बावळट कोण ?
लहानपणी १९७५ मध्ये मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई बघण्यासाठी मामा-मावशीकडे गेलो होतो. काही दिवस गिरगांवला मावशीकडे आणि काही दिवस ठाण्याला मामाकडे अशी दोन्हीकडे दिवाळी केली. परंतु गावाकडील शिवरायांचे किल्ले बनविण्याचा आनंद मुंबईत मिळाला नाही.
सावंतवाडी सारख्या कोकणातील लहानशा टुमदार आणि डोंगरांनी-झाडाझुडपांनी वेढलेल्या गावापेक्षा मुंबापुरी प्रचंड मोठी होती. तेथील सर्वच गोष्टी अतर्क्य वाटत. मावशीचे नोकरीला जाणे आणि दिवसभर घरात नसणे मोठे गमतीचे वाटे. माझा मावसभाऊ माझ्यापेक्षा लहान असून आकाराने मोठा होता. येता जाता सारखा चरत असे आणि मलाही त्याचे विविध खाऊ देत असे. पण कोकणातील आमच्या घरी असे काही नव्हते. वेळच्या वेळी असे. त्यामुळे सारखे खाणे जमत नसे. त्यामुळे मुंबईत मी बावळट झालो. येता जाता सर्वजण म्हणत, काय पण बावळट आहे!'
चौपाटी असो वा हँगिंग गार्डन सर्वच ठिकाणी मुंबईकर मोठे हुशार! आम्ही मात्र बावळट पदवी प्राप्त! आई-वडील गावांकडे, ताई मात्र लगेचच स्मार्ट झाली. तेथे आमच्या बावळटपणाला मायेने सावरणारे कोणीच नव्हते. कधी एकदा दिवाळीची सुट्टी संपते आणि गावाकडे सावंतवाडीला जातो असे झाले.
बालपणी 'झुकझुक गाडीतून मामाच्या गावाला जाऊया' असे काही तरी गाणे रेडिओवर ऐकून मामाच्या गावचे आकर्षण वाटे; मात्र प्रत्यक्षात मामाच्या गावी ठाण्याला आल्यावर मात्र भ्रमनिरास झाला. तेथेही 'काय पण बावळटच आहे!' या पालुपदाने मन खट्टू झाले; पण उलट बोलण्याची सोयच नव्हती. कसे बोलणार? सडेतोड उत्तर देण्याच्या बाबतीत आम्ही परत बावळटच होतो ना!
माझी मामे बहिण बोलण्यात मोठी फटाकडी; त्यांच्या इमारतीला लागूनच एक पटांगण होते. त्याकाळी भाषणबाजीला रात्रीच्या वेळेचे बंधन नव्हते. पुष्कळ उशीरापर्यंत भाषणे चालत. एकदातर या मामेबहिणीने कमालच केली. अत्रेंचे भाषण रात्री ११ नंतर रंगात आले होते. त्यावेळी आमची मामेताई अत्र्यांना उद्देशून मोठ्याने ओरडली 'अहो! अत्रे आम्हाला झोपायचे आहे. बंद करा तुमची बडबड!'
मुंबई-ठाण्याचे लोक मोठे धाडसी अन् हुश्शार! दोन्ही हात पसरले की यांचे घर संपले. पण काय त्यांचा रुबाब - स्वतःचा फ्लॅट ना! आम्ही आपले गावाकडच्या कौलारू घरातील भाडेकरू म्हणजे बावळटच! काय त्यांचे कपडे, काय त्यांचा पैसा, मोठे कौतुकच! चौपाटीवर भेळ खाणे किती आत्मप्रौढिचे! पण सागराच्या लाटाच तेवढ्या भेळ बोकांडत बघायच्या! तेथे शंख शिंपले पण विकले जात होते. जे आम्ही रेडीच्या समुद्र किनाऱ्यावर हवे तेवढे फुकट गोळा करू! समुद्रात मनोसोक्त डुंबू, कसलेच बंधन नसे. पण मुंबईतील लोक मात्र लांबूनच लाटा बघत. हे असे का? हे आम्हाला लहानपणी कळत नसे; कारण आम्ही बावळट!
