडू इत्यादी सर्वच क्षेत्रातील पुरुष आणि स्त्रिया कामवासनेने पीडित आहेत. या कामाग्नीत भर घालण्यासाठी प्रगत स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आहेत.
             पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्यांत स्वतःला धान्य मानणाऱ्या लोकांचे प्राबल्य अतिशय वेगाने वाढत आहे त्यामुळे त्यातून उत्पन्न होणारे दुष्परिणामही भोगावेच लागणार यात तिळमात्र शंका नाही. जे आई बाप आपल्या वयात येणाऱ्या मुलीला भाकरी भाजावयास लावत नाहीत त्यांना त्या मुलीपासून आयुष्यभर चटके खावेच लागणार. प्रगतीच्या नावाखाली मुलींनी तोकडे कपडे घातल्यावर मुले चेकाळणाराच! तुम्ही असे म्हणूच शक्यत  नाही, 'आमच्या मुलीने तोकडे वा लांडे कपडे घातले तरी तुमच्या मुलाला मात्र आवरा. त्याला मुलीशी कसे वागावे हे शिकवा.'  अहो, जरा विचार करा, तुम्ही पुरुषांच्या तोंडासमोर चिंचा हलवणार आणि अपेक्षा करणार कि आम्ही असे केले तरी  त्यांच्या  तोंडाला पाणी सुटताकामनाये, पाणी सुटत असेल तर त्यांनी लाळ  प्रसविणाऱ्या ग्रंथीच कापून टाकाव्यात! हे कसे काय शक्य आहे?



     अवधूत गीता सांगते -
     अग्निकुण्डसमा नारी घृतकुंभसमो नरः ।
     संसर्गेण विलीयेत तस्मातां परिवर्जयेत ।।
"स्त्री ही प्रज्वलित अग्निकुंडासमान असून पुरुष घट्ट झालेल्या तुपासमान असतो. जर दोघांच्यात जवळीक आली तर पुरुष विरघळल्याविना राहणार नाही."
    आजची उफाडी तरुणी विचार करते की, 'मी कसलेही कपडे घालेन, माझे सुडौल शरीर मुसमुसलेले असेलही, त्याने तिचे शरीर जरी कामोत्तेजक वाटत असले तरी पुरुषाने तिच्याकडे केवळ आकर्षित व्हावे, पण त्याने तिच्या अंगचटीला लागता कामा नये. त्याने असे वागणे म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण कारणे , आमचे लैंगिक शोषण करणे ठरेल. परंतु असे असले तरी एकदा धर्ममर्यादा ओलांडल्यावर पुरुषातील कामाग्नी कोणाचाही आणि कशाचाही विचार करीत नाही. तो आपला कुप्रभाव तीव्रतेने दाखवणाराच! त्यामुळे तरुणींनी आपले शील सांभाळत नेहमी स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तुम्ही कशाही वागणार आणि पुरुषांना, पोलिसांना, शासनाला वा भारतीय संस्कृतीला मात्र दोष देणार?
     तरुणी पुरुषांनाच दोष का देतात? कारण त्या सर्वांचे उत्तरदायित्व पुरुषांवर असते.

     महाभारताच्या शांतिपर्वात(२६६. ४०) सांगितले आहे -
     नापराधोअस्ति  नारीणां नर एवापराध्यति ।
     सर्वकार्यापराध्यत्वात नापराध्यन्ति  चांगनाः ।।
    "स्त्रिया वाईट मार्गाला लागल्या तर त्यात त्यांचा कसलाही अपराध नाही. याबाबतीत पुरुष सर्वस्वी दोषी असतो. अशा प्रकारच्या सर्व उदाहरणांमध्ये प्रथम अपराध पुरुषांकडून होत असल्यामुळे स्त्रियांना दोष देता येत नाही."
   पुरुषप्रधान व्यवस्था मोडून काढली पाहिजे असा आरडाओरडा करणाऱ्या मुक्त स्त्रिया मात्र कठीण  प्रसंगी स्वबळावर विसंबून न राहता पुरुषांच्या सभ्यतेची तत्काळ अपेक्षा करतात! हा त्यांचा आपलपोटेपणा आहे याचे त्यांना भान नसते.
      आजच्या तथाकथित प्रगत समाजात अतिशय दोषपूर्ण घटक सक्रिय झाले आहेत. ते नेमके कोणते, यावर भाष्य करताना ट्रिटिंग पोर्नोग्राफी अडिक्शनचे डॉ. केविन स्कीनर म्हणतात, "आजकाल प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्या चेतनेवर होणारा कामुकतेचा भडीमार संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात इतका कधीच झाला नव्हता. कामवासना चाळवणारे घटक आणि कामवासनेच्या प्रभावाला आपण सर्वजण बळी पडत असल्यामुळे आजचा समाज डोळ्यांदेखत अधोगतीला जात असल्याचे आपण पाहू शकत नाही. आजच्या अशा कामवासनेला बळी पडलेले कोट्यवाधी लोक असतील."
  आदरणीय सिंधुताई सपकाळ म्हणतात, "पूर्ण शरीर झाकेल इतके कपडे स्त्रीजातीने घालावयास हवे तेव्हाच समाज हा सत्कार करेल, नाहीतर बलात्कार हे होताच राहतील."