शेवटी एकदाची दिवाळीची सुट्टी संपली आणि आम्ही सावंतवाडीला आलो आणि करटी ढूंमचा खेळ मोठ्या आनंदाने खेळू लागलो.
पण मनास मात्र एकच टोचणी लागून राहिली होती की, मुंबईकारांपुढे आम्ही बावळटच! त्यांना प्रत्युत्तर देऊ न शकणारा एक बावळट!
वर्षामागून वर्षे गेली पण हा बावळटपणाचा वेताळ आमच्या मानगुटीवरून काही केल्या उतरेना! हळूहळू वर्तमानपत्रातून मुंबईच्या वार्ता कळू लागल्या. साखळी बॉम्ब स्फोट, हिंदू-मुस्लिम दंगे इत्यादी वार्ता कळू लागल्या आणि एक दिवस कुठे तरी वाचण्यात आले की, पाकिस्तानने दाऊद टोळी मार्फत हे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या आधी त्यांची योजना होती की, मुंबई महानगरीला जोडणारे रेल्वे पूल, महामार्गावरील पूल आणि पाण्याची पाईपलाईन इतकेच उद्ध्वस्त करायचे, म्हणचे मुंबईचा खेळ खल्लास! मुंबई खल्लास म्हणजे भारत खल्लास! हसके लिया पाकिस्तान बम्बसे लेंगे हिंदुस्थान!!! पण बेनझिर भुट्टो घाबरली, असे केले तर जगभर पाक नापाक होईल. तिने परवानगी नाकारली आणि साखळी बॉम्बस्फोटाला अनुमती दिली. खरे-खोटे अल्लाच जाने!
मुंबईच्या अशा सर्व लीला ऐकून आमच्या मनात मात्र वादळे वाहू लागली. या वादळांनी आमच्या मानगुटीवर बसलेल्या बावळट नामक ब्रह्मसंबंधाला मात्र पार उडवून दिले. एके काळच्या बावळट मनात विचारांचे धुमारे फुटू लागले.
मागील हजार बाराशे वर्षांपासून पवित्र कुराणाच्या आदेशानुसार प्रत्येक तुर्की, इराकी, पठाणी, अफगाणी, अरबी, मोगली आणि पाकिस्तानी मुसलमान संपूर्ण जगाला 'दार-उल-इस्लाम' बनविण्यासाठी मोठ्या इनामे इतबारे कोशिश करीत आहेत. अल्ला मेहेरबान आहे. त्यामुळे आता जल्द भारताचे 'मुगलीस्तान ' आणि मुंबईचे 'मुस्लमाबाद' होणार हे निश्चित! जगाची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे आणि न घडो, पण तसे झाले तर मग या मुंबईतील हुश्शार-स्मार्ट लोकांचे काय होणार? लहानपणी आम्हाला कळत नव्हते. अरे , यांना पिण्याचे पाणी गांवाकडून जाते. भाजी-पाला, फळ-फळावळ , अन्नधान्य, फुले सर्व काही बावळटांच्या गावाकडून जाते. मग यांच्या कारखान्यातून काय पिकते? नट बोल्ट! छान छान कपडे बनतात, पण कापूस तर गावाकडूनच जातो ना?
गावाकडच्या शेतकऱ्या एवढी छाती नसली तरी त्याच्या चारपट पोट असलेले हे महानगरातील लोक मॉलमधील साठवलेले अन्न किती दिवस खाऊ शकतात. कितीही 'स्मार्ट सिटी' बनल्या तरी कुकरमध्ये नोटा वा नटबोल्ट शिजवून खाता येत नाहीत आणि हो पाकिस्तान असो वा आय. एस. ते बॉम्ब फेकणार महानगरांवर, तेथील उत्तुंग इमारतींवर, तेथील फ्लाय ओहरवर! रस्ते उद्ध्वस्त, कारखाने उद्ध्वस्त, पाणी नाही प्यायला, अन्न नाही खायला; अहो श्वास घ्यायला गावाकडची शुद्ध हवा पण नाही.
मग सांगा पाहू बावळट कोण?
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७
लहानपणी १९७५ मध्ये मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई बघण्यासाठी मामा-मावशीकडे गेलो होतो. काही दिवस गिरगांवला मावशीकडे आणि काही दिवस ठाण्याला मामाकडे अशी दोन्हीकडे दिवाळी केली. परंतु गावाकडील शिवरायांचे किल्ले बनविण्याचा आनंद मुंबईत मिळाला नाही.
सावंतवाडी सारख्या कोकणातील लहानशा टुमदार आणि डोंगरांनी-झाडाझुडपांनी वेढलेल्या गावापेक्षा मुंबापुरी प्रचंड मोठी होती. तेथील सर्वच गोष्टी अतर्क्य वाटत. मावशीचे नोकरीला जाणे आणि दिवसभर घरात नसणे मोठे गमतीचे वाटे. माझा मावसभाऊ माझ्यापेक्षा लहान असून आकाराने मोठा होता. येता जाता सारखा चरत असे आणि मलाही त्याचे विविध खाऊ देत असे. पण कोकणातील आमच्या घरी असे काही नव्हते. वेळच्या वेळी असे. त्यामुळे सारखे खाणे जमत नसे. त्यामुळे मुंबईत मी बावळट झालो. येता जाता सर्वजण म्हणत, काय पण बावळट आहे!'
चौपाटी असो वा हँगिंग गार्डन सर्वच ठिकाणी मुंबईकर मोठे हुशार! आम्ही मात्र बावळट पदवी प्राप्त! आई-वडील गावांकडे, ताई मात्र लगेचच स्मार्ट झाली. तेथे आमच्या बावळटपणाला मायेने सावरणारे कोणीच नव्हते. कधी एकदा दिवाळीची सुट्टी संपते आणि गावाकडे सावंतवाडीला जातो असे झाले.
बालपणी 'झुकझुक गाडीतून मामाच्या गावाला जाऊया' असे काही तरी गाणे रेडिओवर ऐकून मामाच्या गावचे आकर्षण वाटे; मात्र प्रत्यक्षात मामाच्या गावी ठाण्याला आल्यावर मात्र भ्रमनिरास झाला. तेथेही 'काय पण बावळटच आहे!' या पालुपदाने मन खट्टू झाले; पण उलट बोलण्याची सोयच नव्हती. कसे बोलणार? सडेतोड उत्तर देण्याच्या बाबतीत आम्ही परत बावळटच होतो ना!
माझी मामे बहिण बोलण्यात मोठी फटाकडी; त्यांच्या इमारतीला लागूनच एक पटांगण होते. त्याकाळी भाषणबाजीला रात्रीच्या वेळेचे बंधन नव्हते. पुष्कळ उशीरापर्यंत भाषणे चालत. एकदातर या मामेबहिणीने कमालच केली. अत्रेंचे भाषण रात्री ११ नंतर रंगात आले होते. त्यावेळी आमची मामेताई अत्र्यांना उद्देशून मोठ्याने ओरडली 'अहो! अत्रे आम्हाला झोपायचे आहे. बंद करा तुमची बडबड!'
मुंबई-ठाण्याचे लोक मोठे धाडसी अन् हुश्शार! दोन्ही हात पसरले की यांचे घर संपले. पण काय त्यांचा रुबाब - स्वतःचा फ्लॅट ना! आम्ही आपले गावाकडच्या कौलारू घरातील भाडेकरू म्हणजे बावळटच! काय त्यांचे कपडे, काय त्यांचा पैसा, मोठे कौतुकच! चौपाटीवर भेळ खाणे किती आत्मप्रौढिचे! पण सागराच्या लाटाच तेवढ्या भेळ बोकांडत बघायच्या! तेथे शंख शिंपले पण विकले जात होते. जे आम्ही रेडीच्या समुद्र किनाऱ्यावर हवे तेवढे फुकट गोळा करू! समुद्रात मनोसोक्त डुंबू, कसलेच बंधन नसे. पण मुंबईतील लोक मात्र लांबूनच लाटा बघत. हे असे का? हे आम्हाला लहानपणी कळत नसे; कारण आम्ही बावळट!