   

         

अज्ञानी 

अति उत्साही आणि शास्त्रज्ञानहीन लोकांना काय करावे आणि काय करू नये याचे भान राहिलेले नाही. गुरु, साधू आणि शास्त्र  यांची पर्वा न करता लोक आपल्या मनाप्रमाणे भक्ती करू इच्छितात. परंतु त्यांच्या अशा वागण्यामुळे समाजात  केवळ गोंधळ निर्माण होत आहे याची त्यांना पर्वा नसते. 

महान श्रीकृष्ण भक्त आणि आचार्य श्रीपाद रूप गोस्वामी भक्तिरसामृतसिंधू  नामक ग्रंथात लिहितात - 

                             श्रुतिस्मृति पुराणादि पञ्चरात्रविधिं  विना ।                            एकान्तिकी हरेरभक्तिरूत्पातायैव कल्पते ।।

' उपनिषद, पुराण, नारद पञ्चरात्र  इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्यांची उपेक्षा करून जी भगवद्भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पाताच आहे.'


भगवदगीता आणि भागवत पुराणातून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना काय आवड़ते आणि नावडते यांचे स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. असे असूनही लोक आपल्या मनाप्रमाणे करू इच्छितात, अर्थात ते लोक स्वतःच्या मनाला प्रसन्न करू इच्छितात किंवा ते भगवंतांना न शृंगारता आपल्या मनाला शृंगारतात. त्यामुळे ते भगवंतांना आपल्यापासून दूर ठेवतात. आपण काय करावे आणि काय करू नये याचे भान या मूढ लोकांना  नसते. हे लोक आपल्या मनाच्या रथात बसून सर्वत्र धावत असतात. 

कलियुगाचा प्रभाव दिवसेंदिवस कसा वाढत चालला आहे हे आपण या सर्व घटनांमधून जणू शकतो. आज मुंबई सारख्या महानगरातील धनाढ्य आणि धर्मज्ञानहीन मस्तवाल हिंदू लोक आपल्या घरातून ख्रिस्त्यांची अंधश्रद्धा जोपासताना दिसून येत आहेत. हे मूर्ख लोक हिंदूंच्या श्रद्धांना नाक मुरडतात आणि ख्रिसमस ट्री वा सांताक्लॉज सारख्या अंधश्रद्धांचे मात्र अवडंबर माजवतात. 

तसेच पाश्चिमात्यांचे अंधानुकरण कसे वाढत आहे हेही आपण जाणले पाहिजे. ख्रिस्ती मिशनरी कश्याप्रकारे आपला खोटा धर्म हिंदूंच्या गळी उतरवीत आहेत हेही प्रकर्षाने कळून येते. मूर्ख हिंदू ओल्ड मॅन जाळतात, दारू ढोसून धिंगाणा घालतात वा केक हादडतात. गोव्यात तथाकथित उच्च वर्णीय तरुण- तरुणी तोकडे कपडे घालून नंगानाच करतात आणि स्वतःला धन्य मानतात. परंतु आपण कधी ख्रिस्त्यांना वा मुसलमानांना हिंदू सणासुदीला रांगोळी घालताना, मोदक खाताना, आंब्याची तोरणे बांधताना पहिले आहे का? 
त्यांच्या सणाला हिंदू शुभेछया देतात, पण ते कधी हिंदू सणाला होर्डिंग्ज लावतात का? त्यांचे नेते वा पाद्री - मुल्ला मौलवी हिंदूंचे अभिनंदन करतात का? जरा विचार करा! मात्र हिंदू पुढारी वा बडी धेंडे हिंदूंचीच भलावण करताना थकत नाहीत. कलियुगाचा प्रभावच मोठा विचित्र आहे. 

श्री व्यासदेव युधिष्ठिर महाराजांना सांगतात-
         अधर्मरूपो धर्मो हि कश्चिदस्ति नाराधिप ।
         धर्मश्चा धर्मरूपोअस्ति तच्च  ज्ञेयं विपश्चिता ।।
" हे राजा, कधी कधी धर्मालाच अधर्माचे रूप येते आणि अधर्मच धर्माचे रूप धारण करत असतो; हि गोष्ट ज्ञानी मनुष्याने लक्षात ठेवली पाहिजे. -महाभारत, शांतिपर्व ३३.