शेवटी एकदाची दिवाळीची सुट्टी संपली आणि आम्ही सावंतवाडीला आलो आणि करटी ढूंमचा खेळ मोठ्या आनंदाने खेळू लागलो.
पण मनास मात्र एकच टोचणी लागून राहिली होती की, मुंबईकारांपुढे आम्ही बावळटच! त्यांना प्रत्युत्तर देऊ न शकणारा एक बावळट!
वर्षामागून वर्षे गेली पण हा बावळटपणाचा वेताळ आमच्या मानगुटीवरून काही केल्या उतरेना! हळूहळू वर्तमानपत्रातून मुंबईच्या वार्ता कळू लागल्या. साखळी बॉम्ब स्फोट, हिंदू-मुस्लिम दंगे इत्यादी वार्ता कळू लागल्या आणि एक दिवस कुठे तरी वाचण्यात आले की, पाकिस्तानने दाऊद टोळी मार्फत हे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या आधी त्यांची योजना होती की, मुंबई महानगरीला जोडणारे रेल्वे पूल, महामार्गावरील पूल आणि पाण्याची पाईपलाईन इतकेच उद्ध्वस्त करायचे, म्हणचे मुंबईचा खेळ खल्लास! मुंबई खल्लास म्हणजे भारत खल्लास! हसके लिया पाकिस्तान बम्बसे लेंगे हिंदुस्थान!!! पण बेनझिर भुट्टो घाबरली, असे केले तर जगभर पाक नापाक होईल. तिने परवानगी नाकारली आणि साखळी बॉम्बस्फोटाला अनुमती दिली. खरे-खोटे अल्लाच जाने!
मुंबईच्या अशा सर्व लीला ऐकून आमच्या मनात मात्र वादळे वाहू लागली. या वादळांनी आमच्या मानगुटीवर बसलेल्या बावळट नामक ब्रह्मसंबंधाला मात्र पार उडवून दिले. एके काळच्या बावळट मनात विचारांचे धुमारे फुटू लागले.
मागील हजार बाराशे वर्षांपासून पवित्र कुराणाच्या आदेशानुसार प्रत्येक तुर्की, इराकी, पठाणी, अफगाणी, अरबी, मोगली आणि पाकिस्तानी मुसलमान संपूर्ण जगाला 'दार-उल-इस्लाम' बनविण्यासाठी मोठ्या इनामे इतबारे कोशिश करीत आहेत. अल्ला मेहेरबान आहे. त्यामुळे आता जल्द भारताचे 'मुगलीस्तान ' आणि मुंबईचे 'मुस्लमाबाद' होणार हे निश्चित! जगाची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे आणि न घडो, पण तसे झाले तर मग या मुंबईतील हुश्शार-स्मार्ट लोकांचे काय होणार? लहानपणी आम्हाला कळत नव्हते. अरे , यांना पिण्याचे पाणी गांवाकडून जाते. भाजी-पाला, फळ-फळावळ , अन्नधान्य, फुले सर्व काही बावळटांच्या गावाकडून जाते. मग यांच्या कारखान्यातून काय पिकते? नट बोल्ट! छान छान कपडे बनतात, पण कापूस तर गावाकडूनच जातो ना?
गावाकडच्या शेतकऱ्या एवढी छाती नसली तरी त्याच्या चारपट पोट असलेले हे महानगरातील लोक मॉलमधील साठवलेले अन्न किती दिवस खाऊ शकतात. कितीही 'स्मार्ट सिटी' बनल्या तरी कुकरमध्ये नोटा वा नटबोल्ट शिजवून खाता येत नाहीत आणि हो पाकिस्तान असो वा आय. एस. ते बॉम्ब फेकणार महानगरांवर, तेथील उत्तुंग इमारतींवर, तेथील फ्लाय ओहरवर! रस्ते उद्ध्वस्त, कारखाने उद्ध्वस्त, पाणी नाही प्यायला, अन्न नाही खायला; अहो श्वास घ्यायला गावाकडची शुद्ध हवा पण नाही.
मग सांगा पाहू बावळट कोण?
© लेखन सेवा - विनय शंकर गोडसे , बेळगांव
संपर्क : ९२४२१ ७६५८